कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाट काम करेल का?

कल्याण मध्ये ठाकरे यांची सहानुभूतीची लाठ काम करेल का?

ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्ले किल्ला मानला जातो. ठाणे आणि ठाणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कल्याण मतदासंघात एकनाथ शिंदे यांचा चांगलाच दबदबा आहे.

या मतदारसंघात मागील दोन टर्म पासून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात कामे केली आहेत आणि केंद्र सरकार कडून या मतदारसंघाला भरपूर निधी मिळवून दिला आहे, तरी सुद्धा या वेळेसचें राजकीय समीकरण जारा वेगळे आहे. त्यामुळे या मतदारसंघात लोकसभा निवडणूकीची लढत काट्याची झाली आहे.

मागील दोन टर्म मध्ये निवडूण येताना श्रीकांत शिंदे हे अखंड शिवसेनेचे उमेवार म्हणून निवडूण येत होते.या वेळेस शिवसेनेत फूट पडल्यानी ते शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत. शिंदे गटावर सत्ते साठी फुटीचे राजकरण केले असे आरोप हिताना दिसत आहेत. आशातच कल्याण लोकसभा निवडणुकीत शिंदे गट विरुध ठाकरे गट असी लढत झाल्यामुळें इथले राजकरण चांगलेच तापले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर कल्याण मतदारसंघासाठी प्रभावशाली उमेदवार नाही असे बोलले जात होते.

परंतू शिवसेनेत फुट पडल्या नंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या साठी प्रतिष्ठेची असणारी जागा आपल्या हातातून जावू नये या साठी दोन्ही पक्षा कडून या मतदारसंघात कसून ताकद लावण्यात आली.त्यामुळे एकतर्फी निवडणूक होईल बोलले जात असलेल्या या मतदारसंघात जोरदार टक्कर झाली.

श्रीकांत शिंदे यांचं पारडं या मतदारसंघात जड असले तरी त्यांना या मतदारसंघात वैशाली दरेकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये भाजप चा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही त्यामुळें शिंदे यांची रणनीती थोडी डगमगली होती परंतू मनसेनी श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये पाठींबा दिला आणि कल्याणची जागा भक्कम कण्यासाठी मदत झाली असल्याचे दिसून येते.

परंतू या मद्रसंघात मतदानाचा टक्का खालावला आहे या मतदारसंघात या वर्षी फक्त ४२ ते ४५ % पर्यंतच मतदान झालं आहे अशी माहिती समोर आली आहे.या कमी मतदानाचा फटका कोणाला बसलं या वर या मतदारसंघातचे निकाल अवलंबून राहणार आहे.

या उलट ठाकरे गटांनी सुद्धा हि जागा जिंकण्या साठी भरपूर प्रयत्न केले आहेत. ठाकरे यांचे या मतदारसंघात असलेलं विशेष लक्ष आणि ठाकरे यांच्या बदल असलेली सहानुभूतीची लाठ वैशाली दरेकर यांना हि जागा मिळवण्या साठीचा मार्ग असल्याचं बोललं जातं आहे.

कल्याणची निवडणूक जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी झाली नाही या मतदारसंघात कमी मदनाचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसला तर हि जागा ठाकरे गट जिंकेल किंवा कामाच्या आणि विकासाच्या आधारावर निवडणूक झाली तर श्रीकांत शिंदे परत निवडूण येतील,ठाकरे यांच्या बदल असलेली सहानुभूतीची लाठ आली तर हि जागा ठाकरे गट जिंकेल. असे विविध पैलू वर या मतदारसंघाचे भविष्य आधारलेले आहे.

हि लोकसभा निवडणुक विकास कामाच्या आधारावर झाली आहे की सहानुभतीच्या आधारावर हे ४ जुनला कळेलच.या मतदासंघात पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच येतील परंतू ते खूप कमी फरकानी निवडूण येतील असे जेष्ठ पत्रकारांचे मत आहे. आणि स्थानिक लोकांचे मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *