मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता.
मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते.
जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…
वर्ष होत १९६६-६७ दरम्यानच. पवार हे २६ वर्षाचे होते. त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार होता.
शरद पवार यांची इच्छा जरी निवडणूक लढवण्याची असली तरी त्यावेळच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांच्या तुलनेत ते लहानच होते. एवढ्या लहान वयात त्यांना विधानसभेच तिकीट मिळेल अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती.
पण यशवंतराव चव्हाण यांच्या पवारांवर असलेल्या विश्वासामुळे त्यांना आमदारकी लढण्याच तिकीट देण्यात आलं आणि ते निवडूनसुद्धा आले. दिवसेंदिवस शरद पवार यांच राजकीय वजन काँग्रेस पक्षात वाढत चाललेलं होत.
म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…
ते वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते. मात्र काँग्रेस पक्षात खरा वाद निर्माण झाला तो म्हणजे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर.
सोनिया गांधींविरोधात पवारांचा बंड
मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा काँग्रेस पक्षात मान वाढला होता. पण संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींच नाव पुढे येताच शरद पवार व त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला.
१९९९ मध्ये कोल्हापूरमध्ये शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी गेले असता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी संध्याकाळी आपल्या निष्ठावंत असलेल्या नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि सण १९९९ मध्येच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…
- रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे
- मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?
- बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir