Author: admin

  • ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?

    मंडळी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र मुंडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूच गूढ आजवर सुटू शकलेलं नाही.

    मुंडे यांचा नेमका अपघात झाला की त्यांची हत्या झाली यावर आजही बरेच लोक शंका व्यक्त करत असतात. मात्र काही गोष्टींचा जर निरखून आढावा घेतला तर गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघाती झाला नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय आणखी बळकट होतो.

    तर मंडळी झालं असं की, २०१४ साली नुकतंच भारतीय जनता पक्षाच् सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेलं होत. आणि या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री पद देण्यात आलं होतं.

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    गोपीनाथ मुंडे हे जरी केंद्रामध्ये मंत्री असले तरी त्यांच बऱ्यापैकी लक्ष महाराष्ट्रावर राहात होत. तारीख होती ३ जून २०१४. गोपीनाथ मुंडे हे सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिल्लीवरून मुंबईला जायला विमानतळावर निघाले होते.

    त्यांना विमानतळावर जाण्यासाठी शासकीय गाडीमध्ये जाणे सोयिस्कर वाटले. मात्र आपल्या ठिकाणांवरून ५ ते ६ किलोमीटरच्या अंतरावरच त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक मारली.

    ज्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच डोकं पुढच्या सीटला जाऊन आदळल. मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला आणि पीएला काही एक दुखापत झाली नव्हती.

    अचानक मुंडेंना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

    आणि संपूर्ण देशामध्ये बातमी पसरली की आपले नेते गोपीनाथ मुंडे आता आपल्यात राहलेले नाही. 

    इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

    ईव्हीएमवरून हत्येचा संशय…

    मंडळी २०१४ साली लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या ईव्हीएम हॅकिंग कल्पना गोपीनाथ मुंडे यांना होती. यावरून त्यांची हत्या करण्यात आली. अस विधान सायबर एक्स्पर्ट सय्यद सुजा याने केलं होतं.

    ययाहीव्यतिरिक्त गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा

    ” गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नसून हत्या आहे.”

    असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत या प्रकरणाच कोड उलगडलेलं नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    मंडळी वीर भगतसिंग यांनी आपली आई विद्यावती यांना म्हटलं होतं की,

    “मला या देशाला स्वातंत्र्य तर मिळवून द्यायचं आहेच. मात्र भारतीय देशाच्या प्रगतीच्या आड येणारी परंपरागत अन हुकूमशाहीची व्यवस्था मला बदलयाची आहे. अन्यथा सत्तेमधला गोरा इंग्रज गेल्यानंतर इथे काळा इंग्रज सत्तेमध्ये येऊन बसेल.”

    भगतसिंगांचं हेच विधान आज कुठेतरी खर होतांना दिसून येतंय.

    ज्या प्रमाणे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेलं केंद्र सरकार प्रत्येक राज्यामध्ये आपल्या हुकूमशाहीची बीजं रोवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

    यावरून लक्षात येत की येणाऱ्या काही वर्षांमध्ये जर या देशातला नागरिक जागा झाला नाही, तर हा देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

    केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या राज्यात भाजपाची सरकार नाही अशा राज्यामधल्या सरकारमधील आमदारांना ईडीची भीती दाखवून ते सरकार बरखास्त करण्याचं षड्यंत्र आखत आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    याच नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच सरकार कोलमडून पडलं. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षामधील आमदारांना केंद्र सरकारने ईडीची भीती दाखवून सरकारमधून बाहेर पडायला सांगितलं.

    आणि त्या आमदारांना ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे प्रमुख होते या सर्वांना एकत्र घेऊन भारतीय जनता पक्षाने आपलं सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याच काम केलं.

    मात्र जे आमदार भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राला घाबरले नाही. त्यांच्यावर ईडीची चौकशी लादून त्यांना अटक करण्याच कामसुद्धा भाजपच्या केंद्र सरकारने केलं आहे.

    यामध्ये सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत. संजय राऊत यांनी भाजपाला पाठिंबा दिला नाही. म्हणून त्यांच्यावर ईडीची चौकशी लादून त्यांना अटक करण्यात आली.

    पण भाजप आणि शिंदे गटामध्ये एकही आमदार भ्रष्ट नाही? हा प्रश्न जनतेला उदभवला आहे. 

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    संजय राऊतांची अटक हा सतर्कतेचा इशारा…

    मंडळी भाजपसोबत गेले नाही म्हणून संजय राऊत यांना अटक करण्यात येते. हा तुम्हाला दिल्या गेलेला इशारा आहे. कारण उद्या जर तुम्ही भाजपला मतदान केलं नाही, तर तुम्हाला अटक झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नये.

    म्हणून आज आपल्याला सतर्क होण्याची वेळ आहे. आणि हा देश पुन्हा गुलामीत जाऊ नये याची खबरदारी घ्यायची आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक!

    ज्यांच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषांत अनुवादित झालेली आहे. 

    त्यांची चित्रा, सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा-महाविद्यालयात गायला जातो.

    इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 15 पोवाडे, एक नाटक, दहा लोकनाट्य, एक प्रवास वर्णन, तेवीस कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही. 

    प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात,

    ‘अण्णा भाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषात दुसरी कादंबरी नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएवस्की यांच्याशीच होऊ शकते.’

    यावरून स्पष्ट होते की अण्णाभाऊ साठे हे केवळ मराठी भाषा, महाराष्ट्र, भारत या चौकटीमध्ये मावणारे व्यक्तिमत्व नसून, ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात.

    अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले.

    मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने -लेखणीने शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत ढवळून काढला.

    स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

    ‘माझी मैना गावावर राहिली. माझ्या जीवाची होतीया काहिली’ ही त्यांची छक्कड खूप गाजली. त्यांची ही छक्कड मराठी भाषेचे वैभव आहे. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला. 

    बालपणापासून त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले. ओझी वाहिली, कोळसा वाचला, गिरणीत झाडू मारला. पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत.

    संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली. आण्णाभाऊ साठे संकटात खचून जाणारे नव्हते. तर संकटाच्या नरडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे आण्णाभाऊ होते.

    गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. आण्णाभाऊ म्हणत,

    ‘दारिद्र हे फार क्रूर असते, आणि ते नग्न असते. ते नष्ट झाले पाहिजे.’

    यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले.

    आण्णाभाऊ साठे म्हणत,

    ‘शांतता ही पवित्र बाब आहे. दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही, तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील.’

    अशी त्यांची भूमिका होती. गरिबांना न्याय मिळावा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती.

    आण्णाभाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाजपरिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना याचे चित्रण करण्यात त्यांचा हातखंडा होता.

    प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथासप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत नामदेवांची गाथा, संत तुकारामाचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कवेत घेत इंग्रजाळलेल्या काळात जनमाणसाची मराठी साहित्यात आणली.

    आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे आण्णाभाऊ साठे आहेत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन झाला पाहिजे. तो मराठी भाषेचा आणि आण्णाभाऊंचा ही सन्मान ठरेल.

    अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. आण्णाभाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला.

    आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने देवाने केलेले आहे. जगाचा नियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे. अशी अंधश्रद्धा आहे.

    परंतु आण्णाभाऊ साठे म्हणतात,

    ‘पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी, श्रमकरी ,शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे.श्रमकऱयांनी श्रम नाही केले तर धनदांडगे  फक्त नोटा खाणार नाहीत.’

    श्रमकऱ्यांचा कैवार घेऊन आण्णाभाऊ साठे अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णाभाऊ साठे म्हणतात,

    ‘”हे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव.’”

    अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालुबाई होते. घरात प्रचंड गरिबी. दारिद्र्य हाच त्यांचा सखा नि सोबती होता.

    आण्णाभाऊंना वाटायचे आपण खुप शिकावे, म्हणून ते शाळेत गेले. गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही. एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आत गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते.

    दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले. गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले. शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या आण्णा भाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले. ते फक्त दीड दिवस शिकले.

    पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांची प्रतिभेची गाडी सुसाट सुटली. गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही. हे साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.

    वयाच्या दहाव्या वर्षी अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा चारशे किलोमीटरचा प्रवास आण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायीच सुमारे दोन महिने केला.

    उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे; असे करत करत त्यांनी मुंबई गाठली. ज्या आण्णाभाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत,

    त्याच आण्णाभाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला. आण्णाभाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते. त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

    अण्णाभाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले, तेव्हा तेथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, “तुम्हाला काय पाहायला आवडेल. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे.

    लोकप्रतिनिधी म्हणाले या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीतक्षेत्रातील सहकारी म्हणाले या ठिकाणचे कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे.

    आण्णाभाऊ साठे म्हणाले,

    “‘या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहयचे आहे”.

    रशियामध्ये जरी गेले, तरी उपेक्षित, वंचित, गरिबांची नाळ कधी तुटली नाही.

    आण्णाभाऊ साठे संवेदनशील मनाचे होते अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोहोचली होती, ती त्यांच्या साहित्यामुळे.

    तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चेलिशेव भेटले. कॉम्रेड पी. ए. बारनिकोव भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकविणाऱ्या प्राध्यापिका ततियाना कातेनीना भेटल्या, बाकु याठिकाणी हमीद साहेब भेटले.

    हमीद साहेब आण्णा भाऊंना पाहिल्या पाहिल्या म्हणाले

    “शाहिरी अझीज.”

    रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ताश्कंद, मास्को, स्टालिनग्राड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. 

    मास्को येथील सत्काराला उत्तर देताना आण्णाभाऊ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलो आहे. मास्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांचा जयजयकार करणारे अण्णाभाऊ साठे होते.

    ‘फकिरा कादंबरीतील फकिरा म्हणतो,

    “‘ही तलवार शिवाजीराजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे.”

    गणपतीला वंदन करणारा गण बदलून, छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण आण्णा भाऊंनी आणला. ते म्हणतात, 

    “प्रथम मायभूच्या चरणा ।

    छत्रपती शिवबा चरणा  ।

    स्मरणी गातो कवणा ।”

    छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णाभाऊंची नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे आण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे. उत्तम आरोग्य मिळावे. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी. सर्वांगीण विकासासाठी शांतता असावी. ही साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची मनोमन इच्छा होती.

    त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. आण्णाभाऊ साठे हे जनमाणसाचे कैवारी होते. स्वतः दुःख भोगून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा. यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आहेत.

    दीड दिवस शाळां शिकणाऱ्या या महान साहित्यिकाने मराठी भाषेचा कैवार घेतला. जनमाणसांच्या मराठी भाषेला साहित्यात आणले. ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिंगत होते.

    मराठी भाषेचा कैवार घेऊन मराठी भाषेला वृद्धिंगत करणाऱ्या या महामानवाची जयंती ‘मराठी भाषा दिन’ म्हणून जर साजरा झाला, तर निश्चितच मराठी भाषेचा आणि आण्णाभाऊंचा सन्मानच ठरेल.

    -डॉ. श्रीमंत कोकाटे

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • स्वतंत्रसमरभुमी गाविलगड

    विदर्भ !!

    महाभारत काल ते त्याच्या ही अगोदर पासून राजघराणी जिथे वसली असे विदर्भ…

    जिथे अखंड महाराष्ट्राचे भविष्य गर्भात वाढले अश्या जिजाऊ मासाहेबांचे माहेर , शिवसिंहछाव्याला मनसब ज्या भागाची होती ते भाग,  आणि बंगालच्या साम्राज्यात जाऊन आपल्या शौर्याचे कवने लिहून घेणार्या नागपुरकर भोसल्यांचा विदर्भ…

    आणि याच भोसल्यांचा अधिपत्याखाली असलेला किल्ला म्हणजे सातपुड्याच्या कुशीत वसलेला , एलिचपुर म्हणजे अचलपूर चे रक्षकगड असलेला आणि चिखलदरा चे सामर्थ्य असलेला गाविलगड… !!

    वाकाटक, राष्ट्रकूट ते देवगिरी च्या यादवांच्या काळापासून  नागपुरकर भोसलेंपर्यंत शतकांचा इतिहास या गडाला लाभलेला . अश्या या गवळ्यांचा गड म्हणजे गाविलगड च्या इतिहास ची पाने स्पर्श केली की दाह जाणवतो सुहासिनींच्या जोहरचा आणि विर बेनिसिंह च्या तलवारीचा ..

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    तेव्हा जेव्हा हे वर्ष होते १८०२ !! पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये वसईचा तह झाला आणि ब्रिटिशांनी आपल्या काळोख नजरा महाराष्ट्रात घुमवल्या…

    रायगडावर आग लावत हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी ब्रिटिशांनी आपले हात सरसावले आणि महाराष्ट्राच्या वर्हाडात आक्रमणाची पाऊल टाकण्यासाठी ब्रिटीश जनरल वेलस्ली च्या हाताखाली फौज पुढे निघाली…

    आक्रमणाची खबर सरसर करत नागपूर च्या भोसले महालात आदळली आणि भोसल्यांचा राजकारणात वाढ झाली.. पण गेली कित्येक राजघराणी ज्या फितुरीच्या कलंकाने ग्रस्त होती तो कलंक इथेही लागलेलाच..

    म्हैसूर चा टिपु सुलतान चा पाडाव करुन निजामांशी हात मिळवून वेलस्ली , कर्नल स्टिव्हनसन्स च्या फौजेची तुकडी घेऊन नागपुरकर भोसल्यांना धमकावत सुटला पण भोसले मात्र त्याला काही भीक टाकेना, 

    वेलस्ली आपली फौज घेऊन मराठवाड्यात पोहोचला आणि दुसरीकडे नागपुरकर भोसले,शिंदे सह मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजण्यासाठी सज्ज झाले…

    आणि गाविलगड गुप्त खलिता येऊन पोहोचला….

    या वेळी भोसल्यांचा दौलतीचा बंगालचा खजिना याच गडावर होता , गाविलगड ची सुरक्षा किल्लेदार रायाजी भोसल्यांचा हाती सोपवुन गाविलगड चा रणरुद्र सेनापती बेनिसिंह मराठमातीच्या सन्माचा लढा देण्यासाठी आसई रणभूमीवर उतरला

    आणि भिडल्या तलवारी, खड्ग खणाणले , किंकाळी उठल्या हर हर महादेव चित्कार झाला आणि अस्मानी फत्ते ब्रिटिश कर्नल चं मुंडकच धडावेगळे झाले…

    वेलस्ली ला धडकी भरली

    आणि वेलस्ली बेनिसिंहास शरण गेला…

    ब्रिटीशांना नामोहरम करून फौजा परतल्या पण वेलस्ली च्या मनात हा पराभव भयानक रुतला होता..

    मराठ्यांचा फौजा परतताच वेलस्ली बाळापूर ला येउन महिपतरायच्या संगतीला आता गाविलगड जिंकण्यासाठी स्वप्न बघायला लागला, आडगाव ला मराठ्यांचा भीषण पराभव करुन वेलस्ली गाविलगड कडे वळला ,

    मधातील सर्व गावं कैदेत घालत , फितूर वकिलांना आपल्या बाजूला करून, नागपुरात एकही वार्ता पोहचणार नाही याची फितुरीच्या मदतीने शाश्वती करून वेलस्ली ने खासा गाविलगड घेरला तारीख होती ९ डिसेंबर १८०३  ,

    वेलस्लीने गडावर चढण्याचा बेत आखला पण मराठ्यांनी जागेवरच त्याचा बेत फस्त केला , तोफा आग ओकु लागल्या , गडावरून बिजली तोफ धडाडली सल्लग दिवस पालटायला लागले गड झुंजत होता,

    लढत होता, बेनिसिंहाची तलवार तडफडत होती , गडाचा तोफखाना प्रमुख रहिमखान झुंजत होता पण गडावर एक भिषण वार्ता पसरली , गडावरचा गोळा बारुद संपला …

    आता अंतिम युद्ध ठरले,  

    तारीख होती १४ डिसेंबर १८०३ चोर दरवाज्यातून गडाचा खजिना रायाजींच्या नजरेखालून नरनाळा ला निघाला, आणि एक चिता पेटली हत्ती तलाव

    आणि देव तलावाच्या मधोमध चंदनाची चिता रचून बेनिसिंहाची तरुण राणी रुपकुवर आपल्या तेरा सौदामिनी सह जोहर च्या अग्निकुंडात आहुती देण्यास सज्ज झाली…

    शहीद चंद्रशेखर आझाद एक क्रांतिकारी झंझावात

    किल्ल्याच्या बाहेर बेनिसिंहाची तलवार चालायला लागली पण भयाण गोळीबार सुरू झाला… एक एक करत विर धारातीर्थी पडु लागले गोळीबारात जखमी झालेल्या रक्तातही बेनिसिंह लढत होते ,

    तोफखानाप्रमुख कोसळले आणि सरसर करत एक गोळी आरपार त्या रणरुद्र योद्धाच्या छातीतून निघाली खासे बेनिसिंह कोसळले व गडावर सौदामिनींची जोहर चिता पेटली…

    राष्ट्रासाठी बलिदानाच्या गाथेचं एक आणखी पान लिहल्या गेले आणि जोहर च्या धगात ते आणखी चकाकले….

    ✍️अक्षय चंदेल 

    ७५५९२४१३४७

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    मंडळी कुठल्याही राज्याच राज्यपाल हे पद संविधानिक आणि त्या राज्याच्या अस्मितेचा व जनतेचा आदर करणार असत. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे.

    यावर सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, कोश्यारींच्या अशा महाराष्ट्रविरोधी कृत्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का गप्प बसलेले आहेत?

    कोश्यारी यांनी याआधीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवरून राज्यपालांनी माफी मागावी अशी भूमिका शिवप्रेमींद्वारे घेण्यात आली होती. मात्र काळानुरूप हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्या गेला.

    त्यानंतर औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुन्हा जीभ घसरली आणि त्यांनी महिलांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या सावित्रीआई फुलेंबद्दल अगदी हीन दर्जाच्या विधानांचा वापर केला होता.

    इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

    तेव्हासुद्धा त्यांच्यावर काही काळापूर्ती टीका करण्यात आली. आणि पुन्हा प्रकरण दाबण्यात आलं. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला आहे.

    राज्यपालांनी अस विधान केलं आहे की,

    “महाराष्ट्राच्या विकासासाठी परप्रांतीय लोकांचं योगदान हे मोठ्याप्रमाणात आहे.”

    मात्र राज्यपालांच्या या वक्तव्यावर अजूनही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय शांत बसलेले आहेत. 

    राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी

    राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेचा केलेला अपमान खपवून घेतल्या जाणार नाही. अशी भूमिका महाराष्ट्रातील पुरोगामी पक्षांच्या आणि संघटनांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे.

    राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरुन तर अशाप्रकारचे विधान करत नाही ना? असा अंदाज राजकिय समीक्षकांकडून लावल्या जात आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    मंडळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली. मात्र उध्दव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेणे सुरू केले आहे.

    ज्यामध्ये नुकतंच आंबेडकरी चळवळीतल सर्वात मोठं नाव म्हणजे सुषमा अंधारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवून शिवसैनिकाच शिवबंधन हाताला बांधलेल आहे.

    मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याअगोदर त्यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक राजकीय सभांमधून बोचरी टीका केली होती.

    इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

    आज आपण सुषमा अंधारे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सुषमा अंधारे हे आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव आहे. त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये झाला.

    त्यांचं संगोपन हे त्यांच्या आजोबांनी केलं असून त्या आपल्या आजोबांच नाव आपल्या नावापुढे लावतात. त्यांनी आपले शिक्षण एमएबीएडमध्ये पूर्ण केले.

    त्यांनी काही वर्षे राज्यशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र त्यांचा रस हा आंबेडकरी चळवळींकडे जास्त प्रमाणात होता. त्याचमाध्यमातून महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले.

    त्यांनी २००९ साली परळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याठिकाणी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

    तसेच त्यांनी यशदा प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक म्हणूनसुद्धा काम केले. त्यांनंतर काही कालावधीसाठी त्या आंबेडकरी चळवळीतील ‘दैनिक लोकनायक’ या वृत्तपत्राच्या पुणे आवृतीच्या संपादक राहल्या. 

    सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

    राष्ट्रवादीला पाठिंबा आणि शिवसेनेवर जहरी टीका

    सुषमा अंधारे यांनी २०१८ साली ‘गणराज्य संघ ‘नावाची संघटना स्थापन केली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता.

    आणि त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्याऱ्या त्यांच्या काही सभा चांगल्याच गाजल्या.

    ज्यामध्ये त्यांनी ठाकरे परिवारावर टीका करत म्हटलं होतं की,

    ” बजाओ पुंगी भगाओ लुंगी कहेनेवालो के पोते आदित्य ठाकरे अब लुंगी डान्स कर रहे है।”

    अशी बोचरी टीका विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे परिवारावर केली होती. मात्र आता शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे.

    प्रवेश घेताच त्यांना उपनेतेपदाची जबाबदारीसुद्धा दिल्या गेली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आता काय भूमिका घेतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

    मंडळी भारतीय देशातील अनेक घटनांना किंवा अनेक घटकांना बऱ्याचदा राजकीय स्वरूप समाज माध्यमांद्वारे किंवा राजकीय नेत्यांद्वारे दिल्या जात.

    मात्र २००४ मध्ये इशरत जहा नावाच्या तरूणीचा झालेला एन्काऊंटर आजही अनेक प्रश्न निर्माण करून जातो. तर मंडळी झालं असं की, इशरत जहा ही तरुणी मुंबईमधील मुंब्रा भागात राहत होती.

    मात्र तीच १२ जून २००४ ला अपहरण केल्या जात. आणि नंतर एन्काऊंटर केल्या जातो.  तिचा एन्काऊंटर झाल्यानंतर अनेक राजकीय आणि सामाजिक समीक्षकांकडून असे आरोप लावल्या गेले की इशरत जहा एन्काऊंटर हा फेक होता.

    कारगिल युद्धाचा थरारक इतिहास

    म्हणजे तिची हत्या करण्यात आली होती. यावर तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अस म्हणतात की या केसमध्ये पांडे नावाचे एक जॉईन कमिश्नर यांना सूत्रांकडून खबर मिळाली होती की,

    ईशरत जहा, जावेद उर्फ प्रणित पिल्ले आणि अन्य दोन व्यक्ती जे आयएसआयचे एजंट आहे, हे चौघेही एका निळ्या रंगाच्या कारमध्ये काही हत्यार घेऊन बसलेले आहेत.

    आणि त्यांचा हेतू तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा होता. याच कारणावरून इशरत जहा आणि जावेदसहित अन्य दोन व्यक्तींचा अहमदाबाद येथे एन्काऊंटर करण्यात येतो.

    मात्र सीबीआय नुसरत जहा ही आतंकवादी नव्हती या भूमिकेवर ठाम होती. देशभरातून या एन्काऊंटरचा फेक एन्काऊंटर म्हणून निषेध केल्या गेला.

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेला आतंकवादी हेडली याने कोर्टामध्ये बयान केलं की, नुसरत जहा ही आतंकवादी संघटनांच्या संपर्कात होती. 

    जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

    ” कुख्यात आतंकवादी हेडली याने कोर्टामध्ये नुसरत जहा हिचे आतंकवादी संघटनांशी संपर्क असल्याचे सांगितले. आमचं एक ऑपरेशन फेल गेलं होतं. ज्यामध्ये एक महिला होती. जींचं नाव इशरत जहा होत.”

    अस जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र देशामधील अनेक ठिकाणांवरून या इशरत जहाच्या एन्काऊंटरचा निषेध केल्या गेला.

    तिच्या हत्येला एक राजकीय मुद्दा बनवून तिला आतंकवादी घोषित करण्याचा प्रयत्न इथल्या राजकिय नेत्यांकडून होत आहे. अशी प्रतिक्रिया इशरत जहाच्या समर्थकांकडून त्यावेळी देण्यात आली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

    मंडळी या लेखाच शीर्षक वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे लांब केस वाढवलेला, डोक्यावर शिंग असलेला, कपाळावर मोठा टिळा लावलेला आणि जोरजोरात हसून धोका दर्शवणारा एक भयानक चेहरा उभा राहला असेल.

    ज्याला आपण एकंदरीत राक्षस म्हणतो. ज्याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांना वरदान मागितल होत, की मी ज्या वस्तू किंवा प्राण्यावर हात ठेवेल ती भस्म व्हायला हवी आणि मग त्या राक्षसाच नाव भस्मासुर अस पडल.

    पण आश्चर्य अस की,हे वरदान प्राप्त करण्यासाठी ज्या महादेवाची त्याने तपश्चर्या केली होती, त्याच महादेवाला भस्म करण्याचा प्रयत्न या भस्मासुराने केला होता अस आपण विविध दैविक मालिकांमध्ये बघत असतो. 

    बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

    मंडळी सांगायच तात्पर्य अस, की भस्मासुर नावाचा हा राक्षस दैवी काळामध्ये जरी मारल्या गेला असला तरी तो दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूला आजही रुप-वेश बदलून वावरत असतो.

    हे भस्मासुर कित्येक काळ जनता नावाच्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या करत असतात आणि मग हा ईश्वर त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी प्रसन्न होऊन त्याला वरदान देतो.

    मग तपश्चर्या करणाऱ्या त्या व्यक्तीतला भस्मासुर जागा होतो आणि सतत पाच वर्षे तो इथल्या ईश्वर नावाच्या जनतेला दगा देऊन भस्म करत असतो.

    प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

    कधी तो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरवतो, कधी विद्यार्थ्यांच्या ऐन वेळेवर परीक्षा रद्द करतो , कधी तो ऐन रात्री नोटबंदी करून देशातील जनतेला तासन्तास बँकेच्या रांगेमध्ये उभं करून १४३ लोकांचे जीव घेतो,

    कधी ऐन वेळी लॉकडाऊन जाहीर करून परराज्यातील लोकांना हजारो मैल पायदळ चालण्यास भाग पाडतो तर कधी शेतकऱ्यांवर बळजबरीने कानून-कायदे लादून त्यांच्यावर हल्ले करून दिल्लीमध्ये रस्त्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करायला लावतो

    आणि मग त्यांना ‘आंदोलनजीवी’ , खलिस्तानी, पाकिस्तानी म्हणायला लागतो तेव्हा मला इथल्या सरकार मध्ये, इथल्या गप्प बसून पगार घेत असलेल्या नेत्यांमध्ये भस्मासुर दिसून येतो. 

    मंडळी आपण प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला फिरणारे भस्मासुर लक्षात घेणे गरजेचे आहे. तो नेत्यांमध्ये किंवा सरकारमध्येच आहे असेही नाही.

    स्त्रियांना प्रेमाच्या नावाखाली प्रभावित करून तिच्या इच्छेविरुद्ध तीच शारीरिक शोषण करणाऱ्यांमध्ये किंवा बलात्कार करणाऱ्यांमध्ये भस्मासुर आजही जिवंत आहे.

    तुमच्याशी गोडगोड बोलून स्वतःच काम झाल्यानंतर पाठ फिरवणाऱ्याध्ये भस्मासुर जिवंत आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूचे भस्मासुर ओळखा आणि स्वतःला भस्म होण्यापासून वाचवा.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

    मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन जवळपास दहा वर्षे झाली तरी त्यांच्या नावाचा जल्लोष आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये ऐकायला मिळतो.

    त्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती असतील. मात्र असा एक किस्सा ज्याला ऐकून तुम्हीसुद्धा थोडे विचारात पडाल. तर मंडळी आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि बॉलिवूड यांच्यातील मैत्रीचे किस्से चालत आलेले आहेत.

    मग त्यामध्ये दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे असो की सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे असो. मात्र काही वर्षांपूर्वी भाजपा नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनू निगम यांच्या घराण्यातील संबंधांबद्दल खळबळजनक खुलासा केला होता.

    शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

    ज्यामध्ये त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांना सोनू निगमला ठार मारायचं होत. त्यांनी अनेकदा त्याला मारण्यासाठी शिवसैनिकसुद्धा पाठवले होते. ठाकरे आणि सोनू निगम या घराण्यांमध्ये काय संबंध आहेत? याबद्दल मला तोंड उघडायला लावू नका.”

    असा खळबळजनक खुलासा निलेश राणे यांनी केला होता. मात्र निलेश राणेंच्या या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना चांगलच धारेवर धरलं होत.

    ते म्हणाले होते की,

    ” निलेश राणे यांना शिवसेना उत्तर देईल एवढे ते मोठे नाही आहेत. ते काहीही बरळत असतात.”

    असा टोला विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर लगावला होता. 

    नेमकं काय होत प्रकरण? 

    तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे यांची सून म्हणजेच जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी नुकताच बॉलिवूड निर्माता क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

    त्यांनी ‘हसीना मान जायेगी’ या सिनेमाचा निर्माता म्हणून काम केलं होतं. ज्या सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याशी झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

    मात्र काही प्रसार माध्यमांनी सोनू निगम आणि स्मिता ठाकरे यांच्याबद्दल वेगळीच अफवा पसरवली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना सोनू निगमने सांगितलं होतं की,

    ” स्मिता ठाकरे यांचा मी आदर करतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. त्या माझ्या कुटुंबाविषयी नेहमी विचारत असतात.”

    याव्यतिरिक्त स्मिता ठाकरे यांनीसुद्धा म्हटलं होतं की,

    ” सोनू निगम हे एवढ्या कमी वयामध्ये उत्तम गायक आहेत आणि ते एक चांगले व्यक्तिमत्त्व आहे.”

    अस स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या. मात्र प्रसार माध्यमांनी दोघांविषयी रंगवलेल्या चर्चेला काहीही अर्थ नाही असं त्यावेळी वरिष्ठ पत्रकारांनी सांगितलं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

     वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास

    संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .

    कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते .

    शिवरायांच्या तलवारी प्रमाणे शब्द चालवुन प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या जातीय व खोट्या इतिहासाचे तुकडे तुकडे केले होते.

    “पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की पुढे शेकडो जणांना डसल्याशिवाय राहत नाही .त्याची कवटी फोडून त्याला मोक्षच द्यावा लागतो .”

    हा प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा होता. राजवाड्यांचे सर्व आरोप सत्य ऐतिहासिक पुराव्यांनी खोडून कायस्थ समाजावरील खोटा कलंक  दूर केला होता .तेंव्हापासून राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकारांना “कोदंड” म्हणूनच हाक मारत असत. 

    आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

    प्रबोधनकार हे शिव कुळाचे वारसदार होते .त्यांचे शब्द अनुबॉमपेक्षाही शक्तिशाली व खोट्या चा नायनाट करणारे होते व आहेत .

    माननीय राज ठाकरे यांना प्रबोधनकारांच्या कुळापेक्षा पुरंदरे यांचे गोत्र अधिक जवळचे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे .टिळक -सावरकर -राजवाडे- गोडसे -पुरंदरे -भागवत यांचे गोत्र एक असू शकते .

    ठाकरे यांचे नाते कुळांशी आहे. गोत्रांशी नाही. राजकीय अभिनिवेषातून भोंग्यांची चढ-उतार करताना कुळालाच कलंक लावणे म्हणजे प्रबोधनकारांना खोटे ठरवणे आहे.

    सूर्य केवळ आमच्यामुळे चमकतो व दिसतो ,असं म्हणणारे करोडो जीवजंतू सृष्टीत आहेत .परंतु सूर्यामुळे जीवजंतू व सृष्टीचे अस्तित्व आहे ,हे त्रिवार सत्य आहे .

    असा महाप्रतापी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! घुबडांनी सूर्य पाहिल्याची मर्दानगी सांगू नये .!! 

    पुरंदरे यांनी लिहिलेल्या बनावट इतिहासाची चिरफाड डॉक्टर आ.ह.साळुंखे सरांनी “पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर “ या ग्रंथात सप्रमाण केलेली आहे .

    हे पुस्तक वाचल्यावरही पुरंदरेनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले असे  वाटत असेल तर त्यांच्या मेंदूला रेशीम बागेचा विषाणू चावला असे समजावे . 

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    मराठा सेवा संघ .संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र व देशात समता ,बंधुता व न्यायाचे विचारकार्य १९९० पासुन करते.पुरुषोत्तम खेडेकरांनी कुणबी -मराठा ,बहुजनांना हा वारसा दिला.

    यामुळे जात -धर्मवादी भोंग्यांना  प्रबोधित समाज भिक घालत नाही.  राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड “बी “ग्रेड आहे की ” सी ” ग्रेड हे शोधण्यापेक्षा त्यांच्या मिमिक्रीला लोकांनी कोनता ग्रेड  दिला आहे , याचा शोध घ्यावा .

    ब्रिगेड समाजातली ए टू झेड विषमता संपावी यासाठी प्रयत्नरत आहे .तसेही माननीय राजसाहेब ; आपल्या प्रत्येक भाषणात आपण ब्रिगेडची आवर्जून आठवण काढताच या एकतर्फी प्रेमाबद्दल व आठवण काढल्याबद्दल  आभार व धन्यवाद.

    माणूस मेल्यावर आठवणी शिल्लक राहतात; ब्रिगेड तर विचार आहे तो संपणार नाही .सतत मालक बदलून, मालकांच्या इशाऱ्यावर भोंगे वाजवणारी ब्रिगेड नाही.

    शिवराय ,फुले ,शाहू ,आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या विचारावर चालणारी प्रबोधन चळवळ आहे ब्रिगेड!! 

    माननीय राज साहेब वेडेवाकडे का होईना आपण ब्रिगेडचे नाव घेता. वाल्ल्या सुद्धा सुरुवातीला  मरा मराच म्हणत होता .परंतु शेवटी त्याला राम कळलाच .आपल्यालाही खरी ब्रिगेड निश्चितच कळेल .

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांना ही चळवळ माहीत होती .त्यामुळे त्यांनी मराठा सेवा संघ व ब्रिगेडला कधीच विरोध केला नाही . मनोहर जोशींना सांगून सामाजिक प्रश्नांबाबत सहकार्य करायला लावले.

    अनेकदा त्यांच्या विरोधात ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली परंतु हा विरोध त्यांनी सकारात्मक घेतला .आर एस एस ला ते ओळखुन होते.

    आपली ही सध्याची  भोंग्यांची चढ-उतार करण्याची “ऑर्डर” संपली की वेळ काढावा व ब्रिगेड समजून घ्यावी .ही विनंती .शिव कुळाच्या वारसांनी पेशवाईचा अभिमान बाळगणे बरे नव्हे .

    प्रबोधनकारांना काय वाटेल?? आपसात नव्हे तर मानवतेच्या शत्रू विरोधात लढण्याची ही वेळ आहे. आमचे ,प्रबोधनकारांचे व सर्व बहुजनांचे कुळ म्हणजे शिव कुळ  !! 

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिक वाटे देवा।।

    जय जिजाऊ.

    @गंगाधर बनबरे, संभाजी ब्रिगेड.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir