शेतकऱ्याची व्यथा,जुन्या पेंशनच्या खात्यात !

सगळीकडे सध्या जुन्या पेंशन चा वाद पेटलेला दिसताना मनात अनेक लोक आणि त्यांच्या नोकरी अथवा व्यवसायाशी निगडित प्रश्न उभे राहतात कालच्या लेखात पण हे बोलू शकलो असतो पण शब्दमर्यादा मध्ये येते …..

 

 

जुनी पेंशनचा विषय थोडासा बाजूला सारून विचार कराव म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त इथला शेतकरी राजाच येत होता हो सध्याच्या काळातील अस्थिर अस निसर्गचक्र आणि त्या त्याला निर्भिडपणे तोंड देणारा बळीराजा

 

 

कदाचित तुम्ही अस ही म्हणत असाल की सारख सारख शेतकऱ्याच नाव घेत सरकारला ला शेतकऱ्यांविरोधात दाखवणं पण तस नाहीये नक्कीच यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी न्याय दिला

 

 

सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

 

 

पण जर सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन साठी संप पुकारू शकतात तर मग शेतकरी इतकी हालअपेष्टा सोसून पण कस हे सगळं सहन करू शकतो.?

 

 

शेतकरी इतका हतबल होतो की त्याला विरोध करण्यापेक्षा जीवन संपवन अधिक सोप वाटत हे इथंच का होत ? 

 

 

इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा आपलाच शेतकरी  मृत्यूला का कवटाळतो याच कारण काय ?

 

 

शेतकरीप्रिय धोरण हे राबवलं जात हे सरकारच म्हणणं आहे पण याची तथ्यता ही फक्त शेतकरीच जाणतो. हल्लीच राज्यसरकर म्हणत आम्ही केंद्रसरकारप्रमाणे शेतकऱ्याला अजून ६००० रु.दिले ज्याणेकरून शेतकरी अजून समृद्ध होईल

 

 

पण खरंच अस होत का पूर्वीच कर्ज शेतकरी परतफेड करू शकला नाही तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही आणि  त्यांचं बँक खात हे होल्ड केल्या जात आणि याच खात्यावर जर सरकारने अनुदान अथवा पीकविमा आला तरी हे खात बँके मार्फत गोठवलं जात

 

 

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

 

 

जेणेकरून या खात्याचे सगळे व्यवहार हे थांबवले जातात मग त्या खात्यात जरी पैसे आले तरी शेतकरी त्या पैश्यापासून वंचीत राहतोच की …..

 

 

आणि सरकार दुसऱ्या दिवशी विरोधकांची बोलती बंद करत जाहिरात करतात राज्यसरकाचा शेतकऱ्यांना पाठिंबा अहो ते पैसे हे शेतकऱ्याला मिळतच नाही मग याला जबाबदार कोण ?

 

 

निवडनूक काळात तोंडाला येईल तसे आश्वासन देणारे नेते या विषयाला हात का घालत नाही ? 

 

 

का शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य तो बाजारभाव उपलब्ध करून देत नाही आणी जरी भाव हा समाधानकारक असला तरी भाडे आणि मध्यस्थी लोकांना पैसे देत देत शेतकरी हा गरीबच राहतो की,

 

 

अहो जर इथल्या शेतकऱ्याला लावलेला पैशाही वसूल होत नाही इतपत वाईट परिस्थिती ही इथल्या राजावर येते मग तुम्हीच सांगा शेतकरी कसा मजबूत होईल.

 

 

आणि जर शेतकरी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे नवीन कर्जाला पात्र राहत नाही परिणामी इतर ठिकाणाहून पैसे घेतो आणि  पुन्हा जर तेच घडले तर शेतकरी जाणार कुठ कुटुंबाच्या उदरनिर्वाह हे तर कारण आहे

 

 

पण जुन्या संस्कृतीला हाच राजामाणूस संभाळतो मग या माणसाला चालना देण्यात इतक राज्यसरकार माग का पडतय की शेतकऱ्यांपेक्षा त्यांना जुनी महत्वाची वाटू लागते.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

 

तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *