वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणार सरकार – देवेंद्र फडणवीस

Govt to crack down on prostitutes' money - Devendra Fadnavis

मंडळी महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. राजकारणाची परिभाषा गेल्या काही काळात महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुडाची होत चाललेली आहे. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहे.

त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच काय? हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य नागरिकाला भुरळ घालणारा आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चालू असलेला वादवादीचा खेळ चांगलाच रंगत आहे , तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तिसरा पाय काढला आहे.

त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता कुठेच दिसत नाही. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी प्रमाणे जनतेचे प्रश्न वगळून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 

काय म्हणाले फडणवीस ? 

मंडळी राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणाच्या मुद्द्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरोधात घेतलेला मुद्दा महाराष्ट्रात गाजायची शक्यता आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की,

” सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणार सरकार.”

या शब्दात फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. पुढे बोलताना त्यांनी समृद्धी महामार्गाचा मुद्दा उचलत राज्यसरकारला आणखी एक टोला लावतांना म्हटलं की,

” समृद्धी महामार्गावरून कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव कोणी मिटवू शकत नाही.”

अस प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले. फडणवीसांच्या या आरोपावर राज्य सरकार आता काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *