Category: ऐतिहासिक राजकारण

  • #क्रांतीगाथा भाग ६

    #आझाद हु मै……

    हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!!

    इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!!

    १२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली..

    भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता..

    भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती…

    अहिंसा आणि सशस्त्र या दोन्ही क्रांतींनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते…

    भारतीय क्रांतिकारकांच्या विरोधात ब्रिटिशांच्या मनात आग लागलेली होती…

    त्यातल्या त्यात अनेक क्रांतिकारकांची धरफकड होत नव्हती…

    #क्रांतीगाथा भाग ५

    भगतसिंग, जतीन दा , सुखदेव, राजगुरू, यान सारखे असंख्य क्रांतिकारकांची फौज उभे करणारे चंद्रशेखर आझाद हा मुक्त होते आणि त्यांना पकडणे ब्रिटिशांना सर्वात महत्त्वाचे झालेले….

    २७ फेब्रुवारी १९३१

    क्रांतिकारकांच्या अग्रगणी  चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यात थोडी सुद्धा विश्रांती नव्हती.

    भगतसिंग यांच्या कैदैनंतर आणि उपोषणाने क्रांतीची लाट उभी केली…

    एक नैतृत्व कसे असावे याचे उदाहरण म्हणजे चंद्रशेखर आझाद..

    आपले  यांना भेटण्यासाठी चंद्रशेखर अल्फ्रेड पार्क मध्ये आलेले….

    ब्रिटिशांना हा आझाद कधीच पकडता आला नाही… हा आझाद म्हणजे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलणारा अफ्ताब होता…

    म्हणून ब्रिटीशांनी आपली चाल टाकली..

    फितुरीच्या काळोखाला हाताशी  धरून स्वतंत्रसूर्याला कैद करण्यासाठी  अल्फ्रेड पार्क ला ब्रिटीशांनी घेराव केला…

    आणि धाड धाड करत गोळीबार सुरू झाला…

    त्याचं प्रत्युत्तर सुद्धा आझाद तेवढ्याच तडाख्यात देत होते.. आझादांची बंदुकीची प्रत्येक गोळी ब्रिटिशांना मारत सुटली पण नियतीने आपला फेर फिरवला…

    क्रांतीगाथा भाग ४

    आझादांकडे शेवटची एकच गोळी उरली…

    काय करावे?? शरणागती पत्करावी??

    नही !!! हम आझाद है और आझाद ही रहेंगे….

    आझादांनी आपल्या मातृभूमीची माती मस्तकावर लावली…

    त्या मातीत आझादांच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब एकरूप झाला…

    ” माफ करदेना ए वतन , तुझे आझाद करने का ख्वाब अधुरा रह गया !!! पर मै आझादी की लौ बनकर जिंदा रहुगा हमेशा !! “

    आणि धाड्ड….ड्ड…..ड्ड……

    गोळी चालली…

    आझादांनी स्वतःच्या हातातील बंदुकीने आपल्या जिवनाचा शेवटचा नारा बनवला…

    डोक्यातून रक्ताची धार निघाली…

    भेदक नजरा तश्याच उघड्या रोखून

    खुश रहो ए वतन म्हणत….

    शब्द थांबले , श्वास रोखून , आपल्या जन्मभूमीला मुक्त करण्याची स्वप्न असंख्य क्रांतिकारकांच्या ह्रदयात पेटवून  आझादी आझाद शेवट करून निघाले ..

    आझादांनी बलिदान दिले आणि एका अभेद्य क्रांतिचा शेवट झाला….

    ✍🏻अक्षय चंदेल©

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग ५

    #ए वतन तेरे लिये

    लाहोरच्या तुरुंगात भगतसिंगांना कैद करण्यात आले…

    जगभरात स्वतःच्या अनुशासनाचे बोंब मारणारे ब्रिटिश क्रांतिकारकां सोबत अगदी अमानुषपणे वागत होते , जेवणाच्या नावाखाली अपोषक जेवण , पाण्याची सोय सुद्धा पुरक नाही , स्वच्छता च्या नावाने बोंब ,

    रोज कैद्यांना मारायचं पण मानसिक खच्चीकरणाच्या नावाखाली जनावरांप्रमाणे वागणूक क्रांतिकारकांना दिली जात होती आणि अश्यातच या अमानुषपणावर इंकलाबी आवाज क्रांतिकारकांनी  उठवला….

    आमरण उपोषण !!

    उपोषणाला सुरुवात झाल्यावर क्रांतिकारकांनी अन्नाचा त्याग केला…

    ब्रिटिशांच्या प्रत्येक अत्याचार ला कणखरपणाने सर्व समोर जात होते..

    तिकडे आझादांनी या उपोषणाला भारतभर पसरवण्याचे कार्य केले…

    ब्रिटिशांवर.दडपण येत होते..

    रोज क्रांतिकारकांवर मारहाण होत होती , तहान लागेपर्यंत मारायचं जेणेकरून उपोषण थांबेल…

    क्रांतीगाथा भाग ४

    पण क्रांतिकारक मागे हटायला तयार नाही , पाण्याएवजी दुध, दही ने माठ भरून ठेवले पण क्रांतिकारकांनी तेही फोडून टाकले ,

    क्रांतिकारकांच्या लघवीच्या जागेवर लाथांनी मारण्यात आले , लाठी मार केले , अंगावर मिठ लावून मारले पण तरीही क्रांतिकारक काही झुकेना..

    ही लढाई फक्त भुकेची नव्हती यात अन्न पाणी सोबत मागणी होती ती पुस्तकांची सुद्धा…!!

    या अत्याचार ला थांबवण्यासाठी आझादांनी आणि भगवती चरण वोहरांनी बॉम्ब ने जेल ची भिंत पाडण्यासाठी प्रयत्न केला…

    क्रांतीगाथा भाग ३

    पण नियती ती  क्रूर  या प्रयत्नात भगवती वोहरांना जीव  गमवावा लागला…

    ब्रिटिशांनी अमानवी अत्याचार ला सुरुवात केली , क्रांतिकारकांच्या नाका, तोंडात नळ्या टाकून दुध जबरदस्तीने ओतण्याचे प्रयत्न केले ,

    असाच प्रयत्न जतीन दा वर सुद्धा झाला पण ती नळी जाऊन त्यांच्या फुफ्फुस ला लागली , संसर्ग वाढले , रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या , भगतसिंगांनी जतीनना थांबण्यासाठी सांगितले पण जतीन थांबले नाही…

    शेवट पर्यंत उपोषणवर अटळ राहिले आणि भारत मातेच्या चरणी आपले श्वास अर्पण करून टाकले….

    भगवतींच्या मरणाचं दुख मागे ठेवून त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी नेहमी प्रमाणे क्रांतिकारकांच्या मदतीला पुढे आल्या..

    जतीन दासांचा देह त्यांनी बाहेर काढला..

    जतीन दाच्या देहाचे स्विकार करण्यासाठी खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस आले…पाच लाख लोकांच्या अश्रूंनी जतीन दाचा अंत्यसंस्कार झाला…

    पण उपोषण तसेच सुरू राहिले…

    भगत ब्रिटिशांच्या हरामखोरी वर हसत राहिले…

    एकदा तर भगत ला विचारले सुद्धा…

    “एवढे होऊन सुद्धा हसतोय तु भगत…!! ”

    आणि भगत म्हणाले…

    ” माझ्या हसण्याने तुम्हाला आज एवढा त्रास होतोय तर त्या क्षणी काय कराल जेव्हा मी फासीच्या तख्तावर असेल आणि जोरजोराने इंकलाब जिंदाबाद चे नारे देत असेल….!! “

    शेवटी ब्रिटिशांना झुकावं लागलं, क्रांतिकारकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या तिकडे लंडन मध्ये भगतसिंग ला फाशी द्या म्हणून तेवीस वर्षाच्या पोराच्या विरोधात मोर्चे निघायला लागले….

    ” ए शहिदे मुल्को मिल्लत मै तेरे उपर निसार…

    अब तेरे हिम्मत का चर्चा गैरो की महफील मे है….”

    सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…

    ✍🏻अक्षय चंदेल©

    #जिगरे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • क्रांतीगाथा भाग ४

    ब्रिटीशांनी घाव फक्त शरीरावरच घातले नव्हते…

    इथल्या कष्टकर्यांना , मजदूरांना त्यांच्या हक्काची मजदुरी ही मिळणे कठीण केले होते ,  शिक्षणाची सोय सुद्धा गरिबांच्या आटोक्यात नव्हतीच , भारतीयांचा राजकीय प्रवेश सुद्धा ब्रिटिशांना अमान्यच होता…

    गरिबीची झड , हिंदू मुस्लिम मतभेद उभे करून सत्तेची मलाई ब्रिटिश चाखत होते , डोळे झाकून अत्याचार करणार्या ब्रिटिशांना भारतीयांच्या किंकाळ्या ही ऐकू येईना आणि मग ठरलं या ब्रिटिशांना आवाज ऐकवायचा इंकलाब चा नारा ऐकवायचा….

    क्रांतीगाथा भाग ३

    पण नेमके कसे तर केंद्रीय असेंबली मध्ये बॉम्ब फेकुन धमाका करायचा पण फक्त आवाज येईल असा….त्यामुळे कुणाला दुखापत होऊ नये याची तस्तदी घेऊन…

    आझादांनी योजना आखली….

    बॉम्ब फेकून लगेच तिथून निघायचं आपल्या क्रांतिकारकांची धरपकड होऊ नये पण भगतसिंगांच्या मनात काही वेगळे होते…

    ” आझादजी अपने छोटे भाई की एक बात मानोगे….!! स्फोट करतेही हम चाहते है की हम गिरफ्तार हो ताकी दुनियाको भी पता चले की हम सरफिरे नही सरफरोशी है ….जो अपने वतन के लिये मर भी सकते है….!! “

    भगत….!! पर ….आझाद अळखडले…

    यहा गुरु गोविंदसिंह ने अपने बेटे वारे है तो हम क्या ?? भगतसिंग शब्दात बलिदानाच्या गाथेचा शब्द उमटला…

    दुसरीकडे राजगुरू भगतसिंगांना ओरडून म्हणत होते…

    ” मै भी आऊंगा….!! मुझे भी वतन के लिये मरना है…!! “

    राजगुरू रात्रभर रडत होते फक्त आपला जीव देशावर वाहता यावा म्हणून…

    पण अगोदरच योजना आखली गेली होती बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगांनी केंद्रीय असेंबली मध्ये प्रवेश केला…

    #क्रांतीगाथा भाग २

    आणि धडाड धुम्म करत बॉम्ब चा आवाज झाला पण त्या ही पेक्षा एक आवाज अधिक बुलंद होता…

    ” इंकलाब जिंदाबाद , ब्रिटिश हुकुमत मुर्दाबाद !! भारत माता की जय….!! “

    भगतसिंग आणि बटुकेश्वर यांना अटक करण्यात आली…

    आणि आझादांच्या तोंडुन सर्व क्रांतिकारकांपुढे शब्द उमटले…

    ” मेरे भगत की शादी तय हो गयी दोस्तो…. पर शायद मै वो देख नही पाउंगा…. इंकलाब जिंदाबाद… !! “

    आणि हे सत्य सुद्धा होते !! या सर्व क्रांतिकारकांनी आपली प्रेयसी फक्त आझादी मानली होती…

    स्वतंत्रता…..पुर्ण स्वतंत्रता…

    आझादांच्या नैतृत्वाखाली आझादीचा लढा सुरू होता आणि जेलमध्ये एक लढा लढण्यासाठी भगतसिंग तयार होते…

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • क्रांतीगाथा भाग ३

    क्रांतिकारकांच्या घरची अवस्था काय असेल याचा आम्ही विचारही करु शकत नाही…

    सर्वस्व अपर्ण करून फक्त स्वतंत्र दर्पण बघण्यासाठी आपली तरुण मुले भारतमातेच्या चरणी अर्पण करून टाकली होती अनेकांनी…

    ब्रिटिशांच्या अत्याचारच्या काळोखात आझादी शोधणे खूप कठीण काम होते…

    जालियनवाला बाग

    रोज नवनवीन पारतंत्र्याचे प्रयोग भारत भुमीवर सुरू होते…

    अश्यातच ३ फेब्रुवारी १९२८ ला सायमन कमीशन भारतात आले..

    भारतीयांना संवैधानिक अधिकार देण्याची वरवर बाता मारणार्या गोर्यांनी अधिकार सुद्धा आपल्या हातात डांबून ठेवले होते…

    ज्याचा  कांग्रेसच्या नैतृत्वाखाली सायमन गो बॅक चा आवाज उठला….सायमन ला परत पाठवण्यासाठी आणि भारतियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी

    लखनौ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि गोबिंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लाहोर येथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला…

    #क्रांतीगाथा भाग २

    ब्रिटिशांनी बेभान होऊन लाठीचार्ज केला…

    रक्ताच्या थारोळ्यात आझादी चे नारे लागत होते , आणि धाड करत एक लाठी लालाजींच्या डोक्यावर आदळली…

    डोक्यावर मोठा घाव झाला…

    आपल्या जन्मभूमीला मुक्त करण्यासाठी लालाजींनी अंतिम शब्दात आपल्या प्राणांची आहुती दिली…

    “मेरे शरीर पर पड़ी एक-एक चोट ब्रिटिश साम्राज्य के क़फन की कील बनेगी। “

    आणि झालेही तसचे लालाजींचा प्रतिशोध घेण्याची अग्नी आझाद आणि भगतसिंगांच्या मनात तळफडत होती…

    ब्रिटिश अधिकारी सांडर्सला मारण्यासाठी   आझाद, भगतसिंह आखणी करत होते..   

    “दयानंद अँग्लो विद्यापीठ’ पुढे सर्व काही घडणार होते… याच विद्यापीठ पुढे आझादांनी भगतसिंग यांना प्रश्न विचारला..

    “क्या कोई रणरागिणी है जो हमारे रणजित से शादी करे.??

    आणि भगतसिंग हसत हसत म्हणाले..

    “हमारी शादी तो आप ही तय करोगे..!!”

    ” मेरी कलम मेरे जज्बातोसे वाकीफ है  की मै इश्क भी लिखना चाहु तो इंकलाब लिख जाती है…!! “

    आणि लग्न ठरलं तेही खुद्द मृत्यूशी दिनांक 17 दिसंबर, 1928 जयगोपाल यांनी इशारा करताच ब्रिटिश  ऑफ़ीसर सांडर्सला राजगुरू ने बेभान होऊन गोळी मारली….

    मागे मागे भगतसिंग ने अंधाधुंद गोळीबार करून सांडर्स ठार  करून या क्रांतिकारकांनी लालाजींच्या हत्याचा प्रतिशोध घेतला पण आमचे मनच मेलेली होती हो …

    या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी चनन सिंह नावाने आपलाच माणूस मागे धावला पुन्हा पुन्हा आझादांनी समझुत देऊनही ब्रिटिशांच्या पायावर आपले इमान.विकलेल्या चनन ला या क्रांतिकारकांचा जज्बात ए वतन कळालं नाही ,

    धाड धाड करत आझादांनी त्याला तिथेच संपवले… आणि एका नव्या क्रांतीगाथेची सुरुवात झाली…

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • #क्रांतीगाथा भाग २

    जालियनवाला बाग मध्ये पेटलेल्या चितांनी एक क्रांतीचा भडका अवघ्या भारतभर पसरवला…

    जागोजागी आंदोलने उभे राहिले…

    अश्यातच एक  अहिंसेच्या शब्दांचा आवाज अवघ्या भारताला एक करत सुटला नाव होते मोहनदास करमचंद गांधी…

    महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाचा पुकार केला आणि स्वभाषा, स्वभुषा , आणि स्वदेशाची आवाज बुलंद झाली…

    अनेक क्रांतिकारक गांधीजींच्या या चळवळीत एकरूप झाले , ब्रिटिशांच्या विरोधात असहकाराची भावना निर्माण होऊन अनेक सत्याग्रह पूढे आले आणि अश्यातच…

    जालियनवाला बाग

    चौरी चौरा येथे ब्रिटीश पोलीस अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांचा भडका उडाला तीन आंदोलनकर्त्यांच्या कत्तल झाल्या आणि अश्यातच संयम तुटलेल्या सत्याग्रहींनी पोलीस स्टेशन मध्ये आग लावली ज्या मध्ये २३ ब्रिटिश अधिकारी जळून खाक झाले…

    पण गांधींना ही अहिंसा नको होती , म्हणून त्यांनी असहकार आंदोलन मागे घेतले , पण क्रांतिकारक आपले पाय मागे घ्यायला तयार नव्हते . गांधीजींचं तत्व

    ” अहिंसा परमो धर्म ……”

    चे होते पण तो श्लोक अपुर्ण होता , त्या श्लोक पुर्ण करण्यासाठी क्रांतिकारकांची आवाज उठली

    ” धर्म हिंसा तथैव च !! “

    अश्यातच ९ ऑगस्ट १९२५  सरफरोशचा बुलंद आवाज काकोरी स्टेशन वर  उठला…

    वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमान, हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है

    खैंच कर लायी है सब को क़त्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-क़ातिल में है…

    सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…

    रामप्रसाद बिस्मिल ,अशफाक उल्ला खाँ, राजेन्द्र लाहिड़ी, चन्द्रशेखर  आजाद, शचीन्द्रनाथ बख्शी, मन्मथनाथ गुप्त, मुकुन्दी लाल, केशव चक्रवर्ती , मुरारी लाल गुप्ता क्रांतिकारकांच्या हातांनी ब्रिटिश खजिना लुटून काढला…

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    दौलत पेक्षा अनमोल खजिना होता तो क्रांतीचा कारण या घटनेने क्रांतिकारकांचा जज्बा आणखिनच वाढला..

    आपल्या जन्मभूमी ला जीव अर्पण करण्यासाठी रामप्रसाद बिस्मिल , अश्फाकउल्लाखान ,रोषण सिंह फाशीच्या तख्तावर चढत असताना सुद्धा अश्फाक म्हणत होते…

    ” मरते बिस्मिल ,रोषण लहिरी ,अश्फाक अत्याचार से…

    होगे पैदा सैकड़ो इनके रुधिर के धार से…”

    फाशीच्या फंद्यावर चढत असताना एकदा रामप्रसाद बिस्मिल ने युनियन जॅक कडे बघितलं आणि म्हणाले…

    सेवा में तेरी माता ! मैं भेदभाव तजकर;

    वह पुण्य नाम तेरा, प्रतिदिन सुनूँ सुनाऊँ ।।

    तेरे ही काम आऊँ, तेरा ही मंत्र गाऊँ।

    मन और देह तुझ पर बलिदान मैं जाऊँ ।।

    भारत माता की जय….

    आणि हसत हसत फाशीवर ही स्वतंत्रपूजक चढली…..

    अश्फाक उल्ला खान खुदा ला आपल्या धर्मापलिकडे जाऊन शेवटच्या क्षणी मागणं मागत राहिले…

    जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,

    जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?

    बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं “फिर आऊँगा, फिर आऊँगा,

    फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा”.

    जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,

    मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ;

    हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा,

    और जन्नत के बदले उससे एक पुनर्जन्म ही माँगूंगा!

    #जिगरे

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जालियनवाला बाग

    हिंदुस्थानात उतरलेल्या परकीय ब्रिटिशांनी भारताच्या भुमी, संस्कृती, इतिहास, वर्तमान ते भविष्यवरही घाला घातला होता…

    १८५७ चे स्वतंत्रसमर  अनेक किंकाळ्यांच्या आवाजाखाली दाबून ब्रिटीशांच्या हरामखोरीचे कारनामे थांबत नव्हते…

    आपल्याच देशात आपलेच भारतीय गुलाम झाले होते आपल्या मातृभूमीला  गुलामीच्या बंदीवासातुन मुक्त करण्यासाठी भारताच्या भूमीत अनेक क्रांतिकारक जन्माला येत होते पण आता ती उपज थांबावी म्हणून ब्रिटिशांनी एक काळा कायदा प्रेरित केला नाव होते रौलट कायदा ( मार्च १९१९)….

    ठाकरे परिवारातील तेजस ठाकरे ची तुलना व्हीव्हीयन रिचर्ड्ससोबत का केली जाते?

    या रौलट कायदा विरोधात उठणारी प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ब्रिटिशांनी सर्व दंड भेद वापरले  , विरोधात चलणार्या सत्याग्रही लोकांना कैदेत घातले ,

    ज्याचा निषेध करण्यासाठी लोक जमली त्यावर भडीमार गोळ्या झाडून रक्ताचा सडा  पाडला आणि अमृतसर मध्ये कडक संचारबंदी लागली…

    पर हिंदुस्थानीओ के बुलंद इरादो को कोई रोख सके ऐसी कोई दिवार कहा…?

    आणि मग एक सभा ठरली …एक एक करत कानावर खबर पडत गेल्या तारीख होती १३ एप्रिल १९१९   दिवस बैसाखी चा..

    सुवर्णमंदिरात दर्शन घेऊन लहान मुले, स्त्रिया ,म्हातारी माणसे, तरुण अनेक अनेक आपल्या सणाला साजरी करण्यासाठी जालियनवाला बाग ला जमली होती…

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

               ” जो बोले सो निहाल …. सतश्री अकाल !!” 

    ढोलाच्या तालावर सर्वांच्या जुबानीवर वतन चे तराने होते , ” ऐ वतन तेनु की की मे दे पावा …तु मागे मेनु जान तो युही तैनु दे जावा….!!”

    भारत माता की जय !!

    पण या निष्पाप लोकांना अंदाज सुद्धा नव्हता की पुढे काय होणार होते….

    कळकळ करत अचानक बागचे गेट बंद झाले आणि गोरा ब्रिटीश अधिकारी जनरल डायर सर्वांपुढे सैनिकांना एका रांगेत एक्टिव करून शांत नजरेने आनंद साजरा करणार्यां लोकांना बघत राहिला…

    आणि अचानक त्याच्या कानावर आवाज पडला…  ” वंदे मातरम..!! भारत माता की जय….” 

    आणि डायरचे डोळे विस्फारले , Bloody Indian’s काळे शब्द बाहेर पडले  ” फायर….. !!! 

    आणि धडधड करत गोळ्या चलायला लागल्या देशभक्तांची ह्रदय चिरत , भारत मातेचे जयकार थांबवत , रक्ताचे थारोळे उडवत सुमारे ३९७ लोकांना मारत ,१९२ लोकांना जखमी करत , लहान लहान मुलांचे घास घेत या गोळ्या चालत होत्या

    एक, नव्हे दोन नव्हे तब्बल १६५० गोळ्या झाडल्या गेल्या , १२०  लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहीरीत उड्या घातल्या तीही संपली , ४२ लहान मुले मारली आणि रक्ताने लालबुंद माती करत डायर बाहेर पडला…

    गिधाडांच्या आवाजाने आकाश भरले…

    प्रेत उचलून सुद्धा मातीचा लाल रंगात रंग बदलला …

    रात्री पालटून सर्व शांत झालेल्या त्या बागेत एक लहान मुलगा एकाला स्वतंत्रदेवतेला बसलेला दिसला …आपल्या लहानग्या हाताने तीथली माती पिशवीत भरत होता मग त्याला सहज विचारले…

    ” किसलिये ले जा रहे हो ये मिट्टी…!!”

    ” हमारे लोगो के खुन से.रंगी है ये मिट्टी हमे ये बलिदान याद दिलायेगी…!!”

    नाम क्या है बेटा आपका !!

    चेहऱ्यावर मासुमीयत पण डोळ्यात क्रांतीची छटा उमटलेल्या त्या निरागस ओठातून नवीन अध्याय चे.नाव बाहेर पडले…

    ”  जी मै सरदार भगतसिंग…..!!!”

    ✍🏻अक्षय चंदेल ©

    #जिगरे ❤️

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

    विदर्भ !!

    महाभारत काल ते त्याच्या ही अगोदर पासून राजघराणी जिथे वसली असे विदर्भ…

    जिथे अखंड महाराष्ट्राचे भविष्य गर्भात वाढले अश्या जिजाऊ मासाहेबांचे माहेर , शिवसिंहछाव्याला मनसब ज्या भागाची होती ते भाग,  आणि बंगालच्या साम्राज्यात जाऊन आपल्या शौर्याचे कवने लिहून घेणार्या नागपुरकर भोसल्यांचा विदर्भ…

    आणि याच भोसल्यांचा अधिपत्याखाली असलेला किल्ला म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेला , एलिचपुर म्हणजे अचलपूर चे रक्षकगड असलेला आणि चिखलदरा चे सामर्थ्य असलेला गाविलगड… !!

    वाकाटक, राष्ट्रकूट ते देवगिरी च्या यादवांच्या काळापासून  नागपुरकर भोसलेंपर्यंत शतकांचा इतिहास या गडाला लाभलेला . अश्या या गवळ्यांचा गड म्हणजे गाविलगड च्या इतिहास ची पाने स्पर्श केली की दाह जाणवतो सुहासिनींच्या जोहरचा आणि विर बेनिसिंह च्या तलवारीचा ..

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    तेव्हा जेव्हा हे वर्ष होते १८०२ !! पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये वसईचा तह झाला आणि ब्रिटिशांनी आपल्या काळोख नजरा महाराष्ट्रात घुमवल्या…

    रायगडावर आग लावत हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी ब्रिटिशांनी आपले हात सरसावले आणि महाराष्ट्राच्या वर्हाडात आक्रमणाची पाऊल टाकण्यासाठी ब्रिटीश जनरल वेलस्ली च्या हाताखाली फौज पुढे निघाली…

    आक्रमणाची खबर सरसर करत नागपूर च्या भोसले महालात आदळली आणि भोसल्यांचा राजकारणात वाढ झाली.. पण गेली कित्येक राजघराणी ज्या फितुरीच्या कलंकाने ग्रस्त होती तो कलंक इथेही लागलेलाच..

    म्हैसूर चा टिपु सुलतान चा पाडाव करुन निजामांशी हात मिळवून वेलस्ली , कर्नल स्टिव्हनसन्स च्या फौजेची तुकडी घेऊन नागपुरकर भोसल्यांना धमकावत सुटला पण भोसले मात्र त्याला काही भीक टाकेना, 

    वेलस्ली आपली फौज घेऊन मराठवाड्यात पोहोचला आणि दुसरीकडे नागपुरकर भोसले,शिंदे सह मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजण्यासाठी सज्ज झाले…

    आणि गाविलगड गुप्त खलिता येऊन पोहोचला….

    या वेळी भोसल्यांचा दौलतीचा बंगालचा खजिना याच गडावर होता , गाविलगड ची सुरक्षा किल्लेदार रायाजी भोसल्यांचा हाती सोपवुन गाविलगड चा रणरुद्र सेनापती बेनिसिंह मराठमातीच्या सन्माचा लढा देण्यासाठी आसई रणभूमीवर उतरला

    आणि भिडल्या तलवारी, खड्ग खणाणले , किंकाळी उठल्या हर हर महादेव चित्कार झाला आणि अस्मानी फत्ते ब्रिटिश कर्नल चं मुंडकच धडावेगळे झाले…

    वेलस्ली ला धडकी भरली

    आणि वेलस्ली बेनिसिंहास शरण गेला…

    ब्रिटीशांना नामोहरम करून फौजा परतल्या पण वेलस्ली च्या मनात हा पराभव भयानक रुतला होता..

    मराठ्यांचा फौजा परतताच वेलस्ली बाळापूर ला येउन महिपतरायच्या संगतीला आता गाविलगड जिंकण्यासाठी स्वप्न बघायला लागला, आडगाव ला मराठ्यांचा भीषण पराभव करुन वेलस्ली गाविलगड कडे वळला ,

    मधातील सर्व गावं कैदेत घालत , फितूर वकिलांना आपल्या बाजूला करून, नागपुरात एकही वार्ता पोहचणार नाही याची फितुरीच्या मदतीने शाश्वती करून वेलस्ली ने खासा गाविलगड घेरला तारीख होती ९ डिसेंबर १८०३  ,

    वेलस्लीने गडावर चढण्याचा बेत आखला पण मराठ्यांनी जागेवरच त्याचा बेत फस्त केला , तोफा आग ओकु लागल्या , गडावरून बिजली तोफ धडाडली सल्लग दिवस पालटायला लागले गड झुंजत होता,

    लढत होता, बेनिसिंहाची तलवार तडफडत होती , गडाचा तोफखाना प्रमुख रहिमखान झुंजत होता पण गडावर एक भिषण वार्ता पसरली , गडावरचा गोळा बारुद संपला …

    आता अंतिम युद्ध ठरले,  

    तारीख होती १४ डिसेंबर १८०३ चोर दरवाज्यातून गडाचा खजिना रायाजींच्या नजरेखालून नरनाळा ला निघाला, आणि एक चिता पेटली हत्ती तलाव

    आणि देव तलावाच्या मधोमध चंदनाची चिता रचून बेनिसिंहाची तरुण राणी रुपकुवर आपल्या तेरा सौदामिनी सह जोहर च्या अग्निकुंडात आहुती देण्यास सज्ज झाली…

    शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

    किल्ल्याच्या बाहेर बेनिसिंहाची तलवार चालायला लागली पण भयाण गोळीबार सुरू झाला… एक एक करत विर धारातीर्थी पडु लागले गोळीबारात जखमी झालेल्या रक्तातही बेनिसिंह लढत होते ,

    तोफखानाप्रमुख कोसळले आणि सरसर करत एक गोळी आरपार त्या रणरुद्र योद्धाच्या छातीतून निघाली खासे बेनिसिंह कोसळले व गडावर सौदामिनींची जोहर चिता पेटली…

    राष्ट्रासाठी बलिदानाच्या गाथेचं एक आणखी पान लिहल्या गेले आणि जोहर च्या धगात ते आणखी चकाकले….

    ✍️अक्षय चंदेल 

    ७५५९२४१३४७

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

    मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन जवळपास दहा वर्षे झाली तरी त्यांच्या नावाचा जल्लोष आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये ऐकायला मिळतो.

    त्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती असतील. मात्र असा एक किस्सा ज्याला ऐकून तुम्हीसुद्धा थोडे विचारात पडाल. तर मंडळी आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि बॉलिवूड यांच्यातील मैत्रीचे किस्से चालत आलेले आहेत.

    मग त्यामध्ये दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे असो की सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे असो. मात्र काही वर्षांपूर्वी भाजपा नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनू निगम यांच्या घराण्यातील संबंधांबद्दल खळबळजनक खुलासा केला होता.

    शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

    ज्यामध्ये त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांना सोनू निगमला ठार मारायचं होत. त्यांनी अनेकदा त्याला मारण्यासाठी शिवसैनिकसुद्धा पाठवले होते. ठाकरे आणि सोनू निगम या घराण्यांमध्ये काय संबंध आहेत? याबद्दल मला तोंड उघडायला लावू नका.”

    असा खळबळजनक खुलासा निलेश राणे यांनी केला होता. मात्र निलेश राणेंच्या या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना चांगलच धारेवर धरलं होत.

    ते म्हणाले होते की,

    ” निलेश राणे यांना शिवसेना उत्तर देईल एवढे ते मोठे नाही आहेत. ते काहीही बरळत असतात.”

    असा टोला विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर लगावला होता. 

    नेमकं काय होत प्रकरण? 

    तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे यांची सून म्हणजेच जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी नुकताच बॉलिवूड निर्माता क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

    त्यांनी ‘हसीना मान जायेगी’ या सिनेमाचा निर्माता म्हणून काम केलं होतं. ज्या सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याशी झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

    मात्र काही प्रसार माध्यमांनी सोनू निगम आणि स्मिता ठाकरे यांच्याबद्दल वेगळीच अफवा पसरवली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना सोनू निगमने सांगितलं होतं की,

    ” स्मिता ठाकरे यांचा मी आदर करतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. त्या माझ्या कुटुंबाविषयी नेहमी विचारत असतात.”

    याव्यतिरिक्त स्मिता ठाकरे यांनीसुद्धा म्हटलं होतं की,

    ” सोनू निगम हे एवढ्या कमी वयामध्ये उत्तम गायक आहेत आणि ते एक चांगले व्यक्तिमत्त्व आहे.”

    अस स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या. मात्र प्रसार माध्यमांनी दोघांविषयी रंगवलेल्या चर्चेला काहीही अर्थ नाही असं त्यावेळी वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • सामनाची स्थापना शिवसेनेने नाही, तर या व्यक्तीने केली..सामना चा इतिहास

    मंडळी शिवसेनेविरोधात कुणी वक्तव्य केलं किंवा कुणी उलटसुलट कृत्य केलं तर शिवसेनेची आक्रमक भूमिका ज्या वृत्तपत्रातून मांडली जाते ते म्हणजे “सामना’.

    आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, सामनाची स्थापना हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. मात्र क्वचितच लोकांना माहिती आहे की, सामना हे नाव बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या दैनिकासाठी एका व्यक्तीकडून मागितलेल होत.

    कारगिल युद्धाचा थरारक इतिहास

    तर मंडळी झालं असं की, शिवसेनेची स्थापना ही सण १९६६ साली झाली. तेव्हा शिवसेना पक्षाची भूमिका किंवा अन्य घडामोडी ‘मार्मिक’ या साप्ताहिकामधून प्रसिद्ध व्हायच्या.

    शिवसेनेचा वाढता प्रभाव पाहून सर्व जनतेच आणि विरोधकांच लक्ष सुरवातीला ‘मार्मिक’ या वृत्तपत्रातील शिवसेनेच्या घडामोडींवर असायचं.

    त्यानंतर १९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना सुचवलं की, शिवसेनेचसुद्धा एक स्वतंत्र दैनिक असावं. तेव्हा चालू घडामोडींवर त्या दैनिकामध्ये बातमी किंवा लेख छापण्याच ठरलं.

    आता प्रश्न असा होता की, या दैनिकाला नाव काय द्यायचं? तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ‘सामना’ हे नाव सुचवलं. मात्र तेव्हा सामना हे नाव सोलापुरमध्ये राहणाऱ्या वसंत कानडे यांच्या साप्ताहिकाला देण्यात आलं होतं.

    गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…

    म्हणजे सामना हे नाव वसंत कानडे यांच्या मालकीचं होत. ज्याचा पहिला अंक वसंत कानडे यांचे नातू अमोल कानडे यांनी १९७५ साली प्रसिद्ध केला. ज्या अंकाचं उद्घाटन तत्कालीन महाराष्ट्राचे मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. 

    सामना शिवसेनेला मिळाला…

    बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दैनिकाला सुचवलेल सामना हे नाव सोलापूरच्या वसंत कानडे यांच्या मालकीचं असल्याने बाळासाहेबांनी त्यांना या नावाच्या मागणीबद्दल विचारणा केली असता वसंत कानडे यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची नाराजी न दाखवता आपली मंजुरी दिली. आणि शिवसेनेच्या दैनिकाला सामना हे नाव मिळालं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

    मंडळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक किस्से ऐकले असतील. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून आपण ऐकलं असेल.

    मात्र शेतकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्वचितच लोकांना माहिती असेल. तर मंडळी हा किस्सा आहे १९ व्या शतकातला जेव्हा ब्रिटिश सरकार भारतीय देशावर वर्चस्व करून बसलं होत.

    भारतीय देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांच्या नाही. तर त्यांनी त्या शेतजमिनीवर कब्जा केलाय. अस ब्रिटिश सरकारच म्हणणं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर वसुली करणे, ठराविक कालावधीनंतर स्वतःच्या सोयीने कर वाढवणे.

    जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

    आणि कर न दिल्यास शेतकऱ्यांना शिक्षा करणे. हे इंग्रज सरकारच धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य नव्हत. यावर त्यांनी ब्रिटिश सरकारला जाब विचारत म्हटलं की,

    ” शेतकरी हा आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्याला घरामध्ये खायला साधी भाकरसुद्धा मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर कसा काय भरू शकेल?”

    असे सडेतोड प्रश्न डॉ. आंबेडकरांनी इंग्रज सरकारला विचारला होता. शेकऱ्यांच्या शेतजमिनीच्या आकारावरून त्यांच्याकडून कर वसूल करण्यात येत होता. याला डॉ. आंबेडकरांनी विरोध करत म्हटलं होतं की,

    ” कधी कधी शेतकऱ्यांकडे मोठ्या जमिनी असूनही उत्पन्न होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो कर कसा भरणार? ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होत त्यांना इंग्रज सरकारने करमुक्त करावं.”

    अशी ठाम भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती.

    पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

    मंडळी शेतकऱ्यांच शोषण दिवसेंदिवस इंग्रज सरकारकडून वाढतच चाललेलं होत. शेतकऱ्यांनी दिलेल्या नियमित वेळेवर कर्ज न भरल्यास त्यांना सावकारांच्या, वतनदारांच्या घरची धुनी, भांडी करावी लागत होती.

    अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकारविरोधात बंड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ ऑगस्ट १९२५ रोजी शेतकऱ्यांचे हक्क आणि प्रश्न विचारणारा ‘शेतकऱ्यांचे प्रश्न’ नावाचा अग्रलेख लिहिला.

    ज्यामुळे ब्रिटिश सरकारमध्ये असंतोषाच वातावरण निर्माण झालं होतं. आणि शोषित शेतकऱ्यांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण झाली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir