Category: बातमी

  • वसंत मोरे यांनी मला रिकामटेकड म्हणलं होत – रुपाली ठोंबरे

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मस्जिदींपुढे भोंग्यात हनुमान चालीसा लावण्याचा आदेश वसंत मोरे यांनी नाकारला.

    या गोष्टीचा राग मनात धरुन राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून काढले आहे. मात्र यानंतर वसंत मोरे यांना इतर पक्षांमधून पक्ष प्रवेशाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. मात्र त्यांनी अद्याप कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे.

    वसंत मोरे यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं की,

    ” माझ्या कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असण्याच्या आधी एका प्रभागाचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या प्रभागमध्ये सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक राहतात. मी एकमेव नगरसेवक असा आहे की ज्याच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय स्मशानभूमी आहे. त्यामुळे मला राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय नाकारावा लागला.”

    अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

    वसंत मोरेंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे – रुपाली ठोंबरे 

    वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

    त्या म्हणाल्या की,

    ” जेव्हा मी मनसे पक्ष सोडला होता तेव्हा वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की मी राजकीय आत्महत्या केली आहे. मात्र आता वसंत मोरे यांनी राजकीय हत्या झाली की आत्महत्या ? हा प्रश्न त्यांना पडायला हवा. वसंत मोरे एक चांगले प्रतिनिधी आहे. त्यांच्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात. म्हणून त्यांना  राज ठाकरेंचा आदेश नाकाराव लागला. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत आहे.”

    अस रुपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितल.

  • संजय राऊत यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल – प्रसाद लाड

    मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या संजय राऊत यांनी ईडीने मालमत्ता जप्त केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच चिघळत जात आहे. मात्र सम्पूर्ण महाराष्ट्रात सद्ध्या सुडाच राजकारण सुरू आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. केंद्र सरकार राज्य सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्याचा प्रयत्न करत आहे.

    मात्र जनतेच्या प्रश्नाचं कुणाला काही एक पडलं नाही. महाराष्ट्रामध्ये रोजच्या तारखेला कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. रोजगाराचा प्रश्न सम्पूर्ण महाराष्ट्रात वाढत चालला आहे. पेट्रोल , डिझेलचे भाव वाढत जात आहे. मात्र यावर बोलायला कुणीच तयार नाही.

    फक्त एकमेकांवर आरोप करायचे आणि एकमेकांना अटक होईपर्यंत पर्यंत राजकारण करायचं बस एवढंच. संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केल्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

    काय म्हणाले प्रसाद लाड? 

    संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या चौकशीनंतर त्यांच्या पारा ठिकाणावर न राहल्या कारणाने राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात आरोप केले होते. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊत यांना प्रतिउत्तर देतांना चांगलच सुनावलं आहे.

    ते म्हणाले की,

    ” संजय राऊत यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल. ज्या प्रकारे राऊत आरोप करत आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. किरीट सोमय्यांनीही सांगितलंय की मुझ्यामंत्र्यांना कागदपत्रे देऊन माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे राऊत आणि गॅंग किरीट सोमय्या यांना फसवण्याच्या प्रयत्न कर आहेत. पण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”

    अस ते म्हणाले.

  • घोटाळा केला नसेल तर संजय राऊत यांनी न्यायालयात येऊन सिद्ध करावे – चंद्रकांत पाटील

    मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे.

    संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी आपली बाजू मांडत म्हटलं की,

    ” कुठली प्रॉपर्टी ? आम्ही घरचे खूप श्रीमंत लोक आहोत का ? आम्ही स्वतः केलेल्या मेहनतीमधून ही मालमत्ता उभी केली आहे.”

    संजय राऊत यांच्या या विधानाचा विरोध करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

    संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे त्यांनी भाजपवर टीका केली होती. याच प्रतिउत्तर देताना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केल आहे. ते म्हणाले की,

    ” एक पैशाचाही घोटाळा केला म्हणून संजय राऊत यांना बाजूला होता येणार नाही. घोटाळा केला नसेल तर त्यांनी न्यायालयातून ते सिद्ध करावे.”

    अस चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केलं आहे. मात्र आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • माझ्या मालमत्ता जप्तीची बातमी मी टीव्हीवर बघितली- संजय राऊत

    मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अचानक झटका बसला आहे.

    भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊत यांचा एकप्रकारे वचपाच काढण्यात आला असावा असे म्हणणं वावग ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले संजय राऊत? 

    संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करून केंद्र सरकारमध्ये बसून असलेल्या भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांचा एक प्रकारे वचपा काढला आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी आपल मौन सोडलं आहे. यावर ते म्हणाले की,

    ” कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. मी आता टिव्हीमध्ये पाहिलं की मालमत्ता जप्त केली आहे. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे काहीतरी म्हणतात ना, एक रुपया जरी गैरव्यवहाराचा आमच्या खात्यामध्ये आला असेल आणि त्यामधून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.”

    अस संजय राऊत यांनी भाजप वर टीका करताना म्हटल आहे. मात्र आता चिघळलेल हे सर्व प्रकरण कुठलं वळण घेईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले गुलाबराव पाटील ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलबराव पाटील यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

    ते म्हणाले की,

    “उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसेच राज ठाकरे यांचे तीन ऋतू आहेत, कोणत्याच ऋतूला यांना काहीही मिळत नाही.”

    अस ते म्हणाले. मात्र गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरेंचं इंजिन कुठे जात आहे हेपण त्यांना माहिती नाही- छगन भुजबळ

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले भुजबळ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ते म्हणाले की,

    ” राज ठाकरे यांच इंजिन कुठल्या दिशेने जात आहे याचं भानसुद्धा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही राहल आहे.”

    अस ते म्हणाले. मात्र भुजबळांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • मंगळवारी लोकसभेत अस काय घडलं की उपस्थित सर्व सदस्यांना हसू आवरले नाही ?

                मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जरी तापलं असलं तरी मंगळवारी अधिवेशनादरम्यान घडलेल्या एका किस्स्याने लोकसभेतील संपूर्ण वातावरण तणावमुक्त करण्याचं काम केलं. मंडळी आपण बघतो की राजकारणामध्ये राजकीय मंडळी आक्रोशाने एकमेकांवर टीका टिप्पणी करतांना दिसतात.
     
     
    एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. मात्र काही वेळेस असे किस्से घडून येत असतात की, त्यामुळे त्यांना पण सामाजिक सळोख्याची थोडी जाणीव होत असते. असाच काही किस्सा मंगळवारी लोकसभेत घडला आणि सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या सदस्यांमध्ये एकच हास्य निर्माण झाले. हा संपूर्ण किस्सा घडवून आणला तो म्हणजे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी.
     
     
    त्यांच्या एका टिपणीवर विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी हसून दाद दिली आणि थोडा काळ सभागृहातल वातावरणसुद्धा तणावमुक्त झालं. संसदीय अधिवेशनात मंगळवारी लोकसभेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील लोकल फेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
     
     
    तसेच, एसी लोकलऐवजी नॉनएसी लोकलच्या पर्यायाविषयीदेखील त्यांनी भूमिका मांडली. जवळपास १० मिनिटाच्या आपल्या भाषणाच्या अगदी सुरवातीलाच श्रीकांत शिंदे यांनी लगावलेला टोला सदस्यांमधला तणाव शांत करून गेला. 
     
     
                लोकसभेच्या तालिका अध्यक्ष यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. श्रीकांत शिंदे भाषणासाठी उभे राहल्यानंतर त्यांच्या मागे बसलेल्या खासदारांनी श्रीकांत शिंदे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात म्हटलं की,
     
     
    ” अरे कॅमेरा दाखवा, कॅमेऱ्याला मी सापडत नाही आहे बहुतेक.”
     
     
     
    हे विधान करताच संपूर्ण सभागृह खळखळून हसू लागलं. आणि संपूर्ण वातावरण हे तणावमुक्त झालं.
  • विरोधीपक्षांकडे नेतृत्व नाही म्हणून भाजप यशस्वी- सामना

    विरोधीपक्षांकडे नेतृत्व नाही म्हणून भाजप यशस्वी- सामना

    मंडळी नुकत्याच पाच राज्यांतील पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. मात्र पंजाबमध्ये त्यांना अत्यंत मोठा आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय.
     
     
     
    पाच राज्यांमधील निवडणुकीमधील भाजपाच्या विजयावर भाष्य करतांना शिवसेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ चा संदर्भ देत केलेल्या भाषणापासून ते अगदी ओवेसीपर्यंत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली आहे. भाजपला विजय कशामुळे मिळाला यासंदर्भात शिवसेनेनं भाष्य करतांना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
     
     
     
     
    महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या गैरवागणुकीमुळे शिवसेनेन केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. 
     
     

    शिवसेनेच्या सामनामध्ये नेमकं काय? 

              भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या यशानंतर शिवसेनेनं सामना या अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षात तगडे नेतृत्व नाही. त्याचा फायदा भाजपाला होत आहे. हे त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वसामान्य नेतृत्व लोकांनी तयार केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
     
     
     
    पंजाबमधील मतदानावर प्रभाव पडावा व भाजपाला फायदा व्हावा यासाठी खून, बलात्कार, लूटमार अशा आरोपांनी बरबटलेल्या बाबा राम रहीम यास ‘निवडणूक’ मोसमाच्या मुहूर्तावर पॅरोलवर सोडण्यात आले. तरीही पंजाबात भाजपाला हाती काहीच लागले नाही.
     
     
     
    विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच ‘हिजाबचा’ राष्ट्रीय बनवलेला मुद्दाही संपवला गेला आहे. दाऊद, पाकिस्तान आणि दहशतवाद हे मुद्दे आता अर्थहीन ठरलेले असून २०२४ च्या निवडणुकीपूर्व हे सर्व मुद्दे जिवंत केले जातील.
     
     
     
    भारतीय जनता पक्ष हे निवडणुकीच्या वेळेला हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून मत घेण्याच्या हेतूने इथल्या सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांच्यासोबत गैरव्यवहार करत असतात. त्यामुळे भाजप नेत्यांनी कितीही ओरडू ओरडू सांगतीले की आम्ही विकासाच्या मुद्यांवर मत घेतली, तर अशा भाकडकथांना अर्थ नाही. अस शिवसेनेच्या सामना या अग्रलेखात लिहिलेलं आहे.
  • फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

    फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

              मंडळी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलच राजकीय सुडनाट्य रंगलय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना कोठडीत डांबण्याचा प्रयत्न सद्ध्या राजकारणात सुरू आहे. नवाब मालिकांची अटक असो, अनिल देशमुखांची अटक असो. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
     
     
     
    विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून,महाविकास आघाडीसरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.  शिवाय फडणवीसांना आलेल्या नोटीसवरून निषेधसुद्धा नोंदवला आहे.
     
     
     
    फडनवीसांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा उपस्थित आहेत, तर दुपारी १२ वाजेपासून फडणवीसांची चौकशी सुरू आहे. फणविसांनी याआधी प्रसार माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुद्दाम खोटे आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
     
     
             भाजप नैराश्याने अस वागत आहे- आदित्य ठाकरे 
     
     
     
         मंडळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची गडबड झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की,
     
     
     
    ” प्रत्येक गोष्टीच राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे, अस दिसतंय. असा त्रास देण्याचं, ईडी, सीबीआय, आयकर विभाग याचा पुरेपूर उपयोग ते करतात. इथे मात्र साधं पोलीस चौकशीलासुद्धा जायचं नाही आणि तिकडे मात्र कायदेशीर, बेकायदेशीर आरोप लावायचे.”
     
     
     
    अस छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल. याव्यतिरिक्त शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,
     
     
    ” मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही आमच काम करतो. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते असे वागत आहेत.”
     
     
     
    अशाप्रकारची टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर भाजप काय प्रतिक्रिया देत यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
  • १२५ तासांची रेकॉर्डिंग कौतुकास्पद – शरद पवार

    १२५ तासांची रेकॉर्डिंग कौतुकास्पद – शरद पवार

     मंडळी गेल्या काही दिवसांपासून अधिवेशन महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते भाजपच्या या मनसुब्याला पूर्ण होऊ देणार नाही. अशी ग्वाही देत आहे. 

    शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली. राज्य सरकारने भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. व्हिडिओच सादर केल्याने प्रतिउत्तर कसे द्यायचे यावर चर्चा सुरू झाली.

    गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्र्यांशी व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच उत्तर देणार आहेत. या व्हिडीओमध्ये शरद पवारांचाही उल्लेख असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी प्रतिउत्तर देतांना फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    काय म्हणाले शरद पवार साहेब

     

                  रेकॉर्डिंग संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पवारांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,

    ” माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितल. या प्रकरणाची राज्यसरकार सम्पूर्ण चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझही नाव घेतलेलं दिसत. माझं कधी यासंबंधात कुणाशी बोलणं व्हायचं काही कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडनवीसांच्या सहकाऱ्याबद्दल तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं यात सत्यता किती ते तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे.”

    अस ते म्हणाले. तपास यंत्रणांचा वापर करुनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नाला त्यांना यश येत नसल्याने फडणवीस यांनी ही टोकाची भूमिका घेतली. अस शरद पवार यावेळी म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तास रेकॉर्डिंग होते ही कौतुकास्पद बाब आहे. अस शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगत होते. मात्र पवारांच्या या प्रतिक्रियेवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.