Category: ऐतिहासिक राजकारण

  • आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

    मंडळी भारतीय देश हा संपूर्ण जगभरामध्ये प्रबळ लोकशाही असलेला देश मानल्या जातो. ज्यामध्ये देशाचा कार्यभार हे प्रधानमंत्री चालवत असतात तर राज्याचा कार्यभार मुख्यमंत्री चालवत असतात.

    त्याचप्रकारे महाराष्ट्र राज्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांना धरून आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.

    ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ १ मे १९६० ते १ नोव्हेंबर १९६२ असा होता. त्यानंतर मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले.

    जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

    ते साओली विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसकडून आमदार होते. त्यांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ असा होता. त्यानंतर पी. के. सावंत हे महाराष्ट्राचे ९ दिवसांचे मुख्यमंत्री झाले.

    ते काँग्रेसकडून चिपळूण मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ मिळाला. ते महाराष्ट्राचे ११ वर्ष मुख्यमंत्री राहिले.

    ते पुसद मतदार संघाचे आमदार होते. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले.

    ते भोकर मतदार संघाचे आमदार होते. त्यांचा कार्यकाळ २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ असा होता. त्यानंतर वसंतदादा पाटील हे विधानपरिषद आमदार असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    ५ मार्च १९७७ ते १८ जुलै १९७८ असा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते बारामती मतदार संघातून आमदार होते. १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० असा त्यांचा कार्यकाळ होता. 

    अनुक्रमे जवळपास २० मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले ज्यामध्ये अतिशय कमी दिवस म्हणून फडणविस हे मुख्यमंत्री होते. आनी सगळ्यात जास्त कार्यकाळ वसंतराव नाईक यांना चालवण्यात यश आलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?

    मंडळी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ ला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी केली. वयाच्या तरुण अवस्थेपासून आपला राजकीय प्रवास शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केला होता.

    मग अस काय घडलं की काँग्रेस पक्षाशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली? तर मंडळी झालं असं की, राजकीय क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसतांना स्वतःच्या कार्यकर्तुत्वार शरद पवार हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आमदार झाले होते.

    जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

    वर्ष होत १९६६-६७ दरम्यानच. पवार हे २६ वर्षाचे होते. त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार होता.

    शरद पवार यांची इच्छा जरी निवडणूक लढवण्याची असली तरी त्यावेळच्या जेष्ठ अनुभवी नेत्यांच्या तुलनेत ते लहानच होते. एवढ्या लहान वयात त्यांना विधानसभेच तिकीट मिळेल अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती.

    पण यशवंतराव चव्हाण यांच्या पवारांवर असलेल्या विश्वासामुळे त्यांना आमदारकी लढण्याच तिकीट देण्यात आलं आणि ते निवडूनसुद्धा आले. दिवसेंदिवस शरद पवार यांच राजकीय वजन काँग्रेस पक्षात वाढत चाललेलं होत.

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    ते वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते. मात्र काँग्रेस पक्षात खरा वाद निर्माण झाला तो म्हणजे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर. 

    सोनिया गांधींविरोधात पवारांचा बंड

    मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा काँग्रेस पक्षात मान वाढला होता. पण संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींच नाव पुढे येताच शरद पवार व त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला.

    १९९९ मध्ये कोल्हापूरमध्ये शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी गेले असता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी संध्याकाळी आपल्या निष्ठावंत असलेल्या नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि सण १९९९ मध्येच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • मर्यादेय विराजते…

    शककर्ते शिवराय या ग्रंथ वर.व्याख्यान झाले आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांना एका मित्राने त्यांच्या कडे आमंत्रण दिले.

    विजयराव या गोष्टी पासून पुर्णपणे दुर होते की ही मित्रभेट त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष अज्ञात अश्या मार्गावर नेणार होते.

    मित्राकडे जाताच त्यांच्या पुढे एक लहान चित्र आले…

    दोन कैद्यांना उंटावर टाकले होते ज्यांना बघण्यासाठी अवघे लोक गोळा झाले होते…

    एक दगड घेऊन बंद्याना मारत होते.. , अंगावर भाले टोचल्या जात होते .

    विदारक चित्र बघताच विजयरावांनी मित्रापुढे प्रश्न उपस्थित केला…

    कोणाचे चित्र आहे हे ?

    आणि तसाच उत्तर सरसरून विज कोसळावी तसा विजयरावांच्या ज्ञानेंद्रियांवर कोसळला..

    शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहे हे…

    हे उत्तर विजयरावांच्या ह्रदयात टोचले…

    हा तोच शंभु ज्याने नवव्या वर्षी मुघलांच्या मनसबाची दौलत आपल्या नावे केली होती, हा तोच शंभु ज्याने सौराष्ट्र सिमावर भगवा ध्वज फडकवला होता…

    शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

    मग हा शंभु असा बंदीवासात कसा…

    या शंभु बद्दल गलिच्छ खूप ते ऐकले नेमका शंभु तसाच आहे ??

    आणि मग सुरू झाला एक वर्षाचा एकांतवास , पत्र, ग्रंथ मध्ये सुर्योदय व्हायचा आणि त्यातच सुर्यास्त..

    आणि मग एक ससंदर्भ ग्रंथ पुढे आला ज्याने वढू तुळापूर ला भव्य अशी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती चे समारोह केले…

    प्रत्येक शंभुद्वेष्टाच्या तोंडावर झापड सुद्धा या ग्रंथातून मारल्या गेली…

    जर विजयरावांनी सुद्धा असेच सह्याद्री ला ओरडू ओरडू विचारले असते कसा होता माझा राजा ?

    तर सह्याद्री ने सुद्धा उत्तर दिले असते..

    राजा डोक्यात घेतलं की डोक्यावर मी स्वतः नाचवेल तुला…

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शी आपल्या भावना जरी जुडल्या असल्या तरी वास्तव समोर ठेवून त्यांच्या चरित्र चे अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे..

    नाही तर भावनिक शिवभक्तीच्या नावाने राजे जयंती पुर्ती मर्यादित राहतील…

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    आणि आमचा राजा जयंती पुरता नाही तर जिवंत असे पर्यंत आमचा मार्गदाता चरितार्थ आहे…

    आणि तरीही प्रश्न असेलच जर कसा होता माझा राजा 

    तर शिवभारतात उंबरखिंड प्रसंगी लिहिलय..

    अतिसुंदर , उंच मान , रूंद छाती , 

    धिप्पाड शरीर , महाबलवान , 

    पाठीवर दोन्ही बाजुस  बाणांचे दोन भाते जणु गरुडाचे पंख , 

    रत्नजडित अलंकार घातलेल्या  पांढर्याशुभ्र घोड्यावर , 

    गरूडावर श्री हरी विष्णू बसावे तसे आरूढ होऊन . अंगात अभेद्य कवच , मस्तकावर उत्कृष्ट शिरकाण , सोबत प्रचंड ढालीने शोभून उठणारा दुपट्टा परिधान करून…. श्री शिवशंकराहुन उग्र ,अग्नीदिव्य , वायुपेक्षा बलवान , इंद्राहुनद समर्थ , वरुणापेक्षा नीतिज ,  चंद्रापेक्षा आल्हाददायक , आणि मदनापेक्षा अजिंक्य , माथ्यावर शिवगंध जणू कैलासाचे रुद्र… असा होता आमचा राजा…

    मर्यादेय विराजते…

    ✍️अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…

    मंडळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते झाले ज्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कारकिर्दीच्या बळावर स्वतःच नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. मात्र एक असा नेता ज्याने लोकांच्या मनात आणि त्यांच्या काळजामध्ये आजन्म घर करून ठेवलं.

    होय मंडळी. आपण बोलत आहोत बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले ठाण्याचे बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघें यांच्याबद्दल.

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    अस म्हणतात की, ९० च्या दशकामध्ये आनंद दिघे हे नाव ठाण्यातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसल होत. जन्माला येणार प्रत्येक मुल आनंद दिघेंसारख व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असायची.

    एक शिवसैनिक म्हणून काम करताना आंनद दिघे यांचा जनसामान्यांमध्ये प्रभाव एवढा वाढला होता की, त्यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हटल्या जाऊ लागलं होतं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

    मात्र संपूर्ण ठाण्यामध्ये दरारा असणाऱ्या आनंद दिघेंची कॉलर एका टीसीने पकडल्याचा किस्सा शिवसेनेच्या राज कल्याणकर यांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की,

    ” १९७६ साली देशात आणीबाणी पुकारण्यात आली. साबीर शेख यांच्यावर मिसा लावण्यात आला. पोलीस साबीर शेख यांना शोधत होते. काहीदिवस पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर साबीर भाई पोलिसांच्या हाती लागले. साबीर भाई यांना झालेली अटक आणि त्यांना कोठे नेणार हे सर्व गुप्त ठरवण्यात आले होते.”

    जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    पुढे बोलताना कल्याणकर सांगतात की,

    ” परंतु ती बातमी आम्हाला समजली. रात्री उशीराच्या गाडीने साबिरभाई यांना विसापूरच्या कारागृहात नेण्यात येणार आहे. आम्ही धावत पळत कल्याण रेल्वेस्टेशनवरून गाडी पकडली. कोणाकडेही तिकीट नव्हती. गाडीमध्ये एक उंचपुरा भैया टीसी आला आणि थेट आनंद दिघे यांना बघून त्यांची कॉलर धरली. मग गाडीतील शिवसैनिकांनी त्याला योग्य तो धडा शिकवला.”

    हा किस्सा राज कल्याणकर यांनी सांगितला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस

    संभ कहैं सुनि दीन दयाल सो | 

    मेरी हँसी भ‌ए तेरी हँसी है | 

                                      ~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक]

    या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे यावं लागलं….!!

    पण आजपर्यंत च्या प्रवासात एका गोष्टी ची एवढी भयंकर चिड होती की संघर्षाच्या पायदंडावर अविरत लढलेल्या शंभुछत्रपतींबद्दल एवढ्या वर्षात न लोकांना जाणायचं होतं , न शंभु कळवुन घ्यायचा होता..

    नितीन बानूगडे च्या व्याख्यान अगोदर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदफैली आणि एका राष्ट्रपुरुषाच्या शब्दात बोललो तर मिनाक्षी आणि मदिराक्षी मध्ये गुंतलेला युवराज पलीकडे शंभुछत्रपती कुणाला माहितीच नव्हते…

    पण त्यांचा अंत मात्र सर्वांना माहिती होता , बदनामी चे घात आयुष्यभर घालून धर्मवीर या शब्दात मात्र गर्वाने संघटना ,नाव वाढवण्यासाठी लोक उभे राहिले…

    शंभु बंध्यो बजरंग……!!

    वा. सी बेंद्रेंनी शोधलेल्या शंभु वर तर खुद्द बाळशास्त्री हरदास सारख्या इतिहास अभ्यासकांनी एकांगी असल्याचे आरोप घातले , पुरंदरेंनी कवी कलश जवाबदार ठरवला आणि सरळ बोलुन दिले

    ” संभाजीराजांच्या ठायी शिवशाहीचा पोंच निर्माण झाला नव्हता…!! त्यांच्या वर्तनात अविवेकी उच्छुंखलपणाचं दिसून येते , या वेळी त्यांच्या हातुन काही आगळीक घडली असावी….!! “

    कानिटकर पासून अनेकांनी पुढे सर्जा शंभु वर पारंपरिक आरोप लावायला तडजोड केलीच नाही…

    तेवढ्यात कमल गोखले , विजयराव देशमुख ,जयसिंगराव पवार , केदार फाळके सारखे काही मंडळी शंभुछत्रपतींना खर्या अर्थाने पुढे आणण्यासाठी धडपडली …

    ज्या शंभुछत्रपतींना एवढे वर्षे बदनाम करून सुद्धा त्यांच्या बलिदानाला कोणी लपवु शकले नाही तो.शंभु नेमका आहे काय ??

    ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूला कंप सुटतो , ज्याचा केवळ स्मरणाने शत्रूची रात्र आणि दिवस थरकापाने शहारली , ज्याच्या घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्र उधळून उठल्याची नोंद खुद्द मनूची ने केली तो.शंभु म्हणजे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या त्रिसूत्रात शोधताच येतो…

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

    गृहकलह चे बळी पडले असतांना अणाजी पंताच्या गोठ्याने शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर लगेच शंभुछत्रपतींना कैदेत घालण्यासाठी घात टाकला असतांना वडिलांच्या दुख पचवून लगेच राजकारणात प्रवेश केला राजापूर ला माणसं पाठवून गड धान्यांनी परिपूर्ण केला , पन्हाळा वर बंदोबस्त वाढवला आणि गडातून एक पायही बाहेर न काढता सर्व स्वराज्य सुभेदारासह आपल्या बांजुंनी घेतले..

    महाराष्ट्र मधून बंगाल ची सुत्रे हलली , दक्षिणेकडे चिक्कदेवरायचे सामर्थ्य जाणुन गोवळकोंडा चा सुलतान आणि इक्केरीच्या नायकाला आपल्या बाजूला करून दक्षिणेकडे मराठ्यांच्या पराक्रमी मेरु उभा करून चिक्कदेवराय तहासाठी गुडघ्यावर बसवला…

    औरंगजेब भिडण्यासाठी आला असताना विजापूर घेण्यासाठी तो तयारी करत असतांना शंभुछत्रपतींनीच विजापूर च्या गडांवर हात टाकले…

    फोंडा पोर्तुगीज पुढे टिकाव धरु शकणार नाही कळताच तो पाडून मर्दनगड उभा केला…

    विजापूर आणि गोवळकोंडा च्या आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्र घेऊन दक्षिणेची ढाल बनुन औरंगजेब ला भिडला..

    राजकारणाच्या पलिकडे गेलो तर

    ‘” आबासाहेबांचे संकल्पीत तेच आम्हांस करणे अगत्य !! “

    म्हणणारा शंभु सापडतो .

    पोर्तुगीजांनी पोली आणि सिडकोली गाव लुटून उध्वस्त केली तेव्हा तिथल्या गरीब रयतेला मायेप्रमाणे जपणारा शंभु , जंजिऱ्याच्या सिद्दी आणि मुघलांनी कुलाबा उध्वस्त केल्यावर तिथल्या रयतेला पुन्हा वसवणारा शंभु ,वडिलांनी केलेल्या निवाड्यांना पुढे त्याच न्यायाने पुढे जाऊन अर्जोजी , गिर्जोजींचे निवाडे करणारा शंभु !!

    या शंभुला धर्मवीर का म्हणावे ?

    कारण औरंगजेब ने धर्म बदलण्यासाठी अट घातल्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही..

    मग शंभुछत्रपती धर्मवीर नाही का? तर आहेच…

    फोंडा च्या शिलालेख वर

    ” आता हे हिंदुराष्ट्र जाहले !! “

    म्हणणारे शंभु , बुधभूषण मध्ये

    ” मृतो धर्मणे संयुक्तो दिर्घजीवी भविष्यती !! “

    म्हणणारा शंभु…

    रामसिंग ला ठणकावून

    ” आता त्या यवनाधमाला कैदेत टाकून आपल्या देवदेवतांच्या पुन्हा स्थापना करण्याचा !! “

    शब्द टाकणारा शंभु !! जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेणारा शंभु धर्मवीर आहे पण फक्त नाही..

    मात्र हा शंभु इतिहास ने दुर्लक्षित केला, करत राहिला आणि त्यांच्या त्या भयावह अंतावर काही क्षणासाठी शंभु आठवल्या जाऊ लागला…

    पण शंभुछत्रपतींचं चरित्र एवढे परिपूर्ण आहे की आम्ही त्याला  मांडण्यासाठी आपण अपुर्ण ठरतो…छत्रपतींचा इतिहास म्हणजे फक्त त्यांचा शेवट नाही , शंभुछत्रपती म्हणजे फक्त धर्मवीर आणि मृत्युंजय नाही , शंभुछत्रपती म्हणजे स्वराज्यरक्षक , मालिक ए हिंद…तरीही श्रापीत राजहंस

    म्हणून अजूनही तो शंभु आम्हाला सातसतक मधून पुन्हा पुन्हा विचारतोच आहे…

    ” संभ कहै मेरी पति तुअ हात रहै !

             मेरे मन इहै तुम बिन लगावै तीर !!

    माझी पत तुमच्याच हातात आहे , माझ्या जिवनाची नौका तुजविण कोण पार नेणार ??

    तसे तर खूप काही लिहावयाचे होते…

    पण शंभुछत्रपतींनी आणि शिवछत्रपतींनी सर्वात महत्त्वाचे शिकवले ते मर्यादेय विराजते म्हणून थांबायचं……

    पण एक मात्र खरयं…

    शंभुछत्रपती एक अग्नी त्यांना जो हातात घेईल त्या प्रत्येकास अग्निपरीक्षा द्यावी लागते..

    आम्ही ती देण्यास सक्षम ठरलो नाही.. पण अनेक पुढे येउन देतील आणि मृत्यू पलीकडे शंभु उभे करतील ही आशाच…

    अवतार समिधा अर्पणम शंभु….

    अक्षय चंदेल ©

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शिवसेना संपणार ??

    असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) यांच्या नुसार…

    कांग्रेस मधे सुद्धा बंड झाले पाच वर्षे मध्ये आजपर्यंत 170 आमदारांनी पक्ष सोडला कारण कदाचित कांग्रेस चा उतरता काळच असावा. किंवा न बदलणारी राजकीय रणनीती .

    भारतीय जनता पक्ष मध्ये सुद्धा बंड झालेच आजपर्यंत 18 आमदारांनी पक्ष सोडला.

    बंड म्हणावे तर योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचे उदाहरण आहेच.

    बसपा आणि टिडीपी मध्ये सुध्दा बंड झालेत.

    ज्या मुलायमसिंह यादव समाजवादी पक्ष उभा केला त्यांच्या घरातच बंड झाला आणि खुद्द अपर्णा यादव भारतीय जनता पक्ष मध्ये गेल्या..

    ही बंडाचे राजकारण काही नवीन नाही आणि महाराष्ट्र मध्ये त्यातल्या त्यात शिवसेना साठी नाहीच नाही छगन भुजबळ सारखं जिवंत उदाहरण शिवसेना पुढे आहे..

    परंतु मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झालेल्या बंडाने पक्षाला नव्याने गरुडझेप घेण्याची ताकद सुद्धा उभी केली हा आजपर्यंत चा शिवसेना चा इतिहास आहे.

    पण आताच्या क्षणाला जेव्हा पुन्हा राजकीय हालचाल होऊन बंड चे राजकारण तापते आणि शिवसेना मधून एक गट खुद्द वेगळा होतो तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री जेव्हा मी पद सोडावयास तयार आहे. मी पक्षप्रमुख म्हणून राजीनामा देतो असे उद्गार काडतात तेव्हा कुठे भुतकाळात जाऊन बघावं लागतं…

    लहानपणापासून शिवसेना म्हटली की डोळ्यापुढे फक्त वाघ यायचा ज्यात मानवी चेहर्याचा उगम होता.. हाता रुद्राक्ष घातलेला , ज्या पक्षाच्या एका आवाजाने पाकिस्तान ला सिमेपार क्रिकेट टीम रोखायला भाग पाडले अश्या शिवसेना ची ही सद्य वाताहत बघणं अशक्यच..

    पण शिवसेना मध्ये आता झालेल्या बंड ला संपवण्यासाठी तत्परता दाखवण्या एवजी  जणू तो बंड आणखी बंडखोर व्हावा अशीच वाक्य संजय राऊत नी आता पर्यंत दिली..

    जी लोक बंड करून बाहेर पडली त्यांना समजून घेण्यापेक्षा त्यांना कामाख्या देवी ला बळी अर्पण करण्याची भाषा सुरू झाली. 

    जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

    बंड शांत करणे हे  आपल्या सहकारी पक्ष कांग्रेस कडून तरी राऊतांना कळायला हवं !! सचिन पायलट चा बंड शांत करण्यापासून ते हार्दिक पटेल च्या बंड ला जेवढे कमी महत्त्व मिळेल तेवढे मिळवण्यासाठी शांत राहणं .

    आणि मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सरळ मुळ मुद्दा पकडला #हिंदुत्व !!

    पण पुन्हा या मुद्द्यावर एकत्र येण्या एवजी संजय राऊत यांचा वेगळाच विषय सुरू झाला…😐

    शिवसेना जेव्हा तयार झाली तेव्हा तीची मुळ विचारधारा ही हिंदुत्व नव्हती तर मराठी माणूस होती… नंतर बदलत्या राजकारणाने शिवसेना ची ओळख हीच हिंदुत्व केली.

    पण भाजप सोबत युती तुटताच. ( भाजप सोबत सुद्धा युती काही हिंदुत्व साठी तुटलेली नाही आणि भाजप ने सुद्धा काही हिंदुत्व म्हणून खूप मोठे मन नव्हते केले… दोन्ही कडे खुर्ची हाच विषय होता..) शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली महाविकास आघाडी जीच्या मुळ बेस चा आणि शिवसेना च्या मुळ विचारधारा चा उत्तर दक्षिण होता आणि त्या नंतर कंगणा रणावत पासून ते आज शिंदे पर्यंत एक एक करत शिवसेना कशी अहिंदू आहे हे दाखवण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला.

    कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता

    त्या पैकी किती मुद्दे धड होते आणि किती चिंध्या हेही महाराष्ट्र ने बघितलच..

    कोविड च्या वेळी दोन वर्षे राज्य सरकार मध्ये आणि केंद्र सरकार मध्ये जे सुरू होते तेव्हा पण सर्व बघतच होते…

    त्या नंतर सुरवात पासून सुरू असलेल्या हिंदुत्व या मुद्द्यावर आघाडी सरकारने पांघरूण टाकले हे खरेच आहे आता याचे कारण शरद पवार आहे की आघाडी मध्ये असलेले कांग्रेस हे आघाडी लाच माहिती..

    पण या सर्व मध्ये एक हवा आणखी उडते आहे ती म्हणजे शिवसेना संपणार का ?

    तर शिवसेना कधीच संपणार नाही गड्या !!

    भारतातील केडर संघटना, ज्याचं नाव दंगल रोखण्यासाठी एक वेळ पुरेसे होते ती संपणे अशक्य आहे  , विचारधारा कुठल्या पक्षाने आजवर बदलली नाही ?? काळानुसार अनेक पक्ष बदलत गेले बदलत आहे म्हणून ती संपली नाही ,, मग शिवसेना तर राजकारणाचा एक असा पक्ष आहे जो विचार म्हणून हिंदुस्थानात अधिक माहिती आहे…. मग ती संपणार कशी? आणि ती संपायला सुद्धा नको फक्त 

    पुन्हा त्याच तडाख्याने आता शिवसेनेच्या हिंदुत्व भगव्या वाघाने पुन्हा आपल्या ओळखीसह  ताकदीने झेप घ्यावी एवढीच मापक अपेक्षा..

    बाकी 

    मेरा हर गुन्हा मेरा विचार बनके लाखो लोगोके खुन मे दौडेगा जिसके हर  कतरे मे जिंदा रहेगा बाल केशव ठाकरे…🚩

    अक्षय चंदेल

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…

    मंडळी शिवसेनेमध्ये सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याआधी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंड करून शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

    यामध्ये सर्वात आधी १९९१ ला छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि शिवसेना सोडली. त्यांनतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी अनुक्रमे शिवसेना सोडली.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    मात्र जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेचा पदभार होता तेव्हा बंडू शिंगरे नावाच्या एका शिवसैनिकाने बंड करून शिवसेना सोडली आणि ‘प्रतिशीवसेना’ काढून थेट बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिल होत.

    बंडू शिंगरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना

    “हिम्मत असेल तर लालबागमध्ये सभा घेऊन दाखवा”

    अस आव्हान केलं होतं. तेव्हा बाळासाहेब प्रचंड संतापले आणि लाल बागमध्ये सभा घेण्याच बंडू शिंगरेंच आव्हान स्वीकारलं होत. त्यांनी पुढील अवघ्या काही दिवसांमध्येच लालबागमध्ये सभा घेण्याच प्रयोजन केलं आणि शिंगरेंच आव्हान स्वीकारल व सभा घेतली.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    अस  म्हणतात की तेव्हा प्रतिशीवसेना काढणाऱ्या बंडू शिंगरे यांची बाळासाहेब ठाकरे यांनी लालबागमध्ये सभा घेऊन चांगलीच नाचक्की केली होती.

    लालबागमध्ये आव्हान स्वीकारून सभा घेतल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिम्मतीचा परिचय तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यांच्या विरोधकांना चांगल्या रीतीने झाला होता. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे रसायन भल्याभल्यांना समजलं नाही असं आताही या देशातील राजकीय समीक्षक म्हणतात.

    मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आव्हानं स्विकारता येतील का? हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या राजकीय नेतृत्वक्षमतेवरून लक्षात येत की, ते शिवसेना पुढे चालवायला सक्षम आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    मंडळी आनंद दिघे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडित असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसेल अस होऊच शकत नाही. आंनद दिघेंना शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल जात होतं.

    मात्र दिघेंसोबत मध्यंतरी घडलेली एक घटना अजूनही त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेलं कोडच आहे. आनंद दिघे यांना एका खुनाप्रकरणी अतिरेक्यांवर वापरल्या जाणाऱ्या ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.

    जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…

    या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. विधानसभेमध्येसुद्धा दिघेंच्या अटकेमुळे लोकप्रतिनिधींमध्ये असंतोषाच वातावरण पसरलं होत.

    तर मंडळी झालं असं की, १९८९ च्या मार्चमध्ये महानगरपालिका निवडणूका पार पडल्या होत्या. ज्यामध्ये शिवसेनेचे जवळपास ३० नगरसेवक निवडणून आले होते. काँग्रेसचेसुद्धा बरेच नगरसेवक निवडून आले होते. आता वेळ होती ती म्हणजे महापौर पदाच्या निवडणूकीची.

    दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    शिवसेनेने जनता दल पक्षाला सोबत घेऊन महापौर पदासाठी उमेदवार दिला होता. दुसरीकडे काँग्रेसने ‘स्थानिक आगरी सेना’ म्हणून त्यावेळेस एक संघटना होती. त्यांना सोबत घेऊन उमेदवार उभा केला होता. ही लढाई एकदम काट्याची होती.

    बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीची जबाबदारी ठाण्याचे त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांच्यावर सोपवली होती. सोबतच माजी महापौर सतीश प्रधान यांच्यावर या महापौर पदाच्या निवडणूकीची जबाबदारी होती. १९८९ हा तो काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात दरारा होता.

    दुसरीकडे ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचा. तरीसुद्धा सगळीकडे चर्चा होती की शिवसेनेचे काही मतं फुटणार आहेत. पण बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब असतांना मतं फुटणार नाही यावर शिवसैनिकांचा प्रचंड विश्वास होता. मात्र झालं वेगळचं. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. 

    शिवसेनेच्या नगरसेवकाचा खून

    मंडळी शिवसेनेचा ठाण्यातील महापौर पदाच्या निवडणूकीमध्ये अवघ्या एका मताने झालेला पराभव हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिवसैनिकांच्या अत्यंत जिव्हारी लागला होता. शिवसेनेतील कुठलातरी नगरसेवक फुटला होता.

    आनंद दिघेंची दहशत झुगारून कोणीतरी क्रॉस मतदान केलं होतं. ही बाब बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर ते प्रचंड संतापले. त्यांनी दिघे यांना बोलावलं.

    “आपली बाजू भक्कम असताना, आपले सर्व आकडे जुडत असतांना आपला पराभव कसा काय झाला?”

    या बाळासाहेबांच्या प्रश्नावर दिघे अनुत्तरीत होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना आनंद दिघे यांनी म्हटलं की,

    “साहेब गद्दारांना माफी नाही”.

    आनंद दिघे यांनी हे स्टेटमेंट समाज माध्यमांवरसुद्धा बोलून दाखवल होत. त्यामुळे त्यांचं हे विधान सगळीकडे चांगलच प्रचलित झालं. त्यानंतरच अवघ्या काही दिवसांमध्ये श्रीधर खोपकर नावाच्या एका शिवसेना नगरसेवकाची काही अज्ञात लोकांनी हत्या केली.

    आणि या खुनाचा आरोप आनंद दिघेंच्या स्टेटमेंटनुसार त्यांच्यावरच घेण्यात आला. ज्यामुळे त्यांना ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. दिघेंच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. काही काळानंतर दिघेंना जामीन देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यावर हा खटला चालूच होता. या घटनेपासून शिवसेनेमध्ये “गद्दारांना माफी नाही” हे स्टेटमेंट प्रचलित झालं होतं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…

    मंडळी भारतीय देशाच्या लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास मिळवून राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतात. मात्र आर्थिक वा अन्य आमिशांपायी काही राजकीय नेते जनतेच्या भावनेचा विचार न करता सतत पक्षांतर करत असतात.

    पण मनात आलं म्हणून किंवा इतर कारणास्तव कुठल्याही नेत्याला सहजासहजी पक्षांतर करता येत नाही. किंवा त्यांनी पक्षांतर केल्यास कायदा सांगतो की,

    ” भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कुठल्याही पक्षाच सदस्यत्व बंधनकारक नाही. पण एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो आणि दुसऱ्या पक्षात स्थलांतर केलं हे कायद्याबाहेर गणल्या जात.”

    १९८५ साली जेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच सरकार होत, तेव्हा त्यांनी हा पक्षांतर बंदी कायदा लागू करून घेतला होता. याची गरज एका प्रकरणावरून पडली.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    तर झालं असं की, १९६७ मध्ये हरियाणामधील गया लाल नावाच्या एका आमदाराने एका दिवसामध्ये चक्क तीनदा पक्ष बदलला. त्यानंतर १९७९ साली प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली असलेलं जनता पक्षाच सरकार हे ७६ खासदारांच्या बंडामुळे कोसळलं होत.

    म्हणजेच कुणाशी वाद-तंटा किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी पक्षांतर राजकीय नेते करत होते. यावरूनच मग पक्षांतर बंदी कायद्याची मागणी करण्यात आली व तो कायदा लागू करण्यात आला. 

    जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…

    नेमकं काय सांगतो पक्षांतर बंदी कायदा? 

    एखाद्या लोकप्रतिनिधीने पक्षांतर केल्याच्या कारणावरून सभागृहातील इतर सदस्यांनी याचिका केली तर संबंधित लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार विधानसभा किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत.

    एखाद्या लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश विधानसभा किंवा लोकसभेच्या अध्यक्षांनी दिला, तर हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाद मागता येते ज्यामुळे तो आदेश रद्द होऊ शकतो. मात्र हा कायदा पुढील परिस्थितीमध्ये लागू होऊ शकतो.

    ” एखाद्या आमदारान किंवा खासदारान स्वतावरून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, निडवून आलेल्या आमदारान किंवा खासदारान पक्षाच्या वैचारिक धोरण मानलं नाही, पक्षाच्या विरोधात मतदान केलं किंवा पक्षाविरोधात भूमिका घेतली.”

    या सर्व कारणावरून लोकप्रतिनिधीच सदस्यत्व रद्द होऊ शकत. मात्र एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना एक नवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता प्राप्त होते आणि त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir