Category: राजकीय व्यक्ती

  • आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

    मंडळी सद्ध्या परळी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार असलेले धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील राजकारणात बहुचर्चित नेत्यांपैकी एक आहेत.

    मात्र आपल्या घराण्याला भारतीय जनता पक्षाचा राजकीय वारसा असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसे काय आले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

    शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…

    तर मंडळी झाल अस की, धनंजय मुंडे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे. ते गोपीनाथ मुंडेंचाच हात धरून राजकीय क्षेत्रात आले. त्यांच्यासोबत विविध सभांमध्ये जाणे, संघटन तयार करणे या कारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियताही मिळाली.

    वाढत्या लोकप्रियतेमुळे धनंजय मुंडे यांना २००२ साली जिल्हापरिषद निवडणुकीची भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. आणि ते निवडूनसुद्धा आले.

    सण २००२ ते सण २००७ पर्यंत ते जिल्हापरिषद सदस्य होते. धनंजय मुंडे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्षसुदधा केले. 

    दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली होती. मात्र  गोपीनाथ मुंडे यांना प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे अशा दोन मुली होत्या. त्यामुळे जनतेला प्रश्न निर्माण झाला होता की, येणाऱ्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार धनंजय मुंडे असतील की पंकजा मुंडे.

    वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

    पण त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना महत्व देण्यात आलं आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत दगा झाला. अस म्हणणं वावग ठरणार नाही. 

    अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    मंडळी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना महत्व दिल्याकारणाने धनंजय मुंडे यांची साफ नाराजी झाली होती. आणि याच कारणावरून त्यांनी अखेर २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

    मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीकडून म्हणजेच पंकजा मुंडेंकडून पराभव स्विकारावा लागला होता. पण धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…

    मंडळी शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुचर्चित असलेले राजकीय नेते आहे. मात्र संजय राऊत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केव्हा व कसा झाला?

    व शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी ते काय करत होते? याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी संजय राऊत यांचे वडील हे शिवसैनिक होते.

    वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

    संजय राऊत यांनी आपलं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख लिहून गुन्हेगारी क्षेत्रातल्या क्राईम स्टोरी लिहल्या आहेत.

    ज्यामध्ये दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे यांसारख्या अनेक कुख्यात गुंडांच्या स्टोरी समाविष्ट आहेत. नंतर त्यांनी लोकप्रभा या वृत्तपत्रामध्ये काम केले.

    लोकप्रभा या वृत्तपत्रामध्ये संजय राऊत यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिफारसीवरून नोकरी मिळालेली होती. तेव्हाची सर्वात महत्वाची घटना म्हणजे रमा नाईक या कुख्यात गुंडांच्या एंन्काऊंटरची स्टोरी कव्हर कण्याची जबाबदारी लोकप्रभाचे संपादक माधव गडकरी यांनी संजय राऊत यांना दिली होती.

    आणि ही जबाबदारी राऊतांनी निर्भीडपणे पार पाडली. त्यांचे संपादकीय लेख हे निर्भीड आणि सडेतोड असायचे. त्यामुळे त्यांची ओळख गुंड पत्रकारम्हणून निर्माण झाली होती. त्यानंतर राऊतांच्या या सडेतोड लिखाणाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाव दिला.

    एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

    व त्यांना बाळासाहेबांनी सामनाचा संपादक केले. ज्या ताकदीने बाळासाहेब ठाकरे हे सामनामध्ये संपादकीय लेखांमधून आपली भूमिका मांडायचे.

    तेच लिखाण कौशल्य त्यांना संजय राऊत यांच्यामध्ये दिसलं होत. त्यानंतर संजय राऊत यांनी १९९२ साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

    राजसभेवर खासदार

    शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांच्या लिखाणाला चांगलाच वाव मिळाला आणि शिवसेनेमध्ये त्यांचं राजकीय नेता म्हणून चांगलच वजन निर्माण झालं. २००४ मध्ये त्यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली.

    आणि ते निवडूनही आले. त्यानंतर संजय राऊत यांनी राजकीय क्षेत्रात कधीच मागे वळून बघितलं नाही. आज ते शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जातात.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

    मंडळी भारतीय देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यामध्ये २३ मार्च १९३१ साली शहीद भंगतसिंग यांना झालेली फाशी आठवली तर आजही प्रत्येक भारतीयांच्या भावना गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.

    पण भगतसिंग यांच्या फाशीचा वाद हा बऱ्याच भारतीय जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करून गेला. ज्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल काही लोक आजही प्रश्न उभे करतात.

    एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

    मग गांधीजी खरच भतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकले असते का? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर त्यांना वाटत होतं की,

    “आपल्याला फाशी दिल्यास आपल्या तत्वज्ञाला उजाळा मिळेल आणि लोकांचा जास्त पाठिंबा मिळेल. मला फाशी झाली तर जनतेच्या मनात क्रांतीचा भडका उडेल आणि या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल.”

    अस भगतसिंग यांना वाटत होत. दुसरीकडे ब्रिटिश सरकारमध्ये गांधीजींनी सहभाग मिळवण्यासाठी त्यांच्याशी करार केला होता.

    आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले

    ज्यामुळे लोकांना वाटत होतं की गांधीजी भगतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकेल. त्यानंतर गांधीजींनी ब्रिटिश व्हॉईसरॉयला भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेबाबत पत्र लिहिलं. 

    गांधींजींच भगतसिंगांबद्दल व्हॉईसरॉयला पत्र

    मंडळी भागतसिंगांच्या फाशीबद्दल गांधीजींनी व्हॉईसरॉयला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की,

    ” मी हे पत्र आपणास शांतता आणि संरक्षणाच्या भूमिकेतून लिहितो आहे. भगतसिंग यांची शिक्षा कमी करता येणार नसल्याचं तुम्ही मनमोकळेपणाने मला सांगितलं. मात्र जर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर देशातील शांततेला धोका आहे. राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या तिघांचे प्राण वाचले तर आम्ही हिंसक कारवाया थांबवू आणि आम्ही ज्या हत्या यापुढे करणार होतो त्याही थांबवण्यात येतील असं आश्वासन क्रांतिकारकांच्या संघटनेने आपणास दिलेलं आहे. राजकीय हत्या यापूर्वीही झाल्या आहेत. हे तीन जीव वाचले तर येणाऱ्या हत्या होणं थांबतील. माझ्या मताचा तुम्ही नेहमीच आदर करता आणि माझं मत नेहमीच शांततेच्या बाजूने असत. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी करून आपण  माझी स्थिती अडचणीची करू नये अशी आपणास विनंती आहे.”

    अस गांधीजी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मंडळी उगाच काहीपण तर्क वितर्क लावून लोक काहीपण बरळत असतात. गांधीजींनी भगतसिंग यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणूनच आज जनतेला कळाले नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदाच्या दावेदारीपर्यंत मझल मारणारी रणरागिणी

    मंडळी आयुष्य म्हणलं की संघर्ष हा अटळ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यालाच येत असतो. मात्र त्या संघर्षाचा प्रवास सुखकर समजून यशाला गाठणारी माणसं हे क्वचितच बघायला मिळतात.

    त्यापैकीच एक संघर्षशाली व्यक्तिमत्त्व असणारी राजकीय क्षेत्रात एका आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत आपली दावेदारी मजबूत करणारी रणरागिणी म्हणजे द्रौपदी मुर्मू.

    RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

    मंडळी द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामधल्या मयुरभंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये झाला.  त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असे दोन अपत्ये झाली.

    मात्र अवघ्या काही कालावधीमध्येच त्यांचे पती व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या मुलीला योग्य शिक्षण मिळाव यासाठी आणि कुटुंबामधला इतर खर्च करता यावा यासाठी सुरवातीला क्लर्क म्हणून नोकरी केली.

    काही काळ क्लर्क म्हणून नोकरी केल्यानंतर नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्राची वाट धरली आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्या.

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    मुर्मू यांची लोकप्रियता वाढू लागली होती. आणि याच जनतेच्या प्रेमापोटी त्या १९९७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे मुर्मू यांच्या लोकप्रियतेकडे चांगलेच लक्ष होते.

    नंतर त्या २००० ते २००४ पर्यंत भाजप आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात राज्यमंत्री राहल्या. 

    राष्ट्रपती पदासाठी दावेदारी

    दिवसेंदिवस मुर्मू यांची लोकप्रियता वाढत होती. त्यांच्या कामामुळे त्यांना जनतेमध्ये आणि भाजपामध्ये एक उत्तम नेतृत्व म्हणून पसंत केल्या जाऊ लागलं. भारतीय देशातील  राजकारणात त्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशामधील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.

    मुर्मू यांच्या नेतृत्वक्षमतेचा आलेख दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाच्या हिताचा ठरत असल्याकारणाने भाजपने त्यांना २०२२ सालच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी दावेदार म्हणून घोषित केले. आणि त्या इथल्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्थान झाल्या.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

    मंडळी स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री लाभले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक विशिष्ट कारकीर्द राहलेली आहे.

    मात्र मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभन म्हणजे एक नवलच म्हणावं लागेलं. हो मंडळी. आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री मा. अब्दुल रहेमान अंतुले.

    तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर जनता दलाच सरकार हे केंद्रामध्ये आलं. मात्र २ वर्षांपेक्षा जास्त काळ हे सरकार टिकू शकलं नाही. त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधींच सरकार आलं.

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    आणि त्यांनी सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे महाराष्ट्रातील शरद पवार यांचं पुरोगामी लोकशाही दलाच सरकार बरखास्त करण्याचं. शरद पवार यांच सरकार कोलमडून पडल्यानंतर महाराष्ट्राला अब्दुल रहेमान अंतुले हे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून लाभले.

    मात्र अंतुलेंच्या मुख्यमंत्री होण्यावर महाराष्ट्रातील इतर काँग्रेसचे नेते फारसे खुश नव्हते. पण अंतुले यांची महाराष्ट्रविषयी निष्ठा आणि जनतेविषयी जो कळवळा होता तो वेगळं संगण्याची गरज नाही.

    ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी आर्थिक परिस्थितीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची ५० कोटी रुपयांची कर्जमाफी केली. यावर रिजर्व बँक ऑफ इंडियाने त्यांना खडसावले होते.

    मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द होणार नाही. या आपल्या निर्णयावर ते अखेरपर्यंत ठाम राहले होते. १९८० मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. 

    २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

    झालेल्या आरोपांवरून राजीनामा 

    मंडळी अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला जवळपास दोन वर्षे होत आली असतांना त्यांच्यावर सिमेंट घोटाळाप्रकरणी आरोप लावण्यात आले.

    त्यांच्यावर कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आला. महाराष्ट्रात सिमेंटची टंचाई निर्माण झाली असता त्यांनी सरकारी मालमत्तेमधून सिमेंट पुरवल्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

    अखेर मुख्यमंत्री पदाच्या दोन वर्षीय कार्यकाळानंतर १९८२मध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र १० ते १५ वर्षानंतर त्यांची या खटल्यातून सुटका झाली.

    अब्दुल रहेमान अंतुले यांनी महाराष्ट्रातील येणाऱ्या राजकीय आणि सामाजिक पिढीसमोर उत्तम नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    मंडळी राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये काही असे राजकीय नेते होऊन गेलेत की त्यांची कारकिर्द बघितली तर अक्षरशः हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. यापैकीच एक राजकीय नेत्या तामिळनाडूच्या अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता.

    जयललिता यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४८ रोजी मेलुकोटे येथे तमिळ कुटुंबात झाला. त्या दोन वर्षांच्या असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचं पालनपोषण केलं.

    २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

    जयललिता यांच्या आईंना त्यांना वकील नाहीतर नृत्यनायिका करायचे होते. मात्र त्यांच्या नशीबामध्ये काही वेगळंच लिहिलेलं होत. जयललिता यांनी भरतनाट्यम, मोहिनी अट्टम यांसारख्या अनेक नृत्यप्रकाराचेही प्रशिक्षण घेतले.

    आणि त्या अभेनेत्री झाल्या. जयललिता यांनी अनेक तामिळ चित्रपटात काम केले आणि अवघ्या काही कालावधीतच त्यांनी रसिकांची लोकप्रियता स्वतःकडे खेचून आणली होती.

    त्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या एआयएडीएमके या पक्षात प्रवेश घेऊन आपली राजकारणामध्ये दावेदारी मजबूत केली. जयललितांनी नंतर राजकीय क्षेत्रामध्ये कधीच मागे वळून बघितलं नाही.

    “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

    १९८४ ते १९८९ या कालावधीमध्ये त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र रामचंद्रन यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेमध्ये फूट पडली आणि रामचंद्रन यांच्या पत्नीचा एक गट व जयललिता यांचा एक गट असे दोन गट निर्माण झाले.

    १९८९ मध्ये त्या तामिळनाडू विधानसभेतील पहिल्या विधानसभा महिला विरोधीपक्षनेत्या होत्या.

    पहिली महिला मुख्यमंत्री

    काही कालावधीनंतर एआयएडीएमके पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले आणि सर्वानुमते त्या १९९५ साली तामिळनाडूच्या सर्वात कमी वय असलेल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.

    जयललिता यांना विधानसभा सभागृहात काही आमदारांकडून मारहाणही झाली होती. आणि फाटक्या साडीत त्या सभागृहाच्या बाहेर पडल्या होत्या. या घटनेने जयललिता यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली होती.

    त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढ उतार आले पण त्या कधीच खचल्या नाही. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींची लाट येऊनसुद्धा तामिळनाडूमध्ये त्यांनी ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळवला होता.

    मुख्यमंत्री असतांना त्यांनी फक्त १ रुपया पगार घेऊन उत्तम प्रशासकाच उदाहरण दिलं. अखेर वयाच्या ६८ व्या वर्षी म्हणजेच ५ डिसेंबर २०१६ ला तामिळनाडूमधील चेन्नई येथे अम्मानी जगाचा निरोप घेतला.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

    मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील इतिहासामध्ये असे काही राजकीय नेते होऊन गेले ज्यांच्या विशिष्ट बाबींमुळे ते आजही ओळ्खले जातात.

    यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख. अस म्हणतात की, विलासराव देशमुख जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असले तेव्हा इतर राजकीय नेते त्यांच भाषण झाल्यावरच भाषण करत होते.

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    त्याच कारण अस की, सगळ्यांच बोलून झाल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांना ते आपल्या भाषणांमधून गोड चिमटे घ्यायचे. आपल्या भाषणशैलीमुळे विलासराव देशमुख हे सर्वांचे लोकप्रिय नेते होते. विशेषकरून आपल्या हजरजबाबीपणामुळे ते जास्तच लोकप्रिय होते.

    एकदा असाच काही किस्सा सभागृहात घडून आला होता. तेव्हा विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते तर स्व. गोपीनाथ मुंडे हे विरोधीपक्षनेते होते. मुंडे यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.

    तेव्हा उत्तराच्या भाषणामध्ये विलासराव देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांना अप्रत्यक्षपणे चिमटा घेत म्हटलं होतं, की

    “मुंडे यांच भाषण हे नेहमी ऐकावसच वाटत. आणि मला अस वाटत की मी सरकारमध्ये असाच मुख्यमंत्री म्हणून असावं आणि त्यांनी विरोधीपक्षनेता म्हणून असच भाषण करत रहावं.”

    देशमुख यांच्या या हजरजबाबीपणावर शेवटी गोपीनाथ मुंडे यांनासुद्धा हसू आवरलं नव्हतं. 

    आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

    जेव्हा देशमुखांनी आमदाराला सुनावलं…

    मंडळी सभागृहामध्ये एकदा ‘राज्याच शैक्षणिक धोरण’ या विषयावर बोलत असतांना मराठवाड्यातील एका आमदाराने आपलं भाषण एवढं लांबवल की सभागृहातील अधिकाऱ्यांनी सांगूनसुद्धा त्यांनी भाषण थांबवलं नव्हतं.

    त्यांनतर विलासराव देशमुख यांनी उत्तराच्या भाषणामध्ये त्या आमदाराला अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटलं होतं की,

    ” राज्याच शैक्षणिक धोरण या विषयावर बोलत असतांना मा. आमदारांच्या भाषणामधून खरच जाणवलं की राज्याच शैक्षणिक धोरण अतीशय खालावल आहे.”

    विलासराव देशमुखांच्या आमदाराला दिलेल्या या अप्रत्यक्ष उत्तराने सर्व सभागृह अक्षरशः हसून उठलं होत.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    मंडळी राजकीय क्षेत्राचा इतिहास जर आपण बघितला तर सर्व राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. ८० ते ९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे हे एक मसिहा म्हणूनच आले होते.

    अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्याविरोधात विरोधीपक्षाचा नेतासुद्धा बोलायला विचारच करायचा. बाळासाहेब ठाकरेंचा चाहता वर्ग हा मुंबईतच नव्हे तर सम्पूर्ण भारतीय देशात प्रचंड प्रमाणात होता आणि आतासुद्धा आहे.

    जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    महाराष्ट्रात खासकरून त्यांच्या नावाचा दरारा होता. कुठलंही पद नसतांना राजकिय क्षेत्रात त्यांच विषेशकरून चांगलच वजन होत. मात्र हे सगळं लक्षात घेता बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री का बरं झाले नाही?

    २०१९ ला त्यांचेच सुपूत्र शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मग बाळासाहेब ठाकरे का बरं झाले नाही मुख्यमंत्री? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला उपस्थित होत असेल.

    तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या मुलाखतीमध्ये, समाज माध्यमांवर सांगायचे की मला कधीच कुठलं पद घ्यायचं नाही. सत्ता कुणाचीही असो सत्तेच रिमोट मात्र आपल्या हातात असायला हवं. अस त्यांचं म्हणणं होतं. १९९५ ला बाळासाहेबांच्या शिवसेनेच युतीच सरकार स्थापन झालं. तेव्हापण ते मुख्यमंत्री झाले नाहीत. 

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मुख्यमंत्री न होण्यामागचं सर्वात मोठं कारण…

    मंडळी अस म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसांच्या हक्कासाठी जो संघर्ष केला त्यादरम्यान त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    त्यामुळे दाखल झालेले गुन्हे जर कोर्टात सिद्ध झाले तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या कारणाने त्यांनी मुख्यमंत्री पद नाकारलं अस म्हटल्या जात. १९८७ मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत  बाळासाहेब ठाकरेंवर धर्माच्या नावावर जनतेला मतं मागितल्याचे आरोप झाले होते.

    या खटल्याचा निकाल १९९९ ला लावण्यात आला होता. ज्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ६ वर्ष मतदान न करण्याची सक्ती आणल्या गेली होती.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास

    मंडळी काही राजकीय नेत्यांचा जीवन प्रवास जर आपण निरखून बघितला तर, खरच अस्वस्थ करणारा असतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत हे त्यांच्या यशाचं विशेष कारण असत.

    हो मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका संयमी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल. फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला.

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    फडणवीस यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे वडिलांकडून मिळाले.

    “वडिलांना इंदिरा गांधींमुळे अटक झाली म्हणून मी गांधींच्या कुठल्याही शाळेत शिकणार नाही.”

    अस वयाच्या सहाव्या वर्षी सांगणाऱ्या फडणवीसांमध्ये बालपणापासूनच राजकीय गुण दिसू लागले होते. नंतर ते १९८६-१९८९ या कालावधीमध्ये ABVP चे सदस्य होते.

    फडणवीस १७ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले. त्यामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष आणखी वाढला होता. वयाच्या अवघ्या २२ वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिका निडवणुकीमध्ये विजय मिळवला आणि नगरसेवक झाले.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    फडणवीसांच कार्यकर्तुत्व वाढत चाललं होतं. त्यानंतर २७ वर्षांचे असतांना त्यांना नागपूर महापौर पदाचा मान मिळाला. महापौर असतांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तव्यदक्ष स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती.

    त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच मागे वडून बघितले नाही. 

    वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री

    २००२ साली देवेंद्र फडणवीस यांना ‘राष्ट्र मंडळ संसदीय संघ’ यांच्या माध्यमातून ‘सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. २००६ मध्ये अमृता रानडे यांच्याशी फडणवीसांचा विवाह झाला.

    नागपूर मधून चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार पद भूषवल्याने देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम आणि प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षात ओळखल्या जाऊ लागले. आणि वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री झाले.

    शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण वयात मुख्यमंत्री होणारे नेते आहे. आता सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?

    मंडळी आनंद दिघे हे नाव बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण जनतेला आजही ज्ञात आहे. मात्र आनंद दिघेंना जनता जेव्हापासून ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागली तेव्हापासून शिवसेनेत आंतरीक वाद उदयास आले होते.

    तर मंडळी झालं असं की, आनंद दिघे यांचा ठाणे येथे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. त्यामुळे त्यांना ठाणे येथील शिवसेना जिल्ह्याध्यक्षपद देण्यात आलं. ठाण्यातील जनतेसाठी दिघे अहोरात्र झटत होते.

    आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?

    जनतेसाठी स्वतःला त्यांनी एवढं झोकून दिल होत की, त्यांनी विवाहसुदधा केला नाही. ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘आनंदआश्रमाची’ स्थापना केली होती. ज्यामध्ये जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे ते काम करत होते.

    प्रत्येक काम ते ताबडतोब करायचे. ठाण्यातील अनेक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. पाहता पाहता आनंद दिघे यांचा चाहता वर्ग एवढा वाढत गेला की त्यांची तुलना हे बाळासाहेब ठाकरेंशी होऊ लागली होती.

    रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

    या तुलनेमुळे तेव्हा शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती अस तेव्हा म्हटल्या जात होतं. याबद्दल जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई असे म्हणतात की,

    ” दिवसेंदिवस आनंद दिघे यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत अस चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, अस धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. अशी चर्चा त्यावेळी ठाण्यात होती.”

    दिघेंविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी असही म्हटल्याची चर्चा होती की ,

    ” आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका नाही. पण ज्याप्रमाणे ते काम करतात त्याविषयी प्रश्न आहे.”

    यावर आनंद दिघे यांनी म्हटलं होत की,

    ” बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीशिवाय मी कुठलंही काम करत नाही.” 

    दिघेंच्या अंतीमयात्रेत बाळासाहेब ठाकरेंची गैरहजेरी

    मंडळी दिघे यांचा ठाण्यातील सिंघाणिया रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला अचानक मृत्यू हा शिवसैनिकांच्या मनात संशय निर्माण करणारा होता. ज्यावरून हजारो शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी दिघेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण रुग्णालय जाळून टाकलं होतं.

    याच कारणामुळे पोलीस प्रशासनाने बाळासाहेब ठाकरे यांना दिघेंच्या अंतिमयात्रेत सामील झाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी ताकीद दिली होती. ज्यामुळे बाळासाहेब ठाकरे आंनद दिघेंच्या अंतिमयात्रेत गैरहजर होते.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir