Author: admin

  • कोरोनाकाळात धावून येणारे डॉ. अमलकार आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही – पदवीधर तरुण

    मंडळी राजकारण आणी राजकीय नेते म्हटले की काही नेते आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जनतेची सातत्याने दिशाभूल करत असतात. मात्र काही नेते हे खरंच सर्वसामान्य जनतेची तळमळ डोळ्यापुढे ठेवून त्यांच्यासाठी झटत असतात.

     

    सध्या विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेला असाच एक नेता पदवीधर तरुणांसाठी कोरोनाकाळात देव ठरला. अस मत अमरावती पदवीधर मतदार संघातील तरुणांच आहे.

     

    मंडळी आपल्याला माहीतच असेल की, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना सारख्या रोगाने अनेक लोकांचा बळी घेतला. एकमेकांचे नातेवाईकसुद्धा जवळ येत नव्हते.

     

    कुणी कुणाची मदत करण्यासाठी धावायला तयार नव्हतं. अनेक नेत्यांनी मदत करण्याची आश्वासन दिली. मात्र मदतीला कुठलाही नेता धावून आला नाही.

     

    डॉ. अंमलकार एक कोरोनायोद्धा

     

    मंडळी कोरोनासारख्या भयावह रोगाचे सावट असलेल्या काळात प्रा. डॉ. अनिल अंमलकार यांनी अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत घेतली.

     

    ज्या रुग्णांनां बेड उपलब्ध होत नव्हता त्यांना बेड उपलब्ध करून दिले. ज्यांना ऑक्सीजनची गरज होती त्यांना ऑक्सीजन उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर या काळामध्ये उपभोगाचे साधनं उपलब्ध होत नसतांना अनेक गोरगरीब लोकांना धान्याच्या किटचे वाटप असो कि किराणा किटचे वाटप असो.

     

    अशा अनेक माध्यमातून डॉ. अमलकार सर्वसामान्य लोकांसाठी कठीण काळात धावून आले. काही रूगणालयात उपचाराच्या नावाखाली रुग्णांनाकडून भरघोस पैसा घेत असतांना डॉ. अमलकार यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचं काम केलं होत.

     

    त्यांच्या याच काम करण्याच्या शैलीने पदवीधरांच्या गळ्यातले ते ताईत झाले आहे. परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी होणाऱ्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले डॉ. अनिल अमलकार यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.

     

    ©copyright politicalwazir.in

  • भाजप आणि काँग्रेसबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीमुळे वंचितचा विजय निश्चित

    मंडळी येत्या ३० जानेवरी २०२३ ला सोमवार रोजी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचाराने अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणी यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चांगलाच जोर धरला आहे.

     

    अमरावती मतदार संघात पदवीधर निवडणुकीसाठी तब्बल एकूण २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला असून ही लढत कमालीची होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यामध्ये भाजप , काँग्रेस आणी वंचित बहुजन आघाडीमध्ये काट्याची लढत होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

     

    तर दुसरीकडे काँग्रेसने आपली पूर्ण इच्छा नसतांना धीरज लिंगाडे यांना वेळेवर उमेदवारी जाहीर केल्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट झाल्यासारखा वाटत आहे. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. रंजित पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.

     

    रंजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार असून पदवीधरांच्या दृष्टीने त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी कुठलेही काम केले नाही. अशी चर्चा सगळीकडे पदवीधरांमध्ये सुरु आहे.

     

    वंचितच्या डॉ. अमलकरांच्या आंदोलनांमुळे पदवीधरांमध्ये डॉ. अंमलकरांचीच चर्चा

     

    मंडळी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरलेले प्रा. डॉ. अनिल अमलकार यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय.

     

    डॉ. अमलकार हे समाजातील विद्यार्थांच्या, शेतकऱ्यांच्या आणी पदवीधरांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनांमुळे सतत चर्चेत असतात. मग बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा आंदोलन असो, की विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप मिळण्याबाबत आंदोलन असो.

     

    अशा कित्येक आंदोलनांमुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. डॉ. अमलकार हे सुशिक्षित आणी धडाडीचे नेतृत्वक्षम नेते असल्याकरणाने पदवीधरांचा कल सध्याच्या निवडणुकीत त्यांच्याकडेच आहे.

     

    खासकरून त्यांनी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणी बुलढाणा जिल्हातील तरुणांची कामे करून अधिक लोकप्रियता मिळवली आहे.

     

    भारतीय जनता पक्षाचा गड असलेला अमरावती पदवीधर मतदार संघ सर्वसामान्य पदवीधरांच्या ताब्यात यावा यासाठी डॉ. अनिल अंमलकार आता सज्ज झालेले आहे. आता औपचारिकता राहली ती म्हणजे फक्त विजयाची.

     

    ©copyright politicalwazir.in

  • समाजातील गोरगरीब युवक युवतींचे सामूहिक विवाह परिचय संमेलन घेणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

    मंडळी राजकारण म्हटलं की निवडणुका येतात आणि  निवडणुका जातात. उमेदवार उभे राहतात. काही जिंकतात तर काहींचा पराभव होतो. आणी या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते ती म्हणजे सर्वसमान्य जनता.

    मात्र ही जनता अशाच लोकांना लक्षात ठेवून मतदान करत असते जो उमेदवार त्यांच्यासाठी नेहमी हजर असतो. त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवून त्याचा योग्य तो पाठपुरावा करून त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम करत असतो.

    होय मंडळी. आपल्याला माहिती असेल की सध्या विधानपरिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने चांगलाच जोर धरला आहे.

    ज्यामध्ये अमरावती पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अनिल अंमलकार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    मात्र सर्वात महत्वाची बाब अशी की वंचितच्या डॉ. अनिल अंमलकरांचा विजय मतदान होण्यापूर्वीच निश्चित मानला जात आहे. 

    सामुहीक विवाह परिचय संमेलनाचे आयोजन करून गोरगरीबांना मदत करणारे डॉ. अमलकार 

    मंडळी बऱ्याचदा एखाद्या कुटुंबाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करायचा असला की भरघोस पैशांची गरज असते. मात्र हलाकीच्या परिस्थितीपोटी काही कुटुंबांचं हे स्वप्न अपूर्ण राहून जात.

    पण ही बाब बुलढाणा जिल्ह्यातील डॉ. अनिल अमलकार यांना सतत छळत होती. यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चातून गोरगरीब युवक युवतींसाठी सामूहिक परिचय विवाह सोहळ्याचे आयोजन करून हजारो कुटुंबांना खूप मोठा दिलासा दिला.

    ज्यामुळे डॉ. अनिल अंमलकार तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले. परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणाऱ्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पदवीधरांना आपल्या समाजिक आर्थिक आणी शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी डॉ. अनिल अंमलकार हा एकमेव परिचय वाटू लागले आहे.

    सध्या डॉ. अमलकरांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला असून अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशीम या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांची गर्दी त्यांच्या प्रचारामध्ये सामील होत आहे.

    ज्याचा मोठ्या प्रमाणात फटका भाजप आणी काँग्रेसला बसला असून अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.

    ©copyright politicalwazir.in

  • निकालाआधीच वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित का मानला जातोय ?

    मंडळी निवडणुक म्हटली की जय पराजय हा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवल्या जात असतो. मात्र या वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निकालाबाबत आश्चर्यचकीत करणारी बाब दिसून येत आहे.

     

    होय मंडळी. दिनांक ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच मतदान होणार आहे. ज्यामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रत्येकाने आपल्या विजयाची दावेदारी स्थापित केली आहे.

     

    मात्र महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. पण यामध्ये ट्वीस्ट आणलाय तो वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांनी. 

     

    भाजप आणी काँग्रेससाठी वंचितचे प्रा. डॉ. अनिल अमलकार सर्वात मोठी डोकेदुखी 

     

    मंडळी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार.

     

    त्याच कारण अस की, गेल्या १० वर्षांपासून अमरावती पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. रंजित पाटील हे आमदार आहेत. मात्र अमरावती मतदार संघातील पदवीधरांच्या अनेक तक्रारी डॉ. रंजित पाटील यांच्याविरोधात आहे.

     

    त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपचा पत्ता आधीच कट झालेला दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसला योग्य उमेदवार मिळत नव्हता. अखेर त्यांनी धीरज लिंगाडे यांना वेळेवर उमेदवारी दिली.

     

    यावरून स्पष्ट होते की काँग्रेसनेसुद्धा पदवीधर निवडणुकीची लढाई लढण्याआधीच रामराम ठोकला आहे. याशिवाय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकारांचा प्रचार आणी प्रसार चांगलाच जोर धरताना दिसून येत आहे.

     

    डॉ. अमलकारांचा जनसंपर्क आणि रस्त्यावर उतरून पदवीधरांसाठी काम करण्याची तळमळ हे वंचित बहुजन आघाडीसाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरत आहे.

     

    सोशल मीडिया असो की अमरावती पदवीधर मतदार संघातील गाव गल्ली बोळातील जनतेमध्ये डॉ. अमलकारांच्या निश्चित असलेल्या विजयाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

    ज्यामुळे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निधवणुकीतून भाजप आणी काँग्रेसचा आधीच पत्ता कट झाल्याच स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

     

    ©copyright politicalwazir.in 

  • जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…

    मंडळी आजचा तरुण म्हटलं की पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे रोजगाराचा. काही रोजगार मिळून जातात तर काही रोजगार मिळवून घ्यावे लागतात.

    मात्र सरकारकडून पदवीधरांची रोजगाराच्या बाबतीत नेहमीच गळचेपीच होत आली आहे. काँग्रेस आणी भारतीय जनता पक्षाने फक्त आश्वासनांचा पूर पदवीधरांसमोर मांडला. मात्र कुणीही त्यांच्या रोजगाराची पुढे येऊन ठाम भूमिका घ्यायला तयार नव्हतं.

    अशा परिस्थितीमध्ये डॉ. अनिल अमलकार नावाचा एक व्यक्ती याचं पदवीधरांसाठी धावून आला. पदवीधरांच्या रोजगाराबाबत काय समस्या आहे हे डॉ. अमलकारांनी समजून घेतलं. आणि हजारो तरुण एकत्र करून त्यांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आवाज उठवला.

    सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या पदवीधर तरुणांच्या समस्या काय असतात ? त्यांना कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण कराव्या लागतात?, त्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी घेतलेले अथक परिश्रम या सर्व गोष्टींचा जाब त्यांनी आंदोलनादरम्यान पूढाकार घेऊन शासनाला विचारला होता. 

    अमरावती पदवीधर निवडणुकीत तरुणांमध्ये का लोकप्रिय आहे प्रा. डॉ. अनिल अमलकार ?

    मंडळी पावसाळा सुरु झाला की ज्याप्रमाणे बेडूक बाहेर पडतात. त्याचप्रमाणे निवडणूक लागली की काही राजकिय नेते आपल्या घराच्या बाहेर पडून जनतेसमोर येत असतात.

    अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या बाबतीतसुद्धा हेच झालं आहे. काँग्रेसचे धीरज लिंगाडे आणि भाजपाचे विद्यमान आमदार रंजित पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधरांशी काडीचाही संबंध आला नाही.

    मात्र वंचित  बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल अमलकार हे गेल्या कित्येक वर्षांपासून अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठवत असल्याकारणाने तरुणांमध्ये त्यांची अधिक लोकप्रियता वाढलेली आहे.

    परिणामी येत्या ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा सर्वीकडे सुरु आहे.

    ©copyright politicalwazir.in

  • अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही राजकीय नेते आपल्या घराण्याच्या राजकीय वारस्यांपोटी मुखात सोन्याचा चमचा घेऊन येत असल्या कारणाने त्यांचं राजकीय पद हे निश्चितच असत. तर काही राजकीय नेते हे अगदी समाजाच्या तळागाळापासून संघर्ष करून आपलं नेतृत्व स्थापन करत असतात.

    सर्वसामान्य लोकांमधून आणि सामाजिक जान असलेल्या कुटुंबातून असच एक पुढे आलेलं आणि आपल्या अनोख्या नेतृत्वक्षमतेमुळे विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांच्या खुर्च्या हलवणारं नेतृत्व म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ. अनिल अमलकार.

    मंडळी डॉ. अमलकारांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. डॉ. अनिल अंमलकार यांचा जन्म १५ डिसेम्बर १९७० साली बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला. आईवडिलांपासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वसामान्य लोकांना मदत करायची जणू परंपराच होती. जनतेची तळमळ जाणून घेणारा आपल्या पालकांचा हाच गुण डॉ. अमलकारांमध्ये आला असावा.

    डॉ. अमलकारांचा शैक्षणिक संघर्ष

    मंडळी लहानपणापासूनच डॉ. अमलकारांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि शालेय शिक्षणाची जिद्द होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. उच्च माध्यमिक शिक्षण हे नांदुरा येथील ज्युनियर कॉलजेमध्ये झाले.

    नंतर त्यांनी शेगाव येथील माऊली संत गजाजन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये विशेष बाब अशी की आपलं अभियांत्रिकीच शिक्षण चालू असताना डॉ. अंमलकारांनी विद्यार्थांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचं काम केलं.

    म्हणूनच आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या कारकिर्दीमधून इथल्या सर्वसामान्य लोकांना डॉ. अमलकारांमध्ये एक निर्भीड नेतृत्व दिसायला लागलं होत. आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमधून एम. इ. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळवली आहे. प्रा. डॉ. अमलकरांनी डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर तब्बल २५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात मुंबई, नागपूर आणि शेगाव येथील माऊली संत गजानन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा दिली आहे.

    शिक्षण क्षेत्रातील डॉ. अनिल अमलकरांचा संघर्ष पाहता अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांचा कल डॉ. अमलकारांकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

    ©copyright politicalwazir.in

  • अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ . रणजित पाटील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात

    या मतदारसंघात पदवीधर मतदार संघ म्हणून घोषीत झाला त्यात भारतीय जनता पक्षा कडून डॉ. रणजित पाटील  यांना उमेदवारी देण्यात आली .

    रणजीत पाटील  यांचा जन्म 20 जानेवारी 1964 रोजी झाला. हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस होते. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

    डिसेंबर 2014 मध्ये त्यांची गृह (शहरी), नागरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा व न्यायव्यवस्था आणि संसदीय कामकाज या खात्यांसह महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    नंतर त्याच महिन्यात त्यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. आणि वाशिम जिल्हा. त्यांनी एमएलसी म्हणून 2 टर्म पूर्ण केल्या आहेत आणि आता ते सलग तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत.

    पाटील यांचा जन्म सुलोचनादेवी पाटील आणि विठ्ठलराव पाटील यांच्या पोटी झाला, ते अकोल्यातील महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांच शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एमबीबीएस आणि एमएस (ऑर्थो) केले.

    पाटील यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमएस (ऑर्थो) पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. ते विठ्ठल रुग्णालयात अकोल्यातील अग्रगण्य ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.

    आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही त्यांची ख्याती आहे. चार भावांमध्ये रणजित पाटील वयाने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचे सर्व भाऊ चांगले पात्र आहेत.

    त्यांचे मोठे बंधू राजेंद्र पाटील हे अकोल्यातील एका नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, त्यांचा धाकटा भाऊ रणधीर पाटील हे अकोल्यातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांचा धाकटा भाऊ नितीन पाटील हे जिल्ह्यातील सर्वात यशस्वी शेतकरी आहेत.

    रणजित पाटील हे दीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय असल्याने त्यांनी आतापर्यंत खुप् राजकीय पद भुशविले आहेत .

    • उपाध्यक्ष, वैद्यकीय शाखा महाराष्ट्र भाजपा (2007-2012)
    • अध्यक्ष, वैद्यकीय शाखा अकोला भाजपा
    • प्रभारी, पश्चिम विदर्भ (वैद्यकीय शाखा)
    • सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र (2012)
    • सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद

    अशा विविध राजकीय पद त्यांनी जबाबदारीने भुशविलेले आहेत.

  • अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांच पारड जड का ?

    मंडळी विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणार असून पदवीधरांमध्ये कमालीचा उत्साह या निवडणुकीबद्दल बघायला मिळतो आहे.

     

    याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती पदवीधर मतदार संघात चालू असलेली उलथापालथ. होय मंडळी. अमरावती मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे.

     

    भारतीय जनता पक्षाकडून अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. रंजित  पाटील आणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. डॉ. अनिल अमलकार यांनां उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

     

    या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार जरी रिंगणात उतरले असले, तरी लढत मात्र भाजप,काँग्रेस आणी वंचित  बहुजन आघाडीमध्ये होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

     

    वंचितच पारड जड का? 

     

    मंडळी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ट्वीस्ट आला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर.

     

    यामध्ये महत्वाची बाब अशी की वंचितने उमेदवार म्हणून ओबीसी समाजाचे कर्तव्यदक्ष व्यक्ती प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

     

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. अमलाकर यांचा पदवीधरांसाठीचा संघर्ष आणी जनसंपर्क पाहता कार्यकर्तुत्वाच्या बळावर त्यांना ही उमेदवारी दिली आहे.

     

    मात्र प्रा. डॉ. अनिल अंमलकार यांनां उमेदवारी मिळताच महाविकास आघाडी आणी भाजपमध्ये चिंतेच वातावरण पसरलेलं आहे. कारण डॉ. अनिल अंमलकार हे गेल्या ३० वर्षांपासून सर्वसामान्य लोकांचे, विद्यार्थ्यांचे आणी पदवीधरांचे प्रश्न घेऊन समाजासाठी काम करत आले आहे.

     

    डॉ. अमलकार हे मूळ खामगावं येथील रहिवासी असून अकोला, अमरावती, वाशीम ,बुलढाणा आणी  यवतमाळ जिल्ह्यातील पदवीधरांसोबत त्यांचा कमालीचा संपर्क येत असल्याने सर्वीकडे त्यांचं पारड जड असल्याची चर्चा सध्या अमरावती पदवीधर मतदार संघात सुरु आहे.

     

    याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अकोला येथील जिल्हापरिषद विश्राम गृहात नुकत्याच पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीतील पदवीधरांची गर्दी डॉ. अनिल अंमलकार यांना पहिली पसंती दर्शवत आहे.

     

    डॉ.अमलकार यांनी आपल्या विजयाच रनशिंग फुंकलं असून अमरावती, अकोला , वाशीम , बुलढाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांची निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. ज्यामध्ये पदवीधरांची गर्दी आणी त्यांचा उत्साह डॉ. अंमलकार यांना विधानपरिषदेमध्ये पाठवण्यासाठी सज्ज आहे.

  • आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

    आज आपल्या सर्वांनाच नक्कीच जाणून घेयला आवडेल अशा सक्षम नेतृत्वाबद्दल म्हणजेच आबासाहेब रघुनाथराव चव्हाण.

     

    यांचा जन्म 10 जून 1943 रोजी पानगाव या गावी झाला, आत्ताचा लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्यातील हे गाव. परंतु अगोदर रेणापूर तालुक्यातील हे गाव अंबाजोगाई तालुक्याला जोडलेले होते.

     

    त्यांचा जन्म हा स्वातंत्र्य पूर्व काळात 1943 साली झालेला. तेव्हा त्यांचे वडिल रघुनाथराव चव्हाण यांच्या कडून समाजसेवेच बाळकडू मिळाल.

     

    विनायकराव पाटिल

     

    चव्हाण घराणं हे पूर्वी पासून पाटिल घराणं असल्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाशी थेट संबंध येऊ लागला रोज बैठकीत होणारा सामान्य जनतेच्या प्रश्नाचा न्याय निवडा पाहून समजून त्यांनी स्वतःला यामध्ये झोकून देऊन काम करायला सुरवात केली.

     

    आबासाहेब चव्हाण यांना जनतेच मिळणार प्रेम पाहून वडील रघुनाथ चव्हाण यांनी सक्रिय राजकारनात काम करण्याची मुभा दिली. तेथील जनतेत ते पूर्णपणे एकरूप झाले होते. माय माउली जनता त्यांना प्रेमाने मालक म्हणून संबोधित होती.

     

    त्यांची नाळ जमिनीशी जोडलेली होती आणि आजही आहे, एवढ्या मोठ्या पाटिल घराण्यातील आपण आहेत याचा त्यांनी कधीच गर्व केला नाही उलट स्वाभिमानाने लोकांसाठी काम करायला सुरवात केली.

     

    ‘सत्ता’ तंञ

     

    त्यांच्या राजकारनाची सुरवात हि गावच्या ग्रामपंचायती पासून झाली, सन. 1973 साली त्यांनी पहिली निवडणूक पानगाव ग्रामपंचायत लढवली, आणि त्यांचा पानगाव ग्रामविकास पॅनेल चे सर्वच उमेदवार विजयी झाले.

     

    आणि आबासाहेब चव्हाण वय वर्ष 30 असताना गावचे सरपंच झाले. तो त्यांच्या कपाळी लागलेला पहिला गुलाल. विजयानंतर कोणत्याही भ्रमात न जाता त्यांनी लोकांसाठी काम केली आणि जणमाणसात त्यांची प्रतिमा सर्वोत्तम नेता, प्रशासक अशी निर्माण झाली.

     

    त्यांनी सलग 1973 ते 1983 असे 10 वर्ष पानगावचे सरपंच पद सांभाळून, प्रशासन आणि जनतेत चांगलीच पकड निर्माण केली. त्यांनी केलेल्या कामामुळे ते घराघरात पोहचले.

     

    लोकांच मिळणार प्रेम आणि अंगी असणारी काम करण्याची क्षमता याच्या जोरावर त्यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांना जनतेच्या प्रेमामुळे यश देखील मिळाले.

     

    1983 साली देशाचे नेते, मा. खा. शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सामाजवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तत्कालीन बीड जिल्हा परिषद निवडणुकीत पानगाव गटातुण 1800 मतानी विजयी झाले.

     

    पुर्वी पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड जिल्हा परिषद सदस्यांमधुण केली जात अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती पदासाठी त्यावेळी आबासाहेब चव्हाण यांना 17 मते तर गोपीनाथराव मुंडे साहेब यांना 9 मते मिळाली, 8 मतांच्या चांगल्या फरकाने आबासाहेब चव्हाण सभापती पदी निवडुण आले मिळालेला विजय खूप मौल्यवान ठरला.

     

    त्यांची पंचायत समिती सभापती पदी निवड झाली, 5 वर्ष सभापती पद भूषवत असताना जनतेचा असणारा संपर्क तुटला नाही. तो अधिक प्रमाणात वाढ ला त्यांनी आणखी जोमाने जनतेत मिसळून लोकांची काम केली आपली लोकांशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

     

    पृ‌त्येक गावांमध्ये शाळा, पाणी पुरवठा योजना विहीर , वैयक्तिक विहीर शक्य तिथे आरोग्य केंद्र या योजना छोटे तलाव आशा अनेक योजना राबविल्या. 5 वर्ष्याच्या काळात त्यांच्या राजकीय ताकदीची चुनुक राज्याच्या नेतृत्वापर्यत गेली होती सर्वच पक्षांना त्यांची जणमाणसात असलेली ताकद समजली होती.

     

    खा. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपला सामाजिक काँग्रेस पक्ष परत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये विलीन केला. त्या काळात आबासाहेब चव्हाण यांनी 10 वर्ष पानगाव ग्रामपंचायत सरपंच आणि 5 वर्ष पंचायत समिती सभापती पद भूषवल होत.

     

    आबासाहेब चव्हाण यांचा वाढता जणसंपर्क आणि मिळणाऱ्या जनतेच्या प्रेमामुळे खूप जनाच्या पोटात गोळा यायला लागला. पंचायत समिती सभापती निवडीत झालेला पराभव गोपीनाथराव मुंडे यांना खूपच जिव्हारी लागला होता.

     

    नंतर विरोधकांच्या राजकीय कुरघोडी वाढायला लागल्या होत्या. विरोधकांची राजकीय महत्वकांक्षा बळ घेत होती.

     

    नंतरच्या काळात अंबाजोगाई ला तोडून रेणापूर हा वेगळा तालुका करण्यात आला आणि त्याचा समावेश लातूर जिल्ह्यात करण्यात आला यामागे पण राजकारण होत हे आबासाहेब यांना समजून चुकलं होत पण त्यांनी धैर्याने काम करायला परत सुरवात केली

     

    त्यांचा पारंपरिक असणारा अंबाजोगाई, बीड मधील मोठा मतदार वर्ग तोडण्यात आला होता. तत्कालीन 1995 साली होऊ घातलेल्या लातूर बाजार समिती निवडणूकीत त्यांनी परत विजय मिळवला आणि 1995 ते 1999 असे सलग 4 वर्ष लातूर बाजार समिती च्या उपसभापती पदी विराजमान झाले,

     

    ती निवडणूक त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षा कडून लढवली होती. त्याच काळात त्यांची 1997 साली परभणी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. 1997-2002 हा 5 वर्ष कालावधी त्यांनी परभणी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केल….

     

    आणि शेतीविषयक त्यांच धोरण हि पवार साहेबांसारखीच होती. पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले कुशल नेते म्हणून संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये त्यांचा नावलौकिक झाला होता.

     

    म्हणून 1999 ते 2002 या कालावधीसाठी त्यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे राज्यपाला तर्फे नियुक्ती करण्यात आली.

     

    आबासाहेब रघुनाथराव चव्हाण यांचा वाढता राजकीय दबदबा काहींना सहन झाला नाही, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी आबासाहेब चव्हाण यांच्या विरोधात कुरघोडी करायला सुरवात केली.

     

    आणि या त्यांच्या स्वार्थी राजकारनामुळे महाराष्ट्र एका कुशल नेत्यांपासून वंचित राहिला. आबासाहेब चव्हाण यांनी द्वेषाच राजकारण कधीच केल नव्हतं.

     

    एक नक्कीच विश्वास वाटतो आज आबासाहेब चव्हाण सक्रिय राजकारणात असते तर नक्कीच ते आजच्या राज्याच्या मंत्री मंडळात आपल्याला उत्तम कृषी मंत्री म्हणून पाहायला मिळाले असते

     

    परंतु तेव्हा काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या नीच राजकारनामुळे महाराष्ट्र या नेत्यापासून वंचित राहिला तो कायमचाच……….

     

    सन 2000 नंतर राजकारणाचा घसरलेला स्तर, जातीय राजकारण ,निष्टा व तत्व यांना नसलेलं महत्व समाज हितासाठी केलेले राजकारण द्वेषासाठी पदासाठी केले जाऊ लागले…

     

    त्यामुळे स्वेच्छा निवृत्ती घेतली व आपल्या आवडत्या शेती व्यवसायाकडे वळले.

     

    पण मान मर्तब रूबाब आज ही जशाचा तसा

     

    ✍️- श्याम दत्तात्र्यय चव्हाण, लातूर

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबुक वर सुद्धा फॉलो करू शकता

    Facebook : political wazir

  • ‘सत्ता’ तंञ

    हल्ली महाराष्ट्रातील झालेल सत्तातंर बघता सामान्य जनतेला अनेक प्रश्न पडले असावे…..

    भारत देशाने इथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार केला आणि नक्कीच लोकशाही देशात आपल्याला सामान्य जनतेतील निडरपणा दिसून येतो.

    पण जर लोकशाही राज्यात जर जनतेला एखादा प्रतिनिधी देण्यासाठी बहुमताने विजयी कराव यातुनच त्या प्रतिनिधीचे वास्तविक विचार जनतेसमोर येतात आणि हेच विजयी प्रतिनिधी होणाऱ्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग ठरु शकतात .

    देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

    राजकीय नेता हा संवेदनशील आणि काळानुसार बदलणारा हवा त्याचे उद्दिष्ट हे सत्ता मिळविणे नसून तिथल्या लोकांना रोजगार ,शिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणारे असावे .

    राजकीय नेत्यांसाठी सत्ता हि ५ वर्षाची असते पण जर याच प्रतिनिधीने त्याच्या सत्ताकाळात रोजगार उपलब्ध करुन दिला तर त्या रोजगार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबियांना पुढील ५० वर्षे तो राजकीय प्रतिनिधी लक्षात राहतो .

    ज्या प्रतिनिधींचे लक्ष हे निवडणूकांवर असते तो व्यक्ती त्याच्या जीवनात फक्त आणि फक्त राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण करतो

    तर सामाजिक जनतेच्या विकासासाठी झटणारा सामाजिक प्रतिनिधी म्हणून छाप पाडतो परिणामी सामाजिक नेता हा राजकीय नेत्यापेक्षा जनतेला आपलासा वाटतो .

    प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

    सामाजिक प्रतिनिधीना विकास करण्यासाठी आणि जनतेच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी गरज असते ती पदाची त्या कारणास्तव निवडणूक लढवणे आणि निवडून येणे भाग पडते ,

    हे सर्व घडत असताना जनतेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात जनतेने व्यवस्थितरीत्या पार पाडायला हव्यात सहसा आपलं मत हे योग्य उमेदवारास देणे .

    “सत्ता हि काही पैसे कमावण्यासाठी मिळालेली ५ वर्षे नसून जनतेच्या अडचणींचे निरासन करुन बदल घडवण्याचा काळ असतो ……..!”

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.