दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

बाळासाहेब ठाकरे

मंडळी आनंद दिघे हे नाव बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण जनतेला आजही ज्ञात आहे. मात्र आनंद दिघेंना जनता जेव्हापासून ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली तेव्हापासून शिवसेनेत आंतरीक वाद उदयास आले होते.

 

तर मंडळी झालं असं की, आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

 

आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

 

जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते.

 

प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती.

 

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

 

या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं. याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,

 

” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”

 

दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,

 

” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”

 

यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,

 

” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.” 

 

दिघेंच्या अंतीमयात्रेत बाळासाहेब ठाकरेंची गैरहजेरी

 

 

मंडळी दिघे यांचा ठाण्यातील सिंघाणिया रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला अचानक मृत्यू हा शिवसैनिकांच्या मनात संशय निर्माण करणारा होता. ज्यावरून हजारो शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी दिघेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण रुग्णालय जाळून टाकलं होतं.

 

याच कारणामुळे पोलीस प्रशासनाने बाळासाहेब ठाकरे यांना दिघेंच्या अंतिमयात्रेत सामील झाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी ताकीद दिली होती. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे आंनद दिघेंच्या अंतिमयात्रेत गैरहजर होते.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *