Category: ऐतिहासिक राजकारण

  • कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला? नितीन गडकरींचं वक्तव्य…

    कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही.. टेस्ट ट्यूब बेबी कशाला?

    नितीन गडकरींचं वक्तव्य..

    लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर कोल्हापूरमधे (४ मे) एका सभेत IVF सेंटरवर बोलताना नितीन गडकरींनी “तुमच्या कोल्हापूरमध्ये मर्द लोकांची कमी नाही. टेस्ट ट्यूब बेबी प्लांट कशाला पाहिजे!” असे वक्तव्य केले आहे. या वरुन ते विरोधकांच्या घेरावात सापडले आहेत.

    लग्नानंतर मुल होत नसेल, तर टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या आधारे मुल जन्माला घालून, त्याचे नैसर्गीकरित्या पोषण केले जाते. परंतु नितीन गडकरींनी लोकांच्या वैयक्तीक विषयाला राजकीय रुप देवुन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

    टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?
    टेस्टट्यूब – बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्रज्ञान आहे. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भधारण प्रक्रियेमध्ये ओव्हरीज मधून एग्ज रिलीज होतात आणि फेलोपियन ट्यूबकडे पाठविले जातात. येथे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे फर्टिलायझेशन होते आणि गर्भधारणा होते. जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही. तेव्हा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेचा वापर केला जातो.

    या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात, आणि ऍडवान्सड लॅब मधील इन्क्युबेटर्स मध्ये फर्टीलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण/एम्ब्रियो स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होते. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात.

    टेस्ट ट्यूब बेबी ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाळांना जन्म देण्यात आले आहे. आणि त्यात गैर काही नाहि. परंतु नितीन गडकरींनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मर्दानगी वर बोट करत मुलं होत नाही. अशा लोकांचा अपमान केला आहे. असे विरोधकांचे मत आहे.

    टेस्ट ट्यूब बेबी प्लांटची मागणी केल्या नंतर लोकांच्या मर्दांगी वर बोलत लोकांचे लक्ष विचलीत करुन टेस्ट ट्यूब बेबी प्लांटच्या मागणीकडे नितीन गडकरी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

  • महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष!

    महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष!

    उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रातुन लोकसभेत सर्वात जास्त उमेदवार पाठवले जातात. त्यामुळे लोकसभेत बहुमत पाहिजे असेल तर महाराष्ट्रातुन जास्तित जास्त जागा मिळवणे आवश्यक आहे. या लेखातून ४०० पार ची घोषणा देणार्या भाजपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे समजुन घेवुयात.

    महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होताना दिसत आहे. पहिल्या दोन टप्यातले मतदान झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तिन जिल्हांचा समावेश होता. या दोन टप्यात मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे असल्याचा अंदाज आहे.

    त्यामुळे महायुतीच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जास्तित जास्त प्रचार सभा घेताना दिसत आहेत. शिवसेना पक्षाचे विभाजन होवून शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाले. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी शिवसेनेची ओळख ठाकरे कुटुंबच आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना लोकांचे भावनीक समर्थन मिळत आहे. आणि त्या जोरावर उध्दव ठाकरे यांची मशाल (ठाकरे गट) एकनाथ शिंदे यांना भारी पडत आहे.

    त्यामुळेच पहिल्या दोन टप्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव जास्त दिसला नाही. त्याच बरोबर राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा फुट पडुन अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवारांची महाराष्ट्रात असलेली राजकीय प्रतिष्ठा आणि त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी महाष्ट्रात महायुतीला अडचणीत आणलय. उमेदवारी देताना राजकीय खेळी खेळत एकमताने महायुतीला जागा मिळेल, असे वाटत होते, त्या मतदार संघात पण राजकीय संघर्ष पेठलेला दिसतोय.

    बीड मतदारसंघ भाजपाचा गड राहिला आहे. सलग ३ वेळा या मतदारसंघात भाजपाची सत्ता होती. परंतु या वेळेस या मतदारसंघात भाजपाला संघर्ष करावा लागत आहे. मराठा आरक्षणामुळे या मतदारसंघात जनतेची भाजपावर नाराजी असल्याचं दिसुन येत आहे.

    त्याचबरोबर अहमदनगर मध्ये सुद्धा विखे पाटिल विरुध्द निलेश लंके हि लढत चांगलीच रंगली आहे. विखे पाटिल विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात पवारांनी निलेश लंकेंना उमेदवारी देवुन विखे पाटलांची कोंडी केली आहे.

    एवढेच नाही तर बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली आहे. एका बाजुला शरद पवारांची मुलगी आहे तर दुसर्या बाजुला सून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.

    या वेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाची हवा किंवा लाट दिसत नाहि आहे. हि निवडणुक पुर्णपणे स्थानिक मुद्यावर होत आहे. विविध मतदारसंघाच्या अभ्यासाच्या आधारे असे लक्षात येते की, या वेळेस महाराष्ट्रात भाजपाला २० ते २४ जागावरच समाधान मानावे लागणार आहे.

    महाराष्ट्रातुन भाजपाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पक्ष फुटी आहे. पक्ष फुटी मुळे शरद पवार गट आणि उध्दव ठकरे गट यांना लोकांचे भावनिक समर्थन मिळत आहे. याचा परिणाम विधान सभेवर सुद्धा दिसून येण्याची शक्यता आहे.

  • शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस – माढ्याचं रणकंदन

    महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग दिवसागणिक बदलताना दिसत आहेत. त्यातच शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या चुरशीचा एक अध्याय 16 जानेवारीला फलटण येथे बघायला मिळाला. निम्मित विकास कामांच्या भूमिपूजनाचं होत. पण टोले मात्र शरद पवार यांना लगावले गेले. ह्या मुद्याचे सविस्तर विश्लेषण आपण ह्या लेखात बघणार आहोत.

    नीरा देवघर प्रकल्प; धोम बलकवडी जोड कालवा; नाईकबोमवाडी MIDC जमीन हस्तांतरण आणि फलटण बारामती रेल्वे लाईन ह्या तीन मुख्य विकास कामांच्या भूमिपूजनाचा वचनपूर्ती सोहळा फलटण(सातारा) येथे पार पडला.

    कार्यक्रमाची महत्वाची रूपरेषा होती की, माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या परिसरातील दुष्काळ कमी होऊन त्या भागाचा विकास व्हावा. ह्या विकासकामांचा मुख्य फायदा जरी फलटण आणि आसपासच्या परिसरापुरता मर्यादित असला तरी, याची मार्केटिंग संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघात केली गेली.

    याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, बारामती प्रमाणे माढा देखील शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. येत्या 2024 लोकसभा निवडणुकीत पवारांचा हा बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 2014 ते 2019 हा मतदारसंघ विजसिंह मोहिते – पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे होता.

    मात्र 2019 साली काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाकर यांना भाजपाने उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काढून संजय मामा शिंदे यांना तिकीट देण्यात आले. माढा पवारांचा बालेकिल्ला असल्याने, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढाई चुरशीची बनवली आणि यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.

    माढ्यात सध्या वर्चस्व कोणाचं?

    माढा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. करमाळा – संजय शिंदे (अपक्ष – अजित पवार गट) ;
    माढा – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी – भूमिका स्पष्ट नाही ) ;
    सांगोला – शहाजी बापू पाटील (शिवसेना) ;
    माळशिरस – राम सातपुते (भाजपा);
    माण- जयकुमार गोरे (भाजपा);
    फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

    ह्या सहा विधानसभा मतदार संघा पैकी माढा अपवाद वगळता, बाकी पाचही आमदार सध्या महायुतीकडे आहेत. माढा अपवाद यासाठी की आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार किंवा अजित पवार यांपैकी कोणत्या गटात जायचे याबद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही.

    माढा लोकसभेसाठी भाजपची दिशा

    शिंदे आणि पवार बंडानंतर, माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तीन आमदार महायुतीत गेले. त्यामुळे त्या 3 आमदारांवर गद्दारीचा शिक्का आहे. त्याची परिणती लोकसभा निवडणुकीत होऊन माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातून निसटायला नको, हा विचार सध्या भाजपा नेतृत्व करत असेल.

    तसेच, माढा परिसरात शरद पवारांना मानणारा एक विशिष्ठ मतदार वर्ग आहे. त्या वर्गाला शरद पवारांपासून तोडण्याचा भाजपचा अट्टाहास मागच्या काही काळात बघायला मिळालेला आहे.

    अश्या परिस्थितीत विकासकामांचा धडाका लावणे आणि आज वरची माढा मतदारसंघाची स्थिती शरद पवारांमुळे दुष्काळी होती, हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर 16 जानेवारीला झालेल्या वचनपूर्ती सोहळ्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा ओघ असाच काहीसा होता.

    येत्या काळात, शरद पवार काय समीकरणे फिरवतात यावरच माढा कोणाकडे जाईल? याचे उत्तर मिळेल.

    तत्पूर्वी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.

  • स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ

    राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नसून शौर्य, त्याग आणि राष्ट्र उभारणीच्या तत्त्वांना समर्पित झालेला उत्सव आहे. १२ जानेवारी हा दिवस भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण घडवण्यात, राजमाता जिजाऊ यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची एक मार्मिक आठवण आहे. जिजाऊसाहेबांनी केलेल्या त्यागाचं, संघर्षाचं प्रतीक म्हणून हा दिवस आहे.

    राजमाता जिजाऊ साहेबांचा जीवनपट उलगडून पाहत असताना त्यांच्याबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले असे जिजाऊंचे संपूर्ण नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे भुईकोट राजवाड्यामध्ये राजे लखोजीराव जाधव व आई म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. म्हणूनच १२ जानेवारी ह्या त्यांच्या जन्मदिनी राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जाते.

    इतिहासात एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्याला त्यांची जयंती साजरी करावीशी का वाटते? तर यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कृती आणि शिकवणींद्वारे, आजही जिजामाता खूप लोकांना प्रेरणा देतात.

    जिजाऊ ह्या स्वराज्यवादी विचारधारेच्या महान पाठीराख्या होत्या. गुलामगिरीची त्यांना खूप चीड होती, सामान्य रयतेवर मुघलांकडून होणारे अत्याचार थांबवण्याची, तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची त्यांची ईच्छा होती. म्हणून जिजाऊंना वाटायचे कि, त्यांच्या पोटी असा पुत्र जन्मावा कि, ज्याच्या नावाचा झेंडा त्रिलोकात पसरावा. आणि जिजाऊंच्या अंगी असणारी स्वराज्याची प्रेरणा बघून देवाने त्यांच्या पोटी असं पुत्ररत्न जन्माला घातलं की ज्याने पुढे चालून मुघलांना पळता भुई थोडी केली. जिजाऊंनी १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला.

    जिजाऊ यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी होते. त्या एक योद्धा होत्या म्हणूनच त्यांनी प्रत्येक संकटा विरुद्ध शूरपणे आणि खंबीरपणे लढा दिला. वेळ प्रसंगी त्या रणांगणात उतरण्यासाठी तयार असायच्या. त्यांची स्वत:ची अशी एक विशिष्ठ विचारसरणी होती. जिजाऊंचे देश व धर्मावर अत्यंत प्रेम होते त्यांनी हेच धडे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दिले.

    मराठी साम्राज्य स्थापन करण्यात जिजाऊंचा सिंहाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारातील प्रत्येक गोष्ट जिजाऊंच्या मार्गदर्शनाने केली. कारण त्या अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होत्या तसेच मुत्सद्दी राजकारणात देखील माहीर होत्या. स्वराज्य मिळवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी त्याचा छावा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पूर्ण करुन घेतले. म्हणूनच त्यांना स्वराज्यजननी असे संबोधले जाते.

    ✍️शब्दांकन – शिवव्याख्याते आशिष पगार (८९९९५१५४२०)

  • शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र; म्हणजेचं राहुल नार्वेकरांनी भेदभाव केला?

    दीड वर्षा पूर्वी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे विरुद्ध उध्दव ठाकरे संघर्षात शिवसेना कोणाची, ह्या वादाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारा पक्ष म्हणजे शिवसेना” असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. तर आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होता. पण घटनात्मक मर्यादा राखत, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्याचे ठरवले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन विधानसभा अध्यक्षांना दिल्या आणि त्या गाईडलाईन नुसार विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित होते.

    अश्या सर्व खटाटोपा नंतर अखेर आमदार अपात्रता निर्णयाची 10 जानेवारी ही तारीख ठरली. सायंकाळी साडेचार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात त्यांनी निकाल वाचन न करता निकालाचे सारांश वाचन केले.

    निकालाची वैशिष्ट्ये

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये आपण बघू;

    1) शिंदे गट हाचं मूळ शिवसेना आहे.
    2) भरत गोगावले हेचं मुख्य प्रतोद आहेत.
    3) पक्षाच्या बैठकीला जर एखादा नेता उपस्थित नसेल तर, त्याला पदावरून बरखास्त करणे, हे पक्षांतर्गत लोकशाहीला धरून नाही.
    4) शिवसेनेच्या दोघं गटांचे आमदार अपात्र नाहीत.
    5) शिंदेंची भारतीय जनता पक्षासोबत सांगड आहे. याचे कोणतेही पुरावे नाही. हे फक्त आरोपचं आहेत.
    7) शिवसेना पक्षाची 1999 ची घटना हीच अंतिम असेल. कारण पुडच्या घटनादुरुस्त्या निवडणूक आयोगाला मिळालेल्या नाहीत.

    असे काही ठळक मुद्दे निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिरेखीत केले.

    निकलाचे थोडक्यात विश्लेषण

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकाल वाचन जसे जसे पूर्णत्वाकडे जाऊ लागले. तश्या लोकांच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून उमटायला सुरुवात झाली. कोणी शिंदेंच्या बाजूने तर कोणी ठाकरेंच्या बाजूने स्वतःची प्रतिक्रिया देत होते. पण निकालाचा मुख्य सारांश हा पक्षपाती आहे हे उघड.

    कारण, मुख्य राजकीय पक्ष हा उध्दव ठाकरेंचा आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मग अश्या वेळी एकनाथ शिंदे हे उध्दव ठाकरेंना सोडून 16 आमदार घेऊन सुरतला गेले आणि मोबाईल बंद करून ठेवला, याला काय म्हणावे? शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्याचा आदेश असेल, की आपल्याला भाजपा सोबत युती करून सरकार स्थापन करायचे नाही. तरी एकनाथ शिंदे भाजपा सोबत सरकार स्थापन करतात. मग ह्याला पक्षविरोधी कारवाई का नाही म्हणायचे?

    राहुल नार्वेकर म्हणतात, एकनाथ शिंदे आणि भाजप यांची काही मिलीभगत नाही. किंवा याचे काहीही पुरावे नाहीत. मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. त्यावेळी शिंदे समर्थक आमदार, गोव्याला हॉटेलमध्ये टेबलावर चढून लहान मुलाप्रमाणे नाचत होते, असा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. हा पुरावा राहुल नार्वेकर यांनी का मानू नये? किंवा हा पुरावा पुरेसा नाही का?

    सर्वोच्च न्यायालयाने, विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता सुनावणीसाठी काही निर्देश दिले होते, जे की सक्तीचे होते. त्यात एक निर्देश असा होता की, शिवसेना कोणाची? यावर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निकालाचे कोणतेही दडपण किंवा आधार घेण्याची गरज नाही किंवा तसे करू नये. पण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक निखिल वागळे म्हणतात त्या प्रमाणे, राहुल नार्वेकर यांनी निकाल तयार करताना, पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतलेला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावरूनचं शिवसेना कोणाची? आणि मुख्य प्रतोद कोण? याचे उत्तर दिलेले दिसते.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल काही वेळासाठी आपण 100% निष्पक्ष आहे असे समजू. मग पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिंदे किंवा ठाकरे यांच्यापैकी एक गट अपात्र व्हायला हवाच होता. पण दोघं गट पात्र ठरले, मग याचा अर्थ काय? किमान ठाकरे गट तरी अपात्र व्हायला होता. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, की निकाल हा पक्षपाती आहे.

    त्यानंतर सुनील प्रभू यांचा व्हीप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अमान्य केला. प्रभू यांनी दिलेला व्हीप अमान्य करण्याचे कारण काय? तर त्यांनी व्हीप वर केलेली सही चुकीची आहे. पण सुनील प्रभूंनी सुनावणी दरम्यान उलट तपासणी वेळी एक बाब वारंवार सांगितली की, “मी नेहमी दोन सह्या करतो. मात्र, आजपर्यंत विधिमंडळ कामकाजात एकच सही केलेली आहे. काही शंका असल्यास त्याची तपासणी करावी.” तरी सुद्धा सुनील प्रभू यांचा व्हीप अमान्य करण्यात आला.

    असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यावरून 16 आमदार अपात्रता निकालाची पक्षपाती असण्याची शंका येते. ते आपण येत्या काही लेखांमध्ये बघणार आहोत. लोकशाही वाचवण्याचे ढोंग करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीचा आणि महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचा विश्वासघात केलेला आहे. यावर तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया Political Wazir वर नक्की नोंदवा.

  • वंचित बहुजन आघाडीला एवढं महत्त्व का दिलं जातंय?

    2024 हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. मतदारापासून तर उमेदवारापर्यंत आणि कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत निवडणुकांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचं पार्श्वभूमीवर देशाच्या राजकरणात अष्टपैलू भूमिका बजावणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अनेक पैलू आपल्याला बघायला मिळतात, त्यातलाच एक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आज आपण जाणून घेणार आहोत, की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी महत्त्वाची का आहे? तसेच असे कोणते घटक आहेत की ते वंचितचे महत्व अधोरेखित करतात.

    वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचा संबंध

    प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून, ते मूलतः आंबेडकरवादी चळवळीतून उदयास आलेले नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत केली. 1990 साली ते राज्यसभेवर गेल्याने पहिल्यांदा खासदार झाले. त्या नंतर त्यांनी 1998 च्या अकोला लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आणि 1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदार संघातून विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले.
    2018 साली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली आणि आपला भारिप बहुजन महासंघ वंचितमध्ये विलीन केला. थोडक्यात असे समीकरण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचे आहे.

    वंचित फॅक्टर चर्चेत कसा आला?

    20 मे 2018 रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत वंचितने आपले उमेदवार उतरवले. त्यासाठी वंचितने AIMIM ला सोबत घेतले. 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्र काँग्रेस ने पराभवाचे खापर वंचितवर फोडले.

    काँग्रेस जरी पूर्णपणे वंचितला जबाबदार ठरवत असली तरी शिर्डी, सोलापूर, अकोला ह्या तीन लोकसभा मतदारसंघात आंबेडकरवादी विचारधारेच्या मतदारांचा प्रभाव अधिक आहे. 2019 पर्यंत हा मतदार पारंपरिकरित्या काँग्रेसकडे झुकणारा होता, पण वंचितच्या उडीमुळे तो मतदार काँग्रेस पासून दुरावला गेला, असे म्हणायला जागा आहे.

    असेच काहीसे झाले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे, येथून चंद्रकांत खैरे बराच काळ लोकसभेवर निवडून जात होते. कारण येथील हिंदू मतदारांवर त्यांचा प्रभाव होता. पण वंचित बहुजन आघाडीमुळे औरंगाबाद परिसरातील हिंदू-आंबेडकरवादी मतदार AIMIM च्या इम्तियाज जलील यांच्या बाजूने उभा राहिला आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला.

    2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचितने कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी न करता, स्वतंत्र निवडणूक लढवली आणि ह्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसला. तब्बल 40 पेक्षा अधिक जागा, जिथे आंबेडकरवादी विचारांचे मतदार काँग्रेसकडे जाणारे होते, त्याठिकाणी आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांना वंचितने अश्वासित केल्याने, महाविकास आघाडीला ह्या 40 जागांपासून वंचित रहावे लागले, साधारण असे ठोकताळे आजपर्यंत बांधले गेलेत. ह्या सगळ्यामुळे वंचित फॅक्टर चर्चेत आला.

    महाविकास आघाडीला वंचितची गरज का वाटतेय?

    वरती बघितल्या प्रमाणे, मतांचे विभाजन टाळणे हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, यात काही शंका नाही.

    महाराष्ट्रात 12 टक्के लोकसंख्या दलीत आणि सलग्न जाती समुहांची आहे. तब्बल 59 जाती समुदाय, ह्या 12 टक्क्याचा भाग आहेत. ह्या मतदारांना प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी हा अश्वासक चेहरा वाटतो. जो आपल्या सोबत आल्यास मतांची टक्केवारी आणि जागांची संख्या वाढवणे आघाडीला सोईचे जाईल.

    तसेच गेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित आणि AIMIM या दोघांनी मिळून 6 टक्के मतं मिळवली. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या वंचितने 4 टक्के मतं मिळवल्याने राज्यात पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. ही आकडेवारी बघता, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व अधोरेखित होते.

    महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपची अस्वस्थता वाढली होती. त्यानंतर भविष्यात निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा साम-दाम-दंड-भेद असे सगळे पर्याय वापरेल असे बोलले गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फुटून भाजपाला जाऊन मिळाले. त्याचा संपूर्ण आरोप भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाला. अश्या परिस्थिती भाजपा भक्कम होत आहे, असे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होऊ शकते. अशा परिस्थितीत भाजपाला ओबीसी व्यतिरिक्त मतदार आपल्याकडे ओढण्यास मर्यादा याव्यात, असा विचार ठेवून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला फायद्याचे ठरेल.

    तसेच, फुले-शाहू-आंबेडकर फॅक्टर वापरून राष्ट्रवादीचा शरद पवार गट ज्या मतदारांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आजवर करत आलेला आहे. त्याचं मतदारांवर अजित पवार गट देखील हक्क दाखवू शकतो.

    मग अश्या वेळी वंचित बहुजन आघाडी जर मविआ बरोबर असेल तर अजित पवार गटाला फुले-शाहू-आंबेडकर फॅक्टर नुसार अधिकचे मतदार आपल्याकडे घेण्यास भरपूर मर्यादा येतील आणि अंतिमतः फायदा मविआलाच होईल.

    काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट, शिवसेना-ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांचं एका मुद्यावर एकमत आहे, ते म्हणजे भाजपाला थांबवणे. मग अशा वेळी महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधन यांना वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेण्यास फार काही अडचण येणार नाही अशी शक्यता सध्या तरी दिसते. याही पलीकडे वंचितचा पाहिला खासदार आणि आमदार कोण निवडून येतो, हे बघणे तितकेच उत्सुकतेचे असेल हे मात्र नक्की.

    आपली प्रतिक्रिया अवर्जून नोंदवा.

  • महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ?

    महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री विनोद तावडे ?

    मुख्यमंत्री विनोद तावडे?

    रविवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना, एका पत्रकाराने “पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवण्या बाबत” प्रश्न विचारला असता. त्यावर विनोद तावडे यांनी “तुम्ही मी मुख्यमंत्री होईल का?” असा प्रश्न का विचारात नाही? असे मिश्किल अंदाजात उच्चारले.

    पण खरचं विनोद तावडे मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर हा प्रश्न तसा रास्तच आहे. कारण एक, विनोद तावडे हे मराठा चेहरा आहेत. ज्यामुळे भाजपाला राज्यातील मराठा समाजाला सोबत घेणे सोईचे जाईल. तसेच “ब्राम्हणवादाला पुढे रेटणारा पक्ष” ह्या टीकेला भाजप तावडेंच्या माध्यमातून खोडून काढू शकतो.

    दोन, उत्कृष्ठ संघटन कौशल्य आणि प्रभावी रणनीतीकार याच्या जोरावर, भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या महत्वाच्या पदाची जबाबदारी विनोद तावडे यांनी मिळवली. विशेष म्हणजे याआधी दिवंगत प्रमोद महाजन हे एकमेव नेते भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बसलेले होते. तावडेंचे कौशल्य पाहता, त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी – शहा यांचे दौरे ठरवण्याची आणि 2019 साली भाजपा ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होती, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तेथील उमेदवार निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. एकूणच यानुसार मोदी – शहा यांचा तावडेंवर भक्कम विश्वास असल्याचे दिसते.

    तीन, स्वच्छ प्रतिमा असणारा नेता. सध्या महाराष्ट्र भाजपचे नेते कोणत्या न कोणत्या वादात अडकलेले दिसतात. मग बावनकुळेंचे कॅसिनो प्रकरण असेल, चंद्रकांत पाटलांवर वारंवार होणारी शाईफेक किंवा त्यांच्या दौऱ्यांना होणार विरोध असेल, किंवा देवेंद्र फडणवीसांवर शिवसेना-राष्ट्रवादी फोडल्याचे आरोप आणि 2019 च्या पाहटेच्या शपथविधिमुळे ओढवून घेतलेली वरिष्ठांची नाराजी असेल. पण त्याचवेळी ABVP पासून सुरुवात करणाऱ्या तावडेंचा प्रवास हा कायमचं चढता राहिलेला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप विनोद तावडे यांच्यावर नसल्याने, भाजप हायकमांड तावडेंना पुढे करू शकते.

    चार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्या आधीच्या पक्ष्यात बंड करून सत्तेत बसल्याने, आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने त्यांच्या विरोधात मोठा मतप्रवाह आहे. तसेच नेहमी प्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारी सत्ता विरोधी लहर. आणि महत्त्वाचे म्हणजे शिंदे – पवार समीकरण दीर्घकालीन चालणारे आणि टिकणारे नाही याची जाणीव भाजपाला चांगलीच आहे. म्हणून अशा ठिकाणी विनोद तावडे परफेक्ट बसताना दिसतात.

    पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ABVP द्वारे राजकारणाची सुरूवात करणारा, RSS च्या मुशीत तयार झालेला, पक्षासाठी अडचणीच्या काळात धावून येणारा विश्वासू अशी विनोद तावडे यांची ओळख.

    यांसारख्या कारणांमुळे विनोद तावडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात. पण विनोद तावडेंना 2018 साली मंत्री पदावरून बाजूला सारण्यात आले होते. तसेच 2019 साली पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते, हे देखील विसरून चालणार नाही. तसेच “देवेंद्र फडणवीस हे देखील मुत्सुद्दी, अभ्यासू आणि भविष्याचा वेध घेणारे नेते,” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विनोद तावडेंसमोर असतील, यात कोणतीही शंका नाही.

    यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

  • धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे!

    राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर, “आम्हीच मुख्य राष्ट्रवादी आहोत” हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे दोनही गट आपापल्या पद्धतीने करताय. सभा, शिबिर, बैठका, मेळावे भरवून दोघं गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

    त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक 22 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडली. बैठकीत बोलत असताना अजित पवार बोलले की, “कोणत्याही पक्षासोबत आपली युती झाली तरी धर्मनिरपेक्षता व पुरोगामीत्वाच्या भूमिकेशी आणि फुले – शाहू – आंबेडकर यांच्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही.” आता यावर कोणी म्हणतय दादांनी बोलताना धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा अधोरेखित करून भाजपाला सुनावले; तर कोणी म्हणतय फुले – शाहू – आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा मुद्दा उचलून शरद पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण खरं तर हे दोघं मुद्दे बरोबर आहेत, कसं ते पाहूया.

    तर, अजित पवारांनी “धर्मनिरपेक्षता हे आपलं मुख्य तत्व आहे” असं बोलणं हे भाजपाला पचण्यासारखं नाही. कारण भाजप मंदिर-मस्जिदच्या वादात मंदिराची बाजू घेऊन, जास्तीत जास्त हिंदू आपल्या बाजूने कसे घेता येतील याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळेच गेल्या 30 वर्षापासून भाजपचा पारंपरिक मतदार हा हिंदू असल्याचे दिसते.

    पण त्याचं वेळी धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या राष्ट्रवादीला, भाजपा सोबत घेणार असेल तर नक्कीच पारंपरिक हिंदू मतदार दुखावला जाईल यात कोणतीही शंका नाही. कारण भारतीय धर्मनिरपेक्षतेचा एक कंगोरा हिंदू मुस्लिम एकतेचा असल्याने तो आजच्या हिंदुत्ववाद्यांना चालणारा नाही.

    म्हणजेच अजित पवारांनी, धर्मनिरपेक्षता हा आमचा आत्मा आहे असं बोलणं म्हणजे, जर की भाजपाने राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेला काही आडकाठी आणली, तर युती तोडण्याचा देखील विचार होऊ शकतो. असा अप्रत्यक्ष ईशारा भाजपाला दिला, असे म्हणता येऊ शकते.

    याद्वारे अधिवेशन काळात नवाब मलिक प्रकरणामुळे झालेला डॅमेज भरून काढण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला हे मात्र नक्की.

    धर्मनिरपेक्षतेवर ठाम पणा घेत, फुले – शाहू – आंबेडकर आणि पुरोगामित्व हे आपले प्रमुख तत्व आहेत, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. कारण फुले – शाहू – आंबेडकर ही त्रिसूत्री आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेली पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी रुजवली असेल तर ती शरद पवारांनी. त्याचं विचारधारेला अजित पवार शिरसावंद मानणारा असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी पसरवलेली वैचारिक चादर, अजित पवार आपल्याकडे ओढताय, हेच यावरून अधोरेखित होते.

    पुरोगामित्व सांगण्याचा दुसरा फायदा म्हणजे, महाराष्ट्रात फुले- शाहू -आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना मानणारा एक मोठा वैचारिक वर्ग आहे. जो की शरद पवारांच्या पाठीमागे उभा असलेला, आपण बघितलेला आहे. त्या वर्गाला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न अजित पवार करता आहेत.

    म्हणजे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी, शरद पवारांना सांगितले, की पुरोगामित्व आणि फुले- शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा ठेका, तुम्ही एकट्याने नाही घेतला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, तसंच पक्षाचे वैचारिक वारसदार देखील आम्हीच आहोत.

    अजित पवारांच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवरून, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि भाजप दोघांना खालच्या पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, हे भविष्यात कळेलच.
    तथापि माहिती कशी वाटली? आपली प्रतिक्रिया नोंदवून नक्की सांगा.

  • क्रांतीगाथा अंतिम भाग

    असे नव्हते की या क्रांतिकारकांची फाशी थांबावी म्हणून प्रयत्न झाले नाही…

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद मैदानात फाशी होऊ नये म्हणून म्हटलं , भगतसिंग यांच्या वडिलांनी सुद्धा प्रयत्न केले , महात्मा गांधी यांनी  सुद्धा व्हाइसरायशी रोखावी म्हणून बोलणं केलं…

    लोकांनी स्वाक्षरी करून, रक्ताचे शिक्के उमटवत पत्र सुद्धा लिहिले…

    #क्रांतीगाथा भाग ७

    पण भगतसिंगांना स्वतःलाच ती फाशी हवी होती…

    ” तो स्वतः च बोलला मै ऐसी कैद भरी  जिंदगी नही जी सकता और मै क्रांतिकारक हु ब्रिटिश हुकुमत मुझपर गोलीया चलाये….

    आणि लाहोर जेलला तो फोन आला…

    फासी एक दिवस अगोदर द्यायची आहे…

    २३ मार्च १९३१ , १४ नंबर च्या कैदखान्याचे गेट हलले , तो तेवीस वर्षाचा भगत लेनीन वाचत बसला होता, पुस्तकाचं शेवटचं पान अपुर्ण होतं , एका क्रांतिकारकांची भेट दुसऱ्या क्रांतिकारकांशी अपुर्ण ठेवून भगत बाहेर आला….

    #क्रांतीगाथा भाग ६

    राजगुरु आणि सुखदेव यांना बाहेर काढण्यात आलं तीघांचे वजन करण्यात आले  , अंघोळ झाली…

    आणि तो क्रांतिकारकांचा जथ्था बाहेर पडला….

    अवघं लाहोर चं सेंट्रल जेल हादरलं..

    इंकलाब जिंदाबाद चे नारे जोरजोर्याने लागत होते, सर्व क्रांतिकारक या तीन मित्रांना अखेरचा निरोप देत होते…

    तिघांच्या डोळ्यात इंकलाबी चा जज्बा जमला… ओठात शब्द उमटले…

    ” मरके कैसे जीते है…इस्स दुनिया को बतलाने तेरे लाल चले है माये अब तेरी लाज बचाने…

    आझादी का शोला बनके खुन रगो मज डोला ….माये रंग दे बसंती चोला…

    खुश रहो ए अहले.वतन अब हमतो सफर करते है….

    पर….पर….!!

    दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत की….मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन आयेगी….!!

    आणि हसुन जेलर ला भगत म्हणाला…

    “खुशनसिब हो  तुम जो आज.देख पा रहे हो की क्रांतिकारक अपने वतन के लिये कैसे मौत को हसकर गले.लगाते है….!!

    फाशीचे तख्त दिसताच तिघाचा वेग वाढला जणू एकमेकाशी फाशी वर अगोदर कोण चढणार म्हणून स्पर्धाच  लागली होती…

    तख्तावर येताच अखेर इच्छा म्हणून तिघांच्या हातांना मोकळे करण्यात आले…

    तीघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली…

    भगतसिंग जोर्याने ओरडला

    ” इंकलाब जिंदाबाद… !! “

    आणि राजगुरु सुखदेव म्हणाले….

    भगतसिंग जिंदाबाद….

    तिघांच्या तोंडावर काळा कपडा चढला , हात बांधण्यात आली… आणि संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनटांनी तिघांचे स्वप्न पूर्ण झाले….

    वतन के लिए शहादत का ख्वाब…..

    या स्वतंत्रदिनी या सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन🇮🇳

    ” पर हम है तुममे , सबमे…..की जब जब वतन के लिए खडे होने का वक्त आये तो ये क्रांतीगाथा तुममे तब भी जिंदा है…..!! “

    भारत माता की जय…..🇮🇳

    ✍🏻अक्षय चंदेल © 

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग ७

    #मा…भारत… मा…

    भगत !!! पुत्तर !!!

    १४ नंबर च्या त्या कैदखान्यात भगतसिंगांच्या कानावर आवाज पडला…

    तसाच तो तेवीस वर्षाचा मुलगा धावत धावत गेट जवळ आला…

    बाहेर डोक्यावर डुपट्टा कायम ठेवणारी भगतसिंग ची आई विद्यावती कौर  उभी होती…

    हातात रसगुल्ला चा भरलेला डबा होता..

    भगत ला काय आवडतं काय नाही याची क्षणाक्षणाला खबर ठेवणारी भगतची आई भगतला बघताच रडायला लागली…

    ” कैसा है ?? “

    अंगावर असलेल्या जखमा पाहून सुद्धा  मनाला धीर देत तीचे ते ओठ पुटपुटले…

    ” ठिक हू !! आप कैसे हो ?? “

    तेरे सिवा कैसी रह सकती हु पुत्तर ? सब कहते है… तैनु फासी होने वाली है….ये आखरी वक्त मिल रहे है हम ,पर भगत मैनु पता है रब तुझे मुझसे अभी अलग नही करेगा ,

    मा !! भगत आपल्या आईच्या हाताला स्पर्श करून म्हणाला…

    ” इक गल दस्सो !! यहा कितने सारे बच्चे है जो ऐसेही दुर जाने वाले है….वो राजगुरू अबतक अपने घरवालो से नही मीला… !! पर पता है हरकोई एक बात जानता है…की नाही अपने मा से दुर होकर भी भारत मा के आचल मे हम महफुज है…..और तुम तो भगत की मा हो….तुम्हे तो सब अपना आदर्श मानते है….तो मा बस्स एक बात मानना मेरी लाश लेने आप मत आना…क्योकी आप आओगी तो रोओगी और मै नही चाहता की कोई ये कहे की भगत की मा रो रही है….

    आपल्या लहानग्या पोराच्या तोंडुन हे शब्द ऐकून विद्यावती देवी ने आपले अश्रू पुसले….

    #क्रांतीगाथा भाग ५

    भगत सबको छोडके चला जायेगा तु… नही बेटा तु नही जायेगा…. इंकलाब जिंदाबाद इस आवाज मे तु हमेशा जिंदा रहेगा….

    आणि भेटीचा वेळ संपला…. रडतच त्या पालटल्या एकदा डोळे भरून शेवटचचं भगत ला बघितलं… एक अश्रूचा थेंब भगतसिंग च्या डोळ्यातुन सुद्धा कोसळला..

    तिकडे सुखदेव आपल्या घरच्यांच्या आठवणीत व्याकूळ झाला…

    राजगुरूंच्या डोळ्यात अश्रू तरले…

    गेली कित्येक वर्षे आपल्या घरच्यांना सोडून भारत मातेसाठी निघालेल्या राजगुरू ला सुद्धा आपल्या आईच्या कुशीत एकदा डोकं ठेवायचे होते…

    #क्रांतीगाथा भाग ६

    दगडाच्या त्या कैदखान्यात आईचं प्रेम पांघरूण कुठेही नव्हती…

    भारत मातेच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते पण पारतंत्र्याच्या बेडीत बांधलेले हात आपल्या लेकरांच्या डोक्यावरुन कसे घुमवावे ??

    तिकडे महाराष्ट्र च्या खेड (राजगुरूनगर ) मध्ये एक पदर अजूनही आपल्या लेकराची वाट बघत होता , पार्वती बाईचे डोळे कवाडाकडे लागलेले…..

    ” राजगुरु….कधी तरी परतशील न लेकरा….!! “

    पण क्षण ठरला होता २४ मार्च १९३१ … भगत , सुखदेव आणि राजगुरु च्या फाशीचा…..

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir