लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आणि राजकीय परिस्थिती.
लोकसभा निवडणुक २०२४ चा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. यामध्ये देशातील ८९ आणि महाराष्ट्रातील आठ मतदारसंघाचा समावेश होता. यात मराठवाड्यातील तीन आणि उर्वरीत ५ मतदारसंघ विदर्भातील होते. गेल्या १० ते १२ दिवसात येथे प्रचार खुप जोरात चालू होते. महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी येथे जाहिर सभा घेतल्या आणि एकमेकावर जोरदार टिकाही केल्या. या मतदारसंघातील राजकीय वातावरण एकदम तापले होते. या आठ मतदारसंघामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, परभणी, नांदेड या मतदारसंघीचा समावेश आहे.
अमरावती लोकसभेसाठी भाजपाच्या नवनीत राना काँग्रसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर झाली होती. यांच्यात तिरंगी निवडणुक पार पडली. सोबतच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सुध्दा मैदानात होते. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली असल्याचे दिसुन येते. येथील दलीत आणि मुस्लीम मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहेत.
नवनित राणाला हनुमाण चालीसावर घेतलेली भुमीका बादक ठरणार की त्यांच्या फायद्याचे ठरणार हे पाहावे लागेल. बच्चु कडु महायुतीचा भाग आहेत परंतू त्यांनी दिनेश बुब यांना मैदानात उतरवले आहे त्यामुळे ही निवडणुक आव्हानात्मक झाली. मुख्यता नवनित राणांना याचा फटका बसनार आहे. येथुन काँग्रसचे बळवंत वानखेडे उमेदवार असले तरी यशोमती ठकुर यांचा वानखेडेंना पाठींबा आहे आणि त्याच्या राजकीय ताकदीचा वानखेडेंना फायदा होईल असा अंदाज आहे.
बुलढाणा मतदारसंघातुन शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी मुख्य लडत झाली आहे. शिंदे गटाकडुन प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाकडुन नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. हि लडत ठाकरे गटाच्या अस्थित्वाची आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि उदध्व ठाकरे यांनी सभा घेऊन मतदारांचा कल आपल्याकडे वळवला आहे. याच बरोबर येथे अपक्ष म्हणुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि वंचीत बहुजन आघाडी कडुन वसंत मगर यांची भुमीका सुध्दा महत्वपुर्ण असणार आहे.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघातुन सुद्धा शिनसेना ठकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आशी मुख्य लडत होणार झाली आहे. शिवसेना शिंदे गटा कडुन राजश्री पाटील आणि शिनसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लडत झाली आहे. विधेमान खासदार भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे मतदार नारज होते याचा फटका शिंदे गटाला बसेल असा अंदाज लावला जातोय.
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रामदास तडस विरुध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे यांच्यात लडत झाली आहे. तडस येथुन दोनवेळा खासदार राहिले आहेत. हा मतदारसंघ परंपरागत काँग्रसचा होता परंतू या वेळेस शरदचंद्र पवार गटाला इथे उमेदवारी देण्यात आली आहे. पुजा तडस यांनी केलेल्या अत्याचाराच्या अरोपामुळे रामदास तडस या स्पर्धेत मागे पडु शकतात. परंतु पंतप्रधानांनी इथे सभा घेतल्यांनी निकाल कोणाच्या बाजुने लागल हे सांगने कठीन आहे.
अकोला मतदारसंघातुन भाजपाचे अनुप धोतरे, वंचीतचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिरंगी निवडणुक झाली. इथे सद्या भाजपाचे संजय धोतरे खासदार असुन गेल्या चार टर्म पासुन ते सलग निवडुन येत आहेत. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे भाजपानी त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर प्रकाश आंबेडकर काँग्रेसला पाठिंबा देनार होते परंतु काँग्रेसनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे याचा परिनाम दोघांच्याही मतदारावर होणार आहे परंतु एमआयएम प्रकाश आंबेडकरांच्या मदतीला आले आहे.
नांदेड मतदारसंघामध्ये भाजपाचे विधेमान खासदार प्रतापराव पाटील चिकलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हान यांच्यात थेट निवडणुक होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु हे मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटले आहे, कारण काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हान भाजपात गेल्या मुळे काँग्रेसला फटका बसनार आहे आणि वंचीतचा पगडा पण इथे जड दिसत नाही.
परभणी मध्ये ठाकरे गटाचे बंडु जाधव आणि विरुध रासपचे माहादेव जानकर अशी दुरंगी लडत झाली आहे. बंडु जाधव हे खासदारकीची हॅट्रिक मारण्यासाठी मैदानात उतरले होते. तर माहादेव जानकर हे अजित पवार यांच्या कोठ्यातून उमेदवारी मिळवत मैदानात उतरले होते. परंतु ते मुळचे सातारा जिल्ह्यातले असल्याने जनतेचा कल विरोधी पक्षाकडे असल्याचा अंदाज येतो.
हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्ठीकर आणि शिंदे गटाचे बाबुराव कदम कोळीकर अशी लडत झाली. विधेमान खासदार हेमंत पाटिल यांची उमेदवारी रद्द करुन शिंदे यांनी बाबुराव कदम यांना मैदानात उतरवले त्याचा फटका शिंदे गटाला बसु शकतो आणि ठाकरे गट इथे बाजी मारु शकतो.