महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला?

महायुतीत जाऊन अजित पवारांचा गेम फसला… अजित पवारांची अस्तित्वाची लढाई. अजित पवारांनी लढवलेल्या या ४ जागे वर त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय आहे?

महाराष्ट्रातली यावेळेसची लोकसभा निवडणुक अस्तिस्वची होती. शिवसेनेचे दोन गट पडले आणि त्याच बरोबर राष्ट्रवादीचे सुद्धा दोन गट पडले होते. शरद पवारांनी ज्या पक्षाची स्थापना केली, तो पक्ष अत्ता अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतला होता आणि प्रथमच शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शरद पवारांन सोबत बंडखोरी करत अजित पवारांनी महायुती सोबती हात मिळवणी केली होती. परंतू या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना ४ जागेवरच समाधान मानावे लागले.अजित पवारांनी लढवलेल्या या ४ जागे वर त्यांच्या उमेदवारांची स्थिती काय आहे याचा आढावा घेऊया.

बारामतीची लोकसभा निवडणूक चांगलीच रंगली होती बारामतीत एकाच घरातल्या दोन उमेदवार अमाने सामने आल्या होत्या राष्ट्रवादी कडून सुनेत्रा पवार तर शरद पवार यांच्या कडून सुप्रिया सुळे मैदान उतरल्या होत्या. हि निवडणूक थेट शरद पवार विरुध अजित पवार आशी झली होती.या मतदारसंघात सुप्रिया सुळेंच पारड जड असल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या कडे लोकांचा भावनीक कल होता आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक अजित पवारांवर नाराज होते त्या मुळे अजित पवार यांना या मतदारसंघात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मोठा संघर्ष करावा लागला, हा मतदारसंघ अजित पवारांच्या दृष्टीने खूप महत्वाचा मतदारसंघ आहे त्या मुळे त्यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती. तरी पण या मतदारसंघात सुप्रिया सुळेच बाजी मारतील असा अंदाज आहे.

शिरुर मतदारसंघात सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे उमेदवार अमने सामने होते. त्यामुळे या मतदारसंघात राजकरण चांगलेच तापलं होते. या मतदारसंघात अमोल कोल्हे हे विध्येमान खासदार आहेत आणि आत्ता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या कडून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून आढळराव पाटिल यांना उमेवारी देण्यात आली होती. मागच्या निवणुकीत सुद्धा अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्यात लढत झाली होती तेंव्हा आढळराव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता तर अमोल कोल्हे हे आपल्या अभिनयाने लोकांच्या घरा घरात पोहचले होते त्यामुळे ते निवडूण आले होते.

या वेळेस सर्व राजकीय समीकरण बदले आहेत आणि आढळराव हि निवडणूक शिवसेनेकडून नाही तर अजित पवार गटाकडून लढत आहेत त्यामुळे ही निवडणुक चांगलीच रंगली आहे. आढळराव पाटील यांनी जनसंपर्क खूप तगडा ठेवला होता त्याचा फायदा त्यांना या निवडणूकीत झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिले होते. शरद पवारांनी या मतदारसंघात ५ साभा घेतल्या होत्या त्या मुळे अमोल कोल्हेच या वेळी सुद्धा बाजी मारतील असा अंदाज आहे.

रागड मतदारसंघात राष्ट्रवादी चे खासादर सुनील तटकरे कार्यरत आहेत आणि पुन्हा एकदा ते अजित पवार गटा कडून लोकसभेसाठी मैदानात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनंत गीते या यांना उमेदवारी मिळाली होती.हे दोन्ही नेत्यांनी खासदार म्हणून काम केलं असलं तरी गीते यांचं लोकांसोबत जनसंवाद हवा तसा नाही त्या मुळे गीते ही निवणूक संपूर्ण पणे उध्दव ठाकरे यांच्या जिवावर लढवत आहेत आशी टीका केली जात होती .त्या उलट सुनील तटकरे हे आपल्या कामाच्या जोरावर निवडूण येतील असा अंदाज लावला आहे.

धाराशिव मतदारसंघात चांगलीच राजकीय परिस्थिती रंगली होती. नरेंद्र मोदींनी या मतदारसंघात सभा घेऊन अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार केला होता.या उलट शिसेना फुटली परंतू ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडली नाही त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना लोकांचा भावनीक आधार मिळेल असा अंदाज होता परंतू मोदी फॅक्टर आणि राष्ट्रवादीची ताकद याचे ओमराजेंना मोठे आव्हान होते.त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण आहे.

एकंदरीत अजित पवारांना ४ जगा मिळाल्या त्यात ही त्यांना निवडूण येण्यासाठी मोठे आव्हान आहेत. ४ मधून अजित पवार यांचे २ उमेदवार निवडून येथील असा अंदाज दर्शवला जात आहे. तुम्हाला काय वाटते तुमचे मत कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *