मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

मोदी

मंडळी अस म्हणतात की

 

“राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर विश्वास करायचा नसतो मग परक्यांवर कसा करायचा?”

 

गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

 

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

 

विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

 

शेवटपर्यंत सर्वांना वाटत होतं की, देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र अचानक पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं.

 

सगळं सुरळीत असतांना मग अचानक फडणवीस साहेब मुख्यमंत्री का झाले नाही? या मागे मोदी शहांनी फडणवीसांविरोधात आखलेल षड्यंत्र तर नसावं?

 

असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

 

मोदी-शहांतर्फे फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम

 

मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याच पक्षातील उत्तम नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम कसा काय केला? हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल.

 

तर मंडळी नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी या भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये आधीच २०२४च्या प्रधानमंत्री पदाची स्पर्धा लागलेली आहे.

 

एकीकडे प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये योगी आदित्यनाथ यांची अचानक आणि अनपेक्षित झालेली एंट्री ही मोदी आणि शहांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. उत्तर प्रदेशच सरकार हातामधून जाऊ नये म्हणून योगींना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.

 

मात्र योगींची राजकीय नेतृत्वाची छाप प्रधानमंत्री पदाची दावेदारी ठोकून गेली. दुसरीकडे नितीन गडकरी हे सुद्धा प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये अग्रेसर होते. मात्र त्यांनासुद्धा हळूहळू मोदी-शहांनी स्पर्ध्येमधून बाद केलं आहे.

 

अशामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर त्यांचं राजकीय वजन केंद्रात नक्कीच वाढलं असत. आणि प्रधानमंत्री पदाच्या चालू असलेल्या स्पर्ध्येत मोदी, शहा आणि योगीनंतर फडणवीसांच नाव येऊ नये म्हणून यावेळेला फडणवीसांना मुख्यमंत्री न होऊ देण्यात मोदी आणि शहांचा सिंहाचा वाटा होता अस म्हणणं वावग ठरणार नाही.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *