Author: admin

  • न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

    सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सध्याच्या स्थापित सरकार वर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि हे सरकार अयोग्य असल्याचा इशारा त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नातून दिसून येतो.

    उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी काळी एकच पक्षात राहिलेले आणि बाळासाहेबांच्या विचार आणि शब्दावर चालणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जात पण काय झाल असावं की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडत

    भाजप म्हणजेच कधी काळी शिवसेना ही भाजप सोबत युती करून फसली होती आणि पुन्हा त्याच पक्षासोबत जाऊन शिवसेना आणि शिवसेनेतील काही पक्षाधिकारी फोडून एकनाथ शिंदे यांना भाजपा सोबत युती करावी लागली काय असावं कारण ?

    देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    ३ वर्षे थाटलेला संसार एका रात्रीत कसा मोडला असावा ?म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे गटाकडून डावलण्यात येत असावं का ?

    शिंदे आणि शिंदे गटातील लोकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती मान्य नसावी का ?

    महाराष्ट्र हे राज्य आधीपासूनच राजकारणाच्या बाबतीत सुसंस्कृत म्हणवलं जाणार राज्य आहे पण खुर्ची पोटी इथ एवढं सगळं घडणं असंभाविक म्हणता येईल.

    आधीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल प्रत्येक वेळी वादग्रस्त विधान करून वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भगतसिंग कोश्यारी यांना भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची एवढी चिंता का असावी की त्यांच्या प्रत्येक पत्राची दखल हे राज्यपाल घेत असत .

    न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरन्यायाधीशांच हे ही म्हणणं आहे की जर पूर्वी ३ वर्षात तुम्ही एकही पत्र राज्यपालांना लिहलं नाही मग एका आठवड्यात ६ पत्र कशी लिहली गेलीत,

    माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    तर याउलट सध्याच्या राज्यसरकारला जीवाला धोका आहे यासाठी पत्र लिहणं योग्य आहे पण जर तुम्ही बहुमत चाचणीसाठी सुद्धा पत्र लिहीत असाल तर ते योग्य नाही .

    तर दुसरीकडे राज्यपालांकडून तत्कालीन राज्यसरकारचा सत्ताउतार करण्याहेतू भाजप आणि शिंदे गटाकडून आलेल्या बहुमत चाचणीच्या पत्राला जास्त प्रतिसाद देण हे योग्य नाही अस सुप्रीम कोर्टाच म्हणणं आहे.

    तात्कालीन राज्यसरकारला सत्तेतून काढण्यासाठी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणी साठी बोलवणे हे देखील योग्य नव्हे तर महाविकास आघाडीच सरकार पडण्याच्या उद्देशाने राज्यपालांचाही हात असल्याचा दिसून येतो.

    या युक्तिवादात भाजप आणि शिंदेगटाकडून ४ मुद्दे मांडण्यात आले त्यापैकी १ च मुद्दा पटतोय तो म्हणजे ३४ आमदारांनी गटनेत्यांची केलेली निवड अस म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यसरकारवर प्रश्न उपस्थित केलेला आहे.

    तर हे सरकार अयोग्य की योग्य ठरत हे पाहणं देखील महत्वाच राहील पण जर कदाचित हे सरकार अयोग्य राहील तर त्यांनी जो काही कार्यकाल राज्यसरकार म्हणून बजावला त्याच काय होईल ?

    आणि जे सरकार योग्य राहील त्यांचा कार्यकाल हा विरोधी पक्ष म्हणून बजावला गेला त्याची भरणी कशी होईल यातून महाराष्टाचा विकास हा कुठ ना कुठ अडखळतो अस नाही का वाटत आपल्याला ?

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir
  • देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

    समाज आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहाचायच आणि प्रत्येकाच्या वाट्याला फुल ना फुलाची पाकळी देत निरंतर प्रवास करणार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी साध्य केल

    हा महाराष्ट्र आहे इथ अनेक पक्ष सत्तेवर आले तर अनेक पक्ष हे सत्तेपायी मातीमोल झाले प्रखर विरोध असतांनासुद्धा युती घडवून आणली आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली.

    हा एवढा खेळखंडोबा फक्त सत्तेपोटी नव्हता तर तो महाराष्ट्रातील समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकासाठी होता हे आज आपल्याला पाहायला मिळत.

    देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बहुचर्चित आणि ओळखीचं असणार अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पुन्हा या युतीच्या माध्यमातून पाहायला मिळालं हल्लीच या वर्षीच्या अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारणे सादर केला

    समाजकंटकिय वाद …

    यात कमतरता तर नाहीच नाही पण विरोधकांना चुका काढणं आणि त्यावर निषेध करण सुद्धा अवघड झालय. या अर्थसंकल्पात शिंदे सरकार म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय

    खास करून मागील २-३ वर्षांपासुन संतप्त शेतकरी वर्गावर भर दिलेला दिसून येत नवनवीन योजना आणि शेतकर्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात या सरकारने कमी भासू दिली नाही

    फक्त १ रु. भरून आपल्या पिकांचा पीकविमा भरण्याची योजना ही या सरकारने शेतकऱ्याला देऊन जिवनदान दिल्यासारखं आहे सध्याच बदलत हवामान आणि अवकाळी पडणारा पाऊस हा शेतकऱ्याच्या जीवावर उठला होता

    पण आता या योजनेअंतर्गत शेतकरी बिनधास्त होईल आणि खास म्हणजे ही योजना आता उन्हाळी पीकांसाठी सुद्धा लागू होईल म्हणजे आता समाजातील शेतकरी या घटकाला भरभक्कम होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    या युती सरकारने फक्त शेतकरीच नव्हे तर इतर घटकासाठी सुद्धा योजना आणल्यात जसं की असंघटीत कामगार आणि टॅक्सी-रिक्षा चालक यांसाठी एक स्वतंत्र महामंडळाची स्थापना सुद्धा या सरकारने करण्याचीही घोषणा केली.

    कित्येक दिवसापासून चालत आलेला प्रश्न म्हणजे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न सोडवण्यात सुद्धा हे सरकार अग्रेसर असल्याच दिसून येत.

    समाजातील काही घटकांचं अर्थिंक उत्पन्न हे कमी असल्या कारणास्तव शिक्षणापासून त्यांची पाल्ये वंचित राहता कामा नये यासाठी ८ वी पर्यंत मोफत शालेय गणवेश वाटपाची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पात केलेली दिसून येते,

    धनगर समाजास १००० कोटी तर १०,००० कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या सरकारने करून दाखवलं तसेच भाजपा सरकारणे चालू केलेल्या सरकारी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्याला ६००० रुपयांच मानधन मिळत होत

    पण या अर्थसंकल्पामार्फत राज्य सरकारने अजून ६००० रुपये वार्षिक मानधन शेतकऱ्याला देऊ केल आता एकूण १२,००० रुपयांच वार्षिक मानधन शेतकऱ्याला मिळेल

    तर आतापर्यंत वयोवृद्ध नागरिकांना मोफत प्रवासानंतर आता महाराष्ट्र राज्यातील महिला एस.टी. प्रवाश्यांना आता तिकिटामध्ये ५०℅ सुट देण्यात येईल .

    वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि अन्न-धान्यांना कमी मिळणारा भाव लक्षात घेता तत्पर सरकारणे कांदाउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रती क्विंटल कांद्यामागे ३०० रुपयांच अनुदान जाहीर केल .

    कोण म्हणत हे सरकार खोके सरकार आहे ?

    असा प्रश्न या राज्य सरकारण लोकांना पाडला आहे तर याऊलट मुख्यमंत्रीपदी विराजमान असणारे एकनाथ शिंदे हे विरोधकांना निशाणा करत

    तुम्ही तर फक्त गाजर दाखवले आम्ही जनतेला गाजराचा हलवा दिल्याचं

    स्पष्टीकरण देतात ….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    Facebook : Political Wazir   

  • समाजकंटकिय वाद …

    भारत देशाच्या इतिहासात अनेक युद्ध झाले काही हे हिंसक होते तर काही लढे हे गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने झाले.

    विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये क्षुल्लक कारण पुढे करत अनेक समाजकंटकांनी भारतात फुट पाडण्याचे डावपेच रचल्याचे दिसून येते पण भारत हा धर्मनिरपेक्ष आणि जातीभेदाला नाकारून विकासाच स्वप्न पाहत जगू इच्छितो

    पण राजकारण्यांनी आणि समाजकंटक लोक यांच्यामार्फत होणार कर्मकांड हे हिंसेंचे प्रमाण ठरते. भूतकाळात मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर प्रसंगी उद्भवलेला वाद

    मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    आणि सध्याच्या दिवसांमध्ये गाजलेला छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यामुळें तयार झालेले वातावरण हे चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या राजनितिक इतिहासानुसार वाद होने संभाविक आहे पण ,छत्रपतींच्या नावाने वाद उद्भवणे ही खूप संतापजनक आणि लाजिरवाणी बाब आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवाच राण करून या जुलमी मोगलांच्या ताब्यातून आपली सुटका करून या राज्याच स्वराज्य केल त्याच महाराजांच्या पुत्राने जीवाची आहुती दिली

    पण आपल्या धर्माचा रक्षण केल आणि जर त्याच महाराजांच्या नावाने जर आपल्या शहराला एक नवी ओळख मिळत असेल तर यात आपले सौभाग्य आहे पण समाजकंटक लोकांकडून याला सुद्धा विरोध होतोय.

    सध्याच सरकार हे नक्कीच फुटाफूटिच जरी असलं तरी लोकहितार्थ निर्णय घेणं आणि लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यात पुरेपूर कंबर कसताना हे सरकार दिसतंय .

    राजकिय साक्षरता

    हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला धरून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना या विषयाला हात लागला आणि भाजपा आणि शिंदे गट यांच्या सहकार्याने हे साध्य झाल

    नक्कीच जनमत सुद्धा या निर्णयाच समर्थन करून प्रशंसा करत आहे पण काही समजकंटक या नामांतराला विरोध करून पुन्हा औरंगाबाद करू इच्छितात कदाचित ते विसरले असावेत औरंगजेब हा किती क्रूर आणि निच्च विचारसरणीचा होता .

    जात,पात आणि धर्म बाजूला ठेवता भारताचा सुजान नागरिक या नात्याने तरी मी या निर्णयाशी सहमत आहे आणी तस पाहता अस ही खासदार इम्तियाझ जलील यांचं आंदोलन पाहून त्यात त्यांचाही पूर्णतः समावेश दिसत नाही

    लोकांनकडून मिळणारा अल्पप्रतिसाद आणि आंदोलनापेक्षा त्यांच्या भोजनाच्या पंगतीचेच जास्त चर्चे आहे यावरून कळत दिशाहीन व्यक्तीकडे लोकशाहीच प्रतिनिधित्व दिल्यावर काय होत !

    नक्कीच लोकांनासुद्धा नामांतर हवं होतच आणि जे झाल ते उत्तमच कारण ज्या औरंगजेबाच्या काळात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या त्या माणसाच नाव इतिहासातसुद्धा नसायला हवं

    तर त्याच व्यक्तिच्या नावाने एखादे शहर वसवणे हे आपल्या इतिहासाला मारकच होते त्यामुळें असल्या खासदार अथवा ठराविक लोकांच्या समूहाने विरोध जरी केला तरी यात फारस लक्षदेण्या इतपत महत्वाच अस काहीच वाटत नाही.

    ‘हे स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा होती ‘

    पण ते टिकवणे ही आपली जबादारी आहे 💯

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • मनसेचं १७ वर्षांचा कार्यकाळ

    हाच तो दिवस ज्याने महाराष्ट्राला एक मराठी आणी सुसंस्कृत मराठी विचारधारेला भरभक्कम करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात झाली स्वबळावर आणि  वक्तृत्वाच्या आणि  भाषाशैलीच्या

    आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याच व्यंगचित्रकलेचा आधार घेत देशवासियांना विकासाची हमी देणार व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सद्या करू शकले.

    तोच रुबाबदारपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची नेहमीची वैशिष्ट्ये राहिली आहेत माध्यम कोणताही असो पण मराठी विचारधारेचा विचार करून मराठी संस्कृतीला साजेल अशी निर्णये घेणं यावर ते भर देतात.

    सामान्य मराठी आणि महाराष्ट्रातील माणूस यांना सरकार अथवा प्रशासनाकडून प्राथमिकता देण्यात यावा यासाठी त्यांचा लढा असतो . महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि इथ मराठी माणूसच राज्य करेल अस त्यांच मत आहे

    सगळ्यां नेत्यांमध्ये राज ठाकरे हे असे एकमेव राजकारणी आहेत जे की मत मिळवण्यावर नव्हे तर माणसं जोडण्यात त्यांचा पक्ष आणि संघटन मजबूत होतोय अस समजतात

    म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…

    पूर्वीपासूनच मनसे या पक्षाने कधी मतांसाठी राजकारण केलेलं नाही हा पक्ष एकमेव असा पक्ष आहे जो की पद नसताना सुद्धा सामान्य माणसाचे हित जपत प्रत्येक अडी-अडचणीत माणसाच्या पाठीशी खंबीर उभा राहतो.

    राज ठाकरे हे जरी मताधिक्य मिळवण्यात कमी असले तरी लोकहितार्थ निर्णय घेण्यासाठी मनसे पक्ष नेहमी बांधील असतो राज ठाकरे हे दूरदृष्टी असणारे एक सुशिक्षित आणि पुरोगामी विचारांना घेऊन विकास साधणारे नेते आहे.

    मनसे पक्ष स्थापनेला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत ह्या १७ वर्ष्याच्या काळत राज ठाकरे यांनी सामान्य व्यक्तीचे हित जपन्यात कधीही कमतरता भासू दिली नाही राज ठाकरे आणि त्यांचे विश्वासू कार्यकर्ते

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    अथवा पक्षाचे पदाधिकारि हे नेहमी राज साहेबांच्या शब्दावर चालणारे आहेत त्यामुळं लोकहित यातच मनसेच सत्तास्थापन झाल्यासारख आहे नक्कीच मनसे एक खूप कर्तृत्वशील नेतृत्व आहे

    महाराष्ट्रातील जनतेन एकदा सत्ता देऊन बघायला हव मनसे सरकार खूप मोठा अमूलाग्र बदल घडवून आणेल आणि मराठी माणसाला अजून विकासाच्या थरावर नेईल यात काही शंका नाही.

    जेव्हा राज ठाकरे भाषणात बोलतात ना येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधु, माता-भगिनींनो तेव्हा कळत राज ठाकरे साहेब आणि त्यांची विचारसरणी त्यांच्या भाषणाला उपस्थित राहणारी हजारोंची गर्दी च सांगते भविष्यात येणार ते मनसेचच सरकार

    आणि मतांची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी काम करणारे मनसे पदाधिकारी यांचा निस्वार्थीपणा हे एक महाराषष्ट्राला न उलगडणार कोड आहे….

    अश्या १७ वर्ष्याच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होऊन आणि कर्तव्य बजावणाऱ्या तमाम मनसे कार्यकर्त्यांना १७ व्या मनसे पक्ष वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • राजकिय साक्षरता

    आमदार ,खासदार आणि मंत्री हे समाजाचं नेतृत्व करतात पण जर आपला प्रतिनिधिच हा राजकीय निरक्षर असला तर कसा गोंधळ उडतो हे बघायला मिळत.

    नेमकच विधानसभेत राम सातपुते यांनी शरद पवारांचा केलेला एकरी उल्लेख हा फक्त राम सातपुते यांनाच नव्हे तर संपूर्ण सत्ताधारी लोकांनासुद्धा महागात पडल्याच दिसून येत.

    सध्याचा काळात तर बऱ्याच नेत्यामध्ये राजकीय साक्षरता हि पाहायला मिळतच नाही . पूर्वीच्या काळातही राजनीतिक वातावरण यापेक्षाहि गंभीर असायचा पण नेत्यांमधे एकमेकाप्रती आदर हा दिसून यायचा .

    लोकशाहीतील हुकूमशाह !

    जर दोन प्रतिनिधिचे आप-आपसात जमत नाही याचा अर्थ असा नव्हे की ते एकमेकांच्या विरोधातच असायला हवे प्रश्न जेव्हा जनतेचा असतो तेव्हा नेता पक्ष विसरून एकत्र येतो त्यातच त्या नेत्यांची राजकिय साक्षरता दिसून येते.

    पण हल्लीच्या काळात राजकारण्यांनी त्यांची मर्यादा ओलांडल्या आहेत ,तर राजकीय प्रतिनिधि प्रसार माध्यमासमोर वंगाळ आणि शिवीच्या भाषेत बोलतो हे कितपत योग्य आहे ?

    एक प्रतिनिधी हा नारायण राणेंची भर सभेत नक्कल करतो त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंचे सुपुत्र पत्रकारितेचा आधार घेत प्रसार माध्यमासमोर अभद्र भाष्य करतात .

    एक सुजाण नागरिक या नात्याने पाहता महाराष्ट्राच्या बदलात शरद पवार यांचं फार मोठं योगदान आहे हे सांगायची वेगळ काही गरज नसावी परंतु जर याच व्यक्तीच्या नावाने विधानसभेत विरोधी पक्षनेत्याकडुन  एकेरी उल्लेख होणं हे योग्य नव्हे.

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    महाराष्ट्राच्या राजनीतिक काळात खूप नेत्यांनी त्यांचं योगदान दिलेले आहे त्यात प्रामुख्याने स्व.बाळासाहेब ठाकरे ,शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांचं नाव अग्रेसर आहेत .

    एकीकडे असले गलिच्छ  राजकारण होतय तर दुसरीकडे 

    सत्यजित तांबे सारखे एकनिष्ठ आणि तत्ववादि लोक कमी पाहायला मिळतात ज्याच्या कुटुंबाने काँग्रेस साठी २-३ पिढ्या दिल्या त्याच माणसाला काही नेत्यांच्या उपस्थितीत पक्षामधुन बेदखल केलं जातं हे कितपत योग्य आहे ?

    एकीकडे बंड पुकारुन जो तो पदासाठी नुसती पळापळ करतोय तर मुख्यमंत्री पद आणि पक्ष सुद्धा गमव्लेल्या उद्धव ठाकरेसोबत संजय राऊत हे ठाम उभे आहेत हि खरोखर प्रशंसनीय बाब आहे…..

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • लोकशाहीतील हुकूमशाह !

    ५६ इंचीची छाती सांगणारे,भारताला भ्रष्टाचारमुक्त करणार होते आणि भारताला महासत्ता बनवून आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत करून रुपया वधारनार होता….

    नेमकं बोलले काय आणि होत काय ?

    धर्माच्या नावावर सहानुभूती तयार करून निवडणूकीपर्यंत त्यांना वातानुकूलीत वातावरणात निवडणूका जिंकायच्या .

    सध्याच्या भारताची स्थिती अशी आहे कि देवेंद्र फडणवीस यांच्या मते नोकऱ्या आहेत पण भारतीय युवकांमध्ये कौशल्य  नसल्याचा ते दावा करतात नेमक यांच्या पक्षाचं धोरण काय ?

    शिवसैनिक कधी फुटतो का ?

    हा प्रश्न आता जनतेला पडत असावा भारताला विकासाकडे नेण्याच्या गप्पा करणारे भारताला विकायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत हेच का भाजपच विकास घडवणार सूत्र ?

    एकीकडे भारताला मेक इन इंडिया म्हणत उद्योग उभारायला सांगायच आणि सामान्य नागरिक हा कसा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होईल अशी अपेक्षा दाखवून दरवेळी आर्थिक संकल्पात याच सामान्य नागरिक सोपवन्यात यश कस येईल यावर जोर द्यायचा.

    बहुचर्चित उद्योगपती अदानी यांचं एवढं काही गैरव्यवहार बाहेर येत असताना कधीकाळी अदानींसारख्या लोकांना भारत सरकारचा नेहमी पाठिंबा दर्शवनारे पंतप्रधानपदि विराजमान असलेले नरेंद्र मोदी काही बोलत का नसावे ?

    लाल सलाम !

    तेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या अर्थमंत्री कसलाही खुलासा न करता फक्त जनतेला समधानकारक असं वक्त्व्य करत भारताची कसल्याच प्रकारे आर्थिक हानी झालेली नाही असं स्पष्ट करतात या पक्षाची सगळी भूमिका पाहता असं नाही का वाटत पाणी इथेच कुठंतरी मुरतंय असं ?

    सामान्य नागरिकाच हित जपत स्वस्त साधन उप्लब्धिच भाषण देणारे कदचित विसरले असावं का कि इथं महागाई हि काँग्रेस काळापेक्षाहि  वाढली ते ?

    आणि जर खरंच हा पक्ष जर भ्रष्टाचारमुक्त आहे तर कोविड काळात संपूर्ण जनतेने दान केलेल्या PM CARE FUND च्या नावाखाली गोळा केलेल्या करोडों अब्जो रुपयांचा हिशेब का मिळत नसावा ?

    आणि जर हा निधी सरकारी नसून खासगी आहे तर याची जाहिरात या पक्षाचे लोक सरकारी यंत्रणांमार्फत का करत असावेत ?

    जगाला विकासचे स्वप्न दाखवणं आणि दुसरीकडे निर्भीड भाषण देत निडर पत्रकारिता आपल्या देशात असावी असं आव्हान करत पत्रकारितेचिच दमछाक करण कितपत योग्य आहे ?

    BBC माहितीपट बंद करून हा पक्ष त्यांची काही प्रकरणें लपवू इच्छितो का ?

    आणि जर हे पत्रकारि क्षेत्रांचा गैरवापर करत नाहीत तर का मग जगाला एकतेचा संदेश देणारी भारत जोडो यात्रा सुरु असताना पण त्यांना कव्हरेज देण्यात येत नव्हतं ?

    का सारखे-सारखे भारत जोडो यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले ?

    हुकूमशाही चालवू पाहनारा हा पक्ष किती दिवस टिकेल हे पाहणंसुध्दा मजेशीर राहणार हे मात्र नक्की पण या पक्षाचा सत्ता-उतार होइपर्यंत भारत देश हा नुकसानाच्या बाबतीत ४-५ वर्षे मागे जाऊ नाही म्हणजे झालं !

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • शिवसैनिक कधी फुटतो का ?

    हिंदुहृदयसम्राट यांच्या विचाराची नाळ धरून सार्वभौमत्वाचा अवलंब करून हिंदुत्वाच्या कट्टरतेवर एकाच विचारसरणीचे लोक सोबत घेऊन बाळासाहेबांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली

    आणि सहकारी आणि सामाजिक विकासकामे यांच्या जोरावर लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देत सुरुवात केलेला हा शिवसेना पक्ष कधी काळी या पक्षाला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं

    पण स्वबळावर बाळासाहेबांनी याची अल्पावधीत ओळख निर्माण करून राजकीय क्षेत्राला एक नवा पक्ष देऊन राजकारणात क्रांती घडवली .

    ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

    फुटीरतावादि लोकांना त्याग करून एकनिष्ठ लोक या पक्षास नेहमी महत्वाचे राहिले बाळासाहेबांनी दिलेला शब्द हा शिवसैनिकांसाठि नेहमी अंतिम राहायचा.

    महाराष्ट्राच्या राजकारणात आमुलाग्र बदल घडवून आणून बाळासाहेबांनंतर ती शिवसेनेची गादी हि उद्धव ठाकरे यांना सोपवन्यात आली एकनिष्ठ मंडळी हि साथीलाच होती

    महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

    पण काळानुसार काही मतभेद हे वाढतच गेले परिणामि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली या कारणास्तव् शिंदे गट आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले

    आणि भाजप सोबत युती करून महराष्ट्रात सत्तापालट केली एकीकडे भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र आले असता भाजप पुन्हा सत्तेत येणं हि त्यांच्यासाठि खूप हनिकारक गोष्ट होती आणि ती गोष्ट या घटनेने सत्यात आली.

    एकीकडे भाजप पक्षातील लोक म्हणतात महविकास आघाडीमुळे शिवसेना संपली तर शिंदेगटसुद्धा या युतिने खुश बघायला मिळतोय.

    यातूनच नवीन वाद पेटला शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची आणि न्यायालयानेही शिवसेना एकनाथ शिंदे यांची म्हणत त्यांना धनुश्यबाण देऊ केलं पण यात उद्धव ठाकरे यांच्याप्रति लोकांची सहानुभूती पाहायला मिळाली

    आता बघायचं ते हि युती किती काळ टिकते आणि उद्धव ठाकरे पुन्हा पक्षबांधणी कशी करतात नक्कीच हि राजकीय खेळी भविष्यात लोकांना एकनिष्ठतेची जाणीव करून देणारी असेल .

    पण मनात विचार येतो तो कि,

    बाळासाहेब असते तर हे प्रकरण कसं पाहायला मिळालं असत म्हणजे नेमक यात परिस्थिती काय राहिली असती ?

    शिंदे आणि त्यांचें सहकारी हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध का गेले ?

    जर खरच शिवसैनिक आहात तर मग बोलून अंतर्गत वाद मिटवून शिवसेना आणखी बलाढय़ करू शकला नसतात का ?

    आज जर बाळासाहेब् असते तरी शिंदे गटाने हेच केलं असत का ?

    आणि खास म्हणजे भविष्यात आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळा गट म्हणून पाहायला मिळेल का भाजप चा अंतर्गत समूह म्हणून दिसेल ?

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • लाल सलाम !

    कॉम्रेड ऐकायला किती मस्त वाटतं ना पण याचा नेमका याचा अर्थ तर ते म्हणजे कॉ.गोविंद पानसरे . त्यांच पूर्ण जीवन हे सामाजिक चळवळीत गेले शालेय जीवनापासून सामाजिक कोणत्याही हक्कासाठी चळवळीकडे आकर्षित झालेले पानसरे .

    हे कोणत्याहि बाबतीत तडजोड न करता शोषितांच्या हक्कासंबंधी लढणारे एक ओळखले जातात सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरोगामित्वाची दूसरी बाजू म्हणवले पानसरे हे व्यवसायाने वकील होते

    माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी  असंघटीत  क्षेत्रातील  लोकासाठी न्यायाचा लढा दिलेला आहे त्यांनी शेतमजूर आणि  घरकामगार आणि इतर लोकांच प्रतिनिधित्व करून कोल्हापुरातील टोलविरोधि आंदोलनात मुख्य सहभाग नोंदवून ते अग्रस्थानी उभे राहिले.

    चळवळीमार्फत न्याय देणारे पानसरे यांना साहित्यीक क्षेत्रात आवड  असल्या कारणाने लेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात शांतता आणि धर्मनिरपेक्षताच्या धोरणाचा अवलंबन  करणारे

    पानसरे यांच्या अनेक लेखनापैकी  ‘शिवाजी कोण होता’ हे सुप्रसिध्द  लेखन  जबाबदार आणि इतिहासाशी इमान ठेवणारी महाराजांची प्रतिमा समाजापुढे उभी करते.

    २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

    आपल्या  सखोल अभ्यासू वृत्तिने  समाजाला ओळख करून देणारे पानसरे हे अनेकदा  गौरविले सुद्धा गेलेले आहेत.

    पण  काही समाज विरोधी लोकांना  ही गोष्ट सहन होत नसावी दि.२० फेब्रुवारी २०१५ सोमवार रोजी पानसरे हे आपल्या पत्नीसोबत बाहेर सकाळी ९ वाजता फेरफटका मारायला गेले असता

    त्यांच्यावर अज्ञात २ व्यक्तींनी गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यूने असंघटीत लोकच नव्हे तर संपूर्ण महराष्ट्र हा गहिवरून गेला.

    दाभोळकर यांना गमावलेल्या महराष्ट्राने पुन्हा एकदा एक विचारधारा गमावली सतत लोकशाहीला मारक अश्या या दोन घटना घडल्या.

    लाल सलाम च्या घोषणा देत संपूर्ण महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप दिला. पण भारतातील पानसरे यांच्या विचारधारेला स्वीकारून अनेक तरुण समाजापुढे पानसरे  यांचे विचार मांडतोय हि अभिमानाची बाब आहे.

    शारीरिक मृत्यू पत्करून विचारधारेच्या माध्यमातुन जगणं हे त्यांना जमलं अश्या या थोर व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त,

     विनम्र् अभिवादन !

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
    Facebook : Political Wazir

  • माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर

    महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी यांचा राजीनामा मंजूर झाला असून मा. रमेश बैस यांची नियुक्ती राज्यपाल पदी झालेली आहे.महाराष्ट्रा बरोबरच इतर ही काही राज्यातील राज्यपाल उपराज्यपाल बदलले आहेत.

    खर म्हणजे कधी नव्हे ते राज्यपाल हे पद गेल्या 4 वर्षात खुप चर्चेत आलं. त्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर बहुतांश वेळा राज्यपालांनी आपल्या अधिकारांची जाणीव महाविकास आघाडीला करून दिली,

    त्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारला वेगळी वागणुक देत असल्याचा आरोप केला.वेगवेगळ्या प्रसंगातून तत्कालीन मुख्यमंत्री मा.उद्धव टाकरे ,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अनेकदा तशी नाराजी मीडियाला बोलून सुद्धा दाखवली.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान

    मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर नवीन सरकार स्थापन करताना झालेली घाई,किंबहुना राज्यपालांनी दाखवलेली तत्परता अनेकांच्या भुवया उंचावून गेली.

    शिंदे-फडणवीस सरकार यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर महाविकास आघाडी चे शिल्पकार मा. शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना पेढा भरवल्याचे अधोरेखित केले,

    आजपर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवात आपण एकदाही राज्यपालांनी कोणाला पेढा भरविला अस पाहिलं नसल्याचे नमुद केले आणि राज्यपालांच्या निःपक्षपाती वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चटकन जनतेला देखील राज्यपालांची चूक लक्षात आली.

    राज्यपाल नियुक्त 12 आमदार:ततत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांद्वारे नियुक्त होणाऱ्या 12 आमदारांना नियुक्ती सरकार अल्पमतात येईपर्यंत न दिल्याने याही प्रकरणात राज्यपालांच्या निःपक्ष भूमिकेवर आघाडी सरकारने राज्यपाला समोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ,

    आजचे विरोधक आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी राज्यपाल कुणाच्या सांगण्यावरून नियुक्ती थांबवत आहे अशी टीका सुद्धा केली.आज राज्यपालांच्या राजीनाम्या नंतर सुध्दा हा प्रश्न प्रलंबीतच आहे असे म्हणता येईल

    आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…

    महापुरुषांचा अपमान:

    महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना इतरांबरोबर करणारे राज्यपाल नेहमी राजकारण्यांच्या निशाण्यावर असतात,पण छत्रपतींच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्या नंतर सामान्य नागरिकांचा व अनेक शिवप्रेमी संघटनांच्या रोषाला देखील राज्यपालांना सामोरे जावे लागले

    अनेक ठिकाणी आंदोलन,चक्काजाम करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजी राजे भोसले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून तात्काळ राज्यपालांना हटवा या आशयाचे पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या,

    उदयनराजे यांना तर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेले सुद्धा आपण पाहिले.महाविकास आघाडी ने तर थेट मुंबई आझाद मैदान येथे ईतर मागण्या बरोबर राज्यपाल हटाव या मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन केले अनेक संघटनांनी आणि शिवप्रेमी लोकांनी आपला सहभाग या मोर्चात नोंदवत ऐतिहासिक स्वरूप मोर्चाला प्राप्त करून दिले.

    महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा देखील अपमान राज्यपालकडून झाला

    महाविकास आघाडी मधील नवीन मंत्राच्या शपथविधी सोहळ्यात सगळे नियमानुसार करवुन घेणारे राज्यपाल शिंदे-फडनवीस सरकार च्या मंत्रांच्या शपथविधी सोहळ्यात free hand देतांना दिसले,याही प्रकरणात त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

    आपल्या 4 वर्ष्याच्या कार्यकाळात अनेक वाद राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओढवून घेतले.पण सरकार कुठलेही असो त्यांना शिस्त लावण्याचे काम राज्यपालांनी करून दाखवले यात कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही.

    आजपर्यंत च्या सर्व राजपालांपेक्षा वादळी कारकीर्द कोश्यारी साहेबांची राहिली अस म्हणायला वावग ठरणार नाही.मूळचे उत्तराखंड चे असणारे राज्यपाल यांना थंडगार वातावरणाची सवय असतांना देखील,त्यांच्या उपस्तिथीत महाराष्ट्राचे राजकीय तापमान त्यांनी वाढविले ऐवढ मात्र नक्की!

    असो,त्यांना येणाऱ्या काळात उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना,आणि नवीन राज्यपालांना मनस्वी शुभेच्छा….

    तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता :

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता :
    Facebook : Political Wazir

  • युवक व युवतींसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना करणारे डॉ. अमलकार पदवीधरांसाठी पहिली पसंत

    मंडळी राजकारण म्हटलं की आपल्याला माहितीच असेल की काही राजकीय नेते आपल्या राजकीय इर्शेपोटी सर्वसामान्य तरुणांचे भवितव्य खराब करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही.

    मात्र काही राजकीय नेते असे आहेत की, जे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून युवक आणी युवतींच्या हक्कासाठी धावणार असचं एक नेतृत्व म्हणजे विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार असलेले प्रा. डॉ. अनिल अमलकार.

    जेव्हा वंचितच्या डॉ. अमलकारांनी पदवीधरांच्या रोजगारासाठी आंदोलनामध्ये घेतली होती टोकाची भूमिका…

    होय मंडळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचंड विश्वासात असलेलं हे नेतृत्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य पदवीधर तरुणांसाठी आणी जनतेसाठी झुंजत असलेल्या डॉ. अनिल अंमलकार यांच्या सामाजिक कार्याची दखलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली.

    आणी अमरावती पदवीधर मतदार संघातील पदवीधर तरुणांची दयनीय अवस्था पाहता कुठेतरी परिवर्तन व्हावं या अनुषंगान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने त्यांना विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवार म्हणून नेमण्यात आले.

    आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र

    तरुणांसाठी आयटीआय महाविद्यालयाची स्थापना

    मंडळी अमरावती पदवीधर मतदार संघातील तरुण हा आधुनिक तंत्रज्ञाच्या शिक्षणापसून वंचित राहता कामा नये. म्हणून स्वखर्चातून युवक आणी युवकांसाठी डॉ. अनिल अंमलकार यांनी अमरावती येथे आयटिआय महाविद्यालायची स्थापना केली.

    ज्यामध्यमातून अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून आधुनिक तंत्रज्ञांनांच शिक्षण घेऊन बाहेर पडू लागला. परिणामी योग्य ती शिक्षा लाभल्याने अनेक तरुणांना रोजगार पण मिळू लागला.

    डॉ. अनिल अमलकार यांचं तरुणांसाठी हे काम त्यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकत. येत्या ३० जानेवारी २०२३ ला अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून सगळीकडे चर्चा रंगली आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकार.

    गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. वंचितच्या डॉ. अनिल अंमलकार यांचा विजय अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ निश्चित मानल्या जात आहे.

    तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता

    तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता

    facebook : Political Wazir