Author: admin

  • घोटाळा केला नसेल तर संजय राऊत यांनी न्यायालयात येऊन सिद्ध करावे – चंद्रकांत पाटील

    मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे.

    संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी आपली बाजू मांडत म्हटलं की,

    ” कुठली प्रॉपर्टी ? आम्ही घरचे खूप श्रीमंत लोक आहोत का ? आम्ही स्वतः केलेल्या मेहनतीमधून ही मालमत्ता उभी केली आहे.”

    संजय राऊत यांच्या या विधानाचा विरोध करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

    काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

    संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे त्यांनी भाजपवर टीका केली होती. याच प्रतिउत्तर देताना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केल आहे. ते म्हणाले की,

    ” एक पैशाचाही घोटाळा केला म्हणून संजय राऊत यांना बाजूला होता येणार नाही. घोटाळा केला नसेल तर त्यांनी न्यायालयातून ते सिद्ध करावे.”

    अस चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान केलं आहे. मात्र आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे केलेल्या भाषणामध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावायला सांगितल्याने महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून जनतेची मतं काबीज करण्यासाठी राज ठाकरेंचा हा खटाटोप पाहून सम्पूर्ण महाराष्ट्रात त्यांची टीका केली जात आहे.

    राज ठाकरे यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भोंगे लावलेले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कृत्यातून महाराष्ट्राची सामाजीक तेढ निर्माण होण्याची धोका नाकारता येत नाही. मात्र या सर्व गोष्टींचा काही एक विचार न करता राज साहेब आपल्या मतावर ठाम आहे.

    राजसाहेबांच्या या कृत्याचा विरोध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये झालेल्या एका सभेमध्ये राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 

    काय म्हणाले अजित पवार? 

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलेल्या हनुमान चाळीसाच्या वादावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीमध्ये बोलत असताना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले की,

    “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे कामं करतात. कित्येक वर्ष लोक एकमेकांना गुण्यागोविंदाने साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते अस करा इथं हा भोंगा लावा तिथं तो भोंगा लावा सांगत आहेत. अरे भाषण करणं सोपं आहेरे बाबा. पण त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बर वाटण्यासाठी , निवडणूकीवर डोळा ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषण हे फुले शाहू आंबेकरांच्या विचारांच्या लोकांना पटणारी नाहीत. चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहे काय?”

    असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

  • माझ्या मालमत्ता जप्तीची बातमी मी टीव्हीवर बघितली- संजय राऊत

    मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अचानक झटका बसला आहे.

    भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊत यांचा एकप्रकारे वचपाच काढण्यात आला असावा असे म्हणणं वावग ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले संजय राऊत? 

    संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करून केंद्र सरकारमध्ये बसून असलेल्या भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांचा एक प्रकारे वचपा काढला आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी आपल मौन सोडलं आहे. यावर ते म्हणाले की,

    ” कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. मी आता टिव्हीमध्ये पाहिलं की मालमत्ता जप्त केली आहे. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे काहीतरी म्हणतात ना, एक रुपया जरी गैरव्यवहाराचा आमच्या खात्यामध्ये आला असेल आणि त्यामधून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.”

    अस संजय राऊत यांनी भाजप वर टीका करताना म्हटल आहे. मात्र आता चिघळलेल हे सर्व प्रकरण कुठलं वळण घेईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • वेश्यांच्या पैशावर डल्ला मारणार सरकार – देवेंद्र फडणवीस

    मंडळी महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. राजकारणाची परिभाषा गेल्या काही काळात महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुडाची होत चाललेली आहे. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावत आहे.

    त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच काय? हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य नागरिकाला भुरळ घालणारा आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चालू असलेला वादवादीचा खेळ चांगलाच रंगत आहे , तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तिसरा पाय काढला आहे.

    त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता कुठेच दिसत नाही. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी प्रमाणे जनतेचे प्रश्न वगळून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 

    काय म्हणाले फडणवीस ? 

    मंडळी राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणाच्या मुद्द्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरोधात घेतलेला मुद्दा महाराष्ट्रात गाजायची शक्यता आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की,

    ” सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणार सरकार.”

    या शब्दात फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. पुढे बोलताना त्यांनी समृद्धी महामार्गाचा मुद्दा उचलत राज्यसरकारला आणखी एक टोला लावतांना म्हटलं की,

    ” समृद्धी महामार्गावरून कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव कोणी मिटवू शकत नाही.”

    अस प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले. फडणवीसांच्या या आरोपावर राज्य सरकार आता काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • तीन ऋतू असतात तसे राज ठाकरे आहेत – गुलाबराव पाटील

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे.

    या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले गुलाबराव पाटील ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलबराव पाटील यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

    ते म्हणाले की,

    “उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसेच राज ठाकरे यांचे तीन ऋतू आहेत, कोणत्याच ऋतूला यांना काहीही मिळत नाही.”

    अस ते म्हणाले. मात्र गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • राज ठाकरेंचं इंजिन कुठे जात आहे हेपण त्यांना माहिती नाही- छगन भुजबळ

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.

    सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.

    भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    काय म्हणाले भुजबळ? 

    मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ते म्हणाले की,

    ” राज ठाकरे यांच इंजिन कुठल्या दिशेने जात आहे याचं भानसुद्धा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही राहल आहे.”

    अस ते म्हणाले. मात्र भुजबळांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • मी मोदीसाहेबांव्यतिरिक्त दोन कोटींपेक्षा अधिक लोकांना मारणार आहे – अज्ञात

    मंडळी भारतीय देशामध्ये नेत्यांवर अज्ञातांचा हल्ला होणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र अशा गोष्टी पुन्हा घडणे हे देशाला आणि माणुसकीला काळिमा फासणार आहे. याआधी भारतीय देशाच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांना ठार केलं होतं.

    त्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली होती आणि आता सुद्धा काही अज्ञातांनी प्रधानमंत्री मोदींसाहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणारा मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि इतर काही तपास यंत्रणांना आल्याची माहिती समोर आली आहे.

    आपल्याकडे २० आरडीएक्स असून देशातल्या २० महत्वाच्या शहरांमध्ये मोठे ब्लास्ट करणार असल्याच या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार एनआयएन तपास सुरू केला असून इमेल नेमका कुणी पाठवला आहे, याविषयी शोध सुरू करण्यात आला आहे. हा इमेल एनआयए मुंबईला महिन्याभऱ्यापूर्वीच आला असल्याचं तपासात माहीती पडलय. हा इमेल इतर तपास यंत्रणांना देखील पाठवल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. 

    देशातलं मोठी व्यक्ती म्हटली की अशाप्रकारच्या धमक्या येतच असतात. किंवा देशातील जनतेला भरकटवायसाठीपण अशा गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. हे प्रत्येक समजदार नागरिकाने समजून घेणे महत्वाचे आहे. 

    आज आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांसाठी अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. मात्र सरकार अशा मुद्द्यांपासून जनतेच लक्ष विचलित व्हावं यासाठी असल्या प्रकारचे खेळ खेळले जाऊ शकतात. हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र अखेर सत्य काय आहे हे राष्ट्रीय यंत्रणेच्या तपासामध्येच माहिती होणार.

  • भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार

    मंडळी कश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये वादावादीच वातावरण निर्माण झालं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद.

    शरद पवारांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी द्यायची गरज नव्हती असही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

    “काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आधार घेत भाजपा जनतेमध्ये चुकीचा गैरसमज पसरवत असून संपूर्ण देशात विषारी वातावरण पसरवण्याच काम करत आहे.”

    असा आरोप शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर केला आहे. याआधीसुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी या चित्रपटाला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारवर टीका केली होती.

    महाराष्ट्रातील विविध संघटना, संस्था आणि विविध प्रकारच्या समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. 

    काय म्हणाले फडणवीस ?

    मंडळी कश्मीर फाईल्स या चित्रपटाचार आधार घेऊन केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये विषारी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अस शरद पवार यांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर प्रतिहल्ला करत उत्तर दिलं आहे.

    ते म्हणाले की,

    ” अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्यामध्ये अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे त्यातून अशी वक्तव्य येतात.”

    अस फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा वाद आता कुठल्या वळणावर जातो यावर सर्वांचं लक्ष लागूंन आहे.

  • भाजपसोबत भविष्यात युती नाहीच- आदित्य ठाकरे

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दिवसेंदिवस बराच ट्विस्ट येत आहे. त्याच कारण अस की, आता महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी हे लढाई वेगात चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत, तर भाजप नेते महाविकास आघाडी नेत्यांवर टीका टिपणी करत आहेत.

    मात्र आता कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आपली भाजपसंबंधी भविष्याच्या वाटचालीविषयी म्हटलं की,

    ” जो व्यक्ती आपल्यावर अन्याय करतो, आपल्याशी जबरदस्ती करतो आपण त्याच्याशी मैत्री करत नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाची भूमिका पण तेच आहे म्हणून भविष्यात त्यांच्याशी युती होणे शक्य नाही.”

    अस अदित्य ठाकरे यांनी विधान केले आहे. तर या संपूर्ण विधानावर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे.

    काय म्हणाले दरेकर?

    मंडळी भाजप नेहमी अन्याय करत आली असल्याकारणाने त्यांच्यासोबत भविष्यात युती होणे शक्य नाही. अस विधान आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजप नेते यांनीसुद्धा आदित्य ठाकरे यांना टोला देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    ते म्हणाले की,

    ” शिवसेनेन नेहमी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे. मग अशामध्ये भाजप शिवसेनेपुढे कधीच युतीचा प्रस्ताव ठेवूच शकत नाही.’

    अस प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा उद्धव ठाकरे नेहमी पाठीमध्ये खंजर खुपसत आली आहे. अस विधान केलं होत. मात्र प्रविण दरेकरांच्या या प्रतिक्रियेवर आता शिवसेना काय प्रतिउत्तर देईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • पवारांवरच्या वादग्रस्त विधानावरून सदाभाऊ खोत यांना मिटकरींचा टोला

    मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांची खिल्ली उडवणे याला कुठलाही राजकीय नेता अपवाद नाही. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ईडीच्या चौकशीचा धुमाकूळ चालू असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय क्षेत्रातआणखी एक ट्विस्ट आणला आहे.

    रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं असा सल्ला दिला आहे. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्या संबंधी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

    ते म्हणाले की,

    ” शरद पवार हे महान व्यक्ती आहे. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी आडनाव बदलून ते ‘आगलावे’ करावं.”

    अशी टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केली आहे. यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आली असून अद्याप शरद पवारांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. 

    काय म्हणाले मिटकरी? 

    सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,

    ” शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत. तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्यावर उडू शकते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वतः बोलत नाहीत. यामागे फडणवीसांचा मास्टरमाईंड आहे. अस माझं स्पष्ट मत आहे.”

    अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मात्र आता सदाभाऊ खोत यांना शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.