Category: राजकीय व्यक्ती

  • संजय राऊत यांच्या भावाची भाजपला शिवीगाळ

    मंडळी महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटक आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नेहमी राजकिय घडामोडींमध्ये सतत चर्चेत असतात. राजकिय नेत्यांची वादावादी असो की इतर काही कार्यक्रम असो. ते एक राजकारणाचा महत्वाचा घटक आहे.
     
     
    पण आता त्यांचे बंधू व शिवसेना आमदार सुनील राऊत हे सुद्धा एका विधानामुळे चर्चेत आले आहे. मात्र हे विधान राजकीय जरी असलं, तरी यामध्ये ते चक्क भाजपला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानाचा विडिओ सद्ध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
     
     
    सुनील राऊत यांनी भाजपबद्दल केलेल्या या विधानामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या डोकेदुखीमध्ये आणखी वाढ झाल्याचं सुनील राऊत यांच्या विधनावरून दिसून येत आहे. 
     
     

     नेमकं काय आहे प्रकरण? 

     
     
    मंडळी राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा केंद्रबिंदू असलेले संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या विधानाने संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सुनील राऊत भाजपाला शिवीगाळ करताना दिसत आहे.
     
     
    ” ये * भाजपावाले ढुंढ रहे है पैसा किधर है…ओ पागल*लोग…उनको मालूम नहीं मेरे पास पैसा नहीं है…मेरे पास ये प्यार है…क्या उखाडेंगे हमारा? जो करना है करो”
     
     
    अस सुनील राऊत या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. मात्र आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. 
  • फडणवीसांच्या कालखंडात माझे फोन टॅब झालेत- एकनाथ खडसे

    मंडळी गेल्या काही दिवसांपासून हिजाब प्रकरण असो, नवाब मलिकांच प्रकरण असो, किरीट सोमय्या प्रकरण असो की आता देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्याबाबतच प्रकरण असो या सर्व प्रकरणांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
     
     
    देवेंद्र फडणवीस यांना नोटीस येऊन त्यांची त्याचाच निस्वासस्थानी चौकशी करण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांना अटक झाल्यास संपूर्ण महाविकास आघाडी सरकार पेटून देण्याचा वादग्रस्त वक्तव्यसुद्धा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने केलं होतं.
     
     
    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरू झाला, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी फडणवीसांवर असलेल्या आक्रोशाचा उलगडा केला आहे. 
     
     
                 एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की,
     
     
    ” एक नोटीस आली आणि आपली पिळवणूक होत असल्याचे फडणवीस म्हणत आहेत. मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली. असा ते दावा करत आहेत. तुम्ही नाथा भाऊंची पिळवणूक केली नाही का? मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली. माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर माझे संबंध जोडले. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करायला लावलं. हे उद्योग कुणी केले? तसेच देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडात माझें फोन टॅब झालेत.”
     
     
    असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मात्र यावर आता फडणवीस काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

    आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

                 मंडळी एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक यशाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांची धामधूम झाली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या अटकेचा वाद सुटत नाही आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एक प्रकरण पुढे आणलं आहे.
     
     
     
    “आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा याची चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.”
     
     
     
    अस म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांना सूचक इशारा दिला आहे.
     
     
    ते पुढे म्हणाले की,
     
     
     
    “आता पुढचा नंबर अनिल परबचा. याचबरोबर यशवंतराव जाधव संबंधात जी आयकर विभागाच्या पाहणीत खूप माहिती बाहेर आली. ४० ठेकेदारांची सखोल माहिती महापालिकेकडून आयकर विभागाने मागवली आहे. तीन अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत. त्याचा अभ्यास सुरू आहे आणि या तपासात ईडी आणि कंपनी मंत्रालयाने देखील रस दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाचा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 
     
     
    घोटाळेबाजांना उघड करणार- किरीट सोमय्या
     
     
           किरीट सोमय्या महाविकास आघाडीकडून बहुतेक त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा वचपा काढत आहे. असच त्यांच्या हालचालीवरून निरखून दिसत आहे. प्रसार माध्यममांशी बोलत असताना ते म्हणाले की,
     
     
    ” आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यामधल्या अटक होण्याच्या शर्यतीत कोण नंबर मारेल. हे बघण महत्वाचं. तसेच घोटाळेबाजांना उघड करणं हा जर गुन्हा असेल तर, तो गुन्हा एक हजारवेळा करण्यासाठी मी तयार आहे. किरीट सोमय्याने जर राजकीय बळाचा दुरुपयोग केला असेल, तर माझ्याविरुद्ध कारवाई करा, अस मी अगोदरच म्हणालेलो आहे.”
     
     
    अस किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र आता किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर महाविकास आघाडी सरकार काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागूंन आहे.
  • राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    राज्यपाल यांचा महापुरुषांची बदनामी करण्याचा कट- राज ठाकरे

    मंडळी महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असता संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र आता राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
     
     
     
    त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर टीका करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील समस्या आणि लोकांच्या प्रश्नांबाबत कोणालाच काही पडलेले नाही.
     
     
     
    हे फक्त एकमेकांवर धाडी टाकण्यात रमलेले आहेत. लोकांना निवडणुका हव्या आहेत का, याचा जरा कानोसा घ्या, लोकांना निवडणूक नको आहे. महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पक्ष जनतेला फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अस राज ठाकरे म्हणाले. 
     
     
                 पुढे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी यांच्यावरसुद्धा राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे कोण माहिती नसतांना, अभ्यास नसतांना बोलायचं कशाला?
     
     
     
    शिवरायांनी केव्हा सांगितले नाही की रामदास माझे गुरू होते. मग काहीही बोलून भांडणे लावण्याचा उद्योग करायचा कशाला? महापुरुषांची बदनामी करून तरुणांची माथी भडकवायची बस एवढाच उद्योग सध्या राज्यात सुरू आहे. महापुरुषांना बदनाम करायचे आणि त्यांच्या नावावर मते मागायची, असा खेळ आहे.
     
     
     
    अस बोलून राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करून तरुणांची माथी भडकवायच काम केलं. अस राज ठाकरे यांचा म्हणणं आहे. त्याचबरोबर कोश्यारी यांनी विद्येची नायिका सावित्रीआई फुले यांच्याबद्दलपण वादग्रस्त विधान केल होत. अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करून कोश्यारी मूर्खपणाचा डोंगर ओलांडत आहे. अस म्हणायला हकरत नाही.
  • वीज कनेक्शन कापण्याच काम राज्यसरकार करत आहे- देवेंद्र फडणवीस

    वीज कनेक्शन कापण्याच काम राज्यसरकार करत आहे- देवेंद्र फडणवीस

                  मंडळी विरोधी पक्षनेते आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलीच टीका केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन फडणविसांनी राजशासणावर निशाणा साधला आहे. बऱ्याच काळानंतर मोठं अधिवेशन मिळालं असल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला.
     
     
    ” आम्हाला चर्चा करण्यात रस आहे. अनेक दिवसानंतर १७ ते १८ दिवस चालणार अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत. पण चर्चा झाली पाहिजे ही सरकारी पक्षाचीही जबाबदारी आहे. नाहीतर ओबीसींच्या मुद्द्यावर बोललं, तर १२ लोकांना निलंबित केलं.विद्यापीठाच विधेयक विरोधकांची मुस्कटबाजी करून काढण्यात आलं. लोकशाही पायदळी तुडवली.”
     
     
    अशी टीका फडणवीस यांनी राज्यशासणावर केली आहे. 
     
    सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- फडणवीस
     
     
            मंडळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आपल्या विधानांमधून राज्यसरकारवर टीका करत असतात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,
     
     
    ” राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. विजेचे कनेक्शन कापण्याच काम सरकारने सुरू केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहलेली नाही.मागच्याच्या मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी संगितल, वीज कनेक्शन कापण बंद, शेवटच्या दिवशी सांगितल सुरू. मागच्या अधिवेशनात ते म्हणाले, तेव्हा मी चुकीचं बोललो होतो, आता ठामपणे सांगतो की वीज कनेक्शन कापणार नाही. पण आत स्पर्धा लागल्यासारखे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापल्या जात आहे. गेली दोन वर्षे आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलाव लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.”
     
    अस ते पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. मात्र यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय प्रतिक्रिया येईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरेजी शरद पवरांसमोर झुकू नका- भाजप आमदार

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरेजी शरद पवरांसमोर झुकू नका- भाजप आमदार

                     मंडळी नवाब मलिकांना झालेल्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच चिघळत चाललं आहे. नवाब मालिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये जागोजागी आंदोलने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने मात्र नवाब मलिक यांनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्या कठोर शिक्षेसाठी आंदोलने केली.
     
     
    या संदर्भात आता भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच थेट निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून नवाब मलिकांना सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. 
     

    काय म्हणाले भाजप आमदार

     
                मंडळी नवाब मलिक यांच्या अटकेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
     
    ते म्हणाले की,
     

    “केंद्रीय तपासयंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं. देव देश आणि धर्मसाठी हे बोलायचे नाही, आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. शरद पवारांसमोर झुकू नका. नवाब मलिकांची हकालपट्टी करा.अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे. दरम्यान राज्यसरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी या प्रकरणाचा कसा संबंध आहे यासंदर्भातल्या चौकशीला राज्यसरकार थांबवू का पाहत आहे? हे मर्दांच सरकार आहे. अस म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेत आहे हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे.”

     
     
    अस भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • उद्धव ठाकरेंवर भाजप आमदाराची वादग्रस्त टीका

    उद्धव ठाकरेंवर भाजप आमदाराची वादग्रस्त टीका

                  मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलय. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आंदोलनं करून नवाब मालिकांचा विरोध करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत.
     
     
    नवाब मलिक यांना बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला सक्त वसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली.न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतरच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईविरोधात आंदोलने करत आहेत.
     
     
    राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र ही मागणी करतांना नागपूरच्या आमदाराची जीभ घसरलीय. भाजपा आमदारांनी मलिकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. 
     

    भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

     
              नवाब मलिक अटकेप्रकरणात भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त टीका केली आहे. खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्थानकामध्ये मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली.
     
     
    गुन्हा दाखल करून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत असतांना खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला आहे.
     
     
    ते म्हणाले की,
     
     
     
    ” या दोन वर्षात खूप भ्रष्टाचार झालाय. महाविकास आघाडीचे अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने इतका नालायक आणि बेशरम मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगामध्ये असूनसुद्धा त्याचा राजीनामा घेत नाही.”
     
     
    अस खोपडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय. मात्र आमदार खोपडे यांच्या अशा वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आपण भल आणि आपलं काम भल- अजितदादा पवार

    आपण भल आणि आपलं काम भल- अजितदादा पवार

      मंडळी राजकारण म्हटलं की वादावादी , एकमेकांची टिंगलटवाळी करणे, खिल्ली उडवणे, आरोप प्रत्यारोप करणे या सर्व गोष्टी आल्याच. जेव्हापासून महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष कुठल्या ना कुठल्या मुद्य्यावरून सरकार पाडण्याच्या गोष्टी करत असतो.
     
    मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच प्रतिउत्तर दिल आहे. पुण्यातील टेकडी येथील वनउद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
     
    यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि महाविकास आघाडीच सरकार पाडणार या वक्तव्यालाही उत्तर दिलं. वारंवार होत असलेल्या भाजपच्या या वक्तव्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 
     

    काय म्हणाले अजित पवार

     
             मंडळी वारंवार होत असलेल्या भाजपच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
     
           ते म्हणाले की,
     
    ” शिवसेना आणि भाजपने तारतम्य ठेवले पाहिजे. हे आरोप आणि प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत.आमच्याबद्दल बोलणारेपण काही वाचाळवीर आहेत. त्यांच्याबद्दल मी काही अवाक्षर बोललो का?”
     
    असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसच आपलं काम भल आणि आपण भल, अस माझं मत आहे. प्रत्येकाची कामाची पध्दत वेगळी आहे. पण दोन्ही बाजूने हे थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे हे सगळं थांबवा.
     
    अस आव्हान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना केलं. मंडळी एकमेकांची खिल्ली उडवणे, एकमेकांवर टीका करणे यामध्ये आपलं राजकारण करणाऱ्या नेत्यांनासुद्धा अजित पवार यांनी चांगलाच टोला लावला आहे. महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कित्येक समस्या आहेत. यावर नेत्यांनी बोलायला हवं. प्रश्न उपस्थित करायला हवेत.
     
    त्यावर तोडगा काढायला हवा. आज महाराष्ट्रातील कितीतरी जनता अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यांना योग्य तो लाभ मिळाला नाही. अशा कित्येक मुद्द्यांवर चर्चा करायची सोडून जर तुम्ही एकमेकांची टिंगलटवाळी करत आहात, तर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला फसवण्याचं काम करत आहात.
     
    असा याचा अर्थ होतो. मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संतापजनक प्रतिक्रियेवर भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय- नाना पटोले

    महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय- नाना पटोले

                 मंडळी नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने ते राजकिय रणधुमाळीत चांगलेच चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी काही कालावधीपासून कठोर भूमिका घेतलेली आहे.
     
              भाजप नेत्यांचा राजकरणातला भोंगळ कारभार पुढे आणेल आणि हा महाराष्ट्र भाजपमुक्त करेल. अस त्यांनी बरेचदा म्हटलं आहे. मोदी साहेबांची टीका केल्याकारणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोले यांचा पुतडा जागोजागी जाळून त्यांचा विरोध केला होता.
     
                 त्याकारणाने नाना पटोले जास्तच चर्चेत आले होते. मात्र आता नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर बोलत असतांना चांगलाच हल्लाबोल केला आहे. 

    काय म्हणाले नाना पटोले? 

                 नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधत चांगलाच कडाडून विरोध व्यक्त केला आहे.
     

    ” महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होतोय, हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही भाजपची सर्व काळी कृत्ये जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवेल. आज त्यांचा वेळ आहे पण वेळ बदलेल ना, हे काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.”

     
    अस म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले म्हणाले की
     

    “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेकदा प्रलोभन आणि दबावतंत्राचा वापर झाला. हा खऱ्या अर्थाने मोठा आक्षेप आहे. कोणाच्या इमारती किती आहेत? कोणी काय केलं? हे सगळे भाजपावाले दुधाने धुतलेले आहेत अस तर नाही.”

                  अशी धुवाधार टीका नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर केली. मात्र आता भाजपा नाना पटोले यांच्या आरोपांवर काय उत्तर देईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

    आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

             मंडळी मोठ्या मुश्किलीने बसलेल महाविकास आघाडीच सरकार जरी आजपर्यंत टिकून आहे. मात्र हे महाविकास आघाडीच सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच करण्यात आला आहे.
     
                     भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्या असल्याचा आरोप केलेला आहे.
     
                  शिवाय संजय राऊत यांची  लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याच सोमय्या यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडीविरोधात नेहमीच आक्रमक राहलेले आहे.
     
               हे महाविकास आघाडीच सरकार कशाप्रकारे बरखास्त करता येईल याकडे त्यांचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

    काय म्हणाले संजय राऊत? 

             शिवसेनेच्या सैनिकांकडून किरीट सोमय्या यांना मारहाण झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारसोबत विविध कारणातून वाद घालतांना दिसत आहे. मात्र शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाला चांगलाच जवाब दिलेला आहे.
     
            संजय राऊत म्हणाले की,
     

    “गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप केले जात आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना कठोर कारवाई सामोरे जावे लागेल.”

     
            अस संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल आहे. आता किरीट सोमय्या आणि संजय राऊत या दोघांमध्ये चालू असलेला हा वाद कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.