मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दिवसेंदिवस बराच ट्विस्ट येत आहे. त्याच कारण अस की, आता महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी हे लढाई वेगात चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत, तर भाजप नेते महाविकास आघाडी नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत.
मात्र आता कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आपली भाजपसंबंधी भविष्याच्या वाटचालीविषयी म्हटलं की,
” जो व्यक्ती आपल्यावर अन्याय करतो, आपल्याशी जबरदस्ती करतो आपण त्याच्याशी मैत्री करत नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाची भूमिका पण तेच आहे म्हणून भविष्यात त्यांच्याशी युती होणे शक्य नाही.”
अस अदित्य ठाकरे यांनी विधान केले आहे. तर या संपूर्ण विधानावर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे.
काय म्हणाले दरेकर?
मंडळी भाजप नेहमी अन्याय करत आली असल्याकारणाने त्यांच्यासोबत भविष्यात युती होणे शक्य नाही. अस विधान आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप नेते यांनीसुद्धा आदित्य ठाकरे यांना टोला देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की,
” शिवसेनेन नेहमी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे. मग अशामध्ये भाजप शिवसेनेपुढे कधीच युतीचा प्रस्ताव ठेवूच शकत नाही.’
अस प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा उद्धव ठाकरे नेहमी पाठीमध्ये खंजर खुपसत आली आहे. अस विधान केलं होत. मात्र प्रविण दरेकरांच्या या प्रतिक्रियेवर आता शिवसेना काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.