Author: admin

  • राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    मंडळी राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान केलं आहे, की आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीसमोर वाचल्याशिवाय अमरावतीला परत जाणार नाही. या अनुषंगाने खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहे. ते मुंबईत दाखल होताच संपूर्ण मुंबईतील शिवसैनिक आक्रमक होऊन राणा दाम्पत्याच्या घराला वेढा देऊन बसले आहेत.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    राणा दाम्पत्याने अमरावतीला परत जावे अन्यथा हात पाय तोडून परत पाठवू अस आव्हान शिवसैनिकांनी त्यांना केलं आहे. त्याकरिता शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निस्वासस्थानी आणली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. याच्या प्रतिउत्तरात सध्या नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,

    ” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”

    अस प्रतिउत्तर संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिल आहे. 

    मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    शिवसेनेला बच्चू कडूचा पाठिंबा

    राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे. मात्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेची बाजू घेत राणा दाम्पत्याला चांगलच सुनावलं आहे. बच्चू कडू म्हणाले की,

    ” उध्दव ठाकरे आणि शिवसेना वाघ आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने वाघाच्या बिळात हात टाकू नये.”

    अस आव्हान त्यांनी राणा दाम्पत्याना केलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या धार्मिक वळण घेतलं आहे. नवनवीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    शिवसेनेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सरळ राणा दाम्पत्याच घर गाठलं. कालपासून राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्ते वेढा देऊन बसलेले आहेत.

    शेकडो पोलीससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आज राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याकरीता बाहेर पडणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली.

    मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा

    आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणून कमाल केली आहे. 

    शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांकडून सूट – नवनीत राणा

    मुंबईमध्ये राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी हजारो शिवसैनिक वेढा देऊन बसले आहे. कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. याची सर्व सूट शिवसैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
  • मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनीत राणा

    मंडळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल.

    शिवसेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सरळ राणा दाम्पत्याच घर गाठलं.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    कालपासून राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्ते वेढा देऊन बसलेले आहेत. शेकडो पोलीससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आज राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याकरीता बाहेर पडणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

    यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली. आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

    ‘द कश्मिरी फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा- आमदार नितेश राणे

    शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅरिगेट्स तोडले

    राणा दाम्पत्य आज हनुमान चालीसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलं आहे. मात्र चिघळलेलं हे प्रकरण आता कुठलं वळण घेणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे.

    राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर राजकीय नेते धार्मिक राजकारणाची मदत घेतात. हे राज ठाकरेंच्या बाबतीत बघायला मिळाल.

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मात्र भारतीय जनता पक्षाची हरदम टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपच्या धार्मिक राजकारणाच्या बाजूने गेले याच सर्वांना आश्चर्य वाटलं आणि आता तेच राज ठाकरेंनी साकारलेली भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार नवनीत राणा यांनी साकारलेली आहे.

    राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याच्या मुद्द्याला शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने राज ठाकरेंची बाजू घेत शिवसेनेला आव्हान केलं होत की, आम्ही मुंबईमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू आणि आज राणा दाम्पत्य तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    प्रतिउत्तरात शिवसेनेनेसुद्धा राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून राणा दाम्पत्य गनिमी काव्याने नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झाल आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना राणा दाम्पत्य म्हणाल की,

    ” मातोश्री हे आमच्या श्रद्धेच स्थान आहे. बाळासाहेब ठाकरें हे आमच्या हृदयात राहतात. मात्र त्यांचा विचार उद्धव ठाकरेंना जपता आलेला नाही.” पुढे पत्रकाराणे मुख्यमंत्र्यांना तुम्ही पनौती म्हणाल का? असा प्रश्न राणा दाम्पत्याला विचारल्यानंतर त्यांनी ” हो! १०० टक्के म्हणतो.”

    अस उत्तर दिलं. 

     मातोश्रीवर असणारे शिवसैनिक नाही – राणा दाम्पत्य

    आज दिलेल्या आव्हानानुसार राणा दाम्पत्य मुंबईत आलं असता, प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की,

    ” जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे ते ग्राउंड लेव्हलवर काम करतात. मात्र हे जे मातोश्रीवर मुरदाबादचे नारे लावत आहेत. हे शिवसैनिक नाही आहे.”

    असा टोला राणा दाम्पत्यांनी शिवसेनेवर लगावला. मात्र आता चिघळलेलं हे प्रकरण कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.

    अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणल.

    पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

    अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना, ‘ मम भार्या समर्पयामि ‘ हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ ‘ माझी बायको घेऊन जा ‘ असा सांगितला. ब्राम्हण महसंघाने मिटकरींनी हिंदू धर्माचा अपमान केला सांगत त्यांच्या विरोधात मोर्चा उभा केला आहे.

    अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना अमोल मिटकरींच्या वक्त्यव्यंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,

    “माझं स्वतःच नेहमी स्पष्ट मत असत तुम्हा सगळ्या मीडियाला माहिती आहे ,की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने वक्त्यव्य करत असताना कुणाच्या धार्मिक भावनेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”

    अस स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. 

    काय म्हणाले जयंत पाटील? 

    अमोल मिटकरींनी इस्लामपूरमधील सभेमध्ये केलेल्या वक्त्यव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

    ” ब्राम्हण समाज हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. इस्लामपूरमध्ये मिटकरींच्या भाषणातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”

    अस मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकरणात धार्मिक राजकारण खेळण्याचे राजकीय नेत्यांचे मनसुबे चालू आहेत. जनतेच्या प्रश्नांची पर्वा कुणालाच पडलेली नाही. मात्र कुठे हनुमान चालीसा वाजवायचा आणि कुठे अजाण यावर सध्याच राजकारण चालू आहे.

    राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत हनुमान चालीसाच्या वादावरून धार्मीक मुद्दा उचलून धरला होता. राजकीय क्षेत्रात पुरेस यश आलं नाही तर राजकीय नेते धार्मिक राजकारणाची मदत घेतात. हे राज ठाकरेंच्या बाबतीत बघायला मिळाल.

    देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

    मात्र भारतीय जनता पक्षाची हरदम टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपच्या धार्मिक राजकारणाच्या बाजूने गेले याच सर्वांना आश्चर्य वाटलं आणि आता तेच राज ठाकरेंनी साकारलेली भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी साकारलेली आहे.

    राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्याच्या मुद्द्याला शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने राज ठाकरेंची बाजू घेत शिवसेनेला आव्हान केलं होत की, आम्ही मुंबईमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू आणि आज राणा दाम्पत्य तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे.

    तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    प्रतिउत्तरात शिवसेनेनेसुद्धा राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून राणा दाम्पत्य गनिमी काव्याने नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झाल आहे.

    यावर प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याला ताकीद दिली आहे की,

    ” रवी राणा आधी एकटे येतो म्हणले होते. मात्र आता बायकोला घेऊन आले. पण ते जर मातोश्रीवर आले तर त्यांना पायाने परत पाठवणार नाही.”

    अस आव्हान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल.

    हनुमान चालीसा म्हणूनच परत जाणार – राणा दाम्पत्य

    मंडळी काही वेळापूर्वी राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे. याआधी रवी राणा यांनी सांगितलं होतं की,

    ” मी मुंबईत येऊन मातोश्रीपुढे हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय परत जाणार नाही.”

    मात्र त्यांना रोखण्यासाठी शिवसेना कारकर्त्यांनी मुंबई रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे इस्लामपूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भूमिकेवरून. मिटकरी यांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा सांगत असतांना म्हटलं की,

    ” मी एका गावामधल्या लग्न समारंभात गेलो असता तिथे एक महाराज मंत्र म्हणत होता आणि कन्यादान करत होता. पण कन्या ही दान करायची गोष्ट नाही व त्या महाराजाने जो मंत्र म्हटला होता, त्याचा अर्थ असा होता की, मम भार्या समर्पयामि म्हणजेच माझी बायको घेऊन जा.”

    अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. मात्र अमोल मिटकरींच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध करत पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे आंदोलन सुरू केलं. ब्राम्हण महासंघाच्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसपुढे अक्षरशः गदारोळ केला.

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ब्राह्मण महासंघाच्या सर्व महिलांना चांगलच धारेवर धरल. त्या म्हणाल्या की,

    ” कोणाला कुठल्या वक्तव्याचा विरोध करायचा आहे तो त्यांनी लोकशाही मार्गाने करावा. ब्राम्हण महासंघाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्या. मग स्वतः आरडाओरडा करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आमच्यावर हात घातला. आम्हीसुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत. पण ही आमची संस्कृती नाही. अमोल मिटकरींनी ब्राम्हण महसंघाला उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करायची गरज नाही. आम्ही कार्यल्यासमोर लेट पोहचलो नसतो तर ब्राम्हण महासंघाच्या महिलाना डोक्यावर उचलून घेवुन गेलो असतो.”

    अशी बोचरी टीका त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना केली. 

    राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

    अरेरावी केली तर कार्यक्रम करू – रुपाली पाटील

    मंडळी अमोल मिटकरींनी इस्लामपूर येथे झालेल्या सभेत मांडलेल्या भूमिकेबद्दल चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हणाल्या की,

    “ब्राम्हण महासंघाने निषेध व्यक्त करायचा असेल तर तो आमच्या परिसरात करू नये. जास्त आरडाओरडा केला किंवा अरेरावी केलो तर कार्यक्रम करू.”

    अशी ठाम भूमिका रुपाली पाटील यांनी मांडली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • अमोल मिटकरी नी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.

    अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणली.

    पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना,

    ‘ मम भार्या समर्पयामि ‘

    हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ

    ‘ माझी बायको घेऊन जा ‘

    असा सांगितला. ही गोष्ट ब्राम्हण महासंघाला चांगलीच खटकली आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे त्यांनी अमोल मिटकरींविरोधात आंदोलन सुरू केलं. 

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    आंदोलनकर्त्यांची मिटकरींसमोर ततबब 

    अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे वापरलेल्या मंत्रावरून आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघासाची प्रसार माध्यमांवर चर्चा झाली तेव्हा अमोल मिटकरींनी चुकीचा मंत्र वापरून हिंदू धर्माचा अपमान केला अस आंदोलकांच म्हणन होत. मात्र जेव्हा मिटकरींनी या मंत्राचा अर्थ ब्राह्मण महासंघाला विचारला, तेव्हा मात्र खुल्या प्रसार माध्यमांवर ब्राम्हण महासंघाची ततबब झाली.

    या पार्श्वभूमीवर

    ” पुण्यामध्ये चालू असलेलं ब्राम्हण महासंघाच आंदोलन निरर्थक आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बाबासाहेब पुरंदरेंनी केली होती, तेव्हा ब्राम्हण महासंघाने का आंदोलन केलं नाही ?”

    असा प्रश्न मिटकरी यांनी आंदोलकांना विचारला. मात्र आता हे चालू असलेलं आंदोलन कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • लालपरीची सुटका पण गाढवाला कुणी पाळलं – सामना

    मंडळी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याने धुमाकूळ घातला आहे , तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेनी एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या आर्थिक आणि मानसिक फसवणुकीने सगळीकडे राजकीय चर्चेच वातावरण निर्माण केलंय.

    गुणरत्न सदावर्ते आणि अजयकुमार गुजर यांनी निलंबित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५४० रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये अशी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम २५० डेपोमधून गोळा केली.

    अस एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. पोलीस प्रशासनाने सदावर्ते यांच्या केलेल्या चौकशीमध्ये तशी कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर सदावर्ते यांना अटक करून मुंबई आणि सातारा येथे पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं.

    सदावर्ते यांच्यावर शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यामागचे मुख्य आरोपी असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांना कोल्हापूरमध्ये नेण्यात येणार असुन पुढील सुनावणी कोल्हापूर न्यायालयात होणार आहे.

    जवळपास ९४% एसटी कर्मचारी कामावर परतल्याने माहाविकास आघाडी सरकारला दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सामना या अग्रलेखात गुणरत्न सदावर्ते आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

    ” लालपरीची सुटका झाली पण गाढवाला कुणी पाळलं होत ही गोष्ट जनतेसमोर येणे गरजेचे आहे.”

    अस सामनामध्ये म्हटलं आहे.

    सदावर्तेसारख्या गुंडाला आधीच लगाम लावायला होता – सामना

    शिवसेनेच्या सामना या अग्रलेखामध्ये शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते याच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की,

    “सदावर्तेच्या गुंडशाहीला ४ महिन्यांपूर्वीच लगाम लावला असता, तर संप चिघळला नसता. सदावर्तेनी कायद्याचा खेळ केला आणि त्यांचा खेळ कायद्यानेच संपला.”

    अस सामनामध्ये म्हटलं आहे. आज कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेबद्दल काय निकाल लागेल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

    मंडळी गेल्या सात वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीन अगदी कमी कालावधीमध्ये दिल्ली आणि पंजाब राज्यांसारखे गड काबीज केले. याहीव्यतिरिक्त गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्येसुद्धा आम आदमी पार्टीचे दोन आमदार निवडून आले.

    कुठल्याही जाती धर्माच राजकारण सोडून विकासाच राजकारण करणारा हा पक्ष आता महाराष्ट्रामध्ये उदयास यायला सुरुवात झालेली आहे. याच उदाहरण नुकतंच बघायला मिळालं आहे.दिनांक २३ व २४ एप्रिल २०२२ ला उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे.

    या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध, अनिष्ट प्रथा परंपरेविरुद्ध बंड पुकारणार विचारपीठ या साहित्य संमेलनात सर्वांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत असत. या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित असणार आहेत.

    शरद पवार यांनी विचारपीठावर बोलत असतांना राज ठाकरेंच्या समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भोंग्याचा उल्लेख करावा. अस पत्र आम आदमी पार्टीच्या वतीने शरद पवार यांना देण्यात आल आहे. 

    शरद पवारांसोबत नागराज मंजुळे आणि रविषकुमार यांची असणार उपस्थिती 

    दिनांक २३ व २४ एप्रिलला होऊ घातलेल्या ९५ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाला शरद पवार यांच्यासोबत बहुजनांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेपुढे मांडणारे  विख्यात सिने दिग्दर्शक सैराट फेम नागराज मंजुळे आणि निर्भीडपणे आपली ठाम भूमिका मांडणारे विख्यात पत्रकार रविषकुमार यांची उपस्थिती असणार आहे.मात्र या साहित्य संमेलनामध्ये आपल्या भाषणात शरद पवार काय भूमिका मांडतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.