आणि बाबरी पाडल्या गेली…

बाबरी

मंडळी हा भारतीय देश विविध जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो. मात्र कधी वेळ अशी येते की या देशातील जाती धर्मांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्थिरतेला पारावार राहत नाही.

 

आपल्या राजकीय हितासाठी राजकीय नेतेमंडळी समाजामध्ये भडकाऊ भाषणाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असच काही घडलं होत प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये.

 

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?

 

सण १५२८ मध्ये मुगल बादशहा सेनापती मीर बाकीने बाबरी मस्जिदच निर्माण केलं होतं. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांनी ही मस्जिद पाडण्याचा अट्टहास धरला होता. सण १९८४ ला विश्व हिंदू परिषदेने दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये धर्म संसद घेऊन बाबरी मस्जिदीविरोधात आंदोलन उभं केलं होतं.

 

सण १९८६ ला फैजाबादच्या जिल्हा जज यांनी बाबरी मस्जिद ही वादामध्ये अडकलेली आहे असा शिक्कामोर्तब केला होता. याच मुद्द्याला जोर देऊन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सण १९९०ला संपूर्ण भारतीय देशामध्ये रथयात्रा काढून लोकांची मने भटकवण्याचा प्रयत्न केला होता.

 

आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव

 

लालकृष्ण आडवाणी यांच्या या राजकीय कटाला बळी पडून ३० ऑक्टोबर १९९० ला अनेक हिंदुत्ववादी लोकं बाबरीकडे मोर्चा घेऊन धावून आली. हा सर्व गोंधळ बघून तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी पोलीस प्रशासनाला फायरिंगची ऑर्डर दिली. ज्यामध्ये १६ लोकं मारल्या गेली.

 

 

अखेर तारीख आली ६ डिसेंबर १९९२. गोळीबारामध्ये मारल्या गेलेल्या १६ लोकांच्या समर्थकांनी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरीवर धाबा चढवला आणि बाबरी मस्जिद पाडण्यात आली. मस्जिद पाडून त्याठिकाणी अस्थायी मंदिर बनवण्यात आले.

 

ही घटना घडल्यानंतर गुन्हेगार लोकांवर दोन एफआयआर दाखल केल्या गेल्या. त्यामधील पहिल्या एफआयआरमध्ये चोरी करणे, हल्ला करणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळाला ठेस पोहचवण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंगदल समवेत भारतीय जनता पक्षाच्या ८ नेत्यांवर भडकाऊ भाषण देण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले.

 

ज्यामध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, अशोक सिंघल, विनय कठिया आणि मुरलीमनोहर जोशीसारखी नावे सामील होती. अशा प्रकारे ६ डिसेंबर १९९२ ला घडलेली ही घटना देशाच्या एकतेला काळिमा फासणारी ठरली.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *