९ महिन्यांपासून चालत आलेला खेळ अखेर संपला अस म्हणायला हरकत नाही येणारा काळच सांगेल आता सत्ता कोणाची ते…..?
बौद्धिक कुशलतेचा एक नमुना सादर करत पूर्वनियोजित अस धोरण ठरवून महाविकास आघाडीला पराजित करण एवढं सोप्प नव्हतं पण ते म्हणतात ना राजकारणात काहीही होऊ शकत तसचं झाल अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांनी भाजप सोबत सत्ता सत्यात आणली.
*देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधुन डावलण्यात येतय का ?
अत्यंत अल्प काळात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मिळालेली प्रचिती आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वापर यातून फडणवीसांनी वेगळी ओळख निर्माण केली
भविष्यात हा माणूस नक्कीच पंतप्रधान पदासाठी पात्र राहिला असता पण भाजप चा देवेंद्रजी फडणवीस यांना डावलून पद्दोनती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.
भाजपकडून जास्त आमदार बळ असताना सुद्धा भाजप हे उपमुख्यमंत्री पदातच खुश कसे काय राहू शकते हा महाराष्ट्रासाठी एक प्रश्नच आहे.
भविष्यात मा.नितीनजी गडकरी आपल्याला पंतप्रधानपदी दिसतील का ?
एकीकडे भाजप मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जर माणसांना एखादा व्यक्ती आपलासा वाटतो तो म्हणजे मा.नितीनजी गडकरी जेकी सध्या भाजप चे एक प्रतिष्ठित नेते आहेत
जर भाजप सर्वांना समान संधी देत असेल तर यानंतर नितीनजी गडकर्रीना पंतप्रधानपदाचा मान देण्यात येईल का याची उत्सुकता ही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.
निकालाची उत्सुकता तर आहेच पण शेवटच्या सुनावणीत लागलेल्या अंदाजानुसार सध्याच शिंदे-भाजप सरकार हे पळापळ करतय अस ही काही वृतमाध्यमांनी सांगितलं यातून जनतेन काय समजायच ते तर समजेलच …..
पण जर कदाचित हे सरकार अवैद्य ठरलं तर महाराष्ट्राला राजकीय हेरा फेरी च दर्शन झाल अस म्हणायला हरकत नाही.
राजकीय हेराफेरीत पणाला लागणारी थोर पुरुषांची प्रतिष्ठा आणि खुर्ची मिळवण्याच्या नादात पक्षातील लोकच नव्हे तर पक्षाचे चिन्ह सुद्धा उद्धव गटाला गमवावे लागले.
पण इतक्या हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा अतूट महाविकास आघाडीचा नात दिसुन आल , भविष्यात शिंदे गट स्वबळावर मुख्यमंत्री निवडून आणेल का भाजप का मित्रपक्ष म्हणून सोबत ठेवेल ?
का महाविकास आघाडीचा माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाचा आगामी निवडणुकात पराभव होईल ? हे पाहणं मजेशीर राहील.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता
- जागतिक पातळीवर ‘आदित्याचं’च नाव !
- शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !
- सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?
- देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir