Category: बातमी

  • एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

    मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं आणि फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झालं.

    या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर चांगलीच टीका केली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

    या व्हिडीओमध्ये मिटकरी हे एकनाथ शिंदे यांच्या चक्क पाया पडतांना दिसत आहे. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्या जात आहे.

    आपल्याला माहिती असेल की अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याअगोदर महाराष्ट्रात बहू चर्चित असणाऱ्या संभाजी ब्रिगेड या पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांना याच पक्षाने व्याख्यानाकरिता कार्यक्रम उपलब्ध करून दिले.

    ज्यामाध्यमातून मिटकरींनी आपली चांगलीच छाप राजकारणामध्ये सोडली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आलं.

    मात्र

    “अमोल मिटकरी यांनी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे गुलामी स्वीकारली का ?”

    असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. संभाजी ब्रिगेडकडून त्यांना चांगलच ट्रोल केल्या जात आहे. 

    RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री

    मला ट्रोल करणारी लावारस कारटी- मिटकरी

    एकनाथ शिंदे यांच्या पाया पडण्यावरुन ट्रोल होत असलेल्या अमोल मिटकरींना समाज माध्यमांद्वारे प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी नेटकऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. प्रतिक्रिया देतांना त्यांनी म्हटलं की,

    ” हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. आणि ते माझ्यासाठी नेहमी वंदनीय आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो. नरेंद्र मोदिसुद्धा शरद पवारांच्या पाया पडतात. कारण ते मोदींना वंदनीय आहेत. आणि लावारस कारट्यांना काही काम नसल्यामुळे ते मला ट्रोल करत असतात.”

    अस अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!

    मान्य आहे की कोवीड मध्ये आर्थिक स्थिती मध्ये जागतिक उलाढाल झाली.

    भारतीय अर्थव्यवस्था त्या पासून दूर गेली नव्हती तरीही आमच्या देशात आम्ही ऑक्सिजन विना शेवट स्विकारुन सुद्धा राष्ट्र प्रथम म्हणून जागतिक स्तरावर देशाचे नावलौकिक करणारे मा. प्रधानमंत्रीच्या प्रत्येक निर्णय स्विकार केला.

    नंतर उत्तर प्रदेश असू द्या, मध्य प्रदेश असू द्या किंवा सध्या महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी सरकार सुध्दा स्थापन झाले…

    जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…

    पण अच्छे दिन आने वाले है ही भावनिक साद घालून जी सत्ता प्राप्त झाली त्या देशातील शिक्षण क्षेत्रात १८ %  GST ?? पेन्सिल चे नोक करणारे शॉर्पनर पासून मुलांच्या पुस्तक वर जिएसटी?

    ज्या देशात आजही गरिबी अभावी शिक्षण अपुर्ण राहते तिथे शैक्षणिक साहित्य वर वाढीव जिएसटी लावून नेमके कोणते मास्टरस्ट्रोक मारले आहे मोदीजींनी ?

    १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

    खायच्या वस्तू वर सुद्धा जिएसटी वाढीव केले, गहू तांदूळ सारख्या अन्नधान्य वरही जिएसटी वाढवला….

    बरं जगणं तर जगणं…..स्मशानभूमीत कंत्राटी वर १८% जिएसटी??

    जेव्हा देशात आर्थिक स्थिती योग्य नव्हते तेव्हा नवीन सांसद चे बजेट नेमके उभे कशासाठी झाले ??

    समर्थक आहे मोदीजींचे पण शिक्षण विकत घेण्यासाठी मेळघाट सारख्या असंख्य गरिबांच्या शिक्षणाची पर्वा असु नये एवढा अंधसमर्थक नाही…..

    Inflation हा आर्थिक परिस्थिती वर सुनिश्चित होतो म्हणून जागतिक नोबेल नामासाठी लोकांच्या परिस्थिती चे deflation करायचे नसते….

    अक्षय चंदेल….

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?

    मंडळ राजकारण हे क्षेत्र अस आहे की, राजकीय नेत्यांचे चाहते जरी लाखो असले तरी त्यांच्या विरोधात पण काही लोक असतात. जे कधीही राजकीय नेत्यांसाठी धोका निर्माण करू शकतात.

    हो मंडळी काही दिवसांपूर्वी असच काही घडलं होत जपान या देशामध्ये. जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांची जापनच्या नारा शहरामध्ये भाषण करत असताना एका अज्ञाताने गोळ्या झाडून भर रस्त्यात हत्या केली.

    ज्यामुळे संपूर्ण जपान शहरात खळबळ उडाली आहे. जपानमध्ये येत्या काळात निवडणूक होत असल्याकारणाने आबे हे खूप दिवसांपासून तिथल्या प्रत्येक शहरामध्ये जाऊन भाषण करत होते.

    भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…

    मात्र नारा शहरामध्ये भाषण करत असताना एक अज्ञात तिथे आला आणि त्याने आपल्या बंदुकीमधून दोन गोळ्या आबेंवर झाडल्या. ज्यामुळे आबेंच्या मानेमधून रक्त निघायला लागलं.

    आरोपीला त्याच ठिकाणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. आबेंना अवघ्या काही क्षणामध्ये नारा शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र पाच तास चाललेल्या उपचारानंतर आबे यांचा मृत्यू झाला.

    आबेंना रुग्णालयात दाखल करतेवेळी त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत हजर होत्या. आबेंची हत्या करणाऱ्या आरोपीने पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं की,

    “आबेंच्या नीतीपासून सहमत नसल्यामुळे मी त्यांची हत्या केली.”

    आबे हे सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे जपानचे माजी प्रधानमंत्री होते. 

    आणि त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आले

    आबेंच्या हत्येवर मोदी काय म्हणाले? 

    मंडळी जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या हत्येनंतर जपानमध्ये सगळीकडे शोककळा पसरली आहे. त्यावर भारतीय देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी म्हणाले की,

    “जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे हे माझे चांगले मित्र होते. त्यांची हत्या ही निंदनीय आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल संपूर्ण भारतीय देशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे.”

    अस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट

    मंडळी राजकारण म्हटलं की प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्याला अशी अपेक्षा असते की, राजकारण या क्षेत्रात आपण सर्वोत्कृष्ट पदावर असायला हवं. मात्र राजकीय नेत्यांचा हा अट्टहास कधी कधी पक्षासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकतो.

     

    असच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं होत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नितिन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रंगलेल्या शीत युद्धाचा नागपूरमधील शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये चांगलाच गौप्यस्फोट झाला होता.

     

    आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

     

    जेव्हा नागपूरमधील भारतीय जनता पक्षाचा  विषय येतो. तर गडकरी आणि फडणवीस असे दोन गट नागपूरमध्ये भाजपचे मानले जातात.

     

    पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये तत्कालीन भाजप आमदार अनिल सोले जे गडकरींचे एकनिष्ठ मानले जातात आणि दुसरीकडे महापौर संदीप जोशी जे फडणवीसांचे एकनिष्ठ मानले जातात.

     

    या दोघांमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची उमेदवारी कोणाला मिळणार? अशी झुंज लागली होती. पण खरं पाहिलं तर ही झुंज सोले आणि संदीप जोशी यांच्यात नसून ती गडकरी आणि फडणवीस यांच्यात होती. अस म्हटल्या जात.

     

    मात्र उमेदवारीची तिकीट अखेर फडणवीसांचे चाहते असलेल्या जोशी यांना मिळाल्यानंतर गडकरी आणि गडकरी गटामध्ये फडणवीसांबद्दल अधिकच नाराजी निर्माण झाली होती. परिणामी जोशी यांच्या प्रचाराला गडकरींनी एवढं मनावर घेतलं नाही.

     

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

     

    अखेर ३० वर्षांपासूनचा भाजपचा गड ढासळला 

     

    शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये गडकरींच्या माणसाला तिकीट नाकारल्याने गडकरींनी ही निडवणूक एवढी मनावर घेतली नाही. आणि प्रत्येक निडवणुकीमध्ये ज्या प्रमाणे गडकरींच नाव घेऊन निवडणूका जिंकल्या जात होत्या.

     

    त्याप्रमाणे गडकरींच नाव प्रचारात वापरल्या गेलं नाही. परिणामी याच निवडणूकीत भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. या घटनेने गडकरी-फडणवीस वादाचा सगळीकडे गौप्यस्फोट झाला होता.

     

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

     

     

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…

    मंडळी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात अचानक केलेला बंड आणि त्या बंडावरून सरकार कोलमडन अशाप्रकारच्या एकंदरीत अवघ्या थोड्याच कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थगित झालं आणि त्याजागेवर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात उभं झालेलं आहे.

    दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये विजय झाला आणि ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले आहे. त्यांना एकूण १६४ मते मिळाली.

    उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मात्र विधानसभा सभागृहात बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर धुवाधार फटकेबाजी केली.

    त्यांनी सर्वात पहिला निशाणा भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर साधला. ते म्हणाले की,

    ” सभागृहामध्ये पहिल्या रांगेत बसलेले भाजपचे अर्ध्यापेक्षा जास्त पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच भाजपमध्ये गेले आहेत.”

    पुढे बोलताना अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेल्या राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नार्वेकरांना उद्देशून अजित पवार म्हणाले की,

    ” नार्वेकर ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षातील नेतृत्वाशी ते मुद्दाम जवळीक साधतात आणि हळूच मग स्वार्थ जोपासतात. ज्याप्रमाणे आधी शिवसेनेत असतांना त्यांनी आदित्य ठाकरेंशी जवळीक साधली आणि स्वार्थ जोपासला.”

    अस टोला अजित पवार यांनी नार्वेकरांना लगावला. 

    एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    अजित पवारांची शिंदेवर अप्रत्यक्ष टीका

    विधानसभा सभागृहात बोलत असतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटलं की,

    ” शिंदे साहेब तुम्ही जर माझ्याकडे येऊन कानात सांगितल असत की, उध्दव साहेबांचे अडीच वर्षे पूर्ण झाले, आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर, मी उध्दव साहेबांशी बोललो असतो.”

    असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर लगावला. अजित पवारांच्या या विधानाने संपूर्ण सभागृह हसून उठलं.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”

    मंडळी गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

    विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

    एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    स्व. बाळासाहेब ठाकरे व आंनद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आपली भूमिका एकनिष्ठतेने बजावत होते.

    मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अचानक पुकारलेला बंड हा शिवसेना पक्षामध्ये नक्कीच मोठी तफावत निर्माण करणारा होता.

    ४० आमदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्या जाण्याने उध्दव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार टिकवणे अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी दिनांक ३० जून २०२२ आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला…

    मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटलं आहे की,

    ” एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.”

    अशाप्रकारच अप्रत्यक्ष विधान राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंवर केलं आहे. एएनआयच्या एका बातमीनुसार राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला बहुमत चाचणी वेळी पाठिंबा देण्याचे दर्शवले होते.

    देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीकरीता पाठिंबा देऊन मदत करण्यासाठी राज ठाकरेंना फोन करून विनंती केली होती. यावर राज ठाकरेंनी ती विनंती स्विकारली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राजू पाटील हे एकमेव आमदार आहे.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • एकनाथ शिंदे फक्त ११ दिवसांचे मुख्यमंत्री? रुको पिक्चर अभि बाकी है।…

    मंडळी महाराष्ट्रातील राजकारण हे सद्ध्या कुठलं वळण घेत आहे? याचा अंदाज राजकिय समीक्षकांशिवाय इतरांना येणे कठीणच म्हणावं लागेल.

    शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आपल्या सोबत घेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केल आणि महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं.

    ज्यामुळे उध्दव ठाकरे यांच मुख्यमंत्री पदही गेलं. त्यानंतर शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन १६ अपक्ष आमदारांसोबत सरकार स्थापन करण्याच ठरवलं.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    सर्वांना शेवटपर्यंत वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

    मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते सरळ प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येतील यामुळे शहा आणि मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्री न होण्यात महत्वाची भूमिका बजावली असावी असा अंदाज राजकीय समीक्षकांकडून वर्तवल्या जात आहे.

    मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    परिणामी एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र आता यामध्ये ट्विस्ट असा आहे की, शिंदेंना भाजपसोबत बहुमत सिद्ध करावं लागेलं.

    दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी बंड केलेल्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्याची सुनावणी येत्या ११ जुलैला होणार आहे. 

    अमोल मिटकरींच्या ट्विटने नवा ट्विस्ट

    मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत केलेलं ट्विट सद्ध्या चांगलच व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलं आहे.

    त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

    “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२ असू शकते.”

    असा टोला मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भात येत्या ११ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार असून सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे.

    त्यामुळे शिंदे सरकार राहणार की नाही याबद्दल अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. म्हणून मंडळी

    “पिक्चर अभि बाकी है।”…

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?

    मंडळी अस म्हणतात की

    “राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर विश्वास करायचा नसतो मग परक्यांवर कसा करायचा?”

    गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे सर्वसाधारण माणसाच्या डोक्यापलीकडच होत. अडीच वर्षांपासून चालू असलेलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणातच कोलमडून पडलं.

    रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला.

    शेवटपर्यंत सर्वांना वाटत होतं की, देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र अचानक पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं.

    सगळं सुरळीत असतांना मग अचानक फडणवीस साहेब मुख्यमंत्री का झाले नाही? या मागे मोदी शहांनी फडणवीसांविरोधात आखलेल षड्यंत्र तर नसावं?

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    मोदी-शहांतर्फे फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम

    मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्याच पक्षातील उत्तम नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम कसा काय केला? हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल.

    तर मंडळी नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी या भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये आधीच २०२४च्या प्रधानमंत्री पदाची स्पर्धा लागलेली आहे.

    एकीकडे प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये योगी आदित्यनाथ यांची अचानक आणि अनपेक्षित झालेली एंट्री ही मोदी आणि शहांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. उत्तर प्रदेशच सरकार हातामधून जाऊ नये म्हणून योगींना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.

    मात्र योगींची राजकीय नेतृत्वाची छाप प्रधानमंत्री पदाची दावेदारी ठोकून गेली. दुसरीकडे नितीन गडकरी हे सुद्धा प्रधानमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये अग्रेसर होते. मात्र त्यांनासुद्धा हळूहळू मोदी-शहांनी स्पर्ध्येमधून बाद केलं आहे.

    अशामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर त्यांचं राजकीय वजन केंद्रात नक्कीच वाढलं असत. आणि प्रधानमंत्री पदाच्या चालू असलेल्या स्पर्ध्येत मोदी, शहा आणि योगीनंतर फडणवीसांच नाव येऊ नये म्हणून यावेळेला फडणवीसांना मुख्यमंत्री न होऊ देण्यात मोदी आणि शहांचा सिंहाचा वाटा होता अस म्हणणं वावग ठरणार नाही.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • रिक्षाचालक ते मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे

    मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात.

    महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले.

    ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला.

    काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला.

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. 

    एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. २००४ पासून ते ४ वेळा शिवसेनेकडून आमदार आहेत.

    आणि आता शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेऊन त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir

  • असदुद्दीन ओवेसी म्हणाले उदयपूर हत्याकांड…

    मंडळी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात अनेक ठिकाणांवरून नुपूर शर्मा यांचा विरोध करण्यात आला होता.

    मात्र राजस्थानमधील एका शिवणकाम करणाऱ्या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्या तरुणाची काही माथेफीरुंकडून राजस्थान येथील उदयपूरमध्ये मंगळवार दिनांक २८ जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.

    बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून

    या हत्येनंतर राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी आंदोलकांकडून निदर्शने केली जात असून संपूर्ण राज्यात अस्थीरतेच वातावरण पसरलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून सर्वांना शांतता राखण्याच आव्हान केले आहे.

    त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की,

    ” उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा असे माझे आव्हान आहे.”

    अस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. उदयपूर येथील घटनेचा निषेध करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की,

    ” उदयपूरमध्ये झालेल्या घटनेबद्दल मा. प्रधानमंत्री यांनी सर्वांना शांततेच आव्हान करावं आणि संबोधित करावं.”

    अशी विनंती गहलोत यांनी मोदी यांना केली आहे. 

    राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कशी लागू होते?

    काय म्हणाले ओवेसी? 

    एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीसुद्धा या घटनेला विरोध करत म्हटलं की,

    ” अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विकृतींचा आम्ही नेहमी विरोध करत आलो आहोत आणि करत राहणार. या लोकांचा इस्लाम धर्माशी काही एक संबंध नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतो.”

    तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

    नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

    Facebook : PoliticalWazir