संजय राऊत यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल – प्रसाद लाड

Sanjay Raut has to say get well soon - Prasad Lad

मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या संजय राऊत यांनी ईडीने मालमत्ता जप्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच चिघळत जात आहे. मात्र सम्पूर्ण महाराष्ट्रात सद्ध्या सुडाच राजकारण सुरू आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. केंद्र सरकार राज्य सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्याचा प्रयत्न करत आहे.

 

मात्र जनतेच्या प्रश्नाचं कुणाला काही एक पडलं नाही. महाराष्ट्रामध्ये रोजच्या तारखेला कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. रोजगाराचा प्रश्न सम्पूर्ण महाराष्ट्रात वाढत चालला आहे. पेट्रोल , डिझेलचे भाव वाढत जात आहे. मात्र यावर बोलायला कुणीच तयार नाही.

 

फक्त एकमेकांवर आरोप करायचे आणि एकमेकांना अटक होईपर्यंत पर्यंत राजकारण करायचं बस एवढंच. संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केल्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

 

 

काय म्हणाले प्रसाद लाड? 

 

 

संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांच्या पारा ठिकाणावर न राहल्या कारणाने राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केले होते. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊत यांना प्रतिउत्तर देतांना चांगलच सुनावलं आहे.

 

ते म्हणाले की,

 

” संजय राऊत यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल. ज्या प्रकारे राऊत आरोप करत आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. किरीट सोमय्यांनीही सांगितलंय की मुझ्यामंत्र्यांना कागदपत्रे देऊन माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे राऊत आणि गॅंग किरीट सोमय्या यांना फसवण्याच्या प्रयत्न कर आहेत. पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”

 

अस ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *