मंडळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेविरोधात बोलत असतांना कायम चर्चेमध्ये असतात. नारायण राणेंनी आधी शिवसेना नंतर काँग्रेस नंतर भाजप असे पक्ष बदलल्याने त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून नेहमीच टीका होत असते.
मात्र नारायण राणे यांचा त्यांच्या प्रत्येक पक्षातील प्रवास हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेलाच राहला आहे. राणे यांनी मुंबई येथे नोकरीसाठी स्थायिक झाल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.
ओबीसींनो सावधान! राजकीय आरक्षणाचा फायदा नाही
१९९१ साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांच्या जागेवर त्यांची विरोधीपक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर भाजप शिवसेना युतीच सरकार आल्यानंतर त्यांना महसूलमंत्री करण्यात आलं.
१९९९ साली शिवसेना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आल्यानंतर राणेंना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र उध्दव ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर राणे आणि त्यांच्यामध्ये पटत नव्हतं.
आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…
२००४ साली महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या एका अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंना आपला उत्तराधिकारी घोषित केल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली.
आणि अखेर त्यांनी २००५ साली शिवसेना सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर राणेंना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा लागलेली होती.
त्यांनी याबद्दल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपली इच्छा व्यक्त केली होती. २००९ साली काँग्रेसच्या सरकारमध्येही त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं.
पक्षश्रेष्ठींना मागितली माफी
नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्या कारणाने त्यांची काँग्रेसबद्दल नाराजी आणखीच वाढली होती. ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. त्यांच्याच विरोधात राणेंनी वेगळा गट तयार केला.
ही बाब पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आल्यानंतर राणेंना पक्षातून निलंबित करण्याच ठरलं. मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल राणेंनी काँग्रेसमधील सर्व पक्षश्रेष्ठींची माफी मागितली होती.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…
- वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी
- एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी
- आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir