Category: बातमी

  • अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली रेकॉर्डब्रेक सभा आणि सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांवर सद्धया महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाद सुरू आहे. पोलीस प्रशासनाने राज ठाकरेंच्या सभेला १६ नियमांची अंमलबजावणी करायला सांगितले होते.

    मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये पुन्हा समाजात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून  कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अध्यापही अटक झालेली नाही.

    तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

    राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मस्जिदींवरील भोंगे उतवण्यासाठी ४ तारखेचा दिवस दिला होता. अन्यथा महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकत असे सांगितले होते. राज ठाकरेंच्या याच वक्तव्याची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना कामाला लावले आहे.

    काही ठिकाणी अजाण हे विना भोंग्याचे पठण करण्यात आले. यावर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,

    ” आज काही ठिकाणी भोंग्यावर अजाण लावली नाही म्हणून आम्ही शांत बसलो अस समजू नका. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्य सरकारने करावं. अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही.”

    अस राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं आहे. 

    अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    अन्यथा आम्ही आक्रमक होऊ- राज ठाकरे

    मंडळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं की,

    ” प्रत्येक मस्जिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. अन्यथा आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.”

    अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी राज्य सरकारपुढे मांडली आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबद्दल पाठ फिरवली आहे.

    यामध्ये सर्वात पहिल येणार नाव म्हणजे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसे सैनिकांनी पुण्यामध्ये हनुमान चालीसा पठणाच आंदोलन केल. तेव्हा वसंत मोरे अज्ञात स्थळी निघून गेले होते. या गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना ट्रोल करण्यात आलं.

    भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

    मात्र दोन दिवसानंतर वसंत मोरे पुण्यात आल्यावर त्यांनी तिरूपतीला जाण्याबद्दल सर्व माहिती प्रसार माध्यमांना दिली. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना ते म्हणाले की,

    ” राज साहेबांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये मनसे सैनिकांच आंदोलन झालं तेव्हा मी तिरुपतीला गेलो होतो. याबद्दल लोकांनी गैरसमज केला. शेवटी मीसुद्धा एक माणूस आहे. मलापण भावना आहेत. मला वाटलं मी तिरूपतीला जावं म्हणून मी गेलो. पुण्यामध्ये मनसे सैनिक आंदोलन करत असताना मी तिथे नव्हतो.पण सेनापती नसला तर लढाई जिंकल्या जात नाही असं होऊ शकत नाही.”

    अस वसंत मोरे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. 

    राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार

    मी अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहे – वसंत मोरे

    तिरूपतीवरून दोन दिवसाने परतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलं की,

    ” माझी पक्षाबद्दल कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. ठाणेच्या सभेला राज साहेबांच बोलावणं आल्यानंतर मी माझ्या घरचा कार्यक्रम रद्द करून सभेला उपस्थित होतो. मी अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि राहणार.”

    अशी ग्वाही वसंत मोरे यांनी दिली आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंची हुकूमशाही चालणार नाही – अजित पवार

    मंडळी काल औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेमध्ये लाखोंची गर्दी राज ठाकरे यांना ऐकायला आली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत? यावर लक्ष देऊन होता.

    मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये पुन्हा करून समाजामध्ये दूषित वातावरण पेरण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून मुस्लिम समाजाविरोधात आपली भूमिका मांडत म्हटलं की,

    अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    “३ तारखेला ईद असल्याकारणाने आम्ही समजून घेऊ. मात्र ४ तारखेला जर प्रत्येक मस्जिदींवरचे भोंगे उतरले नाही, तर महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे मला माहिती नाही. अस करण्याची आमची इच्छा नाही, आम्हाला तशी गरजही नाही. पण तुम्ही जर भोंगे उतरवणार नसाल, तर आमच्या मनगटातली ताकद आपण बघितली नाही.”

    अशी चेतावणी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देतांना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की,

    ” हा महाराष्ट्र कायद्याने चालेल. संविधानाने जे अधिकार आणि नियम सांगितले आहेत त्यानुसार चालेल. इथे कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही. फक्त मस्जिदींवरचेच भोंगे नाही, तर संपूर्ण धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवल्या जातील.”

    अस अजित पवार यांनी राज ठाकरे यांना बजावलं आहे. 

    भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

    लोकांना भडकवून देणं सोपं आहे अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला 

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देतांना म्हटलं की,

    ” लोकांना भाषणाच्या माध्यमातून भडकवून देणं सोपं आहे. मात्र समाजामधला सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे कठीण आहे. जातीयवाद पेरून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करन महाराष्ट्राला परवडणार नाही.”

    अशी टीका अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • भर सभेत खुर्च्या फेकल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

    मंडळी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये चांगलच चर्चेत असलेलं नाव आहे. मुंबई आणि ठाणे येथे सभेमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेवरून संपूर्ण राजकीय क्षेत्र व्यस्त झालं आहे. राज ठाकरे यांची ठाणे येथील सभा झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली होती की येणारी सभा कुठे व कधी होणार ?

    अखेर राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद  येथे पार पडली. सभेआधी ही सभा होणार की नाही? सभेला पोलीस प्रशासन परवानगी देणार की नाही? अस सर्वांना वाटत होतं. काल औरंगाबाद येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये लाखो लोकांचा सैलाब उसळून पडला.

    अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

    सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. अचानक काही लोकांनी सभेमध्ये गोंधळ घातला आणि राज ठाकरेंचा राग अनावर झाला. त्या  गोंधळ घालणाऱ्या लोकांना खोचक भाषेमध्ये धमकावतना त्यांनी म्हटलं की,

    ” ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. इथे जर गोंधळ कराल, तर चौरंग करून घरी पाठवू लक्षात ठेवा.”

    राज ठाकरेंच्या वक्तव्यांवरून संपूर्ण श्रोते मोठ्याने नारेबाजी करतांना दिसले. 

    राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

    गोंधळ घालणारी लोक कोण होती? 

     मंडळी राज ठाकरे यांची सभा होण्याआधी भीम आर्मीने राज ठाकरे यांना फटकारल होत की,

    ” जर भाषणामध्ये त्यांनी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानांचा वापर केला, तर आम्ही सभा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.”

    असा इशारा भीम आर्मीने दिला होता. काल सभेमध्ये झालेला गोंधळ भीम आर्मीचाच असावा अशी शक्यता सगळीकडून वर्तवल्या जात आहे. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद येथील सभेत जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच वातावरण निर्माण झालं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जो मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला?- नारायण राणे

    मंडळी एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे तर दुसरीकडे भाजपा नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात चांगलाच राजकीय रणसंग्राम चालू आहे.

    महाराष्ट्रात चालू असलेली सामजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही आणि यावर उध्दव ठाकरे सरकारच लक्ष नाही. अशी ठाम भूमिका भाजपा नेते यांनी मांडली आहे. नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

    शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

    ते म्हणाले की,

    ” राज्यातल्या लोकांना कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून रक्षण मिळावं. किती हत्या झाल्या, महिलांवर बलात्कार करून किती हत्या करण्यात आल्यात. दिशा सालीयानच उदाहरण आहे. सुशांत आणि दिशा सालीयान केसमध्ये मंत्रीसुद्धा आहेत. पूजा चव्हाण आणखी एक उदाहरण आहे. आज हत्या, दरोडे किती वाढत आहेत. त्याशिवाय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही आहे असा यांनी शोध लावला. नवाब मलिक दाऊदशी संबंध असून देशद्रोही नाही. १०० कोटी महिन्याला द्यायचे असे सांगणारे देशद्रोही नाही. तीर्थ यात्रेला गेले होते म्हणून त्यांना अटक केली असावी. म्हणून महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जो व्यक्ती मंत्रालयात कधी बसत नाही तो मुख्यमंत्री कसा?”

    अशी खोचक टीका करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चांगलच धारेवर धरल. 

    फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांची निवासस्थानी चौकशी

    महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे – नारायण राणे 

    नारायण राणे प्रसार माध्यमांशी बोलतांना पुढे म्हणाले की,

    ” उध्दव ठाकरे यांच कोरोना काळात शून्य काम आहे. मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा त्यांचं काम शून्य आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने याच स्वागत करावं.”

    अस नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मात्र आता नारायण राणे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील

    मंडळी महाराष्ट्रभरातच नाही, तर संपूर्ण देशभरात राज ठाकरे या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. अचानक राज ठाकरे यांनी साकारलेली धार्मिक राजकारणाची भूमिका हे धर्मवेड्या लोकांना चांगलीच भावली आहे.

    गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांना राजकारनामध्ये फारस यश आलं नसल्याकारणाने त्यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या मुंबई येथील सभेत आणि ठाणेमध्ये घेतलेल्या उत्तर सभेत धार्मिक राजकारणाची भूमिका साकारली होती.

    राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

    आता राज ठाकरे यांची जाहीर सभा हे १ मेला औरंगाबाद येथे होणार आहे. या सभेला प्रशासनाकडून परवानगी मिळणार की नाही ? हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अनेक संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेस विरोध केला.

    मात्र अखेर प्रशासनाने या सभेला परवानगी दिली आहे. पोलीस प्रशासनाने ही सभा १६ नियमांनुसार व्हावी अशी चेतावणी राज ठाकरे यांना दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

    काल राज ठाकरे पुण्यामधून १०० पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन सभेसाठी रवाना झाले.या सभेला १००० पुरोहितांची उपस्थिती राहणार असून १५० पुरोहित या सभेचा शंखनाद करणार आहेत. 

    राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

    आम्ही केसेस घ्यायला तयार – अमित ठाकरे

    मंडळी राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेत समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. त्यामुळे अनेक संघटनांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला विरोध केला होता. दुसरीकडे पोलीस प्रशासनानेसुद्धा राज ठाकरे यांना कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास गुन्हा दाखल करू अशी चेतावणी दिली आहे.

    या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हटलं की,

    ” आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत.”

    अर्थात राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत आणखी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतील अस अमित ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

    मंडळी हा महाराष्ट्र शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर चालत आलेला आहे. मात्र राज ठाकरेंसारखे लोक हे राजकीय हितासाठी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याच्या इर्षेने वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि इथल्या सामान्य गोरगरीब कुटुंबातील तरुणांची माथी भडकवत असतात.

    महाराष्ट्रातील राजकरणामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चांगलाच गवगवा चाललेला आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेत त्यांनी धार्मीक वाद निर्माण करणारी वक्तव्य केली होती. ज्यामुळे समाजामध्ये अस्थीरता निर्माण होण्याची दाट शक्यता होती.

    राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

    मात्र राज ठाकरे यांची पुन्हा सभा औरंगाबाद येथे १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार आहे. आतापर्यंत या सभेला अनेक संघटनांकडून विरोध केल्या गेला. सरकार या सभेला परवानगी देणार की नाही यावर सर्वांचं लक्ष लागून होत. अखेर प्रशासनाने या सभेला परवानगी दिली.

    मात्र भीम आर्मीने राज ठाकरे यांना सभा उधळून लावण्याच खुल चॅलेंज केलं आहे. भीम आर्मीन म्हटलं आहे की,

    ” औरंगाबाद येथे राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोधच असणार आहे. कारण त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार आहे. हिंदू-मुस्लिम दंगली होणार आहे. अस चिन्ह स्पष्ट झालेल आहे. राज ठाकरेंना पोलिसांनी परवानगी दिली, तर आम्ही ती सभा उधळून लावू. कारण या देशातला जो व्यक्ती या देशावर प्रेम करतो तो प्रत्येक माणूस या सभेला विरोध करत आहे.”

    अस भीम आर्मीने म्हटलं आहे. 

    महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

    काय असणार सभेची नियमावली ? 

    मंडळी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे १ मे ला होणाऱ्या सभेसाठी पोलिस प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये एकूण १६ नियमांचा समावेश आहे. सभेमध्ये कुठल्याही जाती- धर्माबद्दल, प्रदेशाबद्दल, भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करता येणार नाही.

    सभा ही दुपारी ३:३० ते रात्री ९:३० या वेळेमध्येच व्हायला हवी. सभेसाठी एकूण श्रोत्यांची संख्या ही १५ हजारांहून अधिक नसावी. अशा एकूण १६ नियमांचं पालन राज ठाकरे यांना करायचं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार

    मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती हे धार्मिक वळण घेऊन भलत्याच मार्गावर चाललेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा पठणाचा अट्टहास, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगे उतरवण्याचा मनसुबा.

    या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांना झाला आहे.

    महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

    राज ठाकरे यांनी योगी यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केल आहे. सोबतच त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्र सरकारलासुद्धा टोला दिला आहे.आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    ते म्हणाले की,

    ” योगी आदित्यनाथ हे दमदार नेतृत्व आहे. जो बोला ओ किया. जे जनतेला आवश्यक आहे त्यासाठी टाचखाऊ भूमिका घेतली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही प्रश्न आल्यावर दिल्लीकडे बोट न दाखवता काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे योगी आहे. करून दाखवणे याला म्हणतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून दाखवल्याची भाषा करतात. त्यांनी आता योगींकडे ट्युशन क्लास लावायला हवा.”

    अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. 

    ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

    यापुढे त्यांनी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद हवं होतं. मात्र ते शिवसेनेकडे गेल्याकारणाने राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे. अस आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं. मात्र आता यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

    मंडळी गेली कित्येक वर्षे झाले राज ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नेते आहे. मात्र त्यांना राजकीय क्षेत्रात फारस यश आलेल नसल्याकारणाने आता त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या मनसुब्याने धार्मिक राजकारण करायला सुरुवात केली आहे.

    मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या त्यांच्या सभेत त्यांनी सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच आव्हान महाराष्ट्र सरकारला केलं होतं. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झाला आहे.

    राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज

    राज ठाकरे यांनी योगी यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केल आहे. सोबतच त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्र सरकारलासुद्धा टोला दिला आहे. योगी अदित्यनाथ यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की, 

    ” योगीजी आपण उत्तर प्रदेशातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. हीच बुद्धी महाराष्ट्र सरकारलासुद्धा यावी अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मात्र महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’.”

    अस पत्रामध्ये लिहत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. 

    राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी

    मंडळी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपचे गुणगान गाऊ लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेल आहे की ते आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आपला धार्मिक अजेंडा घेऊन निवडणूका लढणार आहे.

    पाठोपाठ सभा घेणे आणि शेती, शिक्षण, रोजगार यांसारखे मुद्दे न उचलता धार्मिक मुद्दे उचलणे यावरून राज ठाकरे यांचा राजकीय मनसुबा जनतेच्या चांगलाच लक्षात आलेला आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांचे २ हजार कोटी गिळंकृत करण्याच्या बेतात पडळकरांचा खुलासा

    मंडळी महाराष्ट्रातील राजकरणामधले मातम्बर मानले जाणारे शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल निर्दयी वृत्ती दाखवण्याचा आरोप सध्या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. जवळपास १२० एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले असतानासुद्धा शरद पवार यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही.

    नुकत्याच घोषित झालेल्या एसटी बँकेच्या निवडणूकीत जो थकबाकीदार आहे त्याला मतदान करता येणार नाही असा आदेश महाविकास आघाडी सरकारन काढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना चांगलच धारेवर धरलं आहे.

    शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र

    प्रसार माध्यमांशी बोलत असतांना पडळकर म्हणाले की,

    ” गेल्या ६ महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काची लढाई लढत होता आणि आता त्याचाच फायदा घेऊन शकुनी काकांनी २ हजार कोटींची बँक आणि त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्याला या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा फतवा काढल्या गेला आहे. साहजिकच जो कर्मचारी गेल्या ६ महिन्यांपासून बिनपगारी रस्त्यावर उतरला तोच थकबाकीदार आहे म्हणजे त्याला मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. १९९५ ला शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये वसूल केले.”

    अस पडळकर यांनी म्हटलं आहे. 

    एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला शरद पवार जबाबदार – गोपीचंद पडळकर

    पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली १०० कोटी गिळंकृत केले – पडळकर 

    शरद पवार यांना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांद्वारे चांगलच सुनावलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे ते म्हणाले की,

    ” पवारांनी वाढदिवसाच्या नावाखाली मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रुपये गिळंकृत केले आहे. आपल्या आसपासच्या बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या गाड्या खरेदी करून दिल्या. ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या कुटुंबासोबत उघड्यावरती लढाई लढत होता त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओकवरून जेवण तर सोडा पण पाणीसुद्धा पाठवून दिल नाही. यांच्यामध्ये जर थोडी जरी माणुसकी असती तर यांनी मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली असती.”

    अस बोलत पडळकर यांनी शरद पवार यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मात्र आता यावर पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir