मंडळी राजकारण म्हटलं नेता केव्हा पलटून जाईल याचा कुणी अंदाजच लावू शकत नाही. मात्र यामध्ये भरडली जाते ती फक्त सर्वसामान्य जनता. गेल्या काही कालावधींमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांमध्ये चांगलच अपयश आलं.
काँग्रेस पक्षाची ही पडती बाजू बघून पक्षातील काही नेत्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र आता काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयामुळे.
जेव्हा गडकरींनी चढवला त्यांच्याच सासरेबुवांच्या घरावर बुलडोझर…
हार्दिक पटेल यांनी गुजरातच्या प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याचं जाहीर रित्या सांगितलं आहे. हार्दिक पटेल हे स्वतः पाटीदार समाजातून असल्याकारणाने त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात पाटीदार समाज उभा आहे.
गुजरातमधल्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला याचा चांगलाच फायदा होणार आहे. हार्दिक पटेल हे आज गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आपल्या जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे.
काय म्हणाले हार्दिक पटेल ?
युवानेते हार्दीक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
ते म्हणाले की,
” राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहित या भावनेतून मी आज नवा अध्याय सुरू करतो आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात हे छोटा सैनिक म्हणून काम करेल.”
अस हार्दिक पटेल यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- आणि बाबरी पाडल्या गेली…
- प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या का केली?
- आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव
- तो एकमेव आमदार ज्याला विधिमंडळाच विद्यापीठ म्हणून ओळखल जायचं
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir