आपण भल आणि आपलं काम भल- अजितदादा पवार

ajitdada pawar
  मंडळी राजकारण म्हटलं की वादावादी , एकमेकांची टिंगलटवाळी करणे, खिल्ली उडवणे, आरोप प्रत्यारोप करणे या सर्व गोष्टी आल्याच. जेव्हापासून महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष कुठल्या ना कुठल्या मुद्य्यावरून सरकार पाडण्याच्या गोष्टी करत असतो.
 
मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच प्रतिउत्तर दिल आहे. पुण्यातील टेकडी येथील वनउद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
 
यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि महाविकास आघाडीच सरकार पाडणार या वक्तव्यालाही उत्तर दिलं. वारंवार होत असलेल्या भाजपच्या या वक्तव्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 
 

काय म्हणाले अजित पवार

 
         मंडळी वारंवार होत असलेल्या भाजपच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
 
       ते म्हणाले की,
 
” शिवसेना आणि भाजपने तारतम्य ठेवले पाहिजे. हे आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत.आमच्याबद्दल बोलणारेपण काही वाचाळवीर आहेत. त्यांच्याबद्दल मी काही अवाक्षर बोललो का?”
 
असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसच आपलं काम भल आणि आपण भल, अस माझं मत आहे. प्रत्येकाची कामाची पध्दत वेगळी आहे. पण दोन्ही बाजूने हे थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे हे सगळं थांबवा.
 
अस आव्हान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना केलं. मंडळी एकमेकांची खिल्ली उडवणे, एकमेकांवर टीका करणे यामध्ये आपलं राजकारण करणाऱ्या नेत्यांनासुद्धा अजित पवार यांनी चांगलाच टोला लावला आहे. महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कित्येक समस्या आहेत. यावर नेत्यांनी बोलायला हवं. प्रश्न उपस्थित करायला हवेत.
 
त्यावर तोडगा काढायला हवा. आज महाराष्ट्रातील कितीतरी जनता अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यांना योग्य तो लाभ मिळाला नाही. अशा कित्येक मुद्द्यांवर चर्चा करायची सोडून जर तुम्ही एकमेकांची टिंगलटवाळी करत आहात, तर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचं काम करत आहात.
 
असा याचा अर्थ होतो. मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संतापजनक प्रतिक्रियेवर भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *