राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

मंडळी आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू आणि कुठल्याही क्षणी भारतीय देशाच राष्ट्रगीत कानावर पडलं तर आपोआपच अंगावर शहारे येऊ लागतात. कारण राष्ट्रगीत हे आपल्या देशाचा गौरव आहे. मात्र या राष्ट्रगीताचा इतिहास नेमका काय आहे?

आणि यामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याला भारतीयांकडूनच का विरोध झाला होता? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी भारतीय देशाचं राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ साली लिहिलं आहे. मात्र त्याअगोदर बकीमचंद्र चॅटर्जी यांनी १९७५ साली लिहिलेलं ‘वंदे मातरम’ हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत होत.

रवींद्रनाथ टागोर यांच्यावर त्यावेळी असा आरोप झाला होता की त्यांनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्यासाठी लिहिलं होतं. यावरून रवींद्रनाथ टागोर यांची मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

तर मंडळी झालं असं की, २६ डिसेंबर १९११ला कलकत्ता येथे काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी या गीताचा वापर करण्यात आला होता.

आणि यामध्ये ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्यानुसार जॉर्ज पंचम यांना टागोर यांनी भारताचा भाग्य विधाता संबोधल्याचा आरोप लोकांनी केला होता. या प्रकरणावर अनेक लोकांनी टागोर यांची टीका केली. मात्र त्यांनी यावर काही एक उत्तर न देता त्यांनी शांतता ठेवली होती.

अखेर १९३७ मध्ये टागोर यांनी स्पष्ट केलं होतं की, या गीतामध्ये मी भाग्य विधाता हे ईश्वराला संबोधलं आहे. त्यानंतर टागोर यांचा १९४१ साली मृत्यू झाला.

‘जन गण मन’ राष्ट्रगीत म्हणून मान्यता

         

सण १९७५ मध्ये बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीग पार्टीचा विरोध होता. मात्र भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर ना मोहम्मद जिना भारतात होते ना त्यांची मुस्लिम लीग पार्टी.

अखेर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली २४ जानेवारी १९५० रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *