Author: admin

  • राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

    मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उपस्थित नेत्याने जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती.

    परिणामी इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेच मेन टार्गेट हे राज ठाकरेच बनले. राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या भाषणातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी म्हणून ते कधीही छत्रपती शिवरायांच नाव घेत नाही असा आरोप केला होता.

    या पार्श्वभूमीवर काल इस्लामपूरमध्ये बोलतांना सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की,

    ” राज ठाकरे यांनी शरद पवार साहेबांना जातीयवादी म्हटलं. पण त्यांना मला सांगायचं आहे, की माझ्यापासून तर अमोल मिटकरींपर्यंत प्रत्येक माणसाला उच्च पदावर नेण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं आहे. माझ्यासारखा एक भटक्या जातीमधला समाजातला एक सर्वसाधारण तरुण जो २०१४ च्या निवडणूकीत सबसेल पराभूत होतो. अशा पराभूत झालेल्या तरुणाला कुठलीही जात धर्म न बघता विधान परिषदेच वरीष्ठ सभागृहाच विरोधीपक्षनेते पद दिल जात. त्या शरद पवारांना राज ठाकरे जर जातीयवादी नेते म्हणत असतील, तर त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे.”

    अशाप्रकारची जहरी टीका धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. 

    राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव- धनंजय मुंडे 

    काल इस्लामपूरच्या सभेमध्ये टीका करत असताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंचा भाजपचा अर्धवट राव असा उल्लेख केला. ते म्हणाले की,

    ” मी लहान असताना शाळेमध्ये एक नाटक दाखवल्या जात होतं. ज्यामध्ये रामदास पाध्येच्या हातामध्ये एक बावल असायचं. त्याच नाव अर्धवट राव होत. जेव्हा रामदास पाध्ये जे बोलत नाही ते त्यांच्या हातामधल अर्धवटराव नावच बावल बोलायचं. मात्र ते सगळं बोलणं रामदास पाध्येंचच असायचं. तसेच भारतीय जनता पक्षाचे राज ठाकरे हे अर्धवट राव आहे आणि भाजपा ही रामदास पाध्ये आहे.”

    अस बोलतांना त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

  • पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेत धार्मिक राजकारणाचा डावपेच आखून आपल्या भाषणामधून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती.

    त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांचा मुद्दा पुन्हा उकरून जनतेच्या सामाजिक प्रश्नांना तळा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडला टार्गेटवर धरलं होत. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ नेते मनोज आखरे यांनी राज ठाकरेंना सोशल मिडियाद्वारे चर्चेसाठी ओपन चॅलेंज केलं होतं.

    मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या आव्हानापासून नजर चोरली होती. त्यामुळे त्यांना संपूर्ण सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं. राज ठाकरे हे आपल्या भाषणाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    अस मत बऱ्याच नेत्यांनी व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्या केलेल्या उल्लेखावरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तरात म्हटलं की,

    “पुरंदरेला आणि जेम्स लेनला उकरून तुम्ही बाहेर काढलं आहे. त्यांची हाड मोजायला लावू नका. मला इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातल पान अन पान वाचून दाखवलं ना, तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितल ते सत्य होईल. त्यांनी काय सांगितल ते ही मी सांगत नाही.”

    अस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 

    पुरंदरेंनी प्रशासनाला माफीपत्र लिहिलं होतं- जितेंद्र आव्हाड 

    राज ठाकरे यांनी पुरंदरे आणि जेम्स लेनच्या उकरून काढलेल्या वादाला जोरदार प्रतिउत्तर जीतेंद्र आव्हाड यांनी काल इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये दिल. ते बोलताना पुढे म्हणाले की,

    ” माझ्याकडे पुरावा आहे. जेव्हा पुरंदरे यांनी कालनिर्णय या कॅलेंडरमध्ये स्वतःच्या मनाने छत्रपती शिवरायांची जन्मतारीख हे तिथीप्रमाणे मांडली होती. नंतर ते पंढरपुरला एका कार्यक्रमात गेले असतांना अमरजीत पाटील या शिवमावळ्याने पुरंदरेला जाब विचारल्यानंतर त्याने माफीपत्र प्रशासनाला लिहिलं होतं.”

    अस बोलतांना त्यांनी राज ठाकरे यांना पुराव्यानिशी चांगलच धारेवर धरलं. मात्र आता यावर राज ठाकरे आव्हाडांना काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सध्या राजकीय नेत्यांनी एकमेकांची टिंगल उडवण्याचा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई आणि ठाणे येथे घेतलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा हा नागसारखा दिसतो असे सांगून त्यांची नक्कल करून चेष्टा केली होती.

    प्रतिउत्तरात प्रसार माध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनीसुद्धा राज ठाकरेंवर टीका करत म्हटलं होतं की,

    ” राज ठाकरेंनी एकदा आरशात बघून पहावं , की त्यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतोय ते.”

    यावरून संपूर्ण राजकीय क्षेत्रात चांगलीच राजकीय रंगत लोकांना बघायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सांगलीमधल्या इस्लामपूरमध्ये काल घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं.

    राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंगे खाली न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावा असे आदेश आपल्या मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की,

    ” राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाला मिळालेला नवीन भोंगा आहे. जो अंगानेसुद्धा भोंगा आहे. राज ठाकरे यांनी भाजपकडे आपला मेंदू गुलाम म्हणून ठेवला आहे. मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याची अक्कल राज ठाकरेंना देवाने दिली नाही.”

    अस बोलताना राज ठाकरेंच्या राजकीय गुलामीची खिल्ली मिटकरी यांनी उडवली.

    राज ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी सुरक्षा कशाला हवी?  – मिटकरी 

    राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये राज ठाकरेंवर जोरदार टीका करतांना म्हटलं की,

    ” रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. एक राम दशरथ का बेटा एक राम घटघटमे बैठा अस म्हटल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येला जातांना आपली गादीही भरताला दिली होती. ते Z+ सुरक्षा घेऊन गेलेलं नव्हते. तोच खरा राम भक्त जो केंद्राची Z+ सुरक्षा नाकारणार. “

    अस बोलतांना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र १ मे ला होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे मिटकरींना काय प्रतिउत्तर देतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे.

    भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली आहे. १ मे २०२२ ला राज ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये होणार असून समाजामध्ये धार्मिक अस्थिरतेच वातावरण पसरण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील मुस्लिम समाजाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधुन शिवसेनेची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” अलीकडे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना आपण भाजपाची B टीम समजत होतो. मात्र आता राज ठाकरे यांच्या भाजपप्रेरीत भूमिकेवरून त्यांना भाजपाची C टीम म्हटलं तर वावग ठरणार नाही.”

    अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. 

    राज ठाकरेंच्या सभेचा शिवसेनेला फरक पडत नाही – अब्दुल सत्तार 

    दिनांक १ मे २०२२ ला औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की,

    ” शिवसेना हा खरा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो इतर धर्मांनासुद्धा सोबत घेऊन चालतो. शिवसेना हा प्रत्येक माणसाच्या, गोरगरीब जनतेच्या काळजात बसलेला पक्ष आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या सभेचा शिवसेनेच्या कुठल्याच कार्यकर्त्यावर काही प्रभाव होणार नाही किंवा इतर लोकांना त्याचा फरक पडणार नाही.”

    अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

  • देवेंद्र फडणवीस बहुजनांचे खरे नेते – सदाभाऊ खोत

    मंडळी मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेला असतो. सरकार बदललं तरी मराठा आरक्षणाची परिस्थिती तीच असते आणि जो विरोधीपक्ष असतो तो फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी विरोध करायचा म्हणजे करायचा या उद्देशाने आपली भूमिका नेहमी मांडत असतो.

    जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार होत, तेव्हासुद्धा मराठा आरक्षणाचा वाद हा चालूच होता आणि आता महाविकास आघाडीच सरकार आहे, तरी मराठा आरक्षणाचा वाद चालूच आहे. फक्त भूमिका घेणारे आणि विरोध करणारे बदलत असतात.

    आता हीच विरोधीपक्षाची भूमिका घेऊन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची माल जपली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना फडणवीसांची महती गायतांना सदाभाऊ खोत म्हणाले की,

    ” देवेंद्र फडणवीस हे बहुनजनांचे खरे नेते आहेत. कारण ते बहुजनांसाठी नेहमी आवाज उठवत आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी आपली भूमिका ताकदीने मांडली आहे.”

    अस सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. 

    शरद पवार जातीयवादी नेते – सदाभाऊ खोत

    रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,

    ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी समाजामध्ये जातीयवाद पसरवण्याच काम केलं आहे. मात्र त्या सर्वांना पुरून उरलेला माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. शरद पवार हे जातीयवादी नेते आहेत. म्हणून त्यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल नाही. एकेकाळी मराठा समजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केल्या गेली. अनेक सुनावण्या केल्या गेल्या. मोर्चे काढले गेले. रॅल्या काढल्या गेल्या. मात्र आता तेच लोक सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणापणापासून आपली पाठ फिरवत आहे. कारण त्यांना विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायच नाही. “

    असा टोला सदाभाऊ खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना शरद पवार यांच्यावर लगावला आहे.

  • मोहन भागवतांनी कश्मीरी पंडितांच पुनर्वसन करावं – प्रवीण तोगडिया ( अध्यक्ष आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद )

    मंडळी सध्या भारतीय देशामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिमांचा वाद निर्माण करण्याचा चौफेर राजकारण काही संघटना आणि पक्षांकडून होत आहे. अलीकडे गाजलेला ‘ द कश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलच वादाच कारण बनला होता.

    संपूर्ण देशामध्ये या चित्रपटाने हिंदू मुस्लिम चर्चेचा डंका वाजवला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कश्मीरी पंडितांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र ती भूमिका फक्त हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करणारी होती.

    मोहन भागवंत यांच्या याच भूमिकेवरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” मोहन भागवत यांना जर अखंड भारत करायचा असेल तर, त्यांना मी आठवण देऊ इच्छितो की जेव्हा आपण सत्तेत नसतो तेव्हा आपल्याला वचनं द्यायचे असतात आणि जेव्हा सत्तेत असतो तेव्हा ते वचनं पूर्ण करायचे असतात. आता तुमचेच लोक सत्तेत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा वचन पूर्ण करायचं आहे. जे कश्मीरी पंडित गेल्या ७ वर्षांपासून पुनर्वसनासाठी हक्क मागत आहे. त्यांचं एका महिन्यामध्ये पुनर्वसन करून द्याव आणि किमान एक रात्र तरी आपण एखाद्या कश्मीरमधल्या गावामध्ये मुक्काम करून दाखवावा. हेच अखंड भारताचा पाहिलं पाऊल असेल.”

    असा टोला प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत यांच्यावर लगावला. 

    तोगडियांचा भाजप आणि राज ठाकरेंनासुद्धा टोला

    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भोंग्याच्या वादावरून आपलं मत व्यक्त करताना राज ठाकरे आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की,

    ” ज्या राज्यात भाजपाच सरकार आहे त्या राज्यात भोंगे उतरवण्याचे आदेश का बरं दिले जात नाही. जर तुम्हाला भोंगे उतरवायचे असेल तर ४८ तासांच्या आत भोंगे उतरवायचे असतील तर सुप्रीम कोर्टाकडून पोलीस प्रशासनाला आदेश द्यायला लावा. मी नाव घेणार नाही. पण हिंदूचा अचानक पुडका आलेल्या व्यक्तींच मी स्वागत करतो.”

    अस त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं.

  • राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सद्धया सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत केलेल्या धार्मिक वक्तव्यांवरून सम्पूर्ण महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

    राज ठाकरे यांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आता सर्वसाधारण कुटुंबातील युवकांची धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याला सुरवात केली आहे. अस मत समतावादी सामाजिक संघटनांनी वर्तवल आहे.

    त्यांनी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मस्जिदींसमोर भोंगा लावून त्यामध्ये हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्याकारणाने समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणं साहजिकच आहे.

    अलीकडे मनसेचे नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी नाशिकमध्ये मस्जिदींवरील भोंगे न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अस विधान केल होत. मात्र महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा राज ठाकरेंचा हा मनसुबा हाणून पाडण्याच मत आता भीम आर्मी या संघटनेने व्यक्त केलं आहे.  

    भीम आर्मीचा राज ठाकरेंना दम

    गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात कार्यरत असलेले राज ठाकरे यांना फारस राजकीय यश प्राप्त न झाल्याकारणाने त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने राज ठाकरेंना चांगलाच दम दिला आहे.

    ” राज ठाकरे यांच्या भाषणावर रमजानपर्यंत प्रशासनाने बंदी आणावी. ते आपल्या भाषणांमधून महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याच्या हेतूने राजकारण करत आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्रातूनच नाही, तर सम्पूर्ण भारतीय देशातून तडीपार करण्यात याव.”

    अस रोखठोक मत भीम आर्मीने पोलीस महासंचालक आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून व्यक्त केलं आहे. मात्र आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

    मंडळी गेल्या कित्येक महिन्यांपासून महराष्ट्रामध्ये चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा वाद सुटता सुटत नाही आहे. अलीकडे शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून संपूर्ण महाराष्ट्र खळबळून उठला होता.

    मात्र जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढता लढता आत्महत्या केली तेव्हा एवढा गदारोळ झाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणासाठी चालू असलेलं आंदोलन अध्यापही शांत झालेलं नाही.

    महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट १०७ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच काम केलं. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आता प्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 

    काय म्हणाले पडळकर? 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वादावरून जोरदार टीका केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,

    “पवारांच्या घरावर जो हल्ला झाला त्याच आम्ही समर्थन करत नाही.  मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला संपूर्णतः शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला नाही, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या गाडीवरती हल्ला होऊनसुद्धा माझ्यावरतीच गुन्हा दाखल केल्या गेला. परत एकदा माझ्या गाडीवरती दोनशे ते अडीचशे लोकांनी हल्ला केल्यानंतर माझ्यावरच ३०७ चा गुन्हा दाखल केल्या गेला. शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेत असतात. कर्मचारी पवारांच्या घराकडे का चालून आली याचा अभ्यास शरद पवार यांनी का केला नाही? ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार पवार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. एसटी कर्मचाऱ्यांच ५० वर्ष समर्थन शरद पवारांनी केलं. विलीनिकरणाची आषासुद्धा त्यांनीच दाखवली. मग आता पवार पाठ का फिरवत आहे ?”

    असा चोख प्रश्न विचारत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. मात्र आता यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

  • ३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात धार्मिक राजकारण करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हनुमान चालीसा प्रत्येक मस्जिदीपुढे लावण्यात येईल.

    अस विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.राज ठाकरेंच्या या विधानाने समाजामध्ये धार्मिक तेढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे यांना पुरेस राजकीय यश प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी हा राजकारणातील धार्मिक फंडा वापरला असावा.

    या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशीकमध्ये सर्व धार्मिक स्थळी भोंगे लावण्याअगोदर पोलिसांची परवानगी घ्यावी असे आदेश दिले आहेत. अन्यथा चार महिन्यांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितल. मात्र दीपक पांडे यांच्या आदेशांचा विरोध नाशिकचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे. 

    दुप्पट आवाजात भोंगे वाजवू – दिलीप दातीर 

    मंडळी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाटील यांनी नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांवरचे भोंगे लावण्याअगोदर पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यायचे सांगितल्यानंतर नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दीपक पाटील यांच्या आदेशांचा कडाडून विरोध केला आहे.

    ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते की,

    “जर ३ मेपर्यंत नाशिकमधील मस्जिदींवरचे भोंगे प्रशासनाने हटवले नाही, तर आम्ही प्रत्येक मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही. मा. राज साहेबांचा आदेश आम्हाला अंतिम आदेश आहे. आम्ही नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशांना मानत नाही. जर मुस्लिमांना भोंग्यावत अजाण लावायची परवानगी मिळत असेल ,तर आम्हाला हनुमान चालीसा लावायची का नाही ?”

    असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. मात्र दातीर यांच्या या वक्तव्यावर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • मी हिमालयात जायचं म्हटलंच नव्हतं – चंद्रकांत पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकाणात एकीकडे राज ठाकरे यांनी धार्मिक मुद्दे उचलून ट्विस्ट आणला आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरमधल्या पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपाच्या प्रभावाने दुसरा ट्विस्ट चांगलच राजकीय वर्तुळ गाजवतोय.

    कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या नेत्या जयश्री जाधव यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षातील राजकीय वातावरण चांगलच डगमगलय. चंद्रकांत पाटील यांचा गड असलेलं कोल्हापूर काँग्रेस उमेदवार असलेल्या जयश्री जाधव नावाच्या स्त्रीन चांगलच अचंबित करून सोडलंय.

    या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठी उसंडी मारेल अशी शक्यता चहुबाजूंनी वर्तवल्या जात होती. मात्र भारतीय जनता पक्षाच धोरण हे कोल्हापूरमधल्या जनतेला बहुतेक भावलं नसाव. परिणामी त्यांनी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना भाजपाच्या सत्यजित कदम यांच्याआधी पसंत केलं.

    मात्र भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाच खापर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर फोडल्या जात आहे. कारण कोल्हापूर त्यांचा गड आहे आणि हे निवडणूक जिंकली नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जाणार असल्याचसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

    मात्र आता पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी स्वभावाप्रमाणे आपण केलेलं वक्तव्य फिरवण्याच काम केलं आहे. 

    पराभवानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

    कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राजकारणामधून संन्यास घेऊन हिमालयात निघून जाईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपलं विधान फिरवलं आहे. त्यांनी आपल्या विधानाला दांडी मारत प्रसार माध्यमांना सांगितलं की,

    ” पराभव झाल्यानंतर मी स्वतः हिमालयात जाईल अस म्हटलं नव्हतं. कदाचित मी निवडणूक लढलो असतो आणि माझा पराभव झाला असता, तेव्हा मी हिमालयात गेलो असतो.”

    अस चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं. मात्र चंद्रकांत पाटील यांचा दुतोंडेपणा आता महाराष्ट्रातील जनतेच्या चांगलाच लक्षात आला असावा. म्हणून भाजपाला कोल्हापूरमध्ये पराभव पत्करावा लागला.