Category: बातमी

  • ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

    मंडळी एकीकडे हनुमान चालीस्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळलेलं असतांना औरंगाबाद येथील वकील नईम शेख यांनी महाराष्ट्र सरकारला ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क खुल करण्यात याव अशी मागणी केली आहे.

    सद्ध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या जातीय द्वेष समाजामध्ये निर्माण करणार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नईम शेख यांची शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी मागणी एक समतावादी निर्णय महाराष्ट्र सरकारकडून होण्याची अपेक्षा आहे.

    ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

    या पार्श्वभूमीवर नईम शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेलं आहे. मुंबई परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. त्यांना नमाज अदा करायला दुसरी मोठी जागा नाही त्यामुळे शिवाजी पार्क देण्यात याव अशी त्यांची मागणी आहे.

    नईम शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

    ” मी महाराष्ट्र शासनाकडे शिवाजी पार्कवर नमाज पठणाकरिता परवानगी मागितलेली आहे. दिनांक २२/४/२०२२ ला मी शासनाला त्यानंतर महानगरपालिकेला पत्र दिलेल आहे. मुंबईमध्ये जागेची कमी असल्याकारणाने रस्त्यावर नमाज पढावी लागते त्यामुळे आम्ही शासनाकडे कायदेशीर परवानगी मागितलेली आहे. शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि आम्हाला दरवर्षी शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो.”

    अस नईम शेख यांनी म्हटलं आहे. 

    ३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

    सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू असलेला धार्मिक वाद पाहता महाराष्ट्र शासन मुस्लिम बांधवांना शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir 

  • Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष

    मंडळी एकीकडे महाराष्ट्रतल्या राजकारणाचा फुल फोकस राज ठाकरेंवरून राणा दाम्पत्याकडे वळला असतांना नितेश राणे यांनी खळबळजनक खुलासा करून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना अडचणीत आणलं आहे.

    नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष आता चांगलाच उफाळून निघाला आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरलसुद्धा होत आहे.

    माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

    सत्तार एका व्यक्तीला हनुमानावरून शिव्या देत असल्याच या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हनुमानाविषयी असे उदगार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अस आव्हान नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केलं आहे.

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटलं की,

    ” अब्दुल सत्तार जे हे उदगार काढत आहे यावर मुख्यमंत्री कुठली कारवाई करणार? सत्तार यांना अटक करून स्वतःमध्ये असलेली मर्दानगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दाखवणार का? ज्या पद्धतीने ते शिवीगाळ करत आहे त्याच पद्धतीने जर सत्तारांच्या धर्मावर केला, तर त्याला परवडणार का?”

    असे प्रश्न नितेश राणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापुढे उपस्थित केले आहे. 

    राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    नितेश राणे यांना महाविकास आघाडी सरकारने अटक करून ३ दिवस तुरुंगामध्ये ठेवलं होतं. या कारणाने त्यांचा शिवसेनेविषयी असणारा राग आता चांगलाच उफाळून येतोय. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अब्दुल सत्तार आणि नितेश राणे या दोघांपैकी कुणाची बाजू घेतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • नवनीत राणा navneet rana यांचा दाऊद गँगशी संबंध

    मंडळी राणा दाम्पत्य सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    नवनीत राणा आता स्वतः दलीत असल्याकारणाने इथलं प्रशासन त्यांना दुय्यम वागणूक देत आहे असा कांगावा करत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्याला पोलीस प्रशासनाकडून दिली जाणारी शाही वागणूक बघून राणा दाम्पत्याची महाराष्ट्रातील जनतेसमोर आता चांगलीच पोलखोल झाली आहे.

    नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

    सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. नवनीत राणा यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचा संशय मुंबई पोलीस प्रशासनाला आला आहे.

    नवनीत राणा यांनी दाऊद गँगमधील युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांच कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येत्या काळामध्ये याप्रकरणासंबंधी लकडावाला आणि नवनीत राणा यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

    राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    राणा दाम्पत्याला दलीत समाजातून असल्यामुळे दुय्यम वागणूक दिली जात आहे – फडणवीस 

    राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नवनीत राणा यांनी आरोप केला होता की मी मागासवर्गीय असल्याकारणाने मला दुय्यम वागणूक पोलीस प्रशासनाकडून दिली जात आहे. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरत नवनीत राणा यांच्या आरोपाला हवा देण्याचं काम केलं आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,

    ” नवनीत राणा या दलीत समाजातून असल्याकारणाने त्यांना राज्य सरकारकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे.”

    अस फडणवीस म्हणाले. मात्र आता हा नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये पेटलेला वाद कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

    मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज ठाकरेंच्या भोंग्याच् राजकारण सुरू आहे, एकीकडे राणा दाम्पत्याच हनुमान चालीसा पठणाच राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya आणि शिवसेनेमध्ये चांगलाच राजकीय खेळ रंगला आहे.

    काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या kirit somaiya  यांच्यावर मुंबईमधील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र किरीट सोमय्या kirit somaiya यांनी या हल्ल्याचा मास्टर माईंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहे असा आरोप केला आहे.

    आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांचा नंबर- किरीट सोमय्या

    हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये केंद्रीयगृहसचिवांची भेट घेतली.  किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

    ” ठाकरे सरकार पोलिसांच्या मदतीनं गुंडांकडून हल्ला करण्याच काम करत आहे. दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये स्पेशल टीम पाठवण्यात यावी. कारण सम्पूर्ण हल्ल्याचे फुटेज पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे पदाचा गैरवापर करत आहे. पोलिसांच्या उपस्थित माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझ्यावर कमांडोचासुद्धा हल्ला पोलीसांच्या समर्थनाने केल्या गेला.”

    असा आरोप किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकार व पोलीस प्रशासनावर केला आहे. 

    आमचं सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही- संजय राऊत

    महाराष्ट्रात नाही तर यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लावा – संजय राऊत 

    मंडळी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचीवांची भेट घेत त्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली. याच प्रतिउत्तर देतांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलच धारेवर धरल आहे. ते म्हणाले की,

    ” एखाद्या व्यक्तीच थोडं रक्त निघालं तर तुम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करता. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर आधी उत्तर प्रदेशमध्ये लावा. कारण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ३ महिन्यांमध्ये १७ बलात्कार झाले आहेत.”

    असा टोला संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    FB : PoliticalWazir.com

  • नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे राणा दाम्पत्याने. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय परत जाणार नाही असं आव्हान शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना देऊन आणि मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्याने सर्वात मोठी चूक केली अस संपूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटत आहे.

    राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला. याचकरणाने राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यास अपयशी ठरलं. मात्र पोलीस प्रशासनानेच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

    मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार रवी राणा यांनी स्वतःचा आणि नवनीत राणा यांचा जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय देण्यास नकार दिला.

    दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांची प्रकृती मंदावली आहे. काल त्यांच चेक अप करण्यात आलं तेव्हा त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं आहे असं लक्षात येताच त्यांना भायखळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल असे आदेश भायखळा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिले आहे. 

    राणा दाम्पत्यांनी स्टंटबाजीसाठी हे सर्व केलं- छगन भुजबळ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज नाशिकमधील येवला तालुक्क्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रसार माध्यमांद्वारे राणा दाम्पत्यांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,

    ” राण दाम्पत्यांनी हे सर्व स्टंटबाजीसाठी केलं. त्यांना संपुर्ण देशभर प्रसिद्धी पाहिजे होती. यामागे त्यांचा हाच मनसुबा असावा.”

    असे जेष्ठ छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र यावर आता राणा दाम्पत्य काय प्रतिउत्तर देणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • राणा दाम्पत्याची अखेर माघार

    मंडळी राणा दाम्पत्य काल मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या भूमिकेवरून गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल होत. त्याचक्षणी हजारो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी त्यांच्या घराभोवती वेढा घातला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

    राणा दाम्पत्यावर शिवसैनिक इतके चिडलेले होते, की राणा दाम्पत्याचे हातपाय तोडून त्यांना परत पाठवू अस पण त्यांनी बजावलं होत. त्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी आणली होती. मात्र राणा दाम्पत्याने हे संपूर्ण वातावरण चिघळवून शेवटी माघार घेतल्याचं जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची टीका होत आहे.

    शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राणा दाम्पत्याला दिलासा देत म्हटलं होतं, की त्यांना सुरक्षित घरी परत पाठवण्याची जबाबदारी ही राज्यसरकारची आहे. मात्र नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेना प्रवक्ते यांनी राणा दाम्पत्याचे चांगलेच कान टोचले. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,

    ” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”

    अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. 

    राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    प्रधानमंत्र्यचा मुंबई दौरा पाहता माघार घेतली – रवी राणा 

    राणा दाम्पत्यानी मुंबईत घातलेला हनुमान चाळीसाचा गोंधळ हा एक स्टंट होता. हे जनतेला चांगलच कळलं आहे. मात्र रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,

    “उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने आम्ही इथे माघार घेत आहोत.”

    यावरून सर्व जनतेच्या लक्षात आलं आहे की राणा दाम्पत्याने केलेला हा एक प्रकारचा स्टंट होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

     नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा . 
    FB : https://www.facebook.com/PoliticalWazir

  • राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत

    मंडळी राणा दाम्पत्याने शिवसेनेला आव्हान केलं आहे, की आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीसमोर वाचल्याशिवाय अमरावतीला परत जाणार नाही. या अनुषंगाने खासदार नवनवीन राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहे. ते मुंबईत दाखल होताच संपूर्ण मुंबईतील शिवसैनिक आक्रमक होऊन राणा दाम्पत्याच्या घराला वेढा देऊन बसले आहेत.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    राणा दाम्पत्याने अमरावतीला परत जावे अन्यथा हात पाय तोडून परत पाठवू अस आव्हान शिवसैनिकांनी त्यांना केलं आहे. त्याकरिता शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निस्वासस्थानी आणली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. याच्या प्रतिउत्तरात सध्या नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,

    ” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”

    अस प्रतिउत्तर संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिल आहे. 

    मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य

    शिवसेनेला बच्चू कडूचा पाठिंबा

    राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झाल आहे. मात्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेची बाजू घेत राणा दाम्पत्याला चांगलच सुनावलं आहे. बच्चू कडू म्हणाले की,

    ” उध्दव ठाकरे आणि शिवसेना वाघ आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने वाघाच्या बिळात हात टाकू नये.”

    अस आव्हान त्यांनी राणा दाम्पत्याना केलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या धार्मिक वळण घेतलं आहे. नवनवीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल.

    राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना

    शिवसेनेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सरळ राणा दाम्पत्याच घर गाठलं. कालपासून राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्ते वेढा देऊन बसलेले आहेत.

    शेकडो पोलीससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आज राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याकरीता बाहेर पडणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली.

    मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा

    आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. त्या म्हणाल्या की,

    ” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”

    अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणून कमाल केली आहे. 

    शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांकडून सूट – नवनीत राणा

    मुंबईमध्ये राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी हजारो शिवसैनिक वेढा देऊन बसले आहे. कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. याची सर्व सूट शिवसैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
  • अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या भोंग्यानंतर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२२ ला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरींनी मांडलेल्या भूमिकेबद्दल राजकीय वातावरण चिघळल आहे.

    अमोल मिटकरींनी या सभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलच धारेवर धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेचा उल्लेख करत त्यांनी राजकीय चर्चा आणखी रंगात आणल.

    पुरंदरेची हाड मोजायला लावू नका – जितेंद्र आव्हाड

    राज ठाकरे हे भोंग्याच्या वादावरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून मांडली. मात्र पुढे बोलत असतांना त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

    अमोल मिटकरी यांनी बोलत असतांना, ‘ मम भार्या समर्पयामि ‘ हा लग्न समारंभामध्ये वापरण्यात येणारा मंत्र सांगून त्याचा अर्थ ‘ माझी बायको घेऊन जा ‘ असा सांगितला. ब्राम्हण महसंघाने मिटकरींनी हिंदू धर्माचा अपमान केला सांगत त्यांच्या विरोधात मोर्चा उभा केला आहे.

    अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना अमोल मिटकरींच्या वक्त्यव्यंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,

    “माझं स्वतःच नेहमी स्पष्ट मत असत तुम्हा सगळ्या मीडियाला माहिती आहे ,की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने वक्त्यव्य करत असताना कुणाच्या धार्मिक भावनेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”

    अस स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. 

    काय म्हणाले जयंत पाटील? 

    अमोल मिटकरींनी इस्लामपूरमधील सभेमध्ये केलेल्या वक्त्यव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की,

    ” ब्राम्हण समाज हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. इस्लामपूरमध्ये मिटकरींच्या भाषणातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”

    अस मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

  • ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे इस्लामपूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भूमिकेवरून. मिटकरी यांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा सांगत असतांना म्हटलं की,

    ” मी एका गावामधल्या लग्न समारंभात गेलो असता तिथे एक महाराज मंत्र म्हणत होता आणि कन्यादान करत होता. पण कन्या ही दान करायची गोष्ट नाही व त्या महाराजाने जो मंत्र म्हटला होता, त्याचा अर्थ असा होता की, मम भार्या समर्पयामि म्हणजेच माझी बायको घेऊन जा.”

    अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

    अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. मात्र अमोल मिटकरींच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध करत पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे आंदोलन सुरू केलं. ब्राम्हण महासंघाच्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसपुढे अक्षरशः गदारोळ केला.

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ब्राह्मण महासंघाच्या सर्व महिलांना चांगलच धारेवर धरल. त्या म्हणाल्या की,

    ” कोणाला कुठल्या वक्तव्याचा विरोध करायचा आहे तो त्यांनी लोकशाही मार्गाने करावा. ब्राम्हण महासंघाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्या. मग स्वतः आरडाओरडा करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आमच्यावर हात घातला. आम्हीसुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत. पण ही आमची संस्कृती नाही. अमोल मिटकरींनी ब्राम्हण महसंघाला उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करायची गरज नाही. आम्ही कार्यल्यासमोर लेट पोहचलो नसतो तर ब्राम्हण महासंघाच्या महिलाना डोक्यावर उचलून घेवुन गेलो असतो.”

    अशी बोचरी टीका त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना केली. 

    राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

    अरेरावी केली तर कार्यक्रम करू – रुपाली पाटील

    मंडळी अमोल मिटकरींनी इस्लामपूर येथे झालेल्या सभेत मांडलेल्या भूमिकेबद्दल चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हणाल्या की,

    “ब्राम्हण महासंघाने निषेध व्यक्त करायचा असेल तर तो आमच्या परिसरात करू नये. जास्त आरडाओरडा केला किंवा अरेरावी केलो तर कार्यक्रम करू.”

    अशी ठाम भूमिका रुपाली पाटील यांनी मांडली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.