राज्यपालांचा अपमान ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरे

aadiya thakre on bhagatsingh koshiyar
                 मंडळी भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये केलेलं वादग्रस्त विधान हे महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलं आहे. कोश्यारी यांनी भाषणादरम्यान म्हटलं की,
 
 
” जर रामदास नसते तर शिवरायांना कुणीही विचारलं नसत.”
 
 
अस विधान केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना सम्पूर्ण महाराष्ट्राभरातून शिवप्रेमींकडून विरोध होत आहे. दुसरीकडे राज्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून या अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणाच्यावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं भाषण अवघ्या दोन मिनीटांमध्ये आटोपत घ्यावं लागलं. मात्र आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. 
 



काय म्हणाले आदित्य ठाकरे?

 
 

            मंडळी शिवरायांच्या नावाचा वापर हा राजकीय लोकांनी नेहमीच राजकारण करण्यासाठी वा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल याचा निषेधच आहे.
 
 
मात्र आदित्य ठाकरे यांनी कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. म्हणजे त्यांचं कोश्यारी यांच्या विधानाला समर्थन आहे. हे यावरून स्पष्ट होत.
 
 
आदित्य ठाकरे म्हणाले की,
 
 
” ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.राज्यपालांनी निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी निघून जाणे, हे सगळं अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टीचा धक्का बसला आहे.”
 
 
 
अस आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे. आता पुढील चित्र काय असणार. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *