मंडळी महाराष्ट्राला गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांचा तेजोमय असा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा परकीय लोकांनी महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तेव्हा इथल्या जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावर जेव्हा अन्याय करत होते.
तेव्हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ‘शिवसेना’ नावाचा पक्ष स्थापन करून मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाला
” मुंबई कुणाच्या बापाची नाही ” अस बेधडकपणे बोलायला शिकवलं.
“महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच आहे”
असं निडरपणे सांगितलं. आणि एक एक माणूस जोडून शिवसेना पक्ष उभा केला. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये काही गद्दार लोकांनी कुटील डाव खेळून बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष पळवून नेला. आणि मा. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं या लोकांनी काम केलं.
महाभारत यात्रा कुणाची व कशासाठी ?
मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून वर्धा या शहरामध्ये राहणारा नेहाल पांडे नावाचा तरुण हा जनतेच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. आणि याच नेहाल पांडे यांनी ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेची स्थापना केली.
आणि असंख्य लोकांना अनेक आंदोलनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण संविधानाला आणि इथल्या लोकशाहीला घातक आहे असं दिसून येतं आहे.
म्हणून नेहाल पांडे यांनी अशा गढूळ राजकारणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कौरवांनी कुटील राजनीती करून पांडवांचे राज्य हस्तगत केले होते.
त्याचप्रमाणे आतासुद्धा काही लोकांनी अशाचप्रकारचे कृत्य करून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मिळवला आहे. अशा कृत्याने या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.
आणि म्हणून नेहाल पांडे यांनी ‘आपल्या युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेसोबत लाखो लोकांना घेऊन मा. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये ‘महाभारत यात्रा’ काढली आहे.
ही यात्रा नागपुर जिल्ह्यातील रामटेक येथून दिनांक २१ मार्चला सुरू झाली असून दिनांक ३० मार्चला मा. उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानी पोहचून संपन्न होणार आहे. दरम्यान या यात्रेमध्ये लाखो लोकांनी सहभाग नोंदवला आहे.