मंडळी भारतीय देशातील जनता हे शेतीच्या बांधावरील किसान आणि देशाच्या सीमेवरील जवान या दोन लोकांमुळे सुरक्षित आहे. देशावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी किसान आणि जवान सर्वात आधी त्या संकटाला सामोरे जात असतात.
आजपर्यंत या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय देशाच्या सिमवेर अनेक युद्ध झालेत. मात्र १९९९ साली झालेलं कारगिल युद्ध आठवलं की शहीद आणि जखमी झालेल्या भारतीय जवानांना आठवून काळीज आजही ठप्प होत.
आज आपण याच कारगिल युद्धाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालं होतं. सण १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर दोनही देशांमध्ये निरंतर संघर्ष सुरू झालेला होता.
गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…
अनुचाचण्यांमुळे सीमेवर तणावही वाढला होता. हा तणाव थांबवण्यासाठी दोनही देशांनी समजदारी घेतली आणि लाहोर येथे १९९९ साली फेब्रुवारीमध्ये घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रामध्ये दोन्ही देश काश्मीरच्या मुद्द्यावर शांततापूर्ण निर्णय घेतील असा करार करण्यात आला होता.
मात्र पाकिस्तानने भारतासोबत दगाबाजी केली. आणि पाकिस्तानी सैनिकांनी भारतामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेज मुश्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री नवाज शरीक यांना न सांगता युध्दाची आखणी केली होती.
पाकिस्तानने विशेष ऑपरेशन हातामध्ये घेऊन आर्मी जवान आणि अर्ध सैनिक दलासोबत भारतामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली.
सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर
पाकिस्तानने घुसखोरी करायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच भारताने दोन लाख सैनिक सीमेवर पाठवले. आणि अखेर लदाखच्या कारगिलमध्ये तब्बल ५९ दिवस हे युद्ध चाललं.
ज्यामध्ये भारताचे एकूण ५५० जवान शहीद झाले आणि जवळपास एक हजार जवान जखमी झाले होते. जवळपास दोन महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय मिळवला.
आणि पाकिस्तानला सडो की पडो करून लावलं. या लढाईत शहीद होणाऱ्या सर्व वीर क्रांतिकारकांना सलाम.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात
- पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री
- आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…
- आणि त्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये असतांना नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir