Category: राज्य

  • नानांना लागले राजकारणाचे वेध?

    Nana Patekar In Politics

    साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है* हा डायलॉग ऐकला की, चाटदिशी एक चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थातच तो नाना पाटेकरांचा.

    क्रांतीवीर, तिरंगा, नटसम्राट अश्या अगणित चित्रपटाद्वारे उत्कृष्ठ अभिनयाची एक आदर्श रेषा नानांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये घालून दिली.

    मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर जरा वेगळ्याच कारणामुळे प्रसार माध्यमांचा केंद्रबिंदू बनलेले आहेत.

    मागच्या 10 दिवसात नानांनी दोन राजकीय विधाने केली.
    पहिलं विधान म्हणजे, “आगामी निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे, त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही”, आणि दुसरं विधान म्हणजे “राजकरणात सातत्य ठेवणारी माणसे कमी आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस हे म्हणजे मुद्देसुद बोलणारे व्यक्ती आहेत”.

    पहिलं केंद्रातल्या भाजप नेतृत्वासाठी आणि दुसरं महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वासाठी, नानांनी काढलेले हे कौतुकोद्गार आहे.

    आता ह्यावरून सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की नानांनी ही वक्तव्य करण्यामागचं कारण नक्की काय?

    आता हा विषय जरा सुरुवाती पासून समजून घेऊ.
    ते असं आहे की, नाना पाटेकर अभिनेते असले तरी नानांची राजकीय जाणीव तशी भक्कम आहे. कारण त्यांची शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या सोबतची असलेली जवळीक आपल्या वडिलांच्या पिढीने बघितलेली आहे. अगदी नाना स्वतः सांगतात त्याप्रमाणे, “अरे गाढवा, कसा आहेस? असं म्हणतं बाळासाहेब नानांच्या गळ्यात हात घालुन जवळ ओढायचे”.

    बाळासाहेब दिवंगत झाल्या नंतर नानांची जवळीक पवार काका – पुतण्यांसोबत अगदीच वाढली. ती इतकी वाढली की, अजित पवारांच्या धरणाच्या वादग्रस्त विधानावरून, नाना जाहीर भाषणात कोपरखिळी मारून, दादांची मस्करी घेतात आणि अजित दादा देखील त्याला मनमोकळा हसून प्रतिसाद देतात. याचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेले असतीलच.

    अश्यातच नाना पाटेकर आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या जोडीचे कौतुक करता आहेत. ह्या वरून नानांचा राजकीय चाणाक्षपणा लक्षात येतो. तो असा की, बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंब, यांच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील राजकारण फिरत असल्याचे आपण बघितले आहे. तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहेत. अश्या ठराविक परिस्थीत, ठराविक नेत्यांच्या जवळ जाऊन आपले वयक्तिक हित साध्य करून घेण्याचा नानांचा कल असू शकतो, असे म्हणता येऊ शकते.

    मग प्रश्न असा निर्माण होतो की, अशा राजकीय चाणाक्षपानातून नाना कोणते हित साध्य करू शकता?

    तर आपण बघतो की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटाला अधिक पसंती मिळत असते. अशा वेळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम त्या चित्रपटाच्या अर्थकारणावर होतो. मग आपले राजकीय संबंध जर भक्कम असतील तर थिएटर मिळण्यासाठी सोईचे होते, हा झाला एक फायदा.
    दुसरा फायदा म्हणजे, नाना पाटेकरांच्या “नाम फाउंडेशनचा”.
    नाम फाउंडेशन ही ग्रामीण भागात कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. कोणतीही सामाजिक संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी राजकीय हितसंबंध फायद्याचे ठरतात. संस्थेला येणाऱ्या आर्थिक अडचणी, स्थानिक कामात लागणारे राजकीय सहकार्य, परदेशातून मागवावी लागणारी मदत अशा अनेक कारणांमुळे राजकीय हितसंबंध उपयोगात येतात.

    तसेच तिसरे आणि सर्वात महत्वाचे हित म्हणजे नानांना लागलेले आमदारकीचे वेध. काही दिवसांपूर्वी भाजपाने सिनेसृष्टीतल्या माधुरी दिक्षित यांना लोकसभा आणि नाना पाटेकर यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रस्ताव दिला होता. आता ह्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हे समजू शकलेले नाही.
    पण नानांनी खडकवासला मतदार संघामधून निवडणूक लढविण्याची ईच्छा अनेकदा अजित पवारांकडे खासगीत बोलताना व्यक्त केलेली आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. तसेच खडकवासला येथील घेरा सिंहगड भागात नाना पाटेकरांची शेती आणि फार्म हाऊस आहे. त्या निमित्ताने नाना आपला बराच फावला वेळ ह्या फार्म हाऊस वर घालवतात.

    आता ह्या दोन राजकीय विधनांमुळे नाना पाटेकर भाजपच्या किती जवळ जातील? आणि नानांचा राजकीय चाणाक्षपणा भाजपासमोर किती कारगर ठरेल? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देईल. तथापि ह्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • शिंदे सरकार’ वैध की अवैध

    ९ महिन्यांपासून चालत आलेला खेळ अखेर संपला अस म्हणायला हरकत नाही येणारा काळच सांगेल आता सत्ता कोणाची ते…..?

     

    बौद्धिक कुशलतेचा एक नमुना सादर करत पूर्वनियोजित अस धोरण ठरवून महाविकास आघाडीला पराजित करण एवढं सोप्प नव्हतं पण ते म्हणतात ना राजकारणात काहीही होऊ शकत तसचं झाल अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांनी भाजप सोबत सत्ता सत्यात आणली.

     

     

    *देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधुन डावलण्यात येतय का ?

    अत्यंत अल्प काळात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मिळालेली प्रचिती आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वापर यातून फडणवीसांनी वेगळी ओळख निर्माण केली

     

     

    भविष्यात हा माणूस नक्कीच पंतप्रधान पदासाठी पात्र राहिला असता पण भाजप चा देवेंद्रजी फडणवीस यांना डावलून पद्दोनती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.

     

     

    भाजपकडून जास्त आमदार बळ असताना सुद्धा भाजप हे उपमुख्यमंत्री पदातच खुश कसे काय राहू शकते हा महाराष्ट्रासाठी एक प्रश्नच आहे.

     

     

    भविष्यात मा.नितीनजी गडकरी आपल्याला पंतप्रधानपदी दिसतील का ?

    एकीकडे भाजप मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर जर माणसांना एखादा व्यक्ती आपलासा वाटतो तो म्हणजे मा.नितीनजी गडकरी जेकी सध्या भाजप चे एक प्रतिष्ठित नेते आहेत

     

     

    जर भाजप सर्वांना समान संधी देत असेल तर यानंतर नितीनजी गडकर्रीना पंतप्रधानपदाचा मान देण्यात येईल का याची उत्सुकता ही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.

     

    निकालाची उत्सुकता तर आहेच पण शेवटच्या सुनावणीत लागलेल्या अंदाजानुसार सध्याच शिंदे-भाजप सरकार हे पळापळ करतय अस ही काही वृतमाध्यमांनी सांगितलं यातून जनतेन काय समजायच ते तर समजेलच …..

     

     

    पण जर कदाचित हे सरकार अवैद्य ठरलं तर महाराष्ट्राला राजकीय हेरा फेरी च दर्शन झाल अस म्हणायला हरकत नाही.

     

    राजकीय हेराफेरीत पणाला लागणारी थोर पुरुषांची प्रतिष्ठा आणि खुर्ची मिळवण्याच्या नादात पक्षातील लोकच नव्हे तर पक्षाचे चिन्ह सुद्धा उद्धव गटाला गमवावे लागले.

     

     

    पण इतक्या हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा अतूट महाविकास आघाडीचा नात दिसुन आल , भविष्यात शिंदे गट स्वबळावर मुख्यमंत्री निवडून आणेल का भाजप का मित्रपक्ष म्हणून सोबत ठेवेल ?

     

    का महाविकास आघाडीचा माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाचा आगामी निवडणुकात पराभव होईल ? हे पाहणं मजेशीर राहील.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

     

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    समाज आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहाचायच आणि प्रत्येकाच्या वाट्याला फुल ना फुलाची पाकळी देत निरंतर प्रवास करणार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी साध्य केल

    हा महाराष्ट्र आहे इथ अनेक पक्ष सत्तेवर आले तर अनेक पक्ष हे सत्तेपायी मातीमोल झाले प्रखर विरोध असतांनासुद्धा युती घडवून आणली आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली.

    हा एवढा खेळखंडोबा फक्त सत्तेपोटी नव्हता तर तो महाराष्ट्रातील समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकासाठी होता हे आज आपल्याला पाहायला मिळत.

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बहुचर्चित आणि ओळखीचं असणार अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पुन्हा या युतीच्या माध्यमातून पाहायला मिळालं हल्लीच या वर्षीच्या अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारणे सादर केला

    समाजकंटकिय वाद …

    यात कमतरता तर नाहीच नाही पण विरोधकांना चुका काढणं आणि त्यावर निषेध करण सुद्धा अवघड झालय. या अर्थसंकल्पात शिंदे सरकार म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय

    खास करून मागील २-३ वर्षांपासुन संतप्त शेतकरी वर्गावर भर दिलेला दिसून येत नवनवीन योजना आणि शेतकर्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात या सरकारने कमी भासू दिली नाही

    फक्त १ रु. भरून आपल्या पिकांचा पीकविमा भरण्याची योजना ही या सरकारने शेतकऱ्याला देऊन जिवनदान दिल्यासारखं आहे सध्याच बदलत हवामान आणि अवकाळी पडणारा पाऊस हा शेतकऱ्याच्या जीवावर उठला होता

    पण आता या योजनेअंतर्गत शेतकरी बिनधास्त होईल आणि खास म्हणजे ही योजना आता उन्हाळी पीकांसाठी सुद्धा लागू होईल म्हणजे आता समाजातील शेतकरी या घटकाला भरभक्कम होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    या युती सरकारने फक्त शेतकरीच नव्हे तर इतर घटकासाठी सुद्धा योजना आणल्यात जसं की असंघटीत कामगार आणि टॅक्सी-रिक्षा चालक यांसाठी एक स्वतंत्र महामंडळाची स्थापना सुद्धा या सरकारने करण्याचीही घोषणा केली.

    कित्येक दिवसापासून चालत आलेला प्रश्न म्हणजे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न सोडवण्यात सुद्धा हे सरकार अग्रेसर असल्याच दिसून येत.

    समाजातील काही घटकांचं अर्थिंक उत्पन्न हे कमी असल्या कारणास्तव शिक्षणापासून त्यांची पाल्ये वंचित राहता कामा नये यासाठी ८ वी पर्यंत मोफत शालेय गणवेश वाटपाची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पात केलेली दिसून येते,

    धनगर समाजास १००० कोटी तर १०,००० कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या सरकारने करून दाखवलं तसेच भाजपा सरकारणे चालू केलेल्या सरकारी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्याला ६००० रुपयांच मानधन मिळत होत

    पण या अर्थसंकल्पामार्फत राज्य सरकारने अजून ६००० रुपये वार्षिक मानधन शेतकऱ्याला देऊ केल आता एकूण १२,००० रुपयांच वार्षिक मानधन शेतकऱ्याला मिळेल

    तर आतापर्यंत वयोवृद्ध नागरिकांना मोफत प्रवासानंतर आता महाराष्ट्र राज्यातील महिला एस.टी. प्रवाश्यांना आता तिकिटामध्ये ५०℅ सुट देण्यात येईल .

    वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि अन्न-धान्यांना कमी मिळणारा भाव लक्षात घेता तत्पर सरकारणे कांदाउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रती क्विंटल कांद्यामागे ३०० रुपयांच अनुदान जाहीर केल .

    कोण म्हणत हे सरकार खोके सरकार आहे ?

    असा प्रश्न या राज्य सरकारण लोकांना पाडला आहे तर याऊलट मुख्यमंत्रीपदी विराजमान असणारे एकनाथ शिंदे हे विरोधकांना निशाणा करत

    तुम्ही तर फक्त गाजर दाखवले आम्ही जनतेला गाजराचा हलवा दिल्याचं

    स्पष्टीकरण देतात ….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    Facebook : Political Wazir   

  • समाजकंटकिय वाद …

    भारत देशाच्या इतिहासात अनेक युद्ध झाले काही हे हिंसक होते तर काही लढे हे गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने झाले.

    विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये क्षुल्लक कारण पुढे करत अनेक समाजकंटकांनी भारतात फुट पाडण्याचे डावपेच रचल्याचे दिसून येते पण भारत हा धर्मनिरपेक्ष आणि जातीभेदाला नाकारून विकासाच स्वप्न पाहत जगू इच्छितो

    पण राजकारण्यांनी आणि समाजकंटक लोक यांच्यामार्फत होणार कर्मकांड हे हिंसेंचे प्रमाण ठरते. भूतकाळात मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर प्रसंगी उद्भवलेला वाद

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    आणि सध्याच्या दिवसांमध्ये गाजलेला छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यामुळें तयार झालेले वातावरण हे चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या राजनितिक इतिहासानुसार वाद होने संभाविक आहे पण ,छत्रपतींच्या नावाने वाद उद्भवणे ही खूप संतापजनक आणि लाजिरवाणी बाब आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवाच राण करून या जुलमी मोगलांच्या ताब्यातून आपली सुटका करून या राज्याच स्वराज्य केल त्याच महाराजांच्या पुत्राने जीवाची आहुती दिली

    पण आपल्या धर्माचा रक्षण केल आणि जर त्याच महाराजांच्या नावाने जर आपल्या शहराला एक नवी ओळख मिळत असेल तर यात आपले सौभाग्य आहे पण समाजकंटक लोकांकडून याला सुद्धा विरोध होतोय.

    सध्याच सरकार हे नक्कीच फुटाफूटिच जरी असलं तरी लोकहितार्थ निर्णय घेणं आणि लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यात पुरेपूर कंबर कसताना हे सरकार दिसतंय .

    राजकिय साक्षरता

    हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला धरून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना या विषयाला हात लागला आणि भाजपा आणि शिंदे गट यांच्या सहकार्याने हे साध्य झाल

    नक्कीच जनमत सुद्धा या निर्णयाच समर्थन करून प्रशंसा करत आहे पण काही समजकंटक या नामांतराला विरोध करून पुन्हा औरंगाबाद करू इच्छितात कदाचित ते विसरले असावेत औरंगजेब हा किती क्रूर आणि निच्च विचारसरणीचा होता .

    जात,पात आणि धर्म बाजूला ठेवता भारताचा सुजान नागरिक या नात्याने तरी मी या निर्णयाशी सहमत आहे आणी तस पाहता अस ही खासदार इम्तियाझ जलील यांचं आंदोलन पाहून त्यात त्यांचाही पूर्णतः समावेश दिसत नाही

    लोकांनकडून मिळणारा अल्पप्रतिसाद आणि आंदोलनापेक्षा त्यांच्या भोजनाच्या पंगतीचेच जास्त चर्चे आहे यावरून कळत दिशाहीन व्यक्तीकडे लोकशाहीच प्रतिनिधित्व दिल्यावर काय होत !

    नक्कीच लोकांनासुद्धा नामांतर हवं होतच आणि जे झाल ते उत्तमच कारण ज्या औरंगजेबाच्या काळात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या त्या माणसाच नाव इतिहासातसुद्धा नसायला हवं

    तर त्याच व्यक्तिच्या नावाने एखादे शहर वसवणे हे आपल्या इतिहासाला मारकच होते त्यामुळें असल्या खासदार अथवा ठराविक लोकांच्या समूहाने विरोध जरी केला तरी यात फारस लक्षदेण्या इतपत महत्वाच अस काहीच वाटत नाही.

    ‘हे स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा होती ‘

    पण ते टिकवणे ही आपली जबादारी आहे 💯

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • शिवसैनिक कधी फुटतो का ?

    हिंदुहृदयसम्राट यांच्या विचाराची नाळ धरून सार्वभौमत्वाचा अवलंब करून हिंदुत्वाच्या कट्टरतेवर एकाच विचारसरणीचे लोक सोबत घेऊन बाळासाहेबांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली

    आणि सहकारी आणि सामाजिक विकासकामे यांच्या जोरावर लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देत सुरुवात केलेला हा शिवसेना पक्ष कधी काळी या पक्षाला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं

    पण स्वबळावर बाळासाहेबांनी याची अल्पावधीत ओळख निर्माण करून राजकीय क्षेत्राला एक नवा पक्ष देऊन राजकारणात क्रांती घडवली .

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    फुटीरतावादि लोकांना त्याग करून एकनिष्ठ लोक या पक्षास नेहमी महत्वाचे राहिले बाळासाहेबांनी दिलेला शब्द हा शिवसैनिकांसाठि नेहमी अंतिम राहायचा.

    महाराष्ट्राच्या राजकारणात आमुलाग्र बदल घडवून आणून बाळासाहेबांनंतर ती शिवसेनेची गादी हि उद्धव ठाकरे यांना सोपवन्यात आली एकनिष्ठ मंडळी हि साथीलाच होती

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    पण काळानुसार काही मतभेद हे वाढतच गेले परिणामि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली या कारणास्तव् शिंदे गट आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले

    आणि भाजप सोबत युती करून महराष्ट्रात सत्तापालट केली एकीकडे भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र आले असता भाजप पुन्हा सत्तेत येणं हि त्यांच्यासाठि खूप हनिकारक गोष्ट होती आणि ती गोष्ट या घटनेने सत्यात आली.

    एकीकडे भाजप पक्षातील लोक म्हणतात महविकास आघाडीमुळे शिवसेना संपली तर शिंदेगटसुद्धा या युतिने खुश बघायला मिळतोय.

    यातूनच नवीन वाद पेटला शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची आणि न्यायालयानेही शिवसेना एकनाथ शिंदे यांची म्हणत त्यांना धनुश्यबाण देऊ केलं पण यात उद्धव ठाकरे यांच्याप्रति लोकांची सहानुभूती पाहायला मिळाली

    आता बघायचं ते हि युती किती काळ टिकते आणि उद्धव ठाकरे पुन्हा पक्षबांधणी कशी करतात नक्कीच हि राजकीय खेळी भविष्यात लोकांना एकनिष्ठतेची जाणीव करून देणारी असेल .

    पण मनात विचार येतो तो कि,

    बाळासाहेब असते तर हे प्रकरण कसं पाहायला मिळालं असत म्हणजे नेमक यात परिस्थिती काय राहिली असती ?

    शिंदे आणि त्यांचें सहकारी हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध का गेले ?

    जर खरच शिवसैनिक आहात तर मग बोलून अंतर्गत वाद मिटवून शिवसेना आणखी बलाढय़ करू शकला नसतात का ?

    आज जर बाळासाहेब् असते तरी शिंदे गटाने हेच केलं असत का ?

    आणि खास म्हणजे भविष्यात आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळा गट म्हणून पाहायला मिळेल का भाजप चा अंतर्गत समूह म्हणून दिसेल ?

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • ‘सत्ता’ तंञ

    हल्ली महाराष्ट्रातील झालेल सत्तातंर बघता सामान्य जनतेला अनेक प्रश्न पडले असावे…..

    भारत देशाने इथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार केला आणि नक्कीच लोकशाही देशात आपल्याला सामान्य जनतेतील निडरपणा दिसून येतो.

    पण जर लोकशाही राज्यात जर जनतेला एखादा प्रतिनिधी देण्यासाठी बहुमताने विजयी कराव यातुनच त्या प्रतिनिधीचे वास्तविक विचार जनतेसमोर येतात आणि हेच विजयी प्रतिनिधी होणाऱ्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग ठरु शकतात .

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    राजकीय नेता हा संवेदनशील आणि काळानुसार बदलणारा हवा त्याचे उद्दिष्ट हे सत्ता मिळविणे नसून तिथल्या लोकांना रोजगार ,शिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणारे असावे .

    राजकीय नेत्यांसाठी सत्ता हि ५ वर्षाची असते पण जर याच प्रतिनिधीने त्याच्या सत्ताकाळात रोजगार उपलब्ध करुन दिला तर त्या रोजगार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबियांना पुढील ५० वर्षे तो राजकीय प्रतिनिधी लक्षात राहतो .

    ज्या प्रतिनिधींचे लक्ष हे निवडणूकांवर असते तो व्यक्ती त्याच्या जीवनात फक्त आणि फक्त राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण करतो

    तर सामाजिक जनतेच्या विकासासाठी झटणारा सामाजिक प्रतिनिधी म्हणून छाप पाडतो परिणामी सामाजिक नेता हा राजकीय नेत्यापेक्षा जनतेला आपलासा वाटतो .

    प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

    सामाजिक प्रतिनिधीना विकास करण्यासाठी आणि जनतेच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी गरज असते ती पदाची त्या कारणास्तव निवडणूक लढवणे आणि निवडून येणे भाग पडते ,

    हे सर्व घडत असताना जनतेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात जनतेने व्यवस्थितरीत्या पार पाडायला हव्यात सहसा आपलं मत हे योग्य उमेदवारास देणे .

    “सत्ता हि काही पैसे कमावण्यासाठी मिळालेली ५ वर्षे नसून जनतेच्या अडचणींचे निरासन करुन बदल घडवण्याचा काळ असतो ……..!”

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?

    मंडळी आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये अनेकदा राष्ट्पती राजवट लागली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट ही लागू होत असते. राज्यघटनेमध्ये याला ‘घटनात्मक यंत्रणा कोलमडन’ अस नमूद केलं आहे.

    यालाच ‘राज्य आणीबाणी’ अससुद्धा म्हणतात. एखाद्या राज्यामधल सरकार अस्थिर झालं असेल. तर त्याविषयीचा अहवाल तयार करून त्या राज्याच्या राज्यपालांना राष्ट्रपतींकडे सुपूर्द करावा लागतो.

    उदय सामंत गेले की पाठवले

    संबंधित अहवालानुसार त्या राज्यातील सरकार खरच अस्थिर झालं आहे का? याविषयीची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच त्या राज्याचा संपूर्ण कारभार राष्ट्रपती आपल्या हातामध्ये घेतात. आणि राज्यपालांच्या माध्यमातून त्या राज्याचा कारभार चालवल्या जातो.

    राष्ट्रपती राजवट एकदा लागू केली तर पुढील दोन महिन्यांपर्यंत राहते. या दोन महिन्यांमध्येसुद्धा त्या राज्यामध्ये सरकार स्थापन झालं नसेल आणि राष्ट्रपती राजवट पुढे ढकलायची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी घ्यावी लागते.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांपर्यंत पुढे चालवता येते. हीच प्रक्रिया दोनदा करता येते म्हणजेच एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट सबंधित राज्यामध्ये चालवता येते.

    याहीव्यतिरिक्त राष्ट्रपती राजवट पुढे लांबवायची असल्यास निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याकरिता योग्य वातावरण नसल्याचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करावा लागतो. राष्ट्रपतींना संबंधित अहवालाची पुन्हा खात्री करून घ्यावी लागते.

    आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मंजुरीने राष्ट्रपती राजवट ही चालू ठेवता येते. मात्र फक्त ३ वर्षापर्यंत याचा कालावधी असतो. त्यापेक्षा जास्त कुठल्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ठेवता येत नाही. 

     राष्ट्रपती राजवट नेमकी कशासाठी ?

    मंडळी एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर झालं असेल. तर सरकार स्थापन होईपर्यंत त्या राज्यातील जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • स्वतःच पॅनल आणि ग्रामपंचायतवर तरुणांचा विजय

    मंडळी आपण आतापर्यंत कित्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित लोकांचं राजकारण पाहल असेल. मात्र एखाद्या गावामध्ये सर्वसाधारण कुटुंबातील तरुण मिळून पॅनल तयार करणे व गावातील लोकांची मन जिंकून ग्रामपंचायतवर स्वतःच पॅनल निवडून आणणे. अशी एखादी गोष्ट घडावी हे कल्पनेच्या पलीकडेच आहे.

    पण हे शक्य करून दाखवलं आहे अकोला जिल्ह्यातील आपोती गावामधील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय वैभव तराळे आणि त्याच्या पॅनलने. वैभव तराळे हा तरुण गोदावरी येथील अभियांत्रिकी विद्यालयात शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असून कोरोना प्रादुर्भावामुळे घरूनच ऑनलाइन वर्ग करीत होतास.

    सत्तापिपासु औरंगजेब

    त्यामुळे त्याचा आपल्या आपोती गावातील लोकांशी संपर्क चांगल्या प्रमाणात वाढला. वैभव हा सकाळच्या इनचा जिल्हाध्यक्षसुद्धा आहे. आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना वैभवने केलेले हे कार्य खरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

    वैभवचे वडील एसटी महामंडळामध्ये नोकरी करतात तर आई हे गृहिणी आहे. वैभवने केलेला हा विक्रम तरुण वर्गातील प्रत्येक मनाला प्रेरणा आणि हिम्मत देणारा आहे. 

    रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

    पॅनलमध्ये वैभव तराळेच्या बहिणीचासुद्धा विजय 

    स्वतःच अभियांत्रिकीच शिक्षण घेत असताना ग्रामपंचायतवर आपलं पॅनलतर वैभवने निवडून आणलंच. मात्र आपल्यासोबत अभियांत्रिकीच शिक्षण पूर्ण झालेल्या आपल्या बहिणीलासुद्धा विजय मिळवून देण्याच काम वैभवच्या कार्यकर्तृत्वाने साकार झालं आहे. वैभव तराळेच्या पॅनलमधील सातपैकी पाच सदस्यांनी विजय मिळवून आपोती ग्रामपंचायतवर आपला शिक्कामोर्तब केला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • अजाण आणि हनुमान चालीस्याच्या वादावर फुटेज पण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कव्हरेज नाही

    मंडळी एकीकडे महाराष्ट्रातील राजकारण भोंगा अजाण हनुमान चालीसा या सर्व मुद्द्यांवर चाललेलं असताना एखादा शेतकरी एखाद्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करतो, तरी सोशल मीडिया या घटनेला कव्हरेज देत नाही ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे.

    शेतकऱ्याची विशिष्ट कुठली जात किंवा धर्म नाही तर त्याला फुटेज कसा मिळणार?  महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर ईडीची कारवाई करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे काही नेत्यांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांची माथी भडकवून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यामध्येच रुची वाटत आहे.

    भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन

    गरिबांची मूल जातात मग हातामध्ये धर्माचे झेंडे घेऊन एकमेकांच्या धर्माची कत्तल करायला. गुन्हा पण सर्वसाधारण मुलांवरच दाखल होतो. मात्र नेते आपल्या भाषणामधून फुकटच्या बाता करण्यात मग्न असतात.

    राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र

    एखादा कवी एखादा लेखक शेतकऱ्यावर कविता करून एखादा पुरस्कार घेऊन मोकळा होतो. मात्र शेतकरी अजूनही मरतोच आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. 

    बीडमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येपासून राजकीय नेते धडा घेणार काय? 

    काल महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेवजी जाधव नावाच्या शेतकऱ्याने आधी शेतातील ऊस पेटवून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    सध्या महाराष्ट्रभरात हनुमान चालीसा आणि अजाण यावर राजकारण चालू आहे. जे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यांनी एकदा शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न विचारून बघावे. तुमचा भोंगा आमच्या कामाचा नाही, तर इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    मंडळी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये चांगलच चर्चेत असलेलं नाव आहे. मुंबई आणि ठाणे येथे सभेमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेवरून संपूर्ण राजकीय क्षेत्र व्यस्त झालं आहे.

    राज ठाकरे यांची ठाणे येथील सभा झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली होती की येणारी सभा कुठे व कधी होणार ? अखेर राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद  येथे पार पडली. सभेआधी ही सभा होणार की नाही? सभेला पोलीस प्रशासन परवानगी देणार की नाही? अस सर्वांना वाटत होतं.

    राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील

    काल औरंगाबाद येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये लाखो लोकांचा सैलाब उसळून पडला. सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर पूर्ण भाषणभर टीका केली.

    मात्र जेव्हा चालू भाषणामध्ये राज ठाकरेंना मुस्लिम बांधवांची अजाण ऐकू आली तेव्हा राज ठाकरे यांनी खुलेपणाने दंगल घडवण्याचे अप्रत्यक्ष निर्देश दिले. अजाण ऐकू येताच राज ठाकरे म्हणाले की,

    ” पोलीस प्रशासनाने या जरा लोकांना सांगावं अन्यथा ते अजाण थांबवत नसतील तर त्यांच्या तोंडात बोळा घालावा. ते ऐकत नसतील तर आमच्यापण मनगटात ताकद आहे. एकदा होऊन जाऊ द्या जे काय व्हायचं ते.”

    अशा शब्दात राज ठाकरे यांनी काल खुलेपणाने महाराष्ट्रात दंगल घडवायचे निर्देश दिले. 

    राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

    महाराष्ट्रातील भोंगे हटवा अन्यथा काही पण होऊ शकत – राज ठाकरे 

    राज ठाकरे पुढे बोलताना ते म्हणाले की,

    ” ज्या प्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या सरकारने भोंगे खाली उतरवले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा भोंगे उतरवण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रात काही घडलं तर मला माहिती राहणार नाही.”

    असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. मात्र आता विरोधी पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir