मंडळी कुठल्याही राज्याच राज्यपाल हे पद संविधानिक आणि त्या राज्याच्या अस्मितेचा व जनतेचा आदर करणार असत. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे.
यावर सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, कोश्यारींच्या अशा महाराष्ट्रविरोधी कृत्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का गप्प बसलेले आहेत?
कोश्यारी यांनी याआधीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवरून राज्यपालांनी माफी मागावी अशी भूमिका शिवप्रेमींद्वारे घेण्यात आली होती. मात्र काळानुरूप हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्या गेला.
त्यानंतर औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुन्हा जीभ घसरली आणि त्यांनी महिलांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या सावित्रीआई फुलेंबद्दल अगदी हीन दर्जाच्या विधानांचा वापर केला होता.
इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन
तेव्हासुद्धा त्यांच्यावर काही काळापूर्ती टीका करण्यात आली. आणि पुन्हा प्रकरण दाबण्यात आलं. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला आहे.
राज्यपालांनी अस विधान केलं आहे की,
“महाराष्ट्राच्या विकासासाठी परप्रांतीय लोकांचं योगदान हे मोठ्याप्रमाणात आहे.”
मात्र राज्यपालांच्या या वक्तव्यावर अजूनही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय शांत बसलेले आहेत.
राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेचा केलेला अपमान खपवून घेतल्या जाणार नाही. अशी भूमिका महाराष्ट्रातील पुरोगामी पक्षांच्या आणि संघटनांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे.
राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरुन तर अशाप्रकारचे विधान करत नाही ना? असा अंदाज राजकिय समीक्षकांकडून लावल्या जात आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.
- वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी
- पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी
- “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir