Category: देश

  • पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

    एंबुलंस चा तो ह्रदयाला छेद देणारा आवाज घरापासून धावत निघाला…

    छातीत धडधड वाढली असतांना आईने मात्र हात पकडून धरला होता…

    ” जाऊ नको जवळ कोरोना आहे…!! “

    म्हणून आईने घराच्या उंबरठ्यावर च रोखलं पण डोळ्यासमोर लहानपणापासून मोठ्या होत  गेलेल्या पोराला आज एंबुलंस मध्ये जातांना पाहून डोळे भरून तीचेही आले होते… पण तेव्हाच्या परिस्थिती ने रोखलं होतं..

    नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एडमिट करून तिथेही ऑक्सिजन चा तुटवडा म्हटल्यावर जिल्ह्यात रात्री उशिरा नेण्याची ताकीद डॉक्टरांनी दिली..

    त्यात सोबत जायला तयार कोणीही नाही..

    तेव्हा आयुष्यभर ची साथ देणारी बायको रात्री दोन वाजता एकटी त्या एंबुलंस मध्ये निघाली.. तोंडावर ऑक्सिजन लागलेला नवरा पाहून डोळ्यावर पदर लावून तेवढा नवर्याचा हात पकडून एवढ्या रात्री जिल्ह्यातील दावाखान्यात जाऊन सर्व कागदपत्रे पुर्ण करून नवर्याला एंबुलंस मधून उतरवून दावखान्याच्या मेन गेटपर्यंत गेली आणि डोळे भरून तीने नवर्याला पाहीलं…. बस्स तीथुन सकाळी पाच वाजता ती घरी आली..

    महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    तेव्हा पर्यंत सर्व एरीया मध्ये खबर पहोचली ,  रात्री घाबरलेली आई सुद्धा मन पक्क करून वहिनींना भेटायला गेली… तेवढे धीर सोडून दुसरे काहीही नव्हते द्यायला कुणाकडे  ..

    दुपारी थोडे फार बरे वाटलं म्हणून नवर्याचा फोन आला.. , जेवण पहोचलं नव्हते दुपार पर्यंत.. दावखान्यात पेशंटच्या वाढणाऱ्या गर्दी, प्रत्येक क्षणाला एक मयतीचा फुटणारा टाहो सर्व काही वेदनादायक होतं.

    रात्र झाली… वहीनी च्या डोळ्यासमोर झोप नव्हती सकाळी लवकर उठून तीने गणरायाच्या मुर्ती ला हातात घेतलं भरल्या डोळ्यांनी अक्षद लावून, दुर्वा ठेवून गणरायाच्या मुर्तीला नवर्याच्या लवकर परतीचा  नवस मागुन ती पाण्यात टाकणारच की एक फोन आला आणि सर्व संपलं..

    रात्री ऑक्सिजन अभावी  तीच्या जिवनाचा ह्रदय श्वास थांबला…

    छाती आदळून रडणारी ती , हातातील बांगड्या जमीनीवर आपटून रडणारी ती आजही डोळ्यासमोर येते…

    सकाळी दहा ला दावखान्यात नवर्याची  डेथबॉडी घेऊन स्मशानभूमीत गेल्यावर चिता पेटण्याची रांगेत तीचा रात्री अकरा ला नंबर लागला आणि एक ला अस्थि कलश घेऊन ती परतली..

    सर्व काही डोळ्यासमोर होत असतांना सूद्धा सर्व हतबल झाले होते..

    आज ती भांडी घासायला बाहेर जाते , मुलांचं.शिक्षण करायचय  , सरकार चे अनुदान कागदावर च राहलं..

    आणि आज एक वर्ष उलटून जेव्हा आजच्या परिस्थिती च दर्शन होतं

    तेव्हा न पेटलेल्या चिता आज नेत्यांच्या भक्तीची यज्ञकुंड मांडून बसलीत , कुणाला थोडी सूद्धा आम्ही कुठल्या परिस्थिती ला समोर गेलो याची पर्वा राहली नाही..

    चलणारे घाणेरडे राजकारण, आणि त्याला कार्यकुत्र्यांचे मिळणारे समर्थन बघून फक्त एवढेच वाटतं…

    पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये…….

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

    या साठी मोर्चे काढा, आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे..

    मागील वर्षी आम्ही एक ऑक्सिजन अभावी जीव जातांना माणसं बघितली…त्या वेळी आमचे माननीय लोक राजकीय सभा घेण्यात व्यस्त होते.. आजही अनेक आव्हाने उभे करून देशातील स्थानिक स्थिती काय आहे न बघता अस्थिरता कशी उभी करावी या कडे नेत्यांची लक्ष जास्त…

    हे करा , ते करा , आम्ही असे करु , तलवार हाती घेऊ वगैरे म्हणणार्या नेत्यांची मुले कधीच जमीनीवर लढायला नसतात. पण कार्यकुत्रे म्हणजे नेत्यांना बाप आणि पक्षाला धर्म मानुन अगदी लाठी वगैरे घेऊन नेहमी तयारच , आजही भारतात जर कोविड ची चौथी लाट आली तर आपण किती तयार आहो आम्हाला माहिती नाही ?

    चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

    सद्यस्थितीत ग्रोथ रेट किती घसरला आम्हाला  घेणेदेणे नाही , तीन लाख लोकांच्या नौकर्या फक्त मागील महिन्यात गेल्या कुणाला फरक पडत नाही , महागाई किती वाढली ते बघणार नाही,शेतकरी आत्महत्या , शैक्षणिक दर्जा, त्या बद्दल आम्ही सरकारला कधीच जाब सुद्धा विचारणार नाही..

    आणि राजकीय धंदा करणार्या लोकांना त्याशी काही घेणे देणे सुद्धा नाही कारण मरणारा हा त्यांच्या घरचा नसतो मरतो तो सामान्य व्यक्ती.

    शिवसेना स बोलले की मराठी अस्मिता , बिजेपी ला बोलले की राष्ट्रधर्म , राष्ट्रवादी कांग्रेस ला बोलले की पुरोगामीत्व …. नेमके पक्ष या सर्व गोष्टी चे ठेकेदार कधी झाले ? हा बिजेपी चा , हा कांग्रेस चा , हा राष्ट्रवादी चा म्हणण्यापेक्षा..

    युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    मी माझ्या बापाचा बोलणं महत्त्वाचे असतं..

    तुम्ही प्रश्न केला की लगेच पाकिस्तान जाओ म्हणणारी केंद्र सरकार , राज्यात विज पासून शेतकरी पर्यंत असंख्य प्रश्न असताना रोज नवीन भानगड करणारी राज्य सरकार..

    शेवटी सर्व एकाच माळेचे मणी..

    “जोपर्यंत रोजगारावर सरकारचे नियंत्रण राहील,माध्यम,शाळा आणि जनमत बनवन्याची सर्व साधने सरकारच्या हाताखाली असतील,जोपर्यंत सर्व कुशल आणि प्रशिक्षीत लोकांवर सरकारचे नियंत्रण असेल;

    निवडणुकांवर प्रभाव टाकन्यासाठी अमर्याद पैसा असेल,जोपर्यंत सत्ताधारी पक्षच कायदे बनविल;

    जोपर्यंत कायद्यांचे अभ्यासक सर्वाधिक पैसे देणाऱ्यांच्यामागे उभे राहतील तोपर्यंत देशात फक्त नावापुरती समानता असेल.”

               ——————-   सरदार भगतसिंग.

    अक्षय चंदेल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    FB : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • मी मोदीसाहेबांव्यतिरिक्त दोन कोटींपेक्षा अधिक लोकांना मारणार आहे – अज्ञात

    मंडळी भारतीय देशामध्ये नेत्यांवर अज्ञातांचा हल्ला होणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र अशा गोष्टी पुन्हा घडणे हे देशाला आणि माणुसकीला काळिमा फासणार आहे. याआधी भारतीय देशाच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांना ठार केलं होतं.

    त्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली होती आणि आता सुद्धा काही अज्ञातांनी प्रधानमंत्री मोदींसाहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणारा मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि इतर काही तपास यंत्रणांना आल्याची माहिती समोर आली आहे.

    आपल्याकडे २० आरडीएक्स असून देशातल्या २० महत्वाच्या शहरांमध्ये मोठे ब्लास्ट करणार असल्याच या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार एनआयएन तपास सुरू केला असून इमेल नेमका कुणी पाठवला आहे, याविषयी शोध सुरू करण्यात आला आहे. हा इमेल एनआयए मुंबईला महिन्याभऱ्यापूर्वीच आला असल्याचं तपासात माहीती पडलय. हा इमेल इतर तपास यंत्रणांना देखील पाठवल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. 

    देशातलं मोठी व्यक्ती म्हटली की अशाप्रकारच्या धमक्या येतच असतात. किंवा देशातील जनतेला भरकटवायसाठीपण अशा गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. हे प्रत्येक समजदार नागरिकाने समजून घेणे महत्वाचे आहे. 

    आज आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांसाठी अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. मात्र सरकार अशा मुद्द्यांपासून जनतेच लक्ष विचलित व्हावं यासाठी असल्या प्रकारचे खेळ खेळले जाऊ शकतात. हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र अखेर सत्य काय आहे हे राष्ट्रीय यंत्रणेच्या तपासामध्येच माहिती होणार.

  • बैलगाडा शर्यत आणि लॉकडाऊन काळातील सर्व गुन्हे मागे घेणार- राज्य सरकार

    मंडळी हल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी गेल्या ३ वर्षांपासून जगभरात कोरोना प्रादुर्भावाने सर्व नागरिक त्रस्त झाले होते. कित्येक लोकांना आपला जीव या कठीण काळामध्ये गमवावा लागला. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित करून जे नियम लागू केले होते.

    त्या नियमांचे उल्लंघन ज्या विद्यार्थ्यांनी किंवा नागरिकांनी केले. त्यांच्यावर लॉकडाऊन काळामध्ये शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या सर्व गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना आता सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने या विद्यार्थी तसच नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मंत्रीमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळल्यानंतर प्रक्रियेला सुरवात होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की,

    ” कोविडच्या काळात ज्या विद्यार्थ्यांवर किंवा नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वतः कलम १८८ नुसार विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर  दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेत आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल.”

    अस वळसे पाटील म्हणाले. 

    बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल झालेल्यांनासुद्धा दिलासा 

    महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रमाणे कोविड काळात गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थी व नागरिकांना गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे दाखल असणाऱ्यांनासुद्धा सरकारने दिलासा दिला आहे.

    ” राजकीय किंवा बैलगाडा संबंधी जे गुन्हे असतील तर ते मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हाप्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय होईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील.”

    अस दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

  • मुस्लिमांसाठी दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहे- अबू आजमी

    मंडळी कर्नाटक उच्चन्यायालयाच्या निकालाने हिजाब प्रकरणात पुन्हा एकदा ट्विस्ट आणला आहे. हिजाब घालणे ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेलं हिजाब प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने म्हटले की, शालेय गणवेशावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाही.
     
     
    मात्र आता या निर्णयावरून देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली असून मुस्लिम समाजासोबत अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितले की,
     
     
    ” कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण हा निर्णय चुकीचा आहे. कोण काय घालणार आणि काय खाणार हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शीख धर्मीयांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्ही पगडी काढायला सांगाल का? तेव्हा तुम्ही का बोलत नाहीत. मुस्लिम समाजासोबत अन्याय होत आहे. कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लिम समाजमध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे. आपल्या पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर चेहरा खुला ठेवून जाणे गुन्हा आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे कसे मी मान्य करू? आम्ही हे लहानपणापासून वाचत आलो आहोत. या निर्णयामुळे मुस्लिमांचे दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहेत.”
     
     
     
    असे अबू आजमी यांनी सांगितले. कर्नाटकमध्ये गाजलेलं हिजाबच प्रकरण हे संपूर्ण देशभरात असंतोष पसरवणार होत. निवडणूका जवळ आलेल्या कारणाने राजकीय टोळ्यांनी हिंदू मुस्लिम वादाचे मुद्दे उखरून काढले होते.
     
     
     ऐन निवडणूकीच्या वेळेलाच हिजाब प्रकरण कस काय? 
     
     
                   निवडणुकीच्या वेळेला राजकीय टोळ्यांनी मुद्दाम उखरून काढलेला हिंदू मुस्लिम वाद निव्वळ मते लुटण्यासाठी निर्माण केल्या गेला होता. मात्र जशी निवडणूक संपली संपूर्ण हिजाब प्रकरण शांत झालेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळाल. अशा राजकीय टोळ्यांच्या दंगल भडकावू मनसुब्यापासून सामान्य लोकांनी दूर राहणे गरजेचे आहे.
  • ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    मंडळी सगळीकडे सद्धया चर्चेत असलेला अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द कश्मीरी फाईल्स’ हा चित्रपट वादामध्ये अडकलाय. या चित्रपटामधून समाजमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता सृजन नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
     
     
    या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री केलेले आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये कश्मीरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन यांनी याचिका दाखल केली आहे.
     
     
     
    चित्रपटाने हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपंकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने सुनावणी निश्चित केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा काय निकाल लागतो यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. 
     
     
    काय म्हणाले नितेश राणे? 
     
     
              सध्या सगळीकडे वादामध्ये अडकलेल द कश्मीरी फाईल्स हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला असताना भाजप आमदार नितेश यांनी पत्राद्वारे महाविकास आघाडी सरकारकडे हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे.
     
     
    ते म्हणाले की,
     
     
    ” जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंच चित्रण करणाऱ्या ‘ द कश्मीरी फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा.”
     
     
     
     
    अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ते म्हणाले की हा चित्रपट करमुक्त केल्यास मुस्लिम दहशतवाद्यांनी कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले. याच खर चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहायला मिळेल. नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे असल्याकारणाने त्यांनापण हा एकच दृष्टिकोन घेऊन या देशात दंगली घडवण्याचे डोहाळे लागले आहे. असे म्हणायला हरकत नाही.
  • युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात

    मंडळी रशिया आणि युक्रेनमधला वाद आता युद्धापर्यंत येऊन ठेपलेला आहे. रशियाने युक्रेनवर चारही बाजूने हल्ले केले. त्यात ७४ लष्करी तळ उध्वस्त झाले असून ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याकारणाने आसपासच्या देशांनी युक्रेनला मदत करायचे ठरवले आहे.

         युक्रेनमधील नागरिकांची परिस्थिती पाहून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक व तसेच विद्यार्थी हे अडकून पडलेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. याविषयी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

    काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

    मंडळी युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेला वाद हा युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांनी युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

           बाळासाहेब थोरात म्हणाले की,

    ” अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार परराष्ट्र मांत्रालय विभागाच्या संपर्कात आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा माझ्याशी सम्पर्क साधला आहे. माझे कार्यालय हे निरंतरपणे परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीसुद्धा सर्व यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी फार मोठ्या संख्येत आहेत. महाराष्ट्राची संख्या मोठी आहे म्हणून राज्यसरकरने केंद्र सरकारसुद्धा विनंती केली आहे.”

     अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. युक्रेन आणि रशियामध्ये पेटलेल हे युद्ध जरी कुठल्याही थराला गेलं, तरी आपण सर्वे सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना करूयात.

  • हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ

    हिंदुत्वाची परिभाषा माहीत नसलेले लोक आम्हाला हिंदुत्व सांगत आहेत- योगी आदित्यनाथ

                       मंडळी राजकीय क्षेत्र हे केव्हा भारतीय देशामध्ये धार्मिक वातावरणात परिवर्तित व्हायला लागलं याकडे कुठल्याही नेत्याने लक्ष दिलं नाही. मात्र ते आणखी धार्मिकरीत्या कशाप्रकारे रंगवता येईल यावरच राजकीय नेत्यांचा हल्ली भर दिसून आलेला आहे.
                     देशात सद्ध्या ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा प्रचार चालू आहे. त्यानंतर आता १४ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार असून त्यासोबतच इतर चार राज्यांमध्येसुद्धा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेलं निवडणूकीच वातावरण चांगलाच तापलं आहे.
     
                     उत्तर प्रदेशमध्ये चालू असलेल्या निवडणूकीच्या प्रचारभाषणामध्ये उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली आहे. प्रचार भाषणात बोलत असतांना त्यांनी राहुल गांधीवर टीका करत काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. 
    काय बोलले होते राहुल गांधी? 
             मंडळी उत्तरप्रदेशमध्ये चालू असलेल्या निवडणूकांच वातावरण राजकीय दृष्ट्या अधिकच तापलं होत. राहुल गांधींनी काही दिवसांअगोदर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत हिंदू आणि हिंदुत्व यातील फरक भाषणामधून व्यक्त केला होता.
     
             मात्र राहुल गांधींच्या या भाषणानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांचा चांगलाच विरोध केला होता. संपूर्ण भारतीय देशातून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी प्रतिउत्तर देऊन राहुल गांधी यांची टीका केली होती. राहुल गांधींचा हाच मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणूकांमध्ये उचलून धरला आहे.
     
               भारतीय जनता पक्षाच्या प्रचार भाषणात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींवर टीका करत योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की,
     

    ” काँग्रेस पक्षाने आम्हाला हिंदू आणि हिंदुत्व यातला फरक समजावून देण्याची गरज नाही.”

     
    अस ते म्हणाले. आता उत्तर प्रदेशातील निवडणूकांमध्ये या वक्तव्याचा किती प्रभाव पडतो, हे येणारी वेळच ठरवेल. मात्र राहुल गांधी व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याविषयी कोणती भूमिका घेईल हे अध्यापही स्पष्ट झालेलं नाही.