कर्नाटक वादावरून राजकीय पक्षांना अचानक कसा काय आला शिवरायांच्या अस्मितेचा पुडका?

मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र राज्यालाच नव्हे संपूर्ण देशाला आदर-सन्मान आहे. मात्र राजकीय नेते बहुधा शिवरायांच्या नावाचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत असतात. शिवरायांची विटंबना झाल्यानंतर जिथे त्यांची बाजू कमी पडते तिथे ही लोक एकही विधान शिवरायांच्या समर्थानात करत नाही. काही काही बहाद्दर तर एवढे आहे, की चक्क आपल्या स्वार्थासाठी, आपली बदनामी वाच्यवण्यासाठी ज्या व्यक्तीने शिवरायांची विटंबना केली त्यालाच सोशल मीडियावरून समर्थन करत असतात. मंडळी शिवरायांची विटंबना करणं \’राजा शिवछत्रपती\’ या पुस्तकातून बाबासाहेब पुरंदरेपासून चालत आलंय. त्याची शिक्षा त्यांना चेहऱ्यावर काळ फासून घेऊन भोगावी लागली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नेते मा. उद्धवसाहेब ठाकरे, मनसे नेते राजसाहेब ठाकरे , राष्ट्रवादी नेते डॉ. अमोल कोल्हे , भाजप नेते देवेंद्र फडणवीस अशी खूप राजकीय मंडळी शिवरायांच्या विटंबना करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना समर्थन करत होती आणि करत सुद्धा आहे. अलीकडे गिरीश कुबेर नावाच्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी राजेंची आणि शिवरायांची विटंबना \’द रेनेसन्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्रा\’ या पुस्तकामध्ये केली होती. त्यावर प्रतिउत्तर म्हणून दोन शिवप्रेमी मावळ्यांनी ९४ व्या तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या तोंडाला काळ फासल होत. मात्र गिरीश कुबेरांच्या या कृत्यावर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते मा. शरद पवार साहेबांनी , मनसे नेते राज साहेब ठाकरेंनी, शिवसेना नेते मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कोणीही विरोध किंवा निषेध दर्शवला नाही. उलट ट्विट करून सांगितल की साहित्य संमेलनामध्ये अतिथीच्या तोंडावर शाही फेकन निषेधार्थ आहे. भाजपाने गिरीश कुबेरांचा निषेध केला पण तो फक्त राजकीय स्वार्थासाठी. याच कारण अस की, याआधी शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला समर्थन देणारी भाजपच होती.

कर्नाटकमध्ये शिवरायांची विटंबना झाल्यावर अचानक शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे,भाजपला अचानक पुडका कसा?

   मंडळी हेच या राजकीय नेत्यांच राजकारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये शिवरायांची बदनामी झाल्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे या सर्वांनी सोशल मीडियाचा माध्यमातून निषेध दर्शवला. निषेध दर्शवन वाईट नाही पण नुसत्या राजकीय स्वार्थासाठी शिवरायांच्या अस्मितेचा वापर करन वाईट आहे. कारण गिरीश कुबेर , बाबासाहेब पुरंदरे यांना शिवरांयांच्या बदनामीवर समर्थन करणारे हेच राजकीय पक्ष होते. म्हणून सम्पूर्ण जनतेने आता पूर्णतः विचार करून या राजकीय पक्षांच समर्थन करायला हवं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *