बंधुत्व असलेल्या देशात हिंदुत्वाच्या आधारे भाजपा ४०० पार जाईल का?
भारतात लोकशाही पध्दतीने निवडणुका होत असल्या तरी जाती व धर्मावर आधारीत राजकारण करणं भारतात नविन नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात राम मंदिरा मध्ये भगवान रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि मंदीर सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले. कारण यामागे भाजपाचा येणार्या लोकसभा निवडणुकीत हिंदु मतदार आपल्या कडे खेचले जातील. हा प्रयत्न होता. परंतु राम मंदीर जरी भाजपचे २०२४ च्या निवडणुकीतील मुख्य मुद्दा असला तरी त्याचा प्रभाव जनतेमध्ये जास्त पडलेला दिसत नाही. “भाजपाची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे.” असे बोलले जात असले तरी फक्त “हिंदुत्व” या मुद्यावर या निवडणुकीत निवडुन येणं कठीण आहे.
अशातच पंतप्रधाण नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम विरोधी भाष्य केले आहे. “काँग्रस सत्तेत आल्यावर सर्वसामान्य लोकांची संपती मुस्लीम लोकांना वाटेल” अशी टिका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे हिंदु-मुस्लिम हा मुद्दा खुप पेटला आहे. भाजपने नेहमीच निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा आधार घेतला आहे. परंतु हिंदुत्व हे मनात असले पाहिजे आणि देशात बंधुत्व असले पाहिजे. यामुळे भाजपाचे धर्मावर आधारीत असलेले राजकारण जास्त दिवस चालणार नाही. भारतात सत्तेत यायचं असेल तर त्या साठी देशाचा विकास हा एकमेव पर्याय आहे.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. भारताला इंडिया ऐवजी हिंदुस्तान म्हणुन संबोधले पाहिजे. यावर राजकारण करण्यात आले. संविधानात बदल करण्यावर राजकारण करण्यात आलं. परंतु बेरोजगारी, महागाई अशा महत्त्वपुर्ण मुद्यांकडे भाजपाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात निवडुन येण्यासाठी धर्माचा आधार घेणं लोकशाहीसाठी घातक ठरु शकते. पक्ष हा कोणत्या धर्माचा नसला पाहिजे. पक्ष धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. धर्मावर राजकारण चालु असताना, भाजपने “४०० पार” ची जी घोषणा केली आहे, या विरोधात काँग्रसने “संविधान बचाव” ची घोषणा केली आहे. असे लोकसभा निवडणुकीचे राजकारण रंगले आहे. यात हिंदुत्ववादाच्या जोरावर भाजपा किती जागा जिंकेल आणि निकाल काय लागेल याकडे सर्वाचे लक्ष आहे.